Friday, December 5, 2025
Home Blog

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार? सरकार देणार डबल गिफ्ट

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणुकीच्या धामधुमीत सरकार लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. मात्र आता महिलांच्या खात्यात १५०० ऐवजी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन्ही महिन्याचे एकत्रित ३००० रुपये महिलांना देईल अशा चर्चा सुरु आहेत. असं झाल्यास नवीन वर्षांपूर्वीच महिलांना मोठं गिफ्ट मिळेल.

खरं तर सध्या डिसेंबर महिना सुरु झाला आहे. परंतु निवडणुकीमुळे आचार संहिता लागली आणि लाडक्या बहिणींचा (Ladki Bahin Yojana) हप्ता लांबला. डिसेंबरला सुरुवात होऊनही महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील महिला निराश असून १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र आता नाराज महिलांना पुन्हा खुश करण्यासाठी सरकार नोव्हेंबर आणि डिसेबर अशी दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रितपणे बँक खात्यात जमा करेल असे बोलले जात आहे. अद्याप सरकारने याविषयीची कोणताही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पुढच्या आठवड्यात हे ३००० रुपये महिलांना मिळतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

E-KYC गरजेची Ladki Bahin Yojana

लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजूनही E-KYC केली नसेल तर घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या

सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा

होम पेजवरील E-KYC वर क्लिक करा. आता E-KYC फॉर्म उघडेल

या फॉर्ममध्ये तुमचे आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड नोंदवा.

आधार ऑथिंटिकेशनसाठी सहमती द्या. ओटीपीवर क्लिक करा

आधाराला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

हा ओटीपी सबमिट करा

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. थेट डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेमुळे महिलावर्गात मोठ्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळते.

Amba Ghat Bus Accident : आंबा घाटात भीषण अपघात!! बस 100 फूट दरीत कोसळली

Amba Ghat Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Amba Ghat Bus Accident । महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दोन दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील कराड तालुक्यात विद्यार्थ्यांची सहलीची बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली होती. आता कोकणातून अपघाताची भीषण घटना घडल्याचे समोर आली आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर या २ जिल्ह्याना जोडणारा महत्वपूर्ण अशा आंबा घाटात प्रवासी बस १०० फूट खोल दरीत कोसळली आहे. आज पहाटे हा भीषण अपघात झाला, प्रवासी साखरझोपेत असतानाच हि घटना घडली. विशेष म्हणजे सुदैवाने कोणतीही जिवितहानी या अपघातात झालेली नाही.

कसा झाला अपघात ? Amba Ghat Bus Accident

या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आलेले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याच प्रवासादरम्यान, आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून १०० फूट खोल दरीत कोसळली (Amba Ghat Bus Accident) . गाडीत ११५ प्रवासी बसवले होते. सर्वजण रात्री साखरझोपेत होते, त्याचवेळी घाटात चालकाचा डोळा लागला आणि बस त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली असं बोललं जात आहे. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवाशांचा जीव वाचला, कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा आणखी मोठा अनर्थ घडला असता.

या अपघाताची (Amba Ghat Bus Accident) माहिती मिळताच साखरपा पोलिस व आंब्यातील तरुणाचे मदत पथक आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आलं असून सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात नेमका कसा झाला? यामागे आणखी काही कारणे आहेत का याचा अंधुक तपास पोलिसांकडून सुरु आहे. बसमधील प्रवासी क्षमता ६० प्रवाशाची असताना ११५ प्रवासी म्हणजे जवळपास दुप्पट प्रवासी बस मध्ये कसे काय बसले हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, धित बस मध्यप्रदेशातील भिंड येथील असल्याचे समोर आले आहे.

Gold Rate Today : सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या!! ग्राहकांच्या खिशाला झळ

Gold Rate Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Rate Today । भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ बघायला मिळाली. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरु असताना दुसरीकडे सोन्याच्या किमतीवर मात्र मोठा परिणाम पाहायला मिळतोय. सोन्याच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलाच चाप बसतोय. आज ५ डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 127581रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.22 टक्के म्हणजेच 281 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे चांदी तब्बल 3523 रुपयांनी महाग झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव सध्या 181661 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.

आज सोन्याच्या किमतीत चढ-उतार का होत आहे? Gold Rate Today

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा वाढल्यामुळे आज सोन्याचे दर (Gold Rate Today) वाढताना दिसत आहेत. अमेरिकेतील अलीकडील आर्थिक आकडेवारीवरून देशातील कामगार बाजारपेठेत मंदी दिसून येते, ज्यामुळे आर्थिक सुलभतेची आशा आणखी बळावते. याव्यतिरिक्त, फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षपदासाठी आघाडीचे दावेदार जेरोम पॉवेल हे अधिक कठोर धोरण स्वीकारतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल असं बोललं जातंय. Gold Rate Today

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव –

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 119100 रुपये
मुंबई – 119100 रुपये
नागपूर – 119100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 129930 रूपये
मुंबई – 129930 रूपये
नागपूर – 129930 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.

Special Trains For Mumbai : अक्कलकोट, सोलापूरमार्गे मुंबईसाठी धावणार स्पेशल ट्रेन; पहा वेळापत्रक

Special Trains For Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Special Trains For Mumbai । महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उद्या म्हणजेच ६ डिसेंबर रोजी आहे. या दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी मुंबईच्या दिशेने चैत्यभूमीवर जात आहेत. या अनुयायांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, त्यांना कोणत्याही प्रकारच्या गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून काही विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. यातीलच एक ट्रेन म्हणजे कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई अनारक्षित विशेष गाडी .. हि ट्रेन आज चालवण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेचं वेळापत्रक कसं आहे? कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर ती थांबेल याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

कसं असेल वेळापत्रक ? Special Trains For Mumbai

तर मित्रानो, कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी हि विशेष ट्रेन 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सोडली जाणार आहे आणि 6 डिसेंबरच्या सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी मुंबई येथे पोहचेल. यानंतर परतीच्या प्रवासासाठी, हि ट्रेन 7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजून 25 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी 11:30 वाजता कलबुर्गी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. Special Trains For Mumbai

कोणकोणत्या स्थानकांवर थांबेल –

कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी हि विशेष ट्रेन गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर यांसह महत्त्वाच्या स्थानकावर थांबेल. त्यामुळे या शहरातील आंबेडकरी अनुयायांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना आरामदायी प्रवास अनुभवता येईल. प्रवाशांची वाढती संख्या बघता या ट्रेनची रचना देखील त्याप्रमाणे करण्यात आली आहे. 22 स्लीपर / सामान्य द्वितीय / सेकंड सीटिंग (अनारक्षित) कोच आणि 2 लगेज-कम-ब्रेक व्हॅन्स अशा मिळून 24 कोचेसचा समावेश असलेली ही गाडी मोठ्या प्रवासी संख्येला सामावून घेऊ शकेल.

Repo Rate Cut : गृहकर्ज, कार लोन झालं स्वस्त; RBI कडून रेपो रेट मध्ये कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Repo Rate Cut । नवीन वर्षाच्या तोंडावर भारतीय रिजर्व बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केली आहे, ज्यामुळे तुमच्या गृहकर्जाचा हप्ता, गाडीचे लोन स्वस्त होणार आहे. दर महिन्याच्या या खर्चाला काहीसा लगाम बसणार आहे. आज आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो रेट मध्ये ०.२५% कपात करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रेपो रेट ५.२५% पर्यंत खाली आला. यापूर्वी, आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये दर कपात केली होती. रेपो रेट सातत्याने कमी होत असलयाने सर्वसामान्य मांसल फायदा होतोय .

यंदाच्या वर्षात आतापर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये एकूण तीनवेळा कपात केली होती. त्यामुळे रेपो रेट 1 टक्क्याने खाली आला होता. यामध्ये आता आणखी 0.25 बेसिस पॉईंटची भर पडली आहे. यापूर्वी, रिजर्व बँकेने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये रेपो रेट मध्ये कपात केली होती. याचा अर्थ असा की चालू कॅलेंडर वर्षात, आरबीआयने सहापैकी चार बैठकांमध्ये रेपो रेट मध्ये १.२५% ने कमी केला आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये, आरबीआयने रेपो दर कायम ठेवला होता. येत्या काळात आणखी रेपो दर कपात करण्याची शक्यता आहे. रेपो दरात कपातीचा अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होईल, कारण स्वस्त कर्जांमुळे मागणी वाढेल आणि आर्थिक घडामोडीना चालना मिळेल. Repo Rate Cut


रेपो रेट म्हणजे काय? Repo Rate Cut

रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्यावसायिक बँकांना अल्पकालीन निधी देण्यासाठी जो व्याजदर वापरते, तो दर. सोप्या भाषेत, बँका RBI कडून ज्या दराने पैसे घेतात, त्या दराला रेपो रेट (Repo Rate) म्हणतात. रेपो रेटचा उपयोग RBI अर्थव्यवस्थेतील पैशांचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी करते. जर रेपो रेट जास्त असेल तर कर्ज घेणे महागते आणि पैशांचा पुरवठा कमी होतो. तर रेपो रेट कमी झाल्यास कर्ज स्वस्त होते, पैशांचा पुरवठा वाढतो, आणि आर्थिक वाढीला चालना मिळते.

Pune Kolhapur Highway : पुणे – कोल्हापूर हायवे कधी पूर्ण होणार? संसदेत गडकरींची मोठी माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Kolhapur Highway। पुणे ते कोल्हापूर हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा व्यापून घेणाऱ्या कोल्हापूर पुणे महामार्गाचे काम मागील ३ वर्षांपासून सुरु आहे. कामात बऱ्यापैकी प्रगती असली तरी अजूनही या महत्वाच्या महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण झालेलं नाही. आजही अनेक ठिकाणी रस्ते वळवण्यात येत आहेत. तसेच रस्त्यांची कामे सुरु असल्याने अपघाताच्या घटनांनी सातत्याने घडताना दिसत आहेत. या एकूण संपूर्ण पार्श्वभूमीवर लोकसभा अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना सवाल केला असता, गडकरींनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती सादर केली, तसेच हा गेमचेंजर महामार्ग कधी पूर्ण होणार हे सुद्धा सांगून टाकलं.

काय म्हणाले नितीन गडकरी ? Pune Kolhapur Highway

केंद्र सरकारने पुणे ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या मार्गाचे नवीन सर्वेक्षण केले आहे. रस्त्याची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या समस्या सोडवण्यासाठी लवकरच महामार्गावर ६,००० कोटी रुपयांचे काम हाती घेतले जाईल. खंबाटकी घाटावर एक नवीन बोगदा बांधण्यात येत आहे आणि लवकरच एक लेन वाहतुकीसाठी खुली केली जाईल, यामुळे पुणे आणि सातारा दरम्यानचा प्रवास वेळ कमी होईल, असे गडकरी यांनी म्हंटल. बेंगळुरूकडे जाणाऱ्या सातारा-कोल्हापूर मार्गाचे काम सुरू आहे, तसेच काही तांत्रिक समस्या सोडवण्यात आल्या आहेत. पुणे-कोल्हापूर महामार्गाची स्थिती (Pune Kolhapur Highway) एका वर्षात लक्षणीयरीत्या सुधारेल, आणि प्रवासाचा वेळ कमी होईल.

दरम्यान, मुंबई-बेंगळुरू बायपासवरील महामार्गावरील नवले पुलावर अपघात होत असल्याचे सुळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. “केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली आहेत. अपघातांची संख्या कमी झाली आहे, परंतु अलीकडेच एक जीवघेणा अपघात झाला आहे. अपघाताचे हे प्रमाण शून्य टक्क्यावर कसं आणता येईल याची आपल्याला गरज असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रश्नात म्हंटल होते.

Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? गडकरींनी तारीखच सांगून टाकली

Mumbai Goa Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Highway । मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा आणि आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकणवासीय आतुरतेने वाट पाहतोय. मात्र काही कारणांनी हा महामार्ग मागील दहा वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. परंतु आता या मार्गाबाबत नवीन डेडलाईट समोर आली आहे. आज संसदेत मुंबई गोवा महामार्ग बाबत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याचे अपडेट्स दिले आहेत.

संसदेत काय घडलं ? Mumbai Goa Highway

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सरकारवर निशाणा साधला. मुंबई- गोवा महामार्गासाठी ‘चांद्रयान मोहिमेपेक्षा जास्त खर्च झाला आहे, तरीही काम अपूर्ण का?’ तुम्ही यात जातीनं लक्ष घाला. तरच काहीतरी होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू आहे त्यामुळं नागरिकही आता वैतागले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार? असं अरविंद सावंत नितीन गडकरींना उद्देशून म्हणाले. सावंत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हे सांगितलं. Mumbai Goa Highway

काय म्हणाले गडकरी ?

मुंबईत गोवा महामार्गाचे काम 2009 मध्ये सुरू झालं आणि मी मंत्री 2014 साली झालो. त्यामुळं जुन्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काम दिले होते. यात जमीन संपादनाचा मुख्य अडथळा होता. अनेक कंत्राटदार बदलण्यात आल. अनेकदा कारवाई सुद्धा करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गाचे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, एप्रिल २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल आणि नागरिकांचा त्रासही संपेल. खूप विलंब झाला हे मान्य करतो, असे गडकरी म्हणाले. त्यामुळं मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आता एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Shinde Group Vs Bjp : शिंदे गट- भाजप युती तुटणार? स्वतंत्र लढण्याच्या भाषेने खळबळ

Shinde Group Vs Bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Shinde Group Vs Bjp। भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून वादाची ठिणगी आहे. भाजपकडून शिंदे गटाच्या अनेक स्थानिक नेत्यांना पक्षात पक्षप्रवेश दिला जात असल्याने शिंदे गटातील नेते अस्वस्थ आणि नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. वर वर जरी दोन्ही बाजूनी नाराजी नसल्याचे सांगण्यात येत असलं तरी नक्कीच महायुतीत काहीतरी घोळ असल्याचे वारंवार समोर आलं आहे. आता तर एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने भाजपला इशारा देताना थेट स्वतंत्र लढण्याची भाषा वापरली आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती तुटते कि काय या चर्चांना बळ मिळताना दिसत आहे.

नेमकं काय घडलं? Shinde Group Vs Bjp

काल म्हणजेच 3 नोव्हेंबरला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. डोंबिवलीतील दोन बडे नेते सदानंद थरवळांचा मुलगा अभिजीत थरवळ तसेच कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटातील नेत्यांना फोडायची हि काय पहिलीच वेळ नव्हती, मात्र यावेळी वरून आदेश येऊनही भाजपने शिंदे गटाला खिंडार पाडण्याचे काम केल्याने शिंदेची शिवसेना चवताळून उठली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांनी भाजपला युती तोडण्याचा इशारा दिला. लोकांना महायुती हवीय, पण फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा संजय शिरसाठ यांनी दिला. Shinde Group Vs Bjp

संजय शिरसाठ काय म्हणाले?

रवींद्र चव्हाण त्यांच्या मनाप्रमाणे वागत आहेत. रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी महाराष्ट्र बघावा. डोंबिवली-कल्याण कशाला बघता. त्यांनी आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला, मग आम्हाला उत्तर द्यावंच लागेल, मग तुमच्या अ‍ॅक्शनला आमच्याकडून रिअ‍ॅक्शन येणारच. तसेच अशापद्धतीने फाटाफूट झाली तर मग भविष्यात स्वतंत्र निवडणुका लढवाव्या लागतील. लोकांना महायुती हवी आहे हे खार आहे, पण तुम्ही फाटाफूट कराल तर स्वतंत्र लढू, असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला. संजय शिरसाठ यांच्या या निर्वाणीच्या इशाऱ्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येतेय ते बघाव लागेल.

Indigo Airlines : Indigo ची 200 उड्डाणे रद्द; देशभरात खळबळ, प्रवासी संतप्त

Indigo Airlines

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indigo Airlines । देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी म्हणून ओळखली जाणारी Indigo मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. याचा देशभरातील उड्डाणावर मोठा परिणाम बघायला मिळतोय. आज इंडिगोला तब्बल २०० विमानाची उड्डाणे रद्द करावी लागली. काही उड्डाणे तर शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळतोय. विमानतळाला अक्षरशः बस स्टॅन्ड सारखं स्वरूप आलंय इतकी प्रवाशांची गर्दी झालीय.

इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Airlines) गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठ्या ऑपरेशनल अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे, देशभरात मोठ्या प्रमाणात विलंब आणि फ्लाईट्स रद्द झाल्याने हजारो प्रवासी अडकले आहेत. गेल्या दोन दिवसांत, अंदाजे २५० ते ३०० उड्डाणे रद्द करण्यात आली होती, आज आणखी काही उड्डाणे रद्द झाली आहेत. इंडिगोने सार्वजनिक माफी मागितली आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एअरलाइनने म्हटले आहे की अनपेक्षित ऑपरेशनल अडचणींमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली तर काही उड्डाणे उशिरा झाली. किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, प्रतिकूल हवामान परिस्थिती, विमानतळावर प्रचंड गर्दी आणि सुधारित क्रू रोस्टरिंग नियम या सर्वांमुळे अशा प्रकारची परिस्थिती ओढवली आहे.

विमान सेवेचे सर्व कामकाज पूर्वरत करण्यासाठी, इंडिगोने पुढील ४८ तासांसाठी त्यांच्या वेळापत्रकात कॅलिब्रेटेड बदल केले आहेत. इंडिगोच्या विमान सेवा बंद पडल्याने देशातील जवळजवळ प्रत्येक विमानतळावर परिणाम होत आहे. दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि सुरत विमानतळांवर प्रवाशांची सर्वात जास्त अडचण झाली आहे.

आतापर्यंत रद्द झालेली विमान उड्डाणे (Indigo Airlines)

बेंगळुरू- ४२
दिल्ली- ३८
अहमदाबाद- २५
इंदूर- ११
हैदराबाद- १९
सुरत- ८
कोलकाता- १०

Sonyacha Bhav : सोने महागले, चांदी झाली स्वस्त; आजचे भाव इथे पहा

Sonyacha Bhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Sonyacha Bhav । भारतीय सराफा बाजारात सोने- चांदीच्या किमतीत सातत्याने चढ उतार पाहायला मिळत आहेत. आधीच सोन्याचे भाव प्रति तोळा सव्वा लाखाच्या वर गेल्याने सर्वसामान्य ग्राहकांना खरेदी करणे तस परवडतच नाही. परंतु लग्न समारंभ असो वा कोणाच्या मुलाचे बारसे असो, सोन्याची वस्तू खरेदी केली जाते. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर सर्वसामान्य ग्राहकांचे बारकाईने लक्ष्य असते. आज ४ डिसेंबर रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) वर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 128217 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.3 टक्के म्हणजेच 385 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय. तर दुसरीकडे चांदी मात्र 543 रुपयांनी स्वस्त झाली असून एक किलो चांदीचा भाव सध्या 177750 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती दररोज बदलतात.

खरं तर MCX वर आज सोन्याचा व्यवहार 127950 रुपयांवर उघडला (Sonyacha Bhav) जो मागील बाजारात 127832 रुपयांवर बंद झाला होता. मार्केट उघडल्या पासूनच सोन्याच्या किमती वर खाली होत होत्या. ९ वाजून ३५ मिनिटांनी सोन्याचा भाव १२८२१७ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. त्यानंतर सोन्याची किंमत खाली खाली येत गेली. सध्या ११ वाजून ५१ मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोने १२७२८३ रुपयांवर व्यवहार करत आहे. Sonyacha Bhav

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Sonyacha Bhav

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 119500 रुपये
मुंबई – 119500 रुपये
नागपूर – 119500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 130360 रूपये
मुंबई – 130360 रूपये
नागपूर – 130360 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.