Thursday, July 10, 2025
Home Blog Page 2

Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दलात 170 जागांची भरती; असा करा अर्ज

Indian Coast Guard Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Coast Guard Recruitment । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलात १७० जागांची भरती जाहीर झाली आहे. सहाय्यक कमांडंट पदांसाठी हि भरती असून यासाठीची अधिसूचनाही जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ०८ जुलै २०२५ पासून सुरू झाली असून राज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२५ आहे. तटरक्षक दलात भरती होण्यासाठी पात्रता काय असावी? शिक्षण किती लागते ? याबाबत सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात.

पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट Indian Coast Guard Recruitment
पदसंख्या – 170 जागा
वयोमर्यादा – 21 – 25 वर्षे
अर्ज शुल्क –
सर्व उमेदवारांसाठी:
रु. ३००/-
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी: शून्य
अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

शैक्षणिक पात्रता – 12th, Diploma, Degree, BE/ B.Tech, Graduation

वेतन– 56100 ते 205400 रुपये महिना

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – 23 जुलै 2025

असा करा अर्ज – Indian Coast Guard Recruitment

सर्वात आधी अधिकृत वेबसाइट- https://joinindiancoastguard.cdac.in ला भेट द्या.

आता होमपेजवर, “असिस्टंट कमांडंट २०२७ बॅचसाठी ऑनलाइन नोंदणी ८ जुलै २०२५ रोजी १६०० वाजल्यापासून २३ जुलै २०२५ रोजी २३३० वाजल्यापर्यंत उपलब्ध असेल” वर क्लिक करा. Indian Coast Guard Recruitment

यानंतर आणखी एक पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमच्या खात्यात लॉगिन करण्यासाठी ईमेल पत्ता आणि पासवर्ड सारखे लॉगिन क्रेडेन्शियल्स भरावे लागतील.

जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर प्रथम स्वतःची नोंदणी करा आणि खाते तयार करा.

लॉग इन केल्यानंतर, सर्व माहिती प्रदान करणारा अर्ज भरा.

स्कॅन केलेले कागदपत्रे आणि छायाचित्रे अपलोड करा.

अर्ज शुल्क भरा आणि नंतर तुमचा अर्ज सबमिट करा.

यानंतर प्रिंटआउट काढा.

Affordable Bikes Under 70000 : खर्च कमी, पण मायलेज जास्त; 70 हजारांपासून मिळतायत या Bike

Affordable Bikes Under 70000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Affordable Bikes Under 70000 जेव्हा आपण नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त २ अपेक्षा असतात. पहिली म्हणजे गाडी कमी खर्चात मिळावी आणि दुसरी अपेक्षा म्हणजे बाईकचे मायलेज जास्त असावं जेणेकरून पेट्रोलचा खर्च वाचेल. तुम्हीही याच २ गोष्टी असणारी बाईक खरेदी करणार असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला ७० हजार रुपयांपासून सुरु होणाऱ्या आणि जास्त मायलेज देणाऱ्या ३ दुचाकी बद्द्दल माहिती देणार आहोत. त्यासाठी हि बातमी शेवटपर्यंत वाचा…..

1) TVS Sport –

TVS Sport ही बाईक अतिशय स्टायलिश आणि स्पोर्टी आहे. गाडीची लांबी 1,950 mm रुंदी 705 mm आणि उंची 1,080 mm आहे. टीव्हीएसच्या या दुचाकीला 1,236 mm व्हीलबेस आणि 175 mm ग्राउंड क्लिरन्स देण्यात आला आहे. या बाइकमध्ये ११० सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ६.०३ किलोवॅट पॉवर जनरेट करते. हि बाईक प्रतितास 90 km स्पीडने धावू शकते. टीव्हीएस स्पोर्ट मधील फ्युएल टँकची क्षमता 10 लिटर आहे. यात १७ इंचाचे टायर आहेत आणि दोन्ही टायर्समध्ये ड्रम ब्रेकची सुविधा आहे. दैनंदिन वापरासाठी बेस्ट पर्याय असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत ६० हजार रुपयांपासून सुरू होते.

2) Bajaj Platina 100 – Affordable Bikes Under 70000

बजाज ऑटोची प्लॅटिना १०० ही एक विश्वासार्ह बाईक आहे. खास करून दररोजच्या वापरासाठी अत्यंत किफायतशीर, चालवायला हलकी फुलकी आणि आरामदायी बाईक म्हणून या गाडीकडे बघितलं जातं. गाडीची लांबी 2006 mm, रुंदी 713 mm आणि उंची 1100 mm आहे. तर  1255 mm व्हीलबेस आणि  200 mm ग्राउंड क्लिअरन्स या बाईकला देण्यात आला आहे. बाईकमध्ये १७-इंच टायर आहेत. समोर १३० मिमी ड्रम ब्रेक आणि मागे ११० मिमी ड्रम ब्रेक आहेत. बजाज च्या बाईक मध्ये ABS सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. मार्केट मध्ये या बाईकची सुरुवातीची किंमत ७१ हजारांपासून सुरू होते. Affordable Bikes Under 70000

3) Hero Passion Pro-

तुम्हाला जर जर affordability, कमी खर्च (Affordable Bikes Under 70000) आणि दमदार स्मार्ट फीचर्स हवे असतील तर हिरोची Passion Pro बाईक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. म्हणूनच कि काय मागच्या अनेक वर्षांपासून हि दुचाकी ग्राहकांना आकर्षित करत आहे. दैनंदिन वापरासाठी हि बाईक तुम्हाला नक्कीच परवडेल. गाडीची लांबी 2,036 mm, रुंदी 715–739 mm आणि उंची 1,113 mm आहे तर या बाईकला 1,270 mm व्हीलबेस आणि 180 mm ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. पॅशन प्रोमध्ये ९७.२ सीसी इंजिन बसवण्यात आलं असून हे इंजिन ५.९ पीएस पॉवर देते. सस्पेन्शन साठी समोर:कॉन्सेनव्हन्शनल फोर्क आणि मागे ट्विन शॉक्स आहेत तर ब्रेकिंग बाबत सांगायचं झाल्यास, समोर 240 mm डिस्क ब्रेक आणि पाठीमागील बाजूला 130 mm ड्रम उपलब्ध आहे.

Indian Railways : रेल्वेच्या ताफ्यात येणार 1000 नवीन ट्रेन; अश्विनी वैष्णव यांची घोषणा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वे विभागाचा चांगलाच कायापालट झाला आहे. थेट जम्मू काश्मीर मध्येही रेल्वे धावू लागली आहे. वंदे भारत एक्सप्रेस, नमो भारत ट्रेन, मेट्रो ट्रेन यांसारख्या नव्या गाड्या रेल्वेच्या ताफ्यात आल्या आणि प्रवाशांचा प्रवास सोप्पा आणि आरमादायी झाला. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही प्रगतीपथावर आहे. आता रेल्वेच्या ताफ्यात येणार १००० नवीन ट्रेन दाखल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. अश्विनी वैष्णव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आगामी प्रकल्पाची माहिती दिली. यामध्ये १,००० नवीन गाड्या चालवणे, बुलेट ट्रेनचे व्यावसायिक लाँचिंग, सुरक्षा तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन आणि मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा ३५% पर्यंत नेणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.

अश्विनी वैष्णव म्हणाले, मागच्या ११ वर्षांत केंद्र सरकारने ३५,००० किमी रेल्वे ट्रॅक उभारले आहेत. दरवर्षी ३०,००० वॅगन आणि १,५०० लोकोमोटिव्ह तयार केले जात आहेत. इतर देशांशी तुलना केल्यास हे उत्पादन अमेरिका आणि युरोप पेक्षाही जास्त आहे. २०१४ मध्ये रेल्वेमधील गुंतवणूक २५,००० कोटी होती ती आम्ही २.५२ लाख कोटी रुपयांवर नेली आहे. ज्यामध्ये पीपीपीमधून अतिरिक्त २०,००० कोटी रुपये आले आहेत. तसेच गेल्या दशकात मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा २६% वरून २९% पर्यंत वाढला आहे, तो आता ३०% पेक्षा जास्त आणि ३५% पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. प्रवाशांचा अनुभव वाढवण्यासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत २००० सामान्य कोच जोडले आहेत आणि अमृत भारत आणि नमो भारत सारख्या गाड्या सुरू केल्या आहेत. रेल्वे प्रवास (Indian Railways) सर्वसामान्य प्रवाशांना कसा परवडेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षाही स्वस्त रेल्वे प्रवास आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

बुलेट ट्रेनबाबत काय अपडेट? Indian Railways

यावेळी अश्विनी वैष्णव यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबतही अपडेट दिली. बुलेट ट्रेन प्रकल्प हा भारतातील हाय-स्पीड रेल्वेचा (Indian Railways) महत्वाचा टप्पा आहे. जपानी तांत्रिक सहकार्याने कार्यरत असलेला हा प्रकल्प २०२६ पर्यंत ट्रॅकवर येईल आणि २०२७ मध्ये प्रवाशांसाठी सुरु करण्याचं लक्ष्य आहे अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. आयआयटी मद्रास आणि आयआयटी रुरकी या प्रकल्पाच्या डिझाइन आणि संशोधनात सहकार्य करत आहेत. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असलेल्या ४० मीटर लांब गर्डरसारखे जटिल घटक देखील भारतात तयार केले जात आहेत आणि अनेक देशांमध्ये निर्यात देखील केले जात आहेत.

APMC Market Navi Mumbai : नवी मुंबईतील APMC मार्केट हद्दपार होणार?? NMMC ने सुचवला 14 गावांचा पर्याय

APMC Market Navi Mumbai (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन APMC Market Navi Mumbai । नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) मार्केटच्या स्थलांतरणाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्वाधिक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून या APMC मार्केट कडे बघितलं जाते. 1977 मध्ये स्थापन झालेलं APMC मार्केट सुरुवातीला मुंबईत होते. त्यानंतर ते नवी मुंबईतील वाशी येथे हलवण्यात आले. आता नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अन्य ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चा आहेत. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील समाविष्ट असणाऱ्या 14 गावांची जमीन सुचवण्यात आली आहे.

मुंबई मधून 80 ते 90 च्या दशकत नवी मुंबईमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Market Navi Mumbai) पाचही बाजारपेठा स्थलांतरीत करण्यात आल्या. यासाठी माथाडी आणि व्यापारी साठी एक लाख हुन जास्त घरे शासनाने कमी किंमती मध्ये उपलब्ध करून दिली. परंतु आता पुन्हा एकदा नवी मुंबईतून एपीएमसी मार्केट हद्दपार होण्याची चिन्हे आहेत, या संदर्भात नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी एपीएमसीच्या सचिवांसोबत बैठक घेतली. नव्या बाजारात समितीसाठी शासनाने 100 एकर भूखंड शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील 14 गावांची जमीन पर्याय म्हणून सुचवली आहे. विमानतळ जवळील उलवा आणि पालघर मधील जागा या नव्या एपीएमसीसाठी तपासल्या जात आहेत.

व्यापारी आणि माथाडी कामगारांचा विरोध– APMC Market Navi Mumbai

सध्याचे एपीएमसी मार्केट नवी मुंबई शहराच्या मध्यभागी असल्याने या जमिनीवर सहविकास करण्याचा प्रस्ताव आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने बाजार समिती प्रशासनाला सुचवलेल्या जागेबाबत व्यापारी आणि इतर घटकांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. परंतु एपीएमसी मधील व्यापाऱ्यांनी आणि माथाडी कामगारांनी मात्र या स्थलांतरणाला तीव्र विरोध केला आहे. बाजार समितीचे अनेक व्यापारी आणि पदाधिकारी यांनी स्पष्ट केलं की, जर एपीएमसीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं. तर त्याचा फटका संपूर्ण पुरवठसाखळीला बसू शकतो सध्या मुंबईसह उपनगरातील भाजीपाला, फळं, कांदे-बटाटे, धान्य यांचं वितरण नवी मुंबई एपीएमसीतून होते. त्यामुळे एपीएमसी हे राज्यभरातील शेती माल व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठीचं मोठं सेंटर आहे.

मुख्यमंत्री विदर्भाचा पण काही नाही कामाचा…; ‘7/12 कोरा करा’ यात्रेतुन बच्चू कडूंचा फडणवीसांवर निशाणा

Bacchu Kadu target fadnavis

अमरावती प्रतिनिधी । मुख्यमंत्री विदर्भाचा आहे पण काही कामाचा नाही कारण विदर्भातील शेतकऱ्यांना हा मुख्यमंत्री शेतीला वेळेवरती वीज देत नाही. सध्या रानातली पिके करपून (शिकून) जात आहेत. रात्री-बेरात्री केव्हाही लाईट येते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत असेल तर मग हा विदर्भातील मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या काय कामाचा? असा सवाल करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तो पर्यंत आपला लढा चालूच ठेवणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी सरकारला दिला.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून ही यात्रा दारवा तालुक्यातील तळेगाव या गावात आज पोहचली. यावेळी बच्चू कडू यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. बच्चू कडू म्हणाले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही तो पर्यंत आपला लढा चालू राहणार आहे. शेतकरी हो हि सरकार नावाची व्यवस्था तुमच्या मेहनतीचा पैसा खात आहे आणि तुमच्या आपापसामध्ये जातीच्या धर्माच्या नावाखाली भांडणे लावून देत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांच्या कधीच नादी लागू नका. आपली लढाई ही शेतीमालाला भाव मिळण्याची आहे, या लढाईत तुम्ही सहभागी झाला पाहिजे. ही भूमी वसंतराव नाईक यांची आहे. या भूमीने राज्यात हरित क्रांती आणली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा सातबारा सुद्धा याच भूमीतुन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हंटले.

Rajasthan Fighter Plane Crash : राजस्थानमध्ये विमान कोसळलं!! 2 जणांचा मृत्यू

Rajasthan Fighter Plane Crash

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Rajasthan Fighter Plane Crash । अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना ताजी असतानाच राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागात आणखी एक विमान कोसळलं. मात्र हे प्रवासी विमान नव्हे तर भारतीय हवाई दलाचे विमान होते. या विमान अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला.

संरक्षण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान आहे. हे विमान राजस्थानच्या चुरु जिल्ह्यातील रतनगढ भागात दुपारी १२:४० वाजता कोसळले. विमान दुर्घटनेची माहिती (Rajasthan Fighter Plane Crash) मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्याठिकाणी २ मृतदेह सापडल्याची माहिती समोर येत आहे.

२०२५ मधील तिसरा जग्वार विमान अपघात- Rajasthan Fighter Plane Crash

दरम्यान, २०२५ मधील हा भारतीय हवाई दलाचा तिसरा जग्वार लढाऊ विमानाचा अपघात आहे. यापूर्वी ७ मार्च रोजी हरियाणातील अंबाला एअरबेसवरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान सिस्टम बिघाडामुळे हा अपघात झाला. यानंतर २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमानही कोसळले. या अपघातात फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा मृत्यू झाला. आता आजचा राजस्थान मधील हा तिसरा विमान अपघात आहे. हा अपघात नेमका कसा झाला? याचा शोध आता घेण्यात येईल.

Gujarat Bridge Collapse : गुजरातमध्ये पुलाचे 2 तुकडे; अनेक वाहने नदीत कोसळली

Gujarat Bridge Collapse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gujarat Bridge Collapse । गुजरात मधून एक धक्कादायक घटना समोर येतेय. डोदरा आणि आणंदला जोडणारा गंभीरा पूल नदीत कोसळला. या पुलाचे २ तुकडे झाले. या दुर्घटनेत अनेक वाहने पाण्यात पडली. यामध्ये आत्तापर्यन्त ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. गंभीरा पूल बऱ्याच काळापासून वाईट स्थितीत होता असं बोललं जातंय. मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही पाऊले का उचलली नाहीत याचा शोध आता घेण्यात येईल.

गुजरात मधील हा पूल महिसागर नदीवर होता. अचानकच या पुलाचे २ तुकडे झाले (Gujarat Bridge Collapse) आणि पुलावर असलेले २ ट्रक नदीत कोसळले. पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. २ ट्रक व्यतिरिक्त पुलावर उपस्थित असलेली ४-५ वाहने नदीत वाहून गेली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळेच हा पूल खचला असल्याचं बोललं जातेय. गंभीरा पूल हा मध्य गुजरातमधील महत्त्वाच्या पुलांपैकी एक आहे. तो मध्य गुजरातला सौराष्ट्रशी जोडतो.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पूल कोसळल्याबद्दल (Gujarat Bridge Collapse) दुःख व्यक्त केले आहे. मोदींनी ट्विट करत म्हंटल कि, वडोदरा येथे पूल कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मला खूप दुःख आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझी तीव्र संवेदना. जखमी लवकर बरे होतील अशी आशा आहे. यासोबतच, पंतप्रधान मदत निधीतून मृतांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

काँग्रेसची टीका? Gujarat Bridge Collapse

गुजरातमधील काँग्रेस नेते आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते अमित चावडा यांनी गंभीरा पूल कोसळल्याचा व्हिडिओ शेअर करतप्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गंभीरा पूल बऱ्याच काळापासून वाईट स्थितीत होता. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा सवाल अमित चावडा यांनी केला.

Indian Railways : महाराष्ट्रातून तिरुपतीला धावणार आणखी एक ट्रेन; पहा कसा आहे रूट ?

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways । महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे अनेक भाविक आहेत. तिरुपतीला जाण्यासाठी राज्यातून एसटी बस, रेल्वे आणि विमानाची सुविधा आहे. आता तिरुपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून हिसार ते तिरुपती (Hisar to Tirupati Train) दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे. हि रेल्वे आपल्या महाराष्ट्रातून जाणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमधून हि ट्रेन धावताना दिसेल. त्यामुळे या भागातील प्रवाशांनाही तिरुपतीला जाणे सोप्प होणार आहे.

कसं असेल वेळापत्रक? Indian Railways

खरं तर प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे विभागाने (Indian Railways) तिरुपती ते हिसार अशी आठवड्यातून एक वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या साप्ताहिक विशेष ट्रेनमध्ये एकूण २२ कोच असतील, यामध्ये २० थर्ड एसी कोच आणि २ पॉवर कार कोचचा समावेश आहे. तिरुपती-हिसार विशेष ट्रेनचा ट्रेन क्रमांक ०७७१७ असून ती आजपासून म्हणजेच ९ जुलैपासून २४ सप्टेंबर पर्यंत चालवली जाईल. ही ट्रेन दर मंगळवारी रात्री ११:४५ वाजता तिरुपतीहून निघेल आणि शनिवारी दुपारी २:०५ वाजता हिसारला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक ०७७१८ हि १३ जुलै ते २८ सप्टेंबर दरम्यान चालवली जाईल. ही ट्रेन दर रविवारी रात्री ११:१५ वाजता हिसारहून निघेल आणि बुधवारी सकाळी ११:३० वाजता तिरुपतीला पोहोचेल. या नव्या एक्सप्रेस ट्रेन मुळे तिरुपती बालाजीच्या भक्तांना मोठा फायदा होणार आहे.

कोणकोणत्या स्थानकांवर ट्रेन थांबणार?

हिसार ते तिरुपती दरम्यान चालवण्यात येणारी हि विशेष ट्रेन चिदावा, झुंझुनू, नवलगढ, सीकर, रिंगास, फुलेरा, किशनगड, अजमेर, नशिराबाद, बिजयनगर, भिलवाडा, चित्तौडगड, नीमच, मंदसौर, रतलाम, वडोदरा, उधना, नंदुरबार, भुसालगाव, भुसालगाव, भुसालगाव, अकरोळगाव, शेवाळगाव, मंदसौर येथे थांबेल. प्रवासादरम्यान हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बसर, निजामाबाद, कामरेड्डी, मडचेल, मलकाजगिरी, काचेगुडा, जडचेर्ला, महबूबनगर, गडवाल, कुरनूल सिटी, ढोणे, गुंटकल, तडीपात्री, येरागुंटला, कडप्पा, राजमपेटा आणि रेगुंटा स्टेशन या रेल्वे स्थानकांवर थांबेल.

Pune Metro : पुणे मेट्रोचा विस्तार होणार!! 12 नवीन सेट मिळणार

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । पुण्यातील प्रवाशांना आनंदाची बातमी आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी काही मार्गावर मेट्रो चालवली जात आहे. आता या मेट्रोचा विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोला आणखी १२ नवीन सेट मिळणार आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील. पुणे मेट्रोने टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेड आणि टीटागड फायरमा यांच्याकडून या १२ ट्रेन सेटसाठी खरेदी ऑर्डर दिली आहे. हे नवीन ट्रेन सेट पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केले जातील आणि विद्यमान रेकप्रमाणेच अॅल्युमिनियमपासून बनवले जातील.

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) नेटवर्कच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज पर्यंत विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, पीसीएमसी-निगडी मार्गाचे बांधकाम आधीच वेगाने सुरू आहे. स्वारगेट-कात्रज कॉरिडॉरसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या दोन आगामी मार्गांवरील कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी, पुणे मेट्रोला १२ नवीन मेट्रो ट्रेन सेटची आवश्यकता असेल. एकूण सर्व मेट्रो सेट खरेदीचा खर्च ४३०.५३ कोटी रुपये आहे. पुढील ३० महिन्यांत या गाड्यांची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाईल.

नवीन ट्रेन कशा असतील ? Pune Metro

नवीन ऑर्डर केलेले ट्रेन सेट सध्या सेवेत असलेल्या मेट्रो ट्रेन सेटसारखेच असतील. त्या पूर्णपणे वातानुकूलित असतील, त्यामध्ये तुम्हला स्वयंचलित दरवाजे बघायला मिळतील तसेच त्यामध्ये स्वयंचलित घोषणा आणि प्रदर्शन प्रणाली असतील. या १२ नवीन गाड्या जोडल्याने, पुणे मेट्रोच्या (Pune Metro) एकूण ताफ्याचा आकार ४६ पर्यंत वाढेल. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं कि, पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी नवीन १२ ट्रेनची ऑर्डर महामेट्रोने दिलेली आहे. यामुळे या विस्तारित मार्गिकेचे बांधकामाचे पूर्ण झाल्यानंतर लगेच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होणार आहे. यामुळे पीसीएमसी ते निगडी या मार्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Ai+ 5G Mobile Launched : 4999 रुपयांत लाँच झाला 5G Mobile; मिळतात हे खास फीचर्स

Ai+ 5G Mobile Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ai+ 5G Mobile Launched । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतात अवघ्या ४९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत २ नवे मोबाईल लाँच झाले आहेत. हे मोबाईल Ai+ ब्रँडने बाजारात आणले आहेत. AI+ Pulse आणि Nova 5G असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे आहेत. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

Ai+ ब्रँड च्या या दोन्ही मोबाईल मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील AI+ Pulse स्मार्टफोन मध्ये T615 चिपसेट बसवण्यात आली आहे तर Nova 5G मध्ये T8200 चिप वापरण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर आधारित NxtQ OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. यामध्ये NxtPrivacy Dashboard आहे, जे वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कोणत्या ॲप्सद्वारे ट्रॅक केला जात आहे आणि कसा, याची माहिती देतं. याशिवाय, NxtQuantum PlayStore, NxtQuantum Theme Design Tool, Community App, Community Wallpaper आणि NxtMove App यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. (Ai+ 5G Mobile Launched)

कॅमेरा – Ai+ 5G Mobile Launched

AI+ पल्स आणि Nova 5G च्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा मिळतो, तर समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी जास्त वेळ टिकेल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, बोलायचं झाल्यास स्मार्टफोन मध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.

किंमत किती?

Ai + Pluse च्या ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,९९९ रुपये आहे तर ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे. दुसरीकडे, Ai + Nova 5G च्या ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे तर ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.