शेतकऱ्यांचे वीजबिल माफ केले जाणार तर..!! राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजितदादांच्या मोठ्या घोषणा

Farmers News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी (Mansoon Session) अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आज म्हणजेच 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024-25) सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणा नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया.

  • कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप 2023-24 2 हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपये दिले जाणार.
  • गाईच्या दुधासाठी 1 जुलैपासून प्रतिलिटर 5 रुपये अनुदान सरकारकडून देण्यात येईल.
  • शेतमालाच्या पंचनामासाठी राज्यभरात ही पंचनामा पद्धत राबवली जाणार.
  • शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय.
  • राज्यातील 8 लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप दिले जाणार.
  • जलयुक्त शिवारासाठी 650 कोटींची तरतूद केली जाईल.
  • शेतकऱ्यांना बांबूंची रोपे मोफत दिली जाणार.
  • राज्यात गाव तिथे गोदाम ही योजना राबवली जाणार.
  • सरकारकडून राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
  • शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना सुरू राहील.
  • राज्यातील 108 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता.