हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jalna Tirupati Train । आंध्र प्रदेशातील तिरुमाला टेकडीवरील तिरुपती बालाजी मंदिर म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान…. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला जात असतात. खास करून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक वर्ग मोठ्या संख्येने बालाजीच्या चरणी नतमस्तक होतो. बालाजीला जाणाऱ्या प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेऊन रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे विभागाने मराठवाड्यातील जालना ते तिरुपती अशी विशेष ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन मुळे मराठवाड्यातील बालाजीच्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आपल्या दैवताच्या दर्शनासाठी कोणत्याही त्रासाशिवाय थेट ट्रेनमधून त्यांना प्रवास करता येईल.
कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक – Jalna Tirupati Train
मिळालेल्या माहितीनुसार जालना ते तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) 7 जुलै 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही रेल्वेगाडी दर सोमवारी जालना मधून रवाना होणार आहे आणि मंगळवारी तिरुपतीला पोहोचेल. दर सोमवारी सकाळी 7 वाजता ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरून तिरुपतीच्या दिशेने रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी 10.45 वाजता तिरुपतीला पोहचेल. तर परतीच्या प्रवासासाठी हिच ट्रेन मंगळवारी दुपारी 3.15 वाजता तिरुपती येथून निघेल आणि बुधवारी दुपारी 3.50 वाजता जालन्यात पोहोचेल. त्यामुळे तिरुपती भक्तांना 3 दिवसांत तिरुपती बालाजीचे दर्शन घडणार आहे. Jalna Tirupati Train
कोणकोणत्या स्थानकांवर थांबा –
जालना – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन (07609/07610) ला परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, विकाराबाद, लिंगमपल्ली, गुटूर गुडूर, रेनीगुंटा या महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरातील प्रवाशांना सुद्धा बालाजीचे दर्शन घेणं अतिशय सोप्प राहणार आहे. या विशेष ट्रेनमुळे (Jalna Tirupati Train) मराठवाड्याचे रेल्वेजाळे आणखी मजबूत होण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील रेल्वे कनेक्टीव्हीटी सुद्धा वाढेल.
दरम्यान, तिरुपति बालाजी, ज्यांना भगवान वेंकटेश्वर, श्री बालाजी किंवा तिरुमाला तिरुपति देव म्हणूनही ओळखले जाते, हे भगवान विष्णूचे एक रूप आहे. हे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपति शहराजवळील तिरुमाला टेकडीवर आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध, श्रीमंत आणि भक्तीस्थळांपैकी एक आहे, जिथे दरवर्षी कोट्यवधी भक्त दर्शनासाठी येतात. असे मानले जाते की भगवान वेंकटेश्वरांनी भक्तांच्या कल्याणासाठी तिरुमालावर अवतार घेतला. त्यांनी देवी लक्ष्मीच्या सल्ल्याने येथे वास्तव्य केले. मंदिराचा इतिहास ९व्या शतकापासून आहे. चोल, विजयनगर आणि इतर राजवंशांनी मंदिराला दान दिले, ज्यामुळे त्याची समृद्धी वाढली. तिरुमाला तिरुपति देवस्थानम (TTD) मंदिराचे व्यवस्थापन करते आणि धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते.