टायर फुटून चारचाकी गाडी पाचवेळा हवेत उडाली, दोन ठार

0
34
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर प्रतिनिधी | चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने ब्रह्मपुरी तालुक्यात झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत तर सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय.

गांगलवाडी ते गुडगाव या मार्गावरून जात असलेल्या चारचाकी वाहनाचे टायर अचानक फुटल्याने गाडी अनियंत्रित झाली. ही गाडी पाचवेळा हवेत फिरून जमिनीवर आदळली. यात गोसेखुर्द प्रकल्पावर काम करणारे ओ एस एस कंपनीचे सुमारे ७-८ कर्मचारी जात होते. या भीषण अपघातात दोघेजण घटनास्थळीच ठार झाले तर बाकीचे गंभीर जखमी झाले.

जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले आहे. या घटनेचा तपास ब्रम्हपुरीचे ठाणेदार बळवंत खाडे यांच्या मार्गदर्शनात रायपुरे,गौरकार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here