Friday, June 20, 2025
Home Blog

Jalna Tirupati Train : मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला विशेष ट्रेन; पहा कसं आहे वेळापत्रक?

Jalna Tirupati Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jalna Tirupati Train । आंध्र प्रदेशातील तिरुमाला टेकडीवरील तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जात असतात. खास करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने बालाजीच्या चरणी नतमस्तक होतो. बालाजीला जाणाऱ्या प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाने मराठवाड्यातील जालना ते तिरुपती अशी विशेष ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन मुळे मराठवाड्यातील बालाजीच्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आपल्या दैवताच्या दर्शनासाठी कोणत्याही त्रासाशिवाय थेट ट्रेनमधून त्यांना प्रवास करता येईल.

कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक – Jalna Tirupati Train

मिळालेल्या माहितीनुसार जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) 7 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही रेल्वेगाडी दर सोमवारी जालना मधून रवाना होणार आहे आणि मंगळवारी तिरुपतीला पोहोचेल. दर सोमवारी सकाळी 7 वाजता ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरून तिरुपतीच्या दिशेने रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपतीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी हिच ट्रेन मंगळवारी दुपारी 3.15 वाजता तिरुपती येथून निघेल आणि बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात पोहोचेल. त्यामुळे तिरुपती भक्तांना 3 दिवसांत तिरुपती बालाजीचे दर्शन घडणार आहे. Jalna Tirupati Train

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –

जालना – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) ला परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुटूर गुडूर, रेनीगुंटा या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील प्रवाशांना सुद्धा बालाजीचे दर्शन घेणं अतिशय सोप्प राहणार आहे. या विशेष ट्रेनमुळे (Jalna Tirupati Train) मराठवाड्याचे रेल्वेजाळे आणखी मजबूत होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील रेल्वे कनेक्टीव्हीटी सुद्धा वाढेल.

दरम्यान, तिरुपति बालाजी, ज्यांना भगवान वेंकटेश्वर, श्री बालाजी किंवा तिरुमाला तिरुपति देव म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान विष्णूचे एक रूप आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपति शहराजवळील तिरुमाला टेकडीवर आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध, श्रीमंत आणि भक्तीस्थळांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी कोट्यवधी भक्त दर्शनासाठी येतात. असे मानले जाते की भगवान वेंकटेश्वरांनी भक्तांच्या कल्याणासाठी तिरुमालावर अवतार घेतला. त्यांनी देवी लक्ष्मीच्या सल्ल्याने येथे वास्तव्य केले. मंदिराचा इतिहास ९व्या शतकापासून आहे. चोल, विजयनगर आणि इतर राजवंशांनी मंदिराला दान दिले, ज्यामुळे त्याची समृद्धी वाढली. तिरुमाला तिरुपति देवस्थानम (TTD) मंदिराचे व्यवस्थापन करते आणि धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते.

Mumbai Local Train : मुंबई लोकलची गर्दी मिटणार; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

Mumbai Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकलची गर्दी म्हणजे रोजचंच मड त्याला कोण रडं अशी परिस्थिती…. लोकलमधून प्रवास करणं म्हणजे आजकाल तारेवरची कसरत झाली आहे. त्यातच मागच्या आठवड्यात मुंब्रा येथील लोकल ट्रेन मधून काही प्रवासी खाली पडल्याने मुंबईच्या या लाईफलाईन वर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. परंतु आता लवकरच मुंबई लोकल ट्रेन मधील गर्दीचा प्रश्न मिटणार आहे. होय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तशी घोषणाच तर केलीय. येत्या ३ वर्षांत मुंबई लोकलच्या फेऱ्या दुप्पट करणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल आहे. रेल्वेमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.

टप्याटप्याने 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील – Mumbai Local Train

एका खाजगी वृत्तपत्राशी संवाद साधताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) म्हणाले की, महाराष्ट्रासाठी रेल्वे विभागाने यंदा ८१ हजार कोटींची तरतूद केली आहे. यात एकट्या मुंबई व एमएमआरमध्ये सध्या १६ हजार कोटींची कामे सुरू आहेत. तर मुंबईती सर्व लोकल ट्रेनना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल. मुंबईत सध्याच्या सुमारास एकूण 3200 फेऱ्या दररोज होतात. त्या फेऱ्या आणखी वाढवण्याच्या हेतूने काम सुरू आहे. टप्याटप्याने सुमारे 300 अतिरिक्त लोकल ट्रेन सोडल्या जातील . सर्वच लोकल एसी करण्याचा विचार राजकीय विरोधामुळे बाजूला ठेवावा लागला असला, तरी जास्तीत जास्त गाड्या वातानुकूलित करण्याचा निर्णय झाला आहे असेही अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल.

अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, मुंबईत सध्या तीन मिनिटांच्या अंतराने दोन लोकल धावतात. या दोन्ही लोकलमधील (Mumbai Local Train) अंतर कमी करण्यात येईल. दोन लोकलमधील अंतर हे चार मिनिटांवरुन अडीच मिनिटांवर आणण्यासाठी आम्ही नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहोत, असं तंत्रज्ञान विकसित करणारे मुंबई हे भारतातील पाहिलेच शहर ठरेल. तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन्सना कवच प्रणालीबरोबर कम्बाइन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणेशी जोडण्यात येईल. सीबीटीसी प्रणालीमुळे येत्या तीन वर्षांत लोकल फेऱ्यांची संख्या दुप्पट होईल. त्याचबरोबर ३५० नवीन एसी लोकल सुरू करणार आहोत अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Ambenali Ghat : कोकण ते पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ‘हा’ घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद

Ambenali Ghat Closed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ambenali Ghat । मागील काही दिवसापासून कोकण आणि पश्चिम महाराष्टात धुव्वाधार पाऊस पडत आहे. नद्या, नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या. याच एकूण पार्श्वभूमीवर रायगड आणि साताऱ्याला जोडणारा पोलादपूर आंबेनळी घाट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांसाठी खबरदारी म्हणून संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत हा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही या घाटातून प्रवास करणार असाल तर हि बातमी वाचूनच प्रवास करा.

रायगड जिल्ह्यात असलेल्या या (Ambenali Ghat) आंबेनळी घाटात ३ ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. यानंतर प्रशासनाने तात्काळ खबरदारीचा उपाय म्हणून हा घाट रस्ता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळेस बंद राहणार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच घाटात दाट धुके पसरले आहे. परिणामी, दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा घाट दररोज रात्री बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच वेळ पाहूनच या घाटातून प्रवास करावा.

आंबेनळी घाटाची वैशिष्ट्ये – Ambenali Ghat

आंबेनळी घाट सह्याद्री पर्वतरांगांमधील पश्चिम घाटात वसलेला असून, रायगड आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. घाटाचा पायथा पोलादपूर येथे तर माथा महाबळेश्वर येथे आहे, जे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. घाटाच्या दोन्ही बाजूंना आंब्याची झाडे आणि नळीसारख्या वळणावळणाच्या रस्त्यामुळे याला “आंबेनळी” असे नाव पडले असावे. हिरव्यागार जंगलांनी, धबधब्यांनी आणि कृष्णा नदीच्या निर्मळ प्रवाहाने आंबेनळी घाट नटलेला आहे. पावसाळ्यात येथील निसर्गरम्य दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. येथील वळणदार रस्ते आणि हिरवळीने नटलेली खोरे यामुळे रोड ट्रिपचा आनंद द्विगुणित होतो. पावसाळ्यात धबधबे आणि धुके यांचा अनुभव अविस्मरणीय असतो, परंतु खराब रास्ता आणि दरड कोसळण्याचा धोका असल्याने आंबेनळी घाट पर्यटकांसाठी चुकीची ट्रीपही ठरते. या घाटात अपघाताच्या आणि दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.

Satara Tourist Places : सातारा जिल्ह्यातील ‘ही’ महत्वाची पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत बंद

Satara Tourist Places banned

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satara Tourist Places । सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसापासून पश्चिम महाराष्टात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्या, नाले दुथड्या भरून वाहत आहेत. अनेक भागात दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या. याच एकूण पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील महत्वाची पर्यटनस्थळे बंद करण्यात आली आहेत. महाबळेश्वर, वाई सह जिल्ह्यातील सर्व महत्वाची पर्यटनस्थळे 19 ऑगस्टपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे.

कोणकोणत्या पर्यटन स्थळांवर बंदी – Satara Tourist Places

अजिंक्यतारा किल्ला
ठोसेघर धबधबा
केळवली-सांडवली धबधबा
वजराई धबधबा
कास पुष्प पठार
एकीव धबधबा
कास तलाव
बामणोली
पंचकुंड धबधबा
सडावाघापूर उलटा धबधबा
ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
रुद्रेश्वर देवालय धबधबा
ओझर्डे धबधबा
घाटमाथा धबधबा
लिंगमळा धबधबा

वरील सर्व पर्यटन स्थळे हे सातारा जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळे (Satara Tourist Places) आहेत. दरवर्षी -पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. मात्र सध्याची पावसाची एकूण परिस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या धोका यामुळे पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनाने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी 19 ऑगस्ट पर्यंत या पर्यटन स्थळांवर निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असेही सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो. ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी ओढयानाल्यातून प्रवास टाळावा. तसेच ओढ्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये याबाबत विविध पध्दतीने प्रचार-प्रसिध्दी करावी. पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करुन देऊ नये. त्याच प्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याच्या ठिकाणी सुरक्षित उपाययोजना राबवावी. अशा ठिकाणी धोक्याची सूचना देणारे व प्रवेश निषिध्द असणारे फलक लावावेत. नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये यासाठी संबंधितांना आप-आपल्या कार्यकक्षेतील सर्व नागरिकांना व ग्रामस्तरावरील यंत्रणेस वेळोवेळी सूचित करावे. तसेच पूलावरुन पाणी वाहत असताना पूल वाहतूकीसाठी तात्काळ बंद करावा, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे

आंबेनळी घाट बंद –

दरम्यान, रायगड आणि साताऱ्याला जोडणारा पोलादपूर आंबेनळी घाटामध्ये ३ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना समोर आली आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संध्याकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत आंबेनळी घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक रात्रीच्या वेळेस बंद राहणार आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, तसेच घाटात दाट धुके पसरले आहे. परिणामी, दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा घाट रोज रात्री बंद राहणार आहे.

RRB Technician Recruitment 2025 : रेल्वे विभागात 6180 पदांसाठी भरती जाहीर; असा करा अर्ज

RRB Technician Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन RRB Technician Recruitment 2025 । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) २०२५-२६ या वर्षासाठी भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये ६,१८० तंत्रज्ञांच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामधील १८० पदे तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नलसाठी आहेत, तर उर्वरित ६,००० पदे तंत्रज्ञ ग्रेड ३ च्या पदांसाठी आहेत. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २८ जून रोजी सुरू होणार असून इच्छुक उमेदवारी २८ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पात्रता निकष

तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बीएससी पदवी किंवा संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक आहे. RRB Technician Recruitment 2025

तंत्रज्ञ ग्रेड ३ पदासाठी उमेदवारांनी १० वी उत्तीर्ण (एसएसएलसी/मॅट्रिक्युलेशन) आणि फाउंड्रीमन, मोल्डर, पॅटर्न मेकर, किंवा फोर्जर आणि हीट ट्रीटर सारख्या विशिष्ट ट्रेडमध्ये आयटीआय किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – RRB Technician Recruitment 2025

ग्रेड १ सिग्नल पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३३ वर्षे असावे
ग्रेड ३ सिग्नल पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे
राखीव श्रेणींसाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट लागू आहे.

अर्ज शुल्क-

२५० रुपये: अनुसूचित जाती/जमाती, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यावर पूर्णपणे परत करण्यायोग्य) RRB Technician Recruitment 2025
५०० रुपये: इतर सर्व श्रेणी (सीबीटीमध्ये उपस्थित राहिल्यावर ४०० रुपये परत करण्यायोग्य)

पगार-

तंत्रज्ञ ग्रेड १ सिग्नल: वेतन स्तर ५, दरमहा २९,२०० रुपये
तंत्रज्ञ ग्रेड ३: वेतन स्तर २, दरमहा १९,९०० रुपये
७ व्या केंद्रीय वेतन आयोग (सीपीसी) नुसार अतिरिक्त भत्ते आणि फायदे मिळतील.

अर्ज कुठे करावा?

२८ जून रोजी पासून आरआरबीची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in द्वारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.

Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ladli Behna Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladli Behna Yojana । लाडक्या बहिणींचा हप्ता आता २५० रुपयांनी वाढणार आहे, थेट मुख्यमंत्र्यांनीच याबाबत जाहीर घोषणा केली आहे. बातमी वाचून तुम्हालाही आनंद झाला असेल ना? पण जरा थांबा.. कारण हा हप्ता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी नाही, तर मध्य प्रदेशातील महिलांसाठी आहे. होय, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी याबाबत थेट घोषणा केली आहे. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व लाडली भगिनींच्या खात्यात १५०० रुपये हस्तांतरित केले जातील असं मोहन यादव यांनी म्हंटल आहे.

लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार ? Ladli Behna Yojana

मध्य प्रदेश सरकारने लाडली बहीण योजनेच्या (Ladli Behna Yojana) माध्यमातून महिलांना ३००० रुपये देण्याचे वचन दिले होते. त्या दृष्टीने आता सरकार पाऊल उचलत आहे. सुरुवातीला मध्य प्रदेश सरकारने महिलांना १००० रुपये दिले होते. त्यानंतर हे पैसे पाठवून १२५० करण्यात आले. आता या योजनेचा निधी आणखी २५० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांचं सरकार रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात अतिरिक्त २५० रुपये जमा करणार आहे. म्हणजेच काय तर मध्य प्रदेशातील महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. मध्य प्रदेशाबरोबरच बरेली प्रदेशाला छिंद वाले हनुमान जी महाराजांचे अपार आशीर्वाद आहेत. शेती समृद्ध बरेली प्रदेशही विकासाच्या मार्गावर पुढे जात आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना ५ रुपयांत वीज जोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे सरकार पुढील ३ वर्षांत शेतकऱ्यांना वीज बिलातून पूर्णपणे मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे असं मोहन यादव यांनी म्हंटल.

महाराष्ट्रात कधी मिळणार २१०० रुपये-

दुसरीकडे महाराष्ट्रातील महायुती सरकारने सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यातील महिलांना सांगितलं होते कि पुन्हा एकदा आमचं सरकार निवडून द्या, आम्ही तुम्हाला १५०० ऐवजी २१०० रुपये दर महिन्याला देऊ, मात्र पुन्हा एकदा सत्तेत येऊन आणि नव्या सरकारला ७ महिने होऊनही अद्यापही लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. सरकार मधील एकही मंत्री २१०० रुपयांवर एका शब्दही काढत नाही. फक्त आम्ही लवकरच २१०० रुपये महिलांना देऊ अशी मोघम प्रतिक्रिया नेत्यांकडून दिली जात आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Khadakwasla Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Khadakwasla Dam । पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दुपारी खडकवासला धरणातून २००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये ज्यांची गाड्या आणि जनावर आहेत, त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

खडकवासला धरण ७५ टक्के भरलं- Khadakwasla Dam

पुण्यातील पावसामुळे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) ७५ टक्के भरलं आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि धरणात पाण्याची वाढती आवक बघता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय आज प्रशासनाने घेतला. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच विसर्ग असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलपूजन केलं गेलं. त्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जवळपास 2 हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात आला. जर पाऊस असाच सुरु राहीला तर पावसाचा वाढता जोर पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना त्यांची वाहने नदीपात्रातून काढून टाकण्याचे आणि अपघात टाळण्यासाठी नांदेड शहरातील नदीच्या पुलाचा वापर थांबवण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदत आणि बचावासाठी जलद कारवाई करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क ठेवण्यात आले आहे. सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन कक्षा आहेत जेणेकरून पाणी साचणे, झाडे तोडणे, ड्रेनेजमध्ये अडथळा येणे आणि इतर संबंधित समस्यांबद्दल नागरिकांच्या चिंता दूर होतील.

Air India चा मोठा निर्णय!! विमानांची उड्डाणे 15% ने कमी केली

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Air India। अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने मोठं पाऊल उचललं आहे. एअर इंडियाने त्यांच्या वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा १५% ने कमी करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांना चांगली कार्यक्षमता देण्यासाठी आणि आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी एअर इंडियाने हे पाऊल उचललं आहे. येत्या २० जून पासून हि उड्डाणात हि कपात होणार असून किमान जुलैच्या मध्यापर्यंत सुरू राहील. या काळात, कोणत्याही अनपेक्षित व्यत्ययाला तोंड देण्यासाठी एअर इंडियाकडे राखीव विमाने उपलब्ध असतील.

का घेतला निर्णय ? Air India

परदेशी उड्डाणे तात्पुरती बंद केल्याने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एअरलाइनने (Air India) माफी मागितली आहे. याव्यतिरिक्त, अतिरिक्त खबरदारी म्हणून एअरलाइन बोईंग ७७७ विमानांसाठी सुरक्षा तपासणी वाढवेल. बुधवारी संध्याकाळी उशिरा जारी केलेल्या निवेदनात एअर इंडियाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, युरोप आणि पूर्व आशियातील अनेक देशांच्या हवाई क्षेत्रात रात्रीच्या कर्फ्यूमुळे व्यत्यय आला आहे. सुरक्षा तपासणी वाढवली जात आहे. एअर इंडियाच्या अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांनी आणि वैमानिकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. या कपातीमुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांची माफी मागत, एअरलाइनने म्हटले आहे की ते त्यांना याबाबत आधीच माहिती देतील आणि त्यांना पर्यायी विमानांमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला जाईल

दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाने १२ जून ते १७ जून या कालावधीत एकूण ८३ उड्डाणे रद्द केली आहेत. दररोज देशात कुठे ना कुठे एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यामुळे एअर इंडियाच्या (Air India) विश्वासार्हतेवर कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एअर इंडियाने १२ जून रोजी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना पुन्हा एकदा तीव्र शोक व्यक्त केला आहे. कंपनीने म्हटले आहे की अपघाताची चौकशी सुरू आहे. एअर इंडियाने डीजीसीए, एएआयबी आणि इतर संबंधित तपास संस्था आणि अधिकाऱ्यांच्या सहकार्याने सुरक्षा मानके मजबूत करण्याचे वचन दिले आहे.

Electric Scooter : स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक स्कुटर, 150 KM रेंज, किंमतही कमी

Electric Scooter ZELIO Legender Facelift

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Electric Scooter । भारतीय मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच क्रेझ बघायला मिळतेय. दररोज पेट्रोलला होणार खर्च कमी करण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांचा लूकही आकर्षक असल्याने खास करून तरुणांना या गाड्यांची भुरळ पडतेय. वाढती मागणी बघता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी आपल्या गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये लाँच केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणारी कंपनी जॅलेओ ई मोबिलिटीने नवीन इलेक्ट्रिक स्कुटर लाँच केली आहे. ZELIO Legender Facelift Model असं या इलेक्ट्रिक स्कुटरचे नाव आहे. या स्कुटरचे स्पीड कमी आहे. मात्र तिची किंमत ग्राहकांना परवडेल अशी आहे. आज आपण या स्कुटरचे खास फीचर्स आणि किंमत सविस्तर जाणून घेऊयात.

१५० किमी रेंज –

ZELIO Legender Facelift Model इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये (Electric Scooter) कंपनीने ६०V / ३०A लिथियम-आयन बॅटरी बसवली आहे. ती एका चार्जवर फक्त १.५ युनिट वीज वापरते. परंतु एका फुल्ल चार्ज झाल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल १५० किलोमीटर पर्यंत अंतर आरामात पार करेल असा दावा केला जातोय. ZELIO Legender Facelift Model इलेक्ट्रिक स्कुटरचे वजन ९८ किलो असून ती १५० किलो पर्यंतचा भार उचलण्यास सक्षम आहे. कंपनीचे म्हणणे आहे की नवीन मॉडेल आजच्या तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन डिझाइन केले आहे. ही स्कूटर स्टायलिश तर आहेच, तसेच ती चालवण्यासही सोपी आहे. स्कुटरच्या समोर टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड सस्पेंशन दिले आहे, ज्यामुळे खराब रस्त्यावरही आरामदायी प्रवास करता येतो.

अन्य फीचर्स – Electric Scooter

इतर फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये स्टायलिश एलईडी हेडलॅम्प, टेललॅम्प डिजिटल डॅशबोर्ड, कीलेस एंट्री, मोबाइल चार्जिंग, अँटी-थेफ्ट डिटेक्शन, प्रॉक्सिमिटी लॉक-अनलॉक, पार्क असिस्ट, फॉलो-मी-होम लाइट्स, एसओएस अलर्ट, क्रॅश आणि फॉल डिटेक्शन, व्हेईकल डायग्नोस्टिक सिस्टम. यांसारखी फीचर्स या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये देण्यात आली आहेत.

किंमत किती?

राहिला प्रश्न तो म्हणजे गाडीच्या किमतीचा, तर या इलेक्ट्रिक स्कुटरची (Electric Scooter) किंमत तिच्या बॅटरी नुसार वेगवेगळी आहे. लेजेंडरच्या जेल बॅटरी मॉडेल ३२AH ची किंमत फक्त ६५,००० रुपये आहे. थियम-आयन बॅटरी ६०V / ३०A असलेल्या मॉडेलची किंमत ७५,००० रुपये आहे. तर ७४V/३२A व्हेरिएंटची किंमत ७९,००० रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किमती आहेत. रस्टी ऑरेंज, ग्लॉसी ग्रीन आणि ग्लॉसी ग्रे अशा ३ आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये हि स्कुटर लाँच केली आहे.

Helicopter Joyrides : पर्यटकांसाटी हेलिकॉप्टर जॉयराइडची सुविधा; महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार सुरु

Helicopter Joyrides

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Helicopter Joyrides । नाशिकसह महाराष्टरातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरवर बोट क्लबजवळ असलेल्या ग्रेप पार्क रिसॉर्टमध्ये १५ ते ३० मिनिटांच्या स्लॉटसाठी हेलिकॉप्टर जॉयराइड सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटन स्थळांची सुलभता वाढविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी हि सुविधा राजस्थान सारख्या देशातील इतर राज्यात सुरु होती. आता महाराष्ट्रातील पर्यटकांनाही हेलिकॉप्टर जॉयराइडचा आनंद घेता येणार आहे.

बोट क्लब आणि ग्रेप पार्क रिसॉर्ट व्यतिरिक्त, गंगापूर धरणाजवळ दोन प्रमुख वाईनरी आहेत ज्या पर्यटन आकर्षण म्हणून देखील काम करतात. मुंबई, पुणे, गुजरात आणि देशाच्या इतर भागांमधून याठिकाणी दररोज हजारो पर्यटक येतात. नाशिक शहराव्यतिरिक्त, माळशेज घाट एमटीडीसी रिसॉर्ट, कार्ला, लोणार, गणपतीपुळे आणि भीमाशंकर येथे हेलिकॉप्टर जॉयराइड सेवा सुरू केली जाणार आहे.

3 महिन्यात सुरु होणार सेवा – Helicopter Joyrides

याबाबत एमटीडीसी अधिकाऱ्यांनी म्हंटल की, नाशिकसह काही निवडक ठिकाणी ‘हेलिकॉप्टर जॉयराइड सेवा (Helicopter Joyrides) देण्यासाठी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी आम्ही प्रस्ताव विनंती (आरएफपी) जारी केली आहे. आरएफपी सादर करण्याची अंतिम तारीख २५ जून आहे. आरएफपी २६ जून रोजी उघडले जाणार आहेत.” “जर ऑपरेटर्सना अंतिम स्वरूप देण्यात आले, तर एमटीडीसीच्या नाशिक ग्रेप पार्क रिसॉर्टमधील जॉयराइड सेवा ३ महिन्यांत सुरू होतील, असं बोललं जातंय.

हेलिकॉप्टर जॉयराइड म्हणजे काय?

हेलिकॉप्टर जॉयराइड म्हणजे मनोरंजनासाठी किंवा पर्यटनासाठी हेलिकॉप्टरमधून केली जाणारी छोटी उड्डाण. यामध्ये प्रवासी हेलिकॉप्टरमधून शहर, निसर्ग, किनारपट्टी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाच्या वरून हवाई दृश्यांचा आनंद घेतात. ही उड्डाणे साधारणपणे काही मिनिटांपासून ते एक तासापर्यंत असतात आणि ती रोमांचक अनुभवासाठी किंवा खास प्रसंगांसाठी आयोजित केली जातात.