राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल; केंद्रानं केली राज्य सरकारची मागणी पूर्ण

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर वाढता ताण या सर्व परिस्थितीमुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती. केंद्रानं राज्य सरकारची मागणी मान्य केली असून केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. या सर्व तुकड्या सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू होणार आहेत.

राज्यात दाखल होत असणाऱ्या या तुकड्यांमध्ये रॅपिड अक्शन फोर्सच्या ५, CISFच्या ३ आणि CRPFच्या २ तुकड्या दाखल झाल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक तुकडीत १०० जवान आहेत. राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता राज्य शासनाने एकूण २० तुकड्या मागवल्या होत्या, त्यातील १० तुकड्या सद्यस्थितीला केंद्राने पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील कोरोना प्रभावित मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, अमरावती इथे या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. रमजान ईद, आषाढी पालखी सोहळा, गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलिसांना विश्रांती देण्यासाठी या तुकड्यांना राज्यात पाचरण करण्यात आल्या आहेत. राज्यात आलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या या तुकड्या कुठे तैनात करायच्या याचा अधिकार त्या-त्या जिल्ह्यांच्या पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here