तांबव्यात बिबट्यानंतर आता रानगव्याचा कळप, शेतकऱ्यांच्यात भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील तांबवे गावात आज रविवारी दि. 1 मे रोजी रानगव्याचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ 4 ते 5 रानगवा आल्याने गावकऱ्यांची चांगलीच पळापळ उडाली. बिबट्यानंतर आता गवा रेडा गावात आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. तेव्हा वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्यातून केली जात आहे.

तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या घराच्याजवळ असलेल्या आनंदा विठ्ठल पवार यांच्या शेतामध्ये सुमारे दोन तास मुक्काम होता. दोन तासांनी डाग रानाकडे रानगवे गेले. त्यांनी शेतीचे उभ्या उसाचे बरीच मोडतोड केली. रानगव्यांची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली. एकाच वेळी 4 ते 5 रानगवे ऊसाच्या शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. रानगव्यांचा  कळपच गावच्या तोंडावर असलेल्या शेतात घुसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात असलेल्या शेतकरी तसेच रहिवाशी लोकांनी या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

तांबवे परिसरात गेल्या अनेक वर्षापासून बिबट्याने मोठा धुमाकूळ घातला आहे. अनेकदा बिबट्याने प्राण्यांसह माणसांच्यावरही हल्ले केले आहेत. तसेच अनेक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. परंतु आता रानगवे गावात शिरल्याने तेही कळपाने शेतकरी तसेच नागरिकांच्यात भीती आहे. तेव्हा आता वनविभागाने या रानगव्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Leave a Comment