नवी दिल्ली । रेल्वे प्रवासी सावध राहा, कारण आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची नजर तुमच्याकडे असेल. आतापर्यंत तुम्हाला ट्रेनमध्ये प्रवास करताना खिसेकापूंची काळजी घ्यावी लागत होती, आता तुम्हाला घरबसल्याही त्याबाबत काळजी घ्यावी लागेल. त्याचे कारण म्हणजे असे खिसेकापू आता ऑनलाइन आले आहेत. जराशी संधी मिळताच ही लोकं तुमच्या खिशातून पैसे काढतील आणि तुम्हाला हातावर हात धरून बसल्याशिवाय काही करता येणार नाही. अलीकडेच, अशा अनेक तक्रारी आल्यानंतर IRCTC ने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अशा प्रकारे खिसा रिकामा केला जातो
ते एका उदाहरणासह समजून घेणे चांगले होईल. समजा तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचे आहे आणि तुम्ही रेल्वेचे तिकीट बुक केले आहे. मात्र काही कारणास्तव तुमचा प्लॅन बदलला आणि तुम्हाला तिकीट रद्द करावे लागले. रद्द केल्यानंतर, जर तुम्हाला रिफंड मध्ये काही अडचण असेल तर तुम्ही रिफंड साठी रिक्वेस्ट कराल.
येथूनच फसवणुकीचा खेळ सुरू होतो. कधीकधी तुमचा डेटा रेल्वेकडे केलेल्या तक्रारींद्वारे हॅक केला जातो तर कधीकधी तुम्हाला फेसबुक किंवा ट्विटरसारख्या तुमच्या सोशल प्रोफाइलद्वारे ट्रॅक केले जाते. फसवणूक करणाऱ्यांना माहिती मिळते की, तुम्हाला रेल्वेच्या रिफंड किंवा तिकिटासंदर्भात काहीतरी अडचण येत आहे, तेव्हा ते तुम्हाला टार्गेट करतात.
IRCTC ने तुमची समस्या सोडवण्यापूर्वीचे हे फसवणूक करणारे तुमच्याशी संपर्क साधतात आणि तुम्हाला एका प्रक्रियेद्वारे फसवतात. UPI द्वारे फसवणूक कशी आहे आपण येथे वाचू शकता – UPI द्वारे फसवणूक.
तुमची वैयक्तिक माहिती देऊ नका
हे फसवणूक करणारे IRCTC च्या ग्राहकांना बळी ठरवण्यासाठी एक नवीन युक्ती घेऊन आले आहेत. रिफंडसाठी एक ऑनलाइन फॉर्म तयार करण्यात आला आहे, जो भरण्यास सांगितले जाते आहे. त्यात अनेक महत्त्वाच्या माहितीचा एक कॉलम आहे, जसे की बँक खाते क्रमांक ते डेबिट कार्ड्सची संपूर्ण माहिती. या माहितीच्या आधारे तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात.
जर कोणी तुम्हाला असाच फॉर्म भरण्यास सांगितले तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. या प्रकारची माहिती IRCTC कडून विचारली जात नाही. IRCTC नेच ट्विट केले आहे की, “अशी लोकं वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतात आणि काही लिंक ग्राहकांना पाठवतात. कृपया अशा लिंक्स किंवा कॉल्सना रिप्लाय देऊ नका.” IRCTC ने सांगितले आहे की,” संपूर्ण रिफंड प्रक्रिया ऑटोमॅटिक आहे. IRCTC च्या रिफंडच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नाही.”




