Monday, December 8, 2025
Home Blog

Toll Rules In India : आता ‘या’ व्यक्तींना टोल भरावा लागणार नाही; सरकारचा नियम जाणून घ्या

Toll Rules In India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Toll Rules In India । प्रवास म्हंटल कि टोल हा भरावा लागतोच. आपल्या भारतात दुचाकीला टोल नाही, परंतु चारचाकी, ट्रक किंवा इतर गाडयांना टोल भरावा लागतो. टोल बाबत मागील काही दिवसांत सरकारकडून नवनवीन नियम जारी करण्यात आलेत. यातीलच एक नियम म्हणजे आता टोल प्लाजा पासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना टोल भरावा लागत नाही. म्हणजेच काय तर जर तुमचे घर टोल प्लाजा पासून जवळच असेल तर तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागणार नाही, तुमच्या पैशाची बचत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो प्रवाशांना फायदा होतोय.

२४ सप्टेंबर २०२४ पासून लागू झालेल्या ‘जितनी दूरी उतना टोल’, या धोरणांतर्गत (Toll Rules In India) जीएनएसएस प्रणालीद्वारे ट्रॅक केलेल्या वाहनांना २० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी टोल सूट लागू केली आहे. यासाठी आपल्याला निवासस्थानाचा पुरावा म्हणून अधिकृत कागदपत्र सादर करावे लागतील. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या नव्या धोरणाअंतर्गत एक खास प्रणाली ऍक्टिव्ह करण्यात आली आहे. या खास प्रणालीला जीएनएसएस प्रणाली असे संबोधले जाते आणि या प्रणाली द्वारे ट्रॅक करण्यात आलेल्या वाहनांना वीस किलोमीटरच्या परिघात टोल सुट लागू केली जाते. ज्यांचे घर तोल नाक्या पासून जवळ आहे अशा लोकांसाठी सरकारचा हा नवा टोल नियम फायदेशीर ठरतोय. Toll Rules In India

देशात कोणकोणत्या वाहनांना सूट ? Toll Rules In India

आपल्या भारतात अनेक गाडयांना तोल माफी मिळते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत वाहने, पोलीस वाहने, रूग्णावाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही टोलमधून सूट मिळतेय . तसेच भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वाहनांनाही कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जात नाही. शिवाय, एनडीआरएफच्या वाहनांनाही टोलमधून सूट आहे. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांसाठी अलीकडेच सरकारने टोल संदर्भात एक सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महामार्गांवर प्रवास करण्यासाठी आता एक विशेष पास उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३००० रुपयांचा हा वार्षिक पास असून या पासच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करू शकता.

Gold Rate Today : सोने- चांदीच्या किंमतीत बदल!! ग्राहकांना मोठा झटका

Gold Rate Today 8 dec

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today ८ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्याची किमतीत वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याचा भाव १,३०,४९४ वर उघडला. काल सोन्याचा व्यवहार १,३०,४६२ रुपयांवर बंद झाला होता. आज बाजाराच्या सुरुवातीला सोन्याच्या किमतीत किरकोळ वाढ बघायला मिळाली. तर दुसरीकडे चांदी मात्र ४५३ रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव सध्या 182950 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्यामुळे आज सोन्याचे दर (Gold Rate Today) वाढताना दिसत आहेत. अमेरिकेतील अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून देशातील कामगार बाजारपेठेत मंदी दिसून येते, ज्यामुळे आर्थिक सुलभतेची आशा आणखी बळावते. याव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे दावेदार जेरोम पॉवेल हे अधिक कठोर धोरण स्वीकारतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल असं बोललं जातंय. आज सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी सोन्याने १३०७६१ रुपयांचा उच्चांक गाठला. त्यानंतर सोन्याच्या किमती वर खाली जाऊ लागल्या. सध्या १२ वाजून ४० मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव १३०७२८ रुपये इतका आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Rate Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 1195500 रुपये
मुंबई – 119100 रुपये
नागपूर – 1195500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 130420 रूपये
मुंबई – 130420 रूपये
नागपूर – 130420 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

500 कोटी रुपयांत मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवरील नव्या आरोपाने खळबळ

Rahul and sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे संपूर्ण देशात निवडणुकीतील एकामागून एक पराभवाने अस्ताच्या दिशेने जात असलेली काँग्रेस (Congress) आता एका नव्या आरोपाने पुन्हा एकदा बॅकफूटवर गेली आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ५०० कोटी रुपये लागतात असा थेट आरोप नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवज्योत कौर सिद्धू यांनी केला आहे. सिद्धू यांच्या या आरोपाने विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे.

काय म्हणाल्या नवज्योत कौर सिद्धू?

नवज्योत कौर सिद्धू म्हणाल्या की, काँग्रेसने अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तरच त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू सक्रिय राजकारणात परततील. परंतु त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. त्यांनी आरोप केला की, जो कोणी ५०० कोटी रुपये असलेली सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. यावेळी त्यांनी असेही म्हंटल कि, त्यांना कोणीही पैसे मागितले नाहीत, परंतु सर्व व्यवस्था अशा प्रकारे काम करते. नवज्योत कौर सिद्धू पुढे म्हणाल्या, पंजाब काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, काँग्रेस पक्षातील किमान ५ नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. हेच नेते सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करू इच्छित नाहीत. आम्ही नेहमीच पंजाब आणि पंजाबतबद्दल बोलतो, परंतु मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आमच्याकडे ५०० कोटी रुपये नाहीत.

दरम्यान, नवज्योत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपांनंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेतृत्वाने कौर यांच्या गंभीर आरोपांचे स्पष्टीकरण द्यावे असे भाजपने म्हटले आहे. कौर यांच्या विधानाचा दाखला देत भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री होण्यासाठी किमान ५०० कोटी रुपये द्यावे लागतात, अन्यथा ते अशक्य आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला आहे. भ्रष्टाचार आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशातील जनतेने काँग्रेसपासून सावध राहिले पाहिजे. ते पक्षाच्या आत आणि बाहेर लोकशाहीचे शत्रू आहेत. कौर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पूर्णपणे उघडकीस आली आहे. काँग्रेसवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांनी त्यांच्या “कौरेज अँड कमिटमेंट” या पुस्तकात लिहिले आहे की, २००८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सर्व जागा सर्वाधिक बोली लावणाऱ्याला कशा लिलाव केल्या जात होत्या.

शिंदेंच्या उठावामुळेच भाजप सत्तेत; शंभूराज देसाईंनी दाखवला आरसा

eknath shinde devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी ‘पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, गोद में हम अपने घर के बच्चे को उठाते हैं’ असे सूचक विधान करत भाजपचाच महापौर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शिंदेंचे खास शिलेदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जुन्या इतिहासाचा दाखला देत मंगलप्रभात लोढा यांना प्रत्त्युत्तरं दिले आहे. एकनाथ शिंदेंच्या उठावामुळेच भाजप सत्तेत आली हे लोढा यांनी लक्षात ठेवाव असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

काय म्हणाले शंभूराज देसाई ?

प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, २०१४ नंतर जी राजकीय स्थित्यंतरे महाराष्ट्रात घडली, थोडं मंगल परभात लोळाली त्याच्याकडे सुद्धा पाठीमागे वळून बघितलं पाहिजे. कारण २०१४ ते २०१९, जेव्हा भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं, तेव्हा काय वस्तुस्थिती राज्यामध्ये होती हे आपण पाहिलं. पण २०१९ नंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली आणि ते झाल्यानंतर भाजप विरोधामध्ये बसली आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी करून सरकार केलं. त्यावेळची काय होती परिस्थिती, तर पूर्ण ताकदवान ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, हे करण्याचा प्रयत्न त्या महाविकास आघाडी सरकारमधून झाला.

नंतरच्या काळात जेव्हा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली. २०२२ ला आणि आम्ही ५० आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला. तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की, आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं. आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचे होतो. कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी विचारविनिमय करूनच घेत होते. आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि आपण बघितलं असेल की शिंदे साहेबांची गती, शिंदे साहेबांची वेगवान कामाची पद्धत, जागेवर निर्णय घ्यायची क्षमता, त्यामुळे महायुतीला २०२४ ला प्रचंड यश मिळालं असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.

Mumbai Local Train : मुंबईत उभारणार 2 नवी रेल्वे स्थानके; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र अजूनही लोकल प्रवास करता असताना मोठ्या गर्दीला सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेनचे जाळे आणखी विस्तारण्यासाठी सरकारकडून महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. याचाच भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण लाईनवर १० अतिरिक्त उपनगरीय ट्रेन सेवांना मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच मुंबईत २ नवी रेल्वे स्थानके उभारण्यात येणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? Mumbai Local Train

याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटल, मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. Mumbai Local Train

३ डिसेंबर रोजी, रेल्वे बोर्डाने पोर्ट लाईनवर एकूण दहा नवीन उपनगरीय सेवांना मान्यता दिली. तारघर आणि गव्हाण स्थानकांवरही थांब्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करणाऱ्या नेरुळ-उरण-नेरुळ मार्गासाठी चार आणि बेलापूर-उरण-बेलापूर मार्गासाठी सहा नवीन लोकल सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उरण कॉरिडॉरच्या वेगाने विकसित होणाऱ्या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत येथील लोकांना रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु अतिरिक्त सेवा आणि नवीन थांबे केवळ प्रवास आरामदायी बनवणार नाहीत तर गर्दी कमी करतील आणि नवी मुंबई आणि उरण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद प्रवास मिळेल. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे रस्त्यांवरील वाहनांची संख्या देखील कमी होईल.

Sharad Pawar Meet Baba Adhav : शरद पवार पूना रुग्णालयात दाखल; बाबा आढाव यांच्या प्रकृतीची विचारपूस

Sharad Pawar Meet Baba Adhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sharad Pawar Meet Baba Adhav । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाबा आढाव यांचावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. यादरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूना हॉस्पिटल मध्ये जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

खरं तर मागील १० दिवसांपासून बाबा आढाव यांच्यावर पूना रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन बाबा आढाव यांची भेट (Sharad Pawar Meet Baba Adhav) घेतली. बाबा आढाव यांच्यावर सध्या त्यांच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार चालू आहेत. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले आहे. आज आत्ता प्रकृती काळजी करण्यासारखी पण स्थिर आहे, असे बाबा आढाव यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

बाबा आढाव कोण आहेत Sharad Pawar Meet Baba Adhav

1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत. मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठं यश मिळालं . परंतू ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप करत बाबा आढाव यांनी ३ दिवसांसाठी आत्मक्लेश उपोषण केले होते. त्यावेळीही शरद पवार यांनी उपोषणस्थळी जाऊन बाबा आढाव यांची भेट घेतली होती.

बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या दिवशी पूर्ण होणार; फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबडेकर महापरिर्निवाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या अनुयायांचा जनसागर उसळला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक कधी पूर्ण होईल याचे अपडेट्स फडणवीसांनी दिले. पुढच्या वर्षी 6 डिसेंबरपर्यंत हे स्मारक पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षभरात इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक हे पुढील महापरिनिर्वाण दिनापर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामध्ये 450 फूट उंचीचा त्यांचा पुतळा असेल. हे स्मारक डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारकाचे 50% काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे. शंभर फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे. या स्मारकातील प्रवेशद्वार इमारत, संशोधन केंद्र, वाचनालय, प्रेक्षागृह, वाहनतळाची शंभर टक्के स्ट्रक्चरल कामे झाली आहेत. सध्या या प्रकल्पातील अंतर्गत सजावटीची कामे प्रगतीपथावर असून, बाह्य विकासाची कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे येत्या वर्षभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक खुले होणार आहे असं फडणवीस यांनी म्हंटल.

बाबासाहेबांची वैचारिक दृष्टी मोठी होती. आपल्या देशात समाजात एक प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. या विषमतेला आपली शक्ती बनवून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केले आणि समाजाला जागृत केल आणि या देशाला संविधान दिले. त्यामुळेच आपला भारत देश प्रगती करू शकला, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा दिला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार? सरकार देणार डबल गिफ्ट

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र आता महिलांच्या खात्यात १५०० ऐवजी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित ३००० रुपये महिलांना देईल अशा चर्चा सुरु आहेत. असं झाल्यास नवीन वर्षांपूर्वीच महिलांना मोठं गिफ्ट मिळेल.

खरं तर सध्या डिसेंबर महिना सुरु झाला आहे. परंतु निवडणुकीमुळे आचार संहिता लागली आणि लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) हप्ता लांबला. डिसेंबरला सुरुवात होऊनही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिला निराश असून १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र आता नाराज महिलांना पुन्हा खुश करण्यासाठी सरकार नोव्हेंबर आणि डिसेबर अशी दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितपणे बँक खात्यात जमा करेल असे बोलले जात आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पुढच्या आठवड्यात हे ३००० रुपये महिलांना मिळतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

E-KYC गरजेची Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या

सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा

होम पेजवरील E-KYC वर क्लिक करा. आता E-KYC फॉर्म उघडेल

या फॉर्ममध्ये तुमचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा.

आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या. ओटीपीवर क्लिक करा

आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

हा ओटीपी सबमिट करा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. थेट डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेमुळे महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.

Amba Ghat Bus Accident : आंबा घाटात भीषण अपघात!! बस 100 फूट दरीत कोसळली

Amba Ghat Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amba Ghat Bus Accident । महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दोन दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कराड तालुक्यात विद्यार्थ्यांची सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली होती. आता कोकणातून अपघाताची भीषण घटना घडल्याचे समोर आली आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या २ जिल्ह्याना जोडणारा महत्वपूर्ण अशा आंबा घाटात प्रवासी बस १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. आज पहाटे हा भीषण अपघात झाला, प्रवासी साखरझोपेत असतानाच हि घटना घडली. विशेष म्हणजे सुदैवाने कोणतीही जिवितहानी या अपघातात झालेली नाही.

कसा झाला अपघात ? Amba Ghat Bus Accident

या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आलेले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच प्रवासादरम्यान, आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून १०० फूट खोल दरीत कोसळली (Amba Ghat Bus Accident) . गाडीत ११५ प्रवासी बसवले होते. सर्वजण रात्री साखरझोपेत होते, त्याचवेळी घाटात चालकाचा डोळा लागला आणि बस त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली असं बोललं जात आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशांचा जीव वाचला, कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता.

या अपघाताची (Amba Ghat Bus Accident) माहिती मिळताच साखरपा पोलिस व आंब्यातील तरुणाचे मदत पथक आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आलं असून सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? यामागे आणखी काही कारणे आहेत का याचा अंधुक तपास पोलिसांकडून सुरु आहे. बसमधील प्रवासी क्षमता ६० प्रवाशाची असताना ११५ प्रवासी म्हणजे जवळपास दुप्पट प्रवासी बस मध्ये कसे काय बसले हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, धित बस मध्यप्रदेशातील भिंड येथील असल्याचे समोर आले आहे.

Gold Rate Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या!! ग्राहकांच्या खिशाला झळ

Gold Rate Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today । भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ बघायला मिळाली. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरु असताना दुसरीकडे सोन्याच्या किमतीवर मात्र मोठा परिणाम पाहायला मिळतोय. सोन्याच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतोय. आज ५ डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 127581रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.22 टक्के म्हणजेच 281 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे चांदी तब्बल 3523 रुपयांनी महाग झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव सध्या 181661 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.

आज सोन्याच्या किमतीत चढ-उतार का होत आहे? Gold Rate Today

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्यामुळे आज सोन्याचे दर (Gold Rate Today) वाढताना दिसत आहेत. अमेरिकेतील अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून देशातील कामगार बाजारपेठेत मंदी दिसून येते, ज्यामुळे आर्थिक सुलभतेची आशा आणखी बळावते. याव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे दावेदार जेरोम पॉवेल हे अधिक कठोर धोरण स्वीकारतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल असं बोललं जातंय. Gold Rate Today

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव –

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 119100 रुपये
मुंबई – 119100 रुपये
नागपूर – 119100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 129930 रूपये
मुंबई – 129930 रूपये
नागपूर – 129930 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.