Tuesday, June 3, 2025
Home Blog

Train to Kashmir : डोंगर, दहशत आणि धैर्य: काश्मीरपर्यंतची रेल्वे ही केवळ लोहरेषा नाही, ती संघर्षाची साक्ष आहे

Train to Kashmir : भारताच्या हृदयातून काश्मीरपर्यंत धावणारी रेल्वे केवळ तांत्रिक चमत्कार नाही, ती एक संवेदनशील संघर्षाची सजीव साक्ष आहे. ऊधमपूर ते बारामुल्ला असा हा प्रकल्प देशातील सर्वात कठीण भूभागातून, प्रतिकूल हवामानातून, आणि सततच्या दहशतवादाच्या सावटातून तयार झाला आहे.

हे रेल्वे जाळं पूर्ण व्हायला जवळपास एक शतकाचा कालावधी लागला. स्वातंत्र्यपूर्व काळात राजा प्रताप सिंहांनी याचे स्वप्न पाहिले होते, परंतु प्रत्यक्षात त्याची पायाभरणी २००३ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात झाली. त्यानंतर वर्षानुवर्षे या प्रकल्पाने संकटांची सावली झेलली … कधी डोंगरफुटी, कधी निधीअभावी थांबलेले काम, आणि कधी दहशतवादाच्या छायेखाली झगडणारे कामगार.

दहशतवादाच्या काळोखातही पेटता राहिला विकासाचा दिवा

या प्रकल्पाचा सर्वात काळा अध्याय म्हणजे वर्ष २००४ मध्ये झालेली एक भीषण घटना. श्रीनगरमध्ये रेल्वे प्रकल्पावर काम करणाऱ्या एका अभियंत्याला आणि त्याच्या भावाला दहशतवाद्यांनी अपहरण करून ठार मारले. या घटनेने संपूर्ण प्रकल्पाला हादरा बसला. त्यानंतर अनेक वेळा श्रमिकांनी काम थांबवले, सुरक्षा रक्षकांच्या छावणीतच काम चालू राहिले. या रेल्वेमार्गावर १२ पेक्षा जास्त कामगार विविध अपघातांमध्ये आपले प्राण गमावून बसले. कुणाचं नाव वर्तमानपत्रातही झळकलं नाही पण त्यांच्या हाताने घडलेली ही वाट, हजारो लोकांसाठी आता जगण्याचा नवा मार्ग बनते आहे.

भूगर्भातील आव्हाने, डोंगरांचा प्रतिकार आणि निसर्गाचा असहकार

ही केवळ तांत्रिक प्रगती नव्हती, ही होती भूगर्भातील अनिश्चिततेशी लढाई.३३ नंबरच्या सुरंगात* पाण्याचे झरे सतत झिरपत होते, त्यामुळे काम वारंवार थांबावे लागत होते. उंच डोंगरात साहित्य पोहोचवण्यासाठी अनेक एप्रोच रोड्स बांधावे लागले. काही ठिकाणी केवळ एक फावडे चालवायला एक तास लागायचा तिथे एका-एका इंचात वाट मोकळी करण्यात वर्षे निघून गेली.

तरीही, या सगळ्या संकटांमधून ही रेल्वे लाईन उभी राहिली … 36 बोगदे, 943 पूल, चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज, आणि देशातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल ही तिची वैभवशाली लक्षणं आहेत.

प्रकल्प फक्त भौगोलिक नव्हे, तर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्याही कठीण

या रेल्वेच्या रेषांवर चालणारी प्रत्येक ट्रेन त्या कामगारांच्या स्वप्नांची आणि त्यांच्या कुटुंबांच्या अश्रूंनी सजलेली आहे. कोरोना महामारीच्या काळातही काम थांबलं, अनेक कामगार स्थलांतरित झाले. परंतु कामाचा ध्यास घेऊन काही अभियंते आणि टीम्स दिवसरात्र कडाक्याच्या थंडीत, अंधाऱ्या बोगद्यांमध्ये काम करत राहिल्या.

काश्मीरच्या प्रगतीचा नवा अध्याय

आज ही रेल्वे सेवा फक्त प्रवास सुलभ करत नाही, ती काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला नवे पंख देते. स्थानिक शेती, हस्तकला, पर्यटन आणि उद्योगांना देशभरात पोहोच मिळेल. याशिवाय, जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक भारही कमी होईल. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, जेव्हा महामार्ग बंद झाला होता, तेव्हा याच रेल्वेने सुरक्षा दलांचं हालचाल सुकर केली होती.

एक ट्रेन… हजारो स्वप्नांची दिशा

ऊधमपूर ते श्रीनगरपर्यंत धावणारी ही ट्रेन म्हणजे फक्त प्रवासाची साधनं नाही . ती देशाच्या धैर्याची, तंत्रज्ञानाची आणि एकात्मतेची चालती प्रतीकं आहे. या प्रकल्पात जे जे योगदान दिलं, त्यामध्ये काही नावं गाजली, काही विसरली गेली… पण त्यांच्या योगदानाशिवाय ही रेल्वे शक्यच नव्हती. काश्मीरला जोडणाऱ्या या रेषा खरंतर स्वप्नांना मार्ग दाखवणाऱ्या वाटा आहेत. काश्मीरसाठी ही ट्रेन एक नव्या उगमाची सुरुवात आहे. आणि भारतासाठी ती आहे अखंडतेची रेल्वे, जी डोंगर पार करते, पण मनं जोडते.

“पाकिस्तानला 48 तास युद्ध हवे होते, पण 8 तासांतच मान टाकली!” ; CDS अनिल चौहान यांचा मोठा खुलासा

भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘फ्युचर वॉर्स अँड वॉरफेअर’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत पाकिस्तानविरोधातील एका गुप्त ऑपरेशनविषयी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी उघड केलं की पाकिस्तानने भारताला ४८ तासांत गुडघ्यावर आणण्याचा कट रचला होता, पण केवळ ८ तासांतच त्यांनी सरेंडर केलं

ऑपरेशन ‘सिंदूर’चं गुप्त पर्व

१० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानने भारतावर दबाव टाकण्यासाठी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी विविध हल्ले सुरू केले होते. जनरल चौहान यांनी सांगितले की, “त्यांचा हेतू भारताला ४८ तासांत गुडघ्यावर आणण्याचा होता. मात्र भारताने केवळ दहशतवादी तळांवर अचूक कारवाई करत त्यांच्या योजनेला छेद दिला.”

पाकिस्तानचं तात्काळ सरेंडर

CDS म्हणाले, “सुरुवातीला पाकिस्तानकडून ही कारवाई ४८ तास चालवण्याचा विचार होता. पण केवळ ८ तासांमध्येच त्यांनी फोन करून चर्चेची मागणी केली.” पाकिस्तानला कळून चुकलं की, जर युद्ध झालंच, तर पराभव अटळ आहे.

आतंकवाद हे युद्धाचं योग्य माध्यम नाही

CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले की, “ही संपूर्ण झुंज पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून सुरू झाली होती. पण आतंकवाद हा युद्धाचा योग्य मार्ग नाही. त्याला कोणतेही स्पष्ट नियम नाहीत. आमचा शत्रू भारताला इजा पोहोचवू इच्छित होता, मात्र तो यात पूर्णपणे अपयशी ठरला.”

भारताने आखली नव्या युद्धरेषा

चौहान यांनी युद्धाच्या तत्त्वज्ञानावर भाष्य करत सांगितले की, “युद्ध हे जितकं जुनं आहे, तितकीच जुनी मानवी संस्कृती आहे. त्यात हिंसा आणि त्या हिंसेमागे असलेली राजकीय भूमिका हे दोन मुख्य घटक असतात. भारताने आताच्या संघर्षात एक नवी युद्धरेषा आखली आहे जी आतंकवादाच्या विरोधात स्पष्ट आणि निर्णायक आहे.”

ही माहिती म्हणजे भारताच्या सैन्यदलाच्या अचूक रणनीती आणि सर्जनशील कारवाईचं जिवंत उदाहरणआहे. पाकिस्तानच्या कटांना धुळीला मिळवत, भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की संविधानिक शांततेच्या आधारावर उभा असलेला देश कधीही झुकत नाही, पण धोका आला तर झुकूही देत नाही.

AI मुळे लोकसंख्या घटणार; पृथ्वीवर फक्त 10 कोटी माणसे राहणार

AI Population

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजेच आर्टिफिशल इंटीलिजन्सचा वापर आजकाल प्रत्येक क्षेत्रात केला जातो. AI मुळे माणसाच्या अनेक गोष्टी सोप्प्या झाल्या आहेत, अनेक कामे पटापट होत आहेत. मात्र हेच AI हे माणसासाठी घातक असून त्याच्यामुळे नोकऱ्यांवर गदा येईल अस मानणारा सुद्धा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे एआय वर सातत्याने संशोधन होत असत, तसेच त्याचे फायदे तोटे आजही निरखून बघितले जातात. त्यातच आता AI बद्दल खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. AI मुळे लोकसंख्या घटण्याची शक्यता असून २३०० पर्यंत पृथ्वीवर फक्त १० कोटी माणसे राहू शकतात असं भाकीत अमेरिकेतील एका तज्ज्ञाने केला आहे.

ओक्लाहोमाच्या स्टिलवॉटर येथील ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संगणक विज्ञान शिकवणारे सुभाष काक असं या तज्ञाचे नाव आहे. न्यू यॉर्क पोस्टनुसार, काक यांनी म्हंटल, कि जागतिक समाजासाठी AI हे विनाशकारी ठरणार आहे, लोकांना याची साधी जाणीवही नाही. संगणक किंवा रोबोट कधीही जाणीवपूर्वक काम करणार नाहीत, परंतु ते आपण जे करतो तेच ते करतील कारण आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो ते बहुतेक बदलले जाऊ शकते, आपल्या कामाची जागा AI घेऊ शकते असं सुभाष काक यांनी म्हंटल.

एआय मुळे माणसाचा जन्मदर कमी होईल कारण लोक बेरोजगार राहण्यासाठी तयार असलेली मुले जन्माला घालण्यास इच्छुकच नसतील. जागतिक लोकसंख्येला यामुळे मोठा धक्का बसेल. जर लोकांनी आपत्य घालण्याचेच बंद केलं तर आपोआपच जगाची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात कमी होईल आणि २३०० पर्यंत पृथ्वीवर फक्त १० कोटींचं माणसे राहू शकतील असं काक यांनी म्हंटल. यावेळी त्यांनी युरोप, चीन, जपान आणि दक्षिण कोरियामधील घटलेल्या लोकसंख्येचं उदाहरण दिले. मी असे म्हणत नाही की हे ट्रेंड चालू राहतील, परंतु त्यांना उलट करणे खूप कठीण आहे कारण बरेच लोक विविध कारणांमुळे मुले जन्माला घालतात असेही शेवटी सुभाष काक यांनी सांगितलं.

JIO : चा जबरदस्त धमाका ! फक्त 601 रुपयांमध्ये मिळवा संपूर्ण वर्षभर अनलिमिटेड 5G इंटरनेट

JIO : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक लै भारी आणि खिशाला परवडणारी इंटरनेट सेवा आणली आहे. केवळ ₹601 मध्ये ग्राहकांना संपूर्ण वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट वापरण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कोणतीही डेटा लिमिट नाही म्हणजेच तुम्ही जितका हवा तितका डेटा वापरू शकता, तोही पूर्ण वेगाने आणि अखंड सेवा अनुभवत चला तर मग जाणून घेऊया…

काय आहे ₹601 चा खास प्लान? (JIO)

Jio चा हा 601 रुपयांचा प्लान त्या ग्राहकांसाठी आहे, ज्यांना वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय 5G इंटरनेटचा वापर करायचा आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना १२ महिन्यांचे 5G अपग्रेड वाउचर्स दिले जातात. हे वाउचर्स वापरून ग्राहक त्यांच्या चालू असलेल्या इंटरनेट प्लानवर अनलिमिटेड 5G डेटा सक्रिय करू शकतात. या वाउचर्समुळे ग्राहकांना नव्याने दर महिन्याला 5G प्लान खरेदी करण्याची गरज भासत नाही. याशिवाय हा प्लान गिफ्ट म्हणून देखील दिला जाऊ शकतो, त्यामुळे आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना फायदेशीर इंटरनेट सेवा देता येते.

पण काही अटी पाळणे गरजेचे…

या प्लानचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, ग्राहकाकडे 5G फोन असणे गरजेचे आहे.जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करत नसेल, तर तुम्ही या प्लानचा उपयोग करू शकणार नाही. त्याचप्रमाणे, तुमच्या परिसरात Jio चा 5G नेटवर्क उपलब्ध असणेही आवश्यक आहे.अन्यथा, सेवा मिळणार नाही.

त्याचबरोबर, 601 रुपयांचा हा प्लान बेस प्लानवर अपग्रेड स्वरूपात काम करतो. म्हणजेच, ग्राहकाने स्वतंत्रपणे एक डेटावाला बेस प्लान घेतलेला असावा. हा प्लान किमान 1.5GB/दिवस डेटा असलेला असावा, म्हणजेच ग्राहकाचा सध्याचा रिचार्ज प्लान सक्षम असणे गरजेचे आहे. एकदा बेस प्लान सक्रिय झाल्यानंतर ग्राहक 5G वाउचर्स रिडीम करू शकतात.

कोणासाठी आहे हा प्लान?

हा प्लान प्रामुख्याने हाय डेटा युजर्स, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, ऑनलाईन शिकणारे विद्यार्थी आणि मोठ्या प्रमाणावर इंटरनेट स्ट्रीमिंग करणारे युजर्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच, वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करून नंतर वारंवार रिचार्ज करण्याची गरज न पडल्यामुळे, वेळ आणि पैशांची बचतही होते.

जिओकडून डिजिटल भारताची वाटचाल…

Jio ने या प्लानद्वारे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतात दर्जेदार आणि वेगवान इंटरनेट सेवा प्रत्येक सामान्य नागरिकाच्या आवाक्यात आणणे शक्य आहे. 601 रुपयात वर्षभर 5G सेवा देऊन कंपनीने टेलिकॉम स्पर्धेत आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे.रिचार्ज करण्यापूर्वी खात्री करा की तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि तुम्ही अशा परिसरात आहात जिथे Jio चे 5G नेटवर्क उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी Jio च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा Jio अ‍ॅप वापरा.

Katra Srinagar Vande Bharat Express : आता रेल्वेनेच वैष्णो देवी दर्शनानंतर थेट श्रीनगरची सैर! मोदींच्या हस्ते ‘या’ तारखेपासून सुरुवात

Katra Srinagar Vande Bharat Express : देशभरातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर थेट काश्मीरपर्यंतचा प्रवास रेल्वेने शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी कटऱ्याहून श्रीनगरकडे जाणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या ऐतिहासिक रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर उत्तर भारतातील धार्मिक आणि पर्यटन यात्रा अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे.

दरवर्षी देशभरातून सुमारे एक कोटी भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यातील अनेक जण काश्मीर पाहण्यासाठी इच्छुक असतात, मात्र कटऱ्यापुढे रेल्वेसेवा नसल्यामुळे ते परतीचा मार्ग धरतात. ही अडचण आता दूर होणार असून, कटऱ्यापासून थेट श्रीनगरपर्यंत रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

काश्मीरला पर्यटनाला चालना (Katra Srinagar Vande Bharat Express )

या नव्या वंदे भारत मार्गामुळे केवळ भाविकांना नव्हे, तर काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे. गेल्या काही काळात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे थोडीशी मरगळ आलेली असली, तरी आता रेल्वेसेवेमुळे पुन्हा एकदा काश्मीर पर्यटकांनी गजबजण्याची शक्यता आहे. याशिवाय ३ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री अमरनाथ यात्रेदरम्यान भोलेबाबाच्या भक्तांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भाविकांना श्रीनगरपर्यंत आरामदायी आणि वेगवान प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

वंदे भारतमुळे व्यवसाय आणि स्थानिकांना थेट लाभ

नवीन रेल्वेमार्गामुळे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनाही थेट फायदा होणार आहे. स्थानिक बाजारपेठा, हॉटेल व्यवसाय, टॅक्सी सेवा आणि पर्यटनाशी संबंधित अनेक क्षेत्रांना नवसंजीवनी मिळणार आहे.

गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई फक्त 40 मिनिटांत? सुरु होतेय वॉटर टॅक्सी

सुरक्षा व्यवस्था कडक

पंतप्रधान मोदींच्या ६ जूनच्या कटरा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. कटरा रेल्वे स्थानक परिसरात विशेषरित्या तयार केलेला हेलीपॅड अंतिम टप्प्यात आहे. रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, रेल्वे स्थानकावर रंगरंगोटी करून परिसर झळाळून निघाला आहे.

सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासन अत्यंत सतर्क असून, कटरा-श्रीनगर रेल्वे ट्रॅकवर सुरक्षा जवानांची कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. पीएम मोदींचे भाषण श्राइन बोर्डच्या स्टेडियममध्ये होणार असल्यामुळे तेथील लोकांची वर्दळ सुद्धा बंद करण्यात आली आहे.काश्मीर आणि कटऱ्याला जोडणारी ही वंदे भारत सेवा केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही क्रांतिकारी पाऊल आहे. यामुळे संपूर्ण उत्तर भारताला आणि विशेषतः जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला नवीन बळ मिळणार आहे.

ST कर्मचाऱ्यांना येणार ‘अच्छे दिन’ ? 53% महागाई भत्त्याची शक्यता, वैद्यकीय योजनेत मोठ्या सुधारणा

राज्याच्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून थांबलेला महागाई भत्ता अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 53% महागाई भत्ता लागू करण्याचा विचार सुरू आहे. इतकंच नव्हे, तर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय योजनेतही ऐतिहासिक बदल होणार असून ओपीडीसारख्या दैनंदिन खर्चासाठीही आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी काही सकारात्मक घडामोडी घडताना दिसत आहेत. 2018 पासून थकीत असलेला महागाई भत्ता आता अखेर जाहीर होण्याच्या टप्प्यावर आहे. सध्या 46% असलेला भत्ता थेट 53% वर नेण्याची तयारी सुरू असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.

राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना 53% महागाई भत्ता लागू केला आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनीही समान न्याय देण्याची जोरदार मागणी केली होती. यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाली, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आपली बाजू मांडली.

महागाई भत्त्याच्या वाढीबरोबरच आणखी एक महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे — वैद्यकीय योजनेत मोठा बदल. सध्या ही योजना फक्त काही निवडक उपचारांपुरती मर्यादित आहे. मात्र, नव्या प्रस्तावित योजनेत ओपीडीसाठीही खर्चाची परतफेड होणार असल्याने कर्मचाऱ्यांना दररोजच्या आरोग्य गरजांमध्ये मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय, ही योजना ‘कॅशलेस’ पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

आकडेवारी

  • एसटी महामंडळाचे सध्याचे मासिक उत्पन्न अंदाजे ₹660 कोटी ते ₹700 कोटींच्या दरम्यान आहे.
  • कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरमहा ₹440 कोटींची गरज असते, तरीही पगार वेळेवर होत नाही.
  • 2018 पासून महागाई भत्ता थकीत असून, सध्या 56% पर्यंत भत्त्याचे देणे बाकी आहे.
  • कर्मचारी पगार सात तारखेला होण्याऐवजी अनेकदा उशिरा म्हणजे 8, 9 किंवा 10 तारखेला होतो.
  • तालुकास्तरावर घरभाडे भत्ता 8% असताना केवळ 7% दिला जातो तोही वेळेवर मिळत नाही.
  • 36 प्रकारच्या सवलती एसटीने प्रवाशांना दिल्या आहेत, मात्र त्याची भरपाई सरकार करत नाही.

कर्मचाऱ्यांचा रोष आणि अपेक्षा

एसटी कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी आपले प्रश्न आणि मागण्या शासनापुढे ठामपणे मांडल्या आहेत. महागाई भत्ता थकीत असणे, पगार वेळेवर न मिळणे, आणि वैद्यकीय सुविधांची अपुरी अंमलबजावणी या बाबींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यामुळे यावेळी केवळ घोषणा न करता ठोस निर्णय घेतले जाणे अत्यावश्यक ठरणार आहे.

महागाई भत्ता वाढ आणि वैद्यकीय सुविधांमधील सुधारणा या दोन निर्णयांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सकारात्मक बदल होऊ शकतो. सरकारकडून लवकरच यावर अंतिम घोषणा होण्याची शक्यता असून, अनेकांचे लक्ष या निर्णयांकडे लागून आहे. आता पाहावे लागेल की सरकारचा ‘अच्छे दिन’चा नारा एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्षात उतरतो का!

IPL 2025 Final Prediction : कोण जिंकणार IPL 2025? अखेर AI ने सांगूनच टाकलं

IPL 2025 Final Prediction

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन IPL 2025 Final Prediction आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ चा अंतिम सामना आहे. रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि पंजाब किंग्स मध्ये ट्रॉफी साठी काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघानी आजपर्यंत एकदाही आयपीएल चषक न जिंकल्याने आयपीएल ला यंदा नवा विजेता मिळणार हे तर फिक्स आहे. आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघाच्या चाहत्यांनी विजयासाठी देव पाण्यात ठेवलेत. विराटची आरसीबी आपला दमदार फॉर्म कायम ठेवत पंजाबला धुळ चारणार कि मुंबईला बाहेर केल्यानंतर आता विराट कोहलीलाही पंजाबचे वाघ धक्का देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य आहे. तत्पूर्वी अनेकांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात AI ला हा प्रश्न विचारला… त्यावर एआयने दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

तस बघितलं तर, आयपीएल फायनल बाबत ChatGPT, Google Gemini आणि Groke सारख्या वेगवेगळ्या एआय प्लॅटफॉर्मनी जवळपास एकसारखाच अंदाज वर्तवला आहे. एआयनुसार, आरसीबीला आयपीएल २०२५ चा अंतिम सामना (IPL 2025 Final Prediction) जिंकण्याची संधी आहे. काही एआय प्लॅटफॉर्म पंजाब किंग्जला सुद्धा काही कमी लेखत नाहीत, परंतु आरसीबीच जिंकण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Grok चा अंदाज काय? IPL 2025 Final Prediction

सर्वात आम्ही grok ला याबाबत विचारलं तर त्याने म्हंटल कि, RCB कडे विजेतेपद जिंकण्याची थोडी अधिक शक्यता आहे. याचे कारण त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये PBKS वर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता, आणि त्यांचा संघ सध्याच्या फॉर्म, खेळाडूंची क्षमता आणि अनुभव यामुळे संतुलित दिसतो. विशेषतः विराट कोहली, रजत पाटीदार यांच्यासारखे फलंदाज आणि जोश हेजलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्यासारख्या गोलंदाजांमुळे RCB चा संघ खूपच मजबूत वाटतोय. PBKS ची लढाऊ वृत्ती आणि पावसाची शक्यता यामुळे सामना चुरशीचा होऊ शकतो हे खरं असलं तरीही आरसीबीच्या विजयाची गॅरेंटी ६० टक्के राहतेय.

यानंतर ChatGPT ला आयपीएल फायनल मध्ये कोण जिंकेल (IPL 2025 Final Prediction) असं विचारलं असता त्यानेही आपलं मत आरसीबी च्या पारड्यात टाकलं. आरसीबीचा सध्याचा फॉर्म आणि पंजाब विरुद्धचा मागच्या सामन्यातील रेकॉर्ड बघता आरसीसीबीचे पारडं जड असल्याचं मत ChatGPT ने व्यक्त केलं… परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखू शकत नाही. पंजाब किंग्जची अलीकडील कामगिरी आणि श्रेयस अय्यरचे नेतृत्व यांचं मोठं आव्हान आरसीबी समोर असेल असं सांगायलाही ChatGPT विसरलं नाही.

पावसाळ्यात बाथरूममध्ये घुसतात गांडूळ-गोम? जाणून घ्या घरगुती आणि नैसर्गिक उपाय

पावसाळा हा ऋतू अनेकांसाठी आनंददायक असतो. थंडावा, हिरवळ, गरम चहा आणि भजी यांची मजा. मात्र या ऋतूसोबतच एक त्रासदायक गोष्टही अनेक घरांमध्ये दिसून येते, ती म्हणजे गांडूळ, गोम, कीटक, झुरळे, आणि इतर रेंगाळणारे प्राणी बाथरूम, स्वयंपाकघर, गच्ची किंवा ड्रेनेजजवळ दिसू लागतात. विशेषतः जिथे ओलावा जास्त असतो, तिथे हे प्राणी जास्त प्रमाणात आढळतात.

या प्राण्यांचा त्रास केवळ बघण्यास असह्य नसतो, तर त्यांच्यामुळे घरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्याचे धोकेही निर्माण होतात. मुलं घरात खेळताना यांच्याशी संपर्कात येऊ शकतात, त्यामुळे योग्य उपाय करणं अत्यावश्यक ठरतं.

गांडूळ आणि गोम घरात का येतात?

पावसाळ्यात जमिनीतील ओलावा वाढल्यामुळे गांडूळ आणि इतर कीटकांना निवारा मिळवण्यासाठी कोरड्या आणि सुरक्षित जागेची गरज भासते. घरातील बाथरूम, वॉश बेसिनजवळची जागा, ड्रेनेज, टॉयलेटच्या फटी, आणि गॅसपाईपच्या मागच्या कोपऱ्यांमध्ये त्यांना सहज प्रवेश मिळतो.ओलसरता, अन्नाचे उरलेले कण, उष्णता आणि अंधाऱ्या जागा हे सगळे घटक त्यांच्या वस्तीच्या दृष्टिकोनातून योग्य ठरतात.

बाजारात मिळणाऱ्या स्प्रेमध्ये धोके काय आहेत?

बाजारात मिळणाऱ्या कीटकनाशकांमध्ये केमिकल, कृत्रिम सुगंधी द्रव्ये आणि विषारी पदार्थ असतात. हे स्प्रे कीटकांना काही वेळासाठी नष्ट करतात खरे, पण घरातील लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात. पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक असतात. हवेत विषारी रसायनांचा परिणाम होतो. काही वेळाने कीटक पुन्हा परत येतात. म्हणूनच आता लोक प्राकृतिक, घरगुती उपायांकडे वळू लागले आहेत, जे दीर्घकाळ टिकतात, सुरक्षित असतात आणि प्रभावीही.

घरच्या घरी बनवा नैसर्गिक स्प्रे

तुमच्या स्वयंपाकघरातच काही सोपी सामग्री वापरून तुम्ही एक प्रभावी स्प्रे तयार करू शकता, जो गांडूळ, गोम आणि अशा प्रकारच्या कीटकांना दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरतो.

लागणारी साहित्ये

  • तुरटी पावडर (Alum Powder) – १ चमचा
  • मीठ (सामान्य स्वयंपाकात वापरले जाणारे) – २ चमचे
  • काळी मिरी पूड (Black Pepper Powder) – १ चमचा
  • पाणी (कोमट पाणी असेल तर अधिक उत्तम) – १ लिटर तयार करण्याची प्रक्रिया
  1. एका स्वच्छ भांड्यात १ लिटर पाणी घ्या.
  2. त्यात तुरटी पावडर, मीठ आणि काळी मिरी पूड टाका.
  3. हे मिश्रण नीट ढवळा, जेणेकरून सर्व घटक व्यवस्थित एकत्र होतील.
  4. आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.

कसा वापराल हा स्प्रे?

  • स्प्रे बॉटलमधील मिश्रण दर दोन दिवसांनी घरातील ओलसर जागांवर फवारा.
  • विशेषतः बाथरूममधील कोपरे, सिंकजवळची जागा, टॉयलेट मागे, ड्रेनेजजवळ आणि दरवाजांच्या चौकटी इत्यादी ठिकाणी लक्षपूर्वक फवारा करा.
  • सतत १ आठवडा वापरल्यानंतर तुम्हाला कीटकांची संख्या कमी होत असल्याचं लक्षात येईल.
  • नियमित वापर केल्यास हे प्राणी पूर्णपणे दिसेनासे होतात.

या उपायाचे फायदे

फायदेवर्णन
नैसर्गिककेमिकल-मुक्त, पर्यावरणपूरक
सुरक्षितलहान मुले व पाळीव प्राण्यांसाठी घातक नाही
स्वस्तघरच्या घरी बनवता येतो
प्रभावीसातत्याने वापरल्यास कायमचा परिणाम
दुर्गंधी निवारणकाळी मिरी आणि तुरटीमुळे दुर्गंधीही कमी होते

स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी?

  • दररोज बाथरूम स्वच्छ करा व कोरडं ठेवा
  • गळणाऱ्या नळांचे दुरुस्ती करा
  • स्वयंपाकघरातील उरलेले अन्न झाकून ठेवा
  • ओलसर कपडे तिथेच टांगू नका
  • ड्रेनेजजवळ ब्लीचिंग पावडर किंवा तुरटी टाकत राहा

पावसाळ्यात घरात होणारा कीटकांचा त्रास अगदी सामान्य असला तरी योग्य उपाय केल्यास तो सहज टाळता येतो. वर दिलेला घरगुती स्प्रे हा एक नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी पर्याय आहे. केमिकलचा वापर न करता घर स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपाय नक्की करून बघा.तुमचं घर स्वच्छ, कीटकमुक्त आणि निरोगी ठेवण्याची ही एक सोपी आणि शाश्वत पद्धत आहे.

Indian Airports : देशात आणखी 50 विमानतळ उभारणार; कनेक्टिव्हिटी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार

Indian Airports

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Airports । पुढील ५ वर्षांत देशात ५० पेक्षा जास्त विमानतळे उभारण्यात येतील अशी माहिती केंद्रीय मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना नायडू यांनी भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीवर प्रकाश टाकताना वरील विधान केलं. .ही योजना उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेचा भाग आहे, ज्याचा उद्देश हवाई वाहतूक परवडणारी आणि सुलभ करणे, तसेच टियर-2 आणि टियर-3 शहरांना हवाई संपर्क जोडणे आहे. या योजनेचं कौतुक करताना सरकारच्या प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी योजनेने हवाई प्रवासाचे लोकशाहीकरण केले आहे आणि एकूण 619 हवाई मार्ग कार्यान्वित केले आहेत असेही नायडू यांनी म्हंटल.

11 वर्षात विमानतळाची संख्या दुप्पट – Indian Airports

सध्या भारतात १६२ विमानतळ आहेत. २०१४ मध्ये देशात फक्त ७४ विमानतळ होते. म्हणजेच काय तर मागील ११ वर्षात मोदी सरकारच्या काळात देशातील विमानतळाची संख्या दुप्पट झाली आहे. आता येत्या ५ वर्षात यात आणखी ५० विमानतळांची (Indian Airports) वाढ होणार आहे. भारताला विमानांच्या ‘देखभाल, दुरुस्ती आणि दुरुस्ती’ (MRO) चे केंद्र बनवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत आणि 2031 पर्यंत या क्षेत्राचे मूल्य चार अब्ज डॉलर्स होण्याचा अंदाज आहे अशी माहितीही मंत्री के राममोहन नायडू यांनी दिली. त्यांनी जागतिक विमान कंपन्यांना शाश्वत विमान इंधन उत्पादनासाठी भारतासोबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि कार्बन-कपातीचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, केंद्र सरकारच्या उडान योजनेचा उद्देश भारताला पूर्व आणि पश्चिम जोडणारे प्रमुख हवाई केंद्र बनवणे आणि देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ वाढवणे आहे. या योजनेअंतर्गत उभारण्यात येणारी नवीन विमानतळ (Indian Airports) ग्रीनफील्ड (नव्याने बांधलेली) आणि विद्यमान हवाईपट्ट्यांचे व्यावसायिक विमानांसाठी सुधारित स्वरूपात विकसित केले जातील. 2016 मध्ये सुरू झालेल्या उडान योजनेने आतापर्यंत 74 विमानतळ, हेलिपोर्ट्स आणि वॉटर एअरोड्रोम्स कार्यान्वित केले असून, 601 मार्ग आणि 1.44 कोटी प्रवासी याचा लाभ घेत आहेत. हवाई क्षेत्रामुळे नोकऱ्या, पर्यटन आणि परिसरातील रिअल इस्टेट वाढेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे.

Mumbai Water Taxi : गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई फक्त 40 मिनिटांत? सुरु होतेय वॉटर टॅक्सी

Mumbai Water Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Water Taxi। मागच्या काही वर्षात मुंबईतील कनेक्टीव्हीटी वाढवण्याचा प्रयत्न जोरदार सुरु आहे. मुंबईकरांचा प्रवास कमी वेळेत आणि आरामदायी व्हावा यासाठी सरकार कडून सातत्याने नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी मुंबईत मेट्रो सेवा करून करून लोकल रेल्वे वरील ताण कमी करण्यात आला. नवनवीन ब्रिज उभारून रस्ते वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सोडवण्यात आला आहे. आता मुंबईकरांसाठी आणखी एक खुशखबर आहे. सरकारने मुंबईत नवीन वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हि वॉटर टॅक्सी मुंबई आणि नवी मुंबईला जोडेल. गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अंतर या वॉटर टॅक्सी मुळे अवघ्या ४० मिनिटात पार करता येईल.

बंदरे आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर टॅक्सी सुरू करण्याच्या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत सोमवारी एक बैठक झाली. बैठकीदरम्यान, श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना वॉटर टॅक्सी सेवांसाठी नियोजन सुरू करण्याचे आणि आवश्यक ठिकाणी जेट्टी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी विमानतळ प्राधिकरणाला प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले. गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टीपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी धावेल. रस्ते वाहतूक कोंडी कमी करणे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान जलद, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम प्रवास पुरवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. तसेच या वॉटर टॅक्सी मुळे इलेक्ट्रिक बोटी प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल.

कसा असेल रूट? Mumbai Water Taxi-

गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टीपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वॉटर टॅक्सी (Mumbai Water Taxi) धावेल. रस्ते वाहतूक कोंडी कमी करणे, मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान जलद, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम प्रवास पुरवणे हे यामागील उद्दिष्ट आहे. तसेच या वॉटर टॅक्सी मुळे इलेक्ट्रिक बोटी प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल. सध्याच्या घडीला मुंबईतून नवी मुंबईला जायचं असल्यास १ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक असल्याने प्रवासाचा फटका बसतो. मात्र आता वॉटर टॅक्सी सुरु झाल्यास मुंबईकरांना अवघ्या 40 मिनिटांत नवी मुंबईत पोहोचणे शक्य होणार आहे.

दरम्यान, काही वर्षापूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी वॉटर टॅक्सी सेवा (Mumbai Water Taxi) सरू करण्यात आली होती. मात्र प्रवाशांच्या अल्पप्रतिसादामुळं ती कालांतराने बंद करण्यात आली. आता नवीन वॉटर टॅक्सी कधी पासून सुरु होते आणि प्रवाशांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे.