तब्बल ५ महिन्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये २-जी इंटरनेट सेवा बहाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने कायदा सुव्यवस्था व सद्यस्थितीची पडताळणी करून केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ७ दिवसांसाठी २-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली असून केवळ पोस्टपेड ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतील. या संबंधीचा आदेश १५ जानेवारीपासून ७ दिवसांपर्यंत लागू असणार आहे. मात्र ही सुविधा केवळ ७ दिवसांसाठी दिली जात असताना या ७ दिवसांच्या पाहणीनंतर या सेवाचा कालवधी वाढवला जाऊ शकतो.

तब्बल पाच महिन्यानंतर जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये २-जी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. याचबरोबर हॉटेल, रुग्णालय व निगडीत संस्थामध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा उधमपुर, कठुआ, सांबा व रियासी या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असणार आहे.

मंगळवारी गृह विभागाच्यावतीने यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आपल्या आदेशात गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे की, काश्मीर विभागात अतिरिक्त ४०० इंटरनेट कियोस्क स्थापले जातील. इंटरनेट सेवा देणारे आवश्यक सेवा देणाऱ्यासर्व संस्था, रुग्णालय, बँकाबरोबच शासकीय कार्यालयात ब्रॉडबॅण्ड सुविधा देतील. पर्यटकांच्या सुविधेच्यादृष्टीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट हॉटेल आणि यात्रा कंपन्यांना पुरवले जाणार आहेत. आदेशात हे देखील म्हटले गेले आहे की, जम्मू परिसरातील इंटरनेट बँकींगसह सुरक्षित वेबसाइट पाहण्यासाठी पोस्टपेड मोबाइलवर 2जी मोबाइल इंटरनेटला परवानगी दिली आहे.

Leave a Comment