Sunday, July 13, 2025
Home Blog Page 3

Airtel 189 Rupees Recharge Plan : Airtel ने लाँच केला 189 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन; मिळतात हे फायदे

Airtel 189 Rupees Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Airtel 189 Rupees Recharge Plan । भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी १८९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्या ग्राहकांना आपलं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, परंतु जास्तीचे इंटरनेट वापरण्याची गरज लागत नाही अशा यूजर्स साठी एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल. हा प्लॅन आता संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये काय काय फायदे मिळतात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात …

21 दिवसांची वैधता – Airtel 189 Rupees Recharge Plan

एअरटेलचाय या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Airtel 189 Rupees Recharge Plan) ग्राहकांना २१ दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. या कालावधीत यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि १ GB इंटरनेटचा लाभ घेता येतोय.. हे इंटरनेट दररोज १ GB नव्हे तर संपूर्ण २१ दिवसांसाठी १ GB इंटरनेट असेल. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आला आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता लागत नाही, परंतु तरीही अमर्यादित व्हॉइस कॉलचा लाभ ते घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक, सामान्य फोन वापरकर्ते किंवा कमीत कमी इंटरनेटची गरज असलेल्या ग्राहकांसाठी हा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल.

२०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे एअरटेलचे २ च रिचार्ज प्लॅन आहेत. एक म्हणजे हा १८९ चा रिचार्ज प्लॅन (Airtel 189 Rupees Recharge Plan) आणि दुसरा आहे तो म्हणजे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या दोन्ही प्लॅन ची तुलना करायची झाल्यास, १९९ च्या रिचार्ज मध्येही हेच सर्व बेनेफिट्स मिळतात हे १८९ मध्ये आहेत, परंतु १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा २८ दिवसाच्या वैधतेसह येतो.. त्यामुळे ग्राहकांना जास्त कालावधीसाठी हा रिचार्ज वापरता येतो. त्यामुळे तुम्ही १० रुपये जास्त खर्च करून १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सुद्धा मारू शकता .

दरम्यान, एअरटेलने OTT सेवांसह कंटेंट-रिच प्लॅनसह आपला प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ वाढवण्यावर भर दिला आहे. अलीकडेच, कंपनीने २७९ रुपयांपासून सुरू होणारे नवीन प्लॅन सादर केले होते. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना नेटफ्लिक्स, झी५ आणि जिओहॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सहज ऍक्सेस मिळतो. हा प्लॅन डेटा आणि व्हॉइस बेनिफिट्ससह मनोरंजन हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी खास लाँच करण्यात आला आहे.

बच्चू कडूंच्या मागण्यांची दखल घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू; बाळा नांदगावकरांचा सरकारला इशारा

Bachhu Kadu Bala Nandgaonakr

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र येत शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार करीत बच्चूभाऊ कडू (Bachhu Kadu) यांनी ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, अशा थेट इशाराच मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिला. तर आमच्या शेतीमाला भाव द्या, आम्हाला कुठल्याही योजनांचे पैसे नकोत. जर आमच्या शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला तर आम्हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर महिन्याला 5000 देऊ…, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रा दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे आज पोहचली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाठिंबा दर्शविला. यावेळी नांदगावकर म्हणाले की, बच्चूभाऊ कडू यांनी सरकारकडे ज्या सतरा मागण्या केल्या आहेत त्या मागण्या अतिशय योग्य आहेत. कष्टकरी शेतकरीराजाला मदत झालीच पाहिजे. त्याला पीकविमाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं कर्जमाफी झाली पाहिजे. आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालवणारे बच्चू कडू यांचा पाठीचा कणा एकदम ताठ आहे. ताठ कण्याचे आबू लढाऊ बाण्याचे माझे मित्र बच्चू कडू आहेत. ज्यावेळेला हा माणूस उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पायी यात्रा काढतो अशा माणसाला पाठिंबा हा द्यायलाच पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी यावेळी म्हंटले.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, बाळा नांदगावकरांना पाहताच सिमेंटच्या जंगलातला माणूस शेतीच्या जंगलात आलाय. मनसेचे बाळा नांदगावकर हे माझे मित्र असून आम्ही दोघेजण विधानसभेत एकत्रित होतो. पक्ष, जात आणि धर्म कोणताही असू दे मात्र राबणारी जात मात्र, शेतकरी, मजुराची आहे हे एकदा दाखवायला पाहिजे. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आम्ही उभारलेला हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या एकजुटीसाठी आहे. त्यामुळे या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जात, पात बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी एकत्रित येत असून मत कोणाला पण द्या पण शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले.

YouTube New Policy 2025 : YouTube वरून पैसे कमवणे झालं अवघड!! 15 जुलैपासून नियम बदलले

YouTube New Policy 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनYouTube New Policy 2025 । सध्या सर्वत्र Youtube चे फॅड सुरु आहे. जो तो उठतोय आणि स्वतःच नवीन युट्युब चॅनेल काढतोय.. उद्देश एकच ते म्हणजे युट्युब वरून पैसे कमवणे… अनेकांनी युट्युबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत. युट्युबचे वारं सध्या जोरदार बघायला मिळत आहे. मात्र आता येत्या १५ जुलै पासून युट्युब ने काही नियमात बदल केले आहेत, ज्यामुळे पैसे कमवणे आधी पेक्षा कठीण होणार आहे. बदललेल्या नियमांनुसार, आता युट्यूब फक्त मूळ आणि नवीन कंटेंट तयार करणाऱ्यांनाच व्हिडिओंमधून कमाई करण्याची संधी देईल. युट्यूबला प्रत्येक चॅनेलप्रमाणे नवीन आणि मूळ कंटेंट मिळावा अशी इच्छा आहे त्यासाठीच कंपनीने नवीन नियम लागू केले आहेत.

गुगलच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, आता YouTube पार्टनर प्रोग्राम अंतर्गत मास प्रोड्यूस्ड आणि रिपेटिव्ह कंटेट ओळखण्याची आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आणखी कडक (YouTube New Policy 2025) करण्यात येणार आहे. एखाद्या क्रिएटरच्या व्हिडिओला किती व्हीव्हज येतात यापेक्षा प्रेक्षकांना माहिती देणारा कन्टेन्ट कोणता आहे किंवा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा व्हिडिओ कोणता आहे? यावर युट्युब लक्ष्य केंद्रित करणार आहे. आत्तापर्यंत युट्युबचे धोरण बघितलं तर YouTube ने नेहमीच ओरिजनल कंटेटला प्रोत्साहन दिले आहे. हे धोरण त्या दिशेने आणखी एक पाऊल असणार आहे.

काय आहेत नवीन नियम- YouTube New Policy 2025

युट्यूबच्या नवीन धोरणानुसार, आता जर एखाद्या क्रिएटरला युट्युबच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर त्याचा विडिओ हा मूळ विडिओ असावा.. दुसऱ्या कोणाचा तरी वापरलेला विडिओ आपल्या युट्युब चॅनेल वर टाकला तर पैसे मिळणार नाहीत..

वारंवार तोच तोच कंटेट रिपीट करणाऱ्या चॅनेलवाल्यांना सुद्धा धक्का बसणार आहे. अशा चॅनेलला पैसे मिळणार नाहीत. YouTube New Policy 2025

मोठ्या बदलांशिवाय इतर कोणाचाही कंटेट वापरला जाऊ शकत नाही. जर दुसऱ्या कोणाचा कन्टेन्ट घेतला तरी त्यात जास्तीत जास्त बदल करावा जेणेकरून तो नवीन कंटेन्ट आहे असच वाटावं… यासाठी तुमच्या स्वतःच्या डोक्यातील स्क्रिप्ट सदर कन्टेन्ट मध्ये टाकावी

अलीकडच्या काळात यूट्यूब आणि इतर व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एआय व्हिडिओंचा वापर करण्यात येत असल्याचं सातत्याने दिसत आहे. अशा विडिओ वर सुद्धा युट्युब कडून कारवाई करण्यात येईल. AI चा वापर करुन तयार केलेल्या व्हिडिओला आता पैसे मिळणार नाहीत.

धरतीवरचा देव, माझा गुरु शेतकरीच आहे! शेतकऱ्यांचा सत्कार करत बच्चू भाऊंकडून गुरुपौर्णिमा साजरी

Bachhu Kadu Gurupournima

अमरावती प्रतिनिधी । आज सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे.गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरुंना समर्पित केला जातो. या जगात धरणीवरचा देव म्हणून शेतकऱ्याला मानले जाते. कारण तो अन्नधान्य पिकवतो आणि हा शेतकरीच माझा गुरु आहे असे सांगत शेतकऱ्यांसाठी ७/१२ कोरा कोरा यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज चौथ्या दिवशी शेतकरी माता भगिनींचा शाल, हार, श्रीफळ देऊन सत्कार केला. इतकेच नाही तर माता भगिनींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून त्याकडे कोणी लक्ष देत नसताना शेतकऱ्यांच्या ७/१२ सह कर्जमाफी प्रश्नी आवाज उठवणाऱ्या व त्याला गुरुचे स्थान देऊन त्याचा सत्कार करणाऱ्या बच्चू भाऊंना पाहताना अनेकांचे डोळे पाणावले.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेच्या आजच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांनी दारव्हा तालुक्यातील वळसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त तेथील शेतकरी, महिला शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, हार घालून आशीर्वाद घेतला. वळसा येथून शेतकऱ्यांचा सत्कार केल्यानंतर आपल्या सातबारा कोरा यात्रेचा निर्धारपुर्वक पुढचा टप्पा बच्चू भाऊंनी सुरु केला.

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरांसह विविध मागणीसाठी उन्ह, वारा, पाऊस आणि दिवस रात्र याचा विचार न करता पायी चालत निघालेल्या बच्चू भाऊंच्या सातबारा कोरा कोरा यात्रेला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पायी चालत असल्याने बच्चू भाऊंच्या पायांना जखमा झाल्या आहेत तरी देखील त्या जखमा सोसत बच्चू भाऊंनी आपली हि यात्रा सुरूच ठेवली आहे. सर्व जाती धर्मातील, पक्षातीळ शेतकरी बांधव बच्चू भाऊंच्या या यात्रेत पक्ष, जातपात सहभागी होताना दिसून येत आहेत.

Ganeshotsav : गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित!! अधिवेशनात मोठी घोषणा

Ganeshotsav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav । गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेशोत्सव या सणाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवनात याबाबत घोषणा केली आहे. भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी हि मोठी घोषणा केली आहे.

गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही- Ganeshotsav

आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो. तसेच पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा –

गणेशोत्सवाला (Ganeshotsav) महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करत असताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या न्यायालयात केला. पण महायुतीच्या सरकारने या सर्व निर्बंधांना बाजूला केलं. 100 वर्षाच्या परंपरेला खंडित कोणी केला असेल तर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आता ठाकरे गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येत ते बघायला हवं.

Mumbai Dhule Express Train : मुंबई- धुळे ट्रेनचे वेळापत्रक बदललं; प्रवासाआधी जाणून घ्या

Mumbai Dhule Express Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Dhule Express Train । मुंबई ते धुळे दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई- धुळे ट्रेनच्या वेळापत्रकात थोडा बदल झाला आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी सुटणारी एक्स्प्रेस ट्रेन आता धुळे स्थानकावर अर्धा तास लवकर पोचणार आहे. येत्या १५ जुलैपासून हि ट्रेन अर्धा आधीच धुळे रेल्वे स्टेशनवर दाखल होईल. मध्य रेल्वे प्रशासनाने विशेषतः चाळीसगाव ते धुळेदरम्यानच्या सर्व स्थानकांसाठी सुधारित वेळापत्रक प्रकाशित केले आहे. त्यामुळेही तुम्हीही मुंबई धुळे एक्सप्रेस ट्रेन ने प्रवास करणार असाल तर आधी सुधारित वेळापत्रक पहा आणि मगच प्रवास करा.

सध्या नियमितपणे धावणारी मुंबई ते धुळे ही रेल्वे गाडी (11011) दररोज दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटते आणि त्याच दिवशी रात्री 8.55 वाजता धुळे स्थानकात पोहोचते. तसेच, धुळे येथून मुंबईकडे धावणारी (11012) गाडी दररोज सकाळी 6.30 वाजता धुळे स्थानकावरून सुटते आणि दुपारी 2.15 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचते. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड या स्थानकांवर हि एक्सप्रेस ट्रेन थांबते. मात्र आता १५ जुलैपासून या वेळेत थोडाफार बदल होईल. त्यामुळे काही स्थानकांवर हि ट्रेन (Mumbai Dhule Express Train) यापूर्वी पेक्षा आधी पोचेल.

कस असेल नवीन वेळापत्रक– Mumbai Dhule Express Train

मुंबई धुळे एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Dhule Express Train) आधीप्रमाणेच दुपारी 12 वाजता मुंबईतून निघेल. मात्र नव्या वेळापत्रकानुसार चाळीसगाव रेल्वे स्थानकावर ती आता 15 मिनिटे लवकर म्हणजेच रात्री 7.10 ऐवजी 6.55 वाजता दाखल होणार आहे. तसेच जामदा स्थानकावर रात्री 7.30 ऐवजी 7.15 वाजता, तर शिरूड स्थानकावर 8.06 ऐवजी 7.44 वाजता पोहोचेल. या ट्रेनचा शेवटचा स्टॉप असलेल्या धुळे रेल्वे स्थानकावरही आता ही ट्रेन रात्री 8.55 ऐवजी 8.25 वाजता पोहोचणार आहे. त्यामुळे धुळेकरांना मुंबईवरून धुळ्याला अर्धा तास लवकर पोचता येणार आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

Pune Ahilyanagar New Railway Route : पुणे- अहिल्यानगरसाठी नवा रेल्वेमार्ग!! या 11 स्थानकांवर थांबणार

Pune Ahilyanagar New Railway Route

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Ahilyanagar New Railway Route । पुणे ते अहिल्यानगर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते अहिल्यानगर दरम्यान आता नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. हा रेल्वेमार्ग सध्याच्या सध्याच्या रेल्वे मार्गाच्या अंतरापेक्षा ३८ किलोमीटर कमी असेल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. महत्त्वाची बाब अशी की हा नवा रेल्वे मार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गाच्या बाजूलाच विकसित केला जाणार आहे. पुणे ते अहमदनगर या दोन्ही शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यांना या नव्या रेल्वेचा नक्कीच फायदा होईल.

अहिल्यानगर ते पुणे या थेट रेल्वेमार्गाची (Pune Ahilyanagar New Railway Route) गेल्या अनेकवर्षांपासून मागणी होती. स्थानिक खासदारांसह नगरकरांनी या मार्गासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा केलेला आहे. रेल्वेमार्ग व्हावा म्हणून नगरकरांची मोठी स्वप्नं होती. खासदार निलेश लंकेंडकडूनही संसदेत यांनीही संसदेमध्ये तसेच केंद्र सरकारकडे या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा सुरू केला होता. आता या नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी हालचाल बघायला मिळतेय. या रेल्वे मार्गासंदर्भात डीपीआर रेल्वेबोर्डाला सादर करण्यात येत आला आहे. सध्या पुणे ते अहिल्यानगर हा प्रवास जर रस्त्याने केला तर प्रवाशांना तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतो. मात्र नव्या रेल्वे मार्गामुळे दीड ते पावणे दोन तासात पुण्याहून नगर गाठता येणार आहे.

कसा असेल मार्ग? Pune Ahilyanagar New Railway Route

सध्याचे पुणे – अहिल्यानगर रेल्वे मार्गाचे अंतर 154 किलोमीटर इतके आहे, मात्र प्रास्तवित नवीन रेल्वेमार्ग (Pune Ahilyanagar New Railway Route) अवघ्या ११६ किलोमीटरचा आहे. सध्या दौंड मार्गे नगरचे अंतर १५४ किलोमीटर इतके आहे. आता हेच अंतर ११६ किलोमीटरवर येणार आहे, म्हणजेच ३८ किमी अंतर कमी होईल. मध्य रेल्वे कडून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पुणे ते अहिल्यानगर या दोन शहरा दरम्यान तयार होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गावर अकरा स्थानके विकसित होणार आहेत. यामध्ये पुणे-वाघोली-शिक्रापुर, रांजणगांव, कारेगांव, शिरूर, सुपा, चास- केडगांव या स्थानकांचा समावेश आहे. पुण्यावरून शिक्रापूर, वाघोलीला कामानिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यांना या नव्या रेल्वेचा फायदा होईल. या महत्वाच्या रेल्वे प्रकल्पसाठी सरकार ११ हजार कोटी रूपये खर्च करणार आहे. हा रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांसोबतच रेल्वेच्या दृष्टीकोनातूनही तो फायदेशीर राहील असा अभिप्राय या प्रकल्प अहवालात देण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गावर विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचीही तरतुद प्रकल्प अहवालात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारचा ऐतिहासिक निर्णय!! आता तुकडे बंदी कायदा रद्द

Tukdebandi kayada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . तुकडे बंदी कायदा (Tukdebandi Kayada) रद्द करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घेतला आहे. हा कायदा रद्द झाल्याने महापालिका, नगरपालिका आणि प्रादेशिक योजना क्षेत्रांतील नागरिकांना जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठा दिलासा मिळेल. सरकारच्या या निर्णयाचे विरोधकांनीही अभिनंदन केलं.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी शेतकऱ्यांसंदर्भातील महत्वपूर्ण लक्षवेधी सभागृहात मांडली. यावेळी त्यांनी तुकडे बंदी कायदा रद्द करून नागरी क्षेत्रामध्ये जे जमिनीचे तुकडे झाले आहेत, त्यांना कायदेशीर करावे अशी मागणी केली. यावर महसूल मंत्री बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे. बावनकुळे म्हणाले, 15 दिवसात याबाबत एसओपी केली जाणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2025 पर्यंत जे तुकडे झाले, तुकडी बंद कायदा असल्याने व्यवहार करता येत नाही. तुकडे बंदी कायदा रद्द केला जाईल. एक एसओपी केली जाईल. महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली जाईल. ही समिती एसओपी करेल. सुमारे 50 लाख लोकांना याचा फायदा होईल. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यासह सभागृहातील सदस्यांना माझी विनंती आहे कि याबाबत आणखी काही सूचना असतील तर त्यासुद्धा सांगाव्या.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयांमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. कारण तुकडेबंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत होता. सध्या बागायतीसाठी 10 गुंठे आणि जिरायतीसाठी 20 गुंठ्यांखालील व्यवहार प्रतिबंधित आहेत. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी 1-2 गुंठ्यांचे व्यवहार खुलेआम होत आहेत. मात्र कायदा शाबूत असल्याने हे व्यवहार नोंदणीसाठी मंजूर होत नाहीत, परिणामी व्यवहार लांबणीवर जातात, तसेच महसूल आणि नोंदणी विभागांवर अतिरिक्त ताण निर्माण होतो.परंतु आता सरकारने तुकडे बंदी कायदाच रद्द केल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात 170 जागांची भरती; असा करा अर्ज

Indian Coast Guard Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Coast Guard Recruitment । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात १७० जागांची भरती जाहीर झाली आहे. सहाय्यक कमांडंट पदांसाठी हि भरती असून यासाठीची अधिसूचनाही जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०८ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून राज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२५ आहे. तटरक्षक दलात भरती होण्यासाठी पात्रता काय असावी? शिक्षण किती लागते ? याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट Indian Coast Guard Recruitment
पदसंख्या – 170 जागा
वयोमर्यादा – 21 – 25 वर्षे
अर्ज शुल्क –
सर्व उमेदवारांसाठी:
रु. ३००/-
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: शून्य
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

शैक्षणिक पात्रता – 12th, Diploma, Degree, BE/ B.Tech, Graduation

वेतन– 56100 ते 205400 रुपये महिना

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 23 जुलै 2025

असा करा अर्ज – Indian Coast Guard Recruitment

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- https://joinindiancoastguard.cdac.in ला भेट द्या.

आता होमपेजवर, “असिस्टंट कमांडंट २०२७ बॅचसाठी ऑनलाइन नोंदणी ८ जुलै २०२५ रोजी १६०० वाजल्यापासून २३ जुलै २०२५ रोजी २३३० वाजल्यापर्यंत उपलब्ध असेल” वर क्लिक करा. Indian Coast Guard Recruitment

यानंतर आणखी एक पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या खात्यात लॉगिन करण्यासाठी ईमेल पत्ता आणि पासवर्ड सारखे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.

जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर प्रथम स्वतःची नोंदणी करा आणि खाते तयार करा.

लॉग इन केल्यानंतर, सर्व माहिती प्रदान करणारा अर्ज भरा.

स्कॅन केलेले कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

यानंतर प्रिंटआउट काढा.

Affordable Bikes Under 70000 : खर्च कमी, पण मायलेज जास्त; 70 हजारांपासून मिळतायत या Bike

Affordable Bikes Under 70000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Affordable Bikes Under 70000 जेव्हा आपण नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त २ अपेक्षा असतात. पहिली म्हणजे गाडी कमी खर्चात मिळावी आणि दुसरी अपेक्षा म्हणजे बाईकचे मायलेज जास्त असावं जेणेकरून पेट्रोलचा खर्च वाचेल. तुम्हीही याच २ गोष्टी असणारी बाईक खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला ७० हजार रुपयांपासून सुरु होणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या ३ दुचाकी बद्द्दल माहिती देणार आहोत. त्यासाठी हि बातमी शेवटपर्यंत वाचा…..

1) TVS Sport –

TVS Sport ही बाईक अतिशय स्टायलिश आणि स्पोर्टी आहे. गाडीची लांबी 1,950 mm रुंदी 705 mm आणि उंची 1,080 mm आहे. टीव्हीएसच्या या दुचाकीला 1,236 mm व्हीलबेस आणि 175 mm ग्राउंड क्लिरन्स देण्यात आला आहे. या बाइकमध्ये ११० सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ६.०३ किलोवॅट पॉवर जनरेट करते. हि बाईक प्रतितास 90 km स्पीडने धावू शकते. टीव्हीएस स्पोर्ट मधील फ्युएल टँकची क्षमता 10 लिटर आहे. यात १७ इंचाचे टायर आहेत आणि दोन्ही टायर्समध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे. दैनंदिन वापरासाठी बेस्ट पर्याय असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ६० हजार रुपयांपासून सुरू होते.

2) Bajaj Platina 100 – Affordable Bikes Under 70000

बजाज ऑटोची प्लॅटिना १०० ही एक विश्वासार्ह बाईक आहे. खास करून दररोजच्या वापरासाठी अत्यंत किफायतशीर, चालवायला हलकी फुलकी आणि आरामदायी बाईक म्हणून या गाडीकडे बघितलं जातं. गाडीची लांबी 2006 mm, रुंदी 713 mm आणि उंची 1100 mm आहे. तर  1255 mm व्हीलबेस आणि  200 mm ग्राउंड क्लिअरन्स या बाईकला देण्यात आला आहे. बाईकमध्ये १७-इंच टायर आहेत. समोर १३० मिमी ड्रम ब्रेक आणि मागे ११० मिमी ड्रम ब्रेक आहेत. बजाज च्या बाईक मध्ये ABS सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. मार्केट मध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत ७१ हजारांपासून सुरू होते. Affordable Bikes Under 70000

3) Hero Passion Pro-

तुम्हाला जर जर affordability, कमी खर्च (Affordable Bikes Under 70000) आणि दमदार स्मार्ट फीचर्स हवे असतील तर हिरोची Passion Pro बाईक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. म्हणूनच कि काय मागच्या अनेक वर्षांपासून हि दुचाकी ग्राहकांना आकर्षित करत आहे. दैनंदिन वापरासाठी हि बाईक तुम्हाला नक्कीच परवडेल. गाडीची लांबी 2,036 mm, रुंदी 715–739 mm आणि उंची 1,113 mm आहे तर या बाईकला 1,270 mm व्हीलबेस आणि 180 mm ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. पॅशन प्रोमध्ये ९७.२ सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ५.९ पीएस पॉवर देते. सस्पेन्शन साठी समोर:कॉन्सेनव्हन्शनल फोर्क आणि मागे ट्विन शॉक्स आहेत तर ब्रेकिंग बाबत सांगायचं झाल्यास, समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि पाठीमागील बाजूला 130 mm ड्रम उपलब्ध आहे.