गलवान खोऱ्यांतील जवानांच्या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने केला सलाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये १५-१६ जूनच्या रात्री लडाखच्या Galwan Valley गलवान खोऱ्यात अतिशय हिंसक झडप झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. भारतीय सैन्याच्या या बलिदानाला अभिनेता विक्की कौशलने ट्विटरवर सलाम करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

विक्की कौशलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “गलवान खोऱ्यात शूरपणे लढलेल्या आणि आपल्या राष्ट्राच्या गौरवासाठी स्वत: शहीद झालेल्या आमच्या वीरांना मी सलाम करतो. त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून सांत्वन करतो. जय हिंद.” विक्कीच्या या ट्विटवर अनेक चाहत्यांनी गलवानच्या संघर्षाबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या. विकी कौशलच्या या ट्विटनंतर युजर्स कमेंटमध्ये विक्की कौशलने काम केलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटामधील फोटो, क्लिप आणि संवाद कमेंट बॉक्समध्ये शेअर करत आहेत.

बर्‍याच लोकांना या घटनेनंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण आहे. जेव्हा भारताने आपल्या वीरांचा बदला घेतला होता. लोकं आता या घटनेचा उरी सारखी घटना म्हणून पाहत आहेत. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमात उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईचे चित्रण दाखवले आहे. विक्की कौशलने या चित्रपटात या मोहिमेतील महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याची भूमिका सरकारली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment