3 शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू; मृतात दोन सख्खा बहिणी, पाणी पिण्यासाठी गेल्या अन्..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेमध्ये पूजा गरड आणि सानिका गरड या दोन सख्खा बहिणी आणि आकांक्षा वडजे या लहान मुलीचा करून अंत झाला आहे. गावापासून दीड किलिमिटर अंतरावर असणाऱ्या सदाशिव जगताप यांच्या शेतातळ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

या तिन्ही मुलींसोबत असणारी एक दहावर्षीय मुलगी सुदैवाने वाचली आहे. विशेष म्हणजे या मुली शाळा बुडवून सरपण वेचण्यासाठी शेतावर गेल्या होत्या. त्यात यांना तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी त्या शेतातळ्यात उतरल्या आणि पाय घासरून पाण्यात पडल्या. एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

हे पण वाचा –

पळून जाऊन लग्न करणे बेतले जीवावर; मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाची केली ‘ही’ अवस्था

महाराष्ट्रात लागणार मिनी लॉकडाऊन?; ‘असे’ असतील निर्बंध

घातपात, अपघात की आणखी काही? तरंगणारं चप्पल..काठावर मोबाईल अन् तलावात मृतदेह सापडला

Leave a Comment