दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप..!

बीड प्रतिनिधी | जिल्ह्यात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येतोय. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालीये.

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या हरिहर तीर्थ या तलावात शहरातील गणपतीचे विसर्जन करण्यात येतंय. दुष्काळाचं सावट यंदाच्या विसर्जनावर दिसून आले, आज गणेश विसर्जन असल्याने परळी नगर पालिकेकडून टँकरच्या सहाय्याने हा तलाव भरण्यात आलाय.

जिल्ह्यावरील दुष्काळाचं सावट दूर होऊ दे.. आणि परतीचा पाऊस जोरदार पडू दे.. असं साकडं घालत गणरायाला निरोप देण्यात येतोय. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत गणेश विसर्ज सुरु आहे.

जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत विसर्जन नाही, शेतकर्‍यांचे बाप्पासमोरच उपोषण

सोलापूर प्रतिनिधी | लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यासाठी राज्यभरात जोरदार जल्लोष सुरु असतानाच इकडे पंढरपूर तालुक्यात मात्र पाण्यासाठी शेतकर्यांनी गणरायापुढेच उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत नीरा कालव्यातून पाणी मिळत नाही तो पर्यंत गणपती बाप्पाचे विसर्जन करणार नाही असा पवित्रा येथील शेतकर्यांनी घेतल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मागील काही दिवसांपासून पंढरपूर,सांगोला आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अद्याप पाऊस नसल्याने शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे भीमा आणि नीरा नदीला पुर आलेला असतानाच दुसरीकडे मात्र याच भागातील शेतकर्यांना पाण्यासाठी गणपती बप्पासमोरच आंदोलन कऱण्याची वेळ आली आहे.

गणपती बप्पाचे विसर्जन करण्यासाठी अनेक गावात पाणीच नसल्याने गणरायाचे विसर्जन कसे करायाचे अशी चिंता देखील गणेश भक्तांना लागली आहे,अशातच आज पंढरपूर तालुक्यातील खर्डी, उंबरगाव, कासेगाव, या भागातील शेतकर्यांनी चक्का गणरायासमोरच उपोषण सुरु केले आहे.इतकेच ऩाही तर पाणी मिळाल्याशिवाय गणरायाचे विसर्जन करणार नाही असा इशारा येथील शेतकरी सचिन ताटे यांनी दिला आहे. पाण्यासाठी गणरायाचे विसर्जन थांबविण्याची वेळ या भागातील शेतकर्यांवर पहिल्यांदाच आल्याने येथील शेतकर्यांच्या उपोषणाची परिसरात चर्चा सुरु झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

दंगल गर्ल बबिता फोगाटचा पोलिस दलातून राजीनामा, भाजपकडून लढणार विधानसभा

आता कार्ड जवळ नसेल तरीही ATM मधून पैसे काढता येणार, पहा काय आहे प्रक्रीया

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

 

कृषी सेविकेचा स्तुत्य उपक्रम महिलांना दिले शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे

औरंगाबाद प्रतिनिधी | शिक्षक दिवस आणि महालक्ष्मी आगमनाचं औचित्य साधत एका कृषीसेविकेनं औरंगाबाद इथं महिला शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे धडे दिले. कृषीसेविका अनिता बनकर यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. सध्या जिल्ह्यात मका, तूर तसंच सोयाबीन यासारख्या मुख्य जिरायती पिकांवर रोगराईचा मोठा प्रादुर्भाव होतो आहे. ही गोष्ट लक्षात घेत खुलताबाद तालुक्यातल्या शुहजातपूर येथील कृषीसेविका अनिता बनकर यांनी आपल्या … Read more

कडकनाथ भ्रष्टाचार, शाहूवाडीत 80 शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक

कोल्हापूर प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचार घोटाळे ची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. सांगली इस्लामपूर व कोल्हापूर जिल्ह्यासह शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या वस्तीवर सुद्धा या कोंबडी भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढू लागलेली आहे. कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचारात शाहूवाडी तील शेतकऱ्यांची दीड कोटीची फसवणूक झाली असून रयत ऍग्रो कंपनी ने कडकनाथ कोंबड्यांच्या नावाखाली सुमारे … Read more

गणेशोत्सवात झेंडूला भलताच भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

टीम, HELLO महाराष्ट्र | यंदाच्या गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना भलताच भाव आहे. शेतकऱ्याच्या फुलाला भाव मिळत असल्यान शेतकरी वर्गात आनंदच वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे. गणेशोत्सवात झेंडूच्या फुलांना चांगलीच मागणी असते मात्र यंदा पाऊस काही ठिकाणी पाऊस खूपच कमी झाल्यानं म्हणावे असे झेंडूच्या फुलांचे उत्पादन झालं नसल्यानं यंदा बाजारात झेंडूच्या फुलांचे भाव खूपच पेटलेले दिसत आहेत. सध्या … Read more

अज्ञानाचा फायदा घेऊन आदिवासी वृद्धाची बँकेतच केली रोकड केली लंपास

यवतमाळ प्रतिनिधी | यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा इथं वास्तव्यास असलेले लखमा कोंडेकर मारेगाव येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून पैसे काढण्याकरिता आले असता त्या बँकेतूनच त्यांचे पैसे चोरी झाले. ही सगळी घटना बँकेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की या वृद्धान एका अनोळखी इसमास पैसे काढण्याची पावती लिहून मागितली. त्यावर २ हजार रुपये … Read more

तिसंगी तलावाचा पाणी प्रश्न पेटणार

सोलापूर प्रतिनिधी | गेल्या काही महिन्यांपासून तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी अनेकवेळा आंदोलन करण्यात आल होतं व प्रशासानाला त्याची दखल घेणेही भाग पडल होत. पण या भागात पावसाळा संपला तरी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून भिमा-निरा नदीला पुर येऊन देखील तिसंगी तलाव पाण्याने भरला नसल्याने संतप्त अज्ञात आंदोलकांनी महामंडळाची बस फोडून तिसंगी तलाव पाण्याने भरला नाही तर … Read more

टोमॅटोचा उच्चांकी बाजारभाव, क्रेटला एवढी मोठी किंमत

जुन्नर प्रतिनिधी । सतिश शिंदे दरवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील पश्चिम, पूर्व भागातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो शेतीमध्ये केली असून, टोमॅटोला या वर्षी ५०० रू क्रेटला किंमत झालेली आहे. उन्हाळ्यामुळे पाणी मिळत नाही, मात्र शेतकर्यांनी तुषार सिंचनाचा वापर करून टोमॅटो पिकाला पाणी देत आहेत. मात्र उन्हामुळे काही ठिकाणी बागा जळत आहेत. त्यातच आज नारायणगाव मार्केटला पश्चिम तसेच पूर्व … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील उमराणी येथील बाबु लक्ष्मण यादव या शेतकऱ्याने कर्जास कंटाळून आपल्याच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी सात वाजता ही घटना घडली. विविध संस्था व खासगी सावकारकडून असे चार लाख ८० हजार रूपयांचे कर्ज त्यांच्या अंगावर होते. याबाबत जत पोलिस ठाण्यात मल्लेश कत्ती यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

२ घरे , १ म्हैस आगीत जळून खाक

Untitled design

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  ठोंबरेवाडी ता.सातारा येथील नुने ते गवडी या रस्त्यानजीक असलेल्या माळरानावरील बाबर यांची दोन घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू,धान्य,दागिने व म्हैस हे सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने जळून खाक झाली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे तीस लाखांचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबन राऊ बाबर … Read more