14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा करा; खासदार मनोज तिवारी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 14 नोव्हेंबर ऐवजी 26 डिसेंबर रोजी बाल दिन साजरा करावा आणि त्यासाठी ‘बाल दिना’ची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.

मनोज तिवारी यांनी आपल्या पत्राद्वारे  म्हंटले आहे की, 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा केल्याने 10 वे शीख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन मुलांना श्रद्धांजली वाहिली जाईल.

“भारतात बरीच मुले आहेत ज्यांनी मोठे बलिदान दिले पण त्यापैकी साहिबाजादे जोरावर सिंह आणि साहिबजादे फतेह सिंग (गुरु गोबिंद सिंग यांचे पुत्र) यांनी केलेले बलिदान सर्वोच्च आहे. 1705 मध्ये या दिवशी त्यांनी पंजाबच्या सरहिंद येथे आपले प्राण अर्पण केले. त्यांचा शहीद दिवस बालदिन म्हणून साजरा केला पाहिजे, असे त्यांचे मत असल्याचे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे कारण असे केल्याने इतर मुलांना प्रेरणा मिळेल. आमच्या मुलांना अभिमान वाटेल आणि यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल,” असं मनोज तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

सध्या 14 नोव्हेंबरला भारताचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ बालदिन साजरा केला जातो.मनोज तिवारी यांचे पत्र दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत आले आहे. दिल्लीत शिखांमध्ये मतदारांचा महत्त्वपूर्ण अंश आहे.याशिवाय मुख्यमंत्रीपदासाठी मनोज तिवारी यांनाही भाजपमध्ये अग्रणी म्हणून पाहिले जात आहे.