रस्त्यावर वाहने आणून कायदा मोडू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाउन केल्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘करोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वत:च्या व दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावलं आहे. त्यामुळं केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहनं आणून गर्दी करून कायदा मोडू नका,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

करोनामुळे राज्यात जमाव बंदी लागू करण्यात आलेली असतानाही लोक ती गांभीर्याने घेत नाही आहेत. जनता कर्फ्यूची उठताच अनेक लोकांनी जमाव बंदीचा आदेश झुगारून खासगी वाहनांनी प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्याच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून त्यामुळे गर्दीही होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट लोकांना गर्दी न करण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!

मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी

महाराष्ट्र ‘लॉकडाऊन’ करणाऱ्या कलम १४४ मध्ये नक्की असं आहे तरी काय? घ्या जाणून

अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

 

Leave a Comment