दिलासादायक! जिल्ह्यात फक्त 25 नव्या रुग्णांची वाढ; 25 जणांना सुटी

0
31
corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | दिवसेंदिवस जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 11 आणि ग्रामीण भागातील 14 जण घरी परतले. सध्या जिल्ह्यात सध्या 532 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागांतील 492 रुग्णांवर तर शहरात अवघ्या 40 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 427 कोरोना बाधितांवर उपचार पूर्ण झाल्याने कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत 3 हजार 440 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील 13 आणि ग्रामीण भागातील 83 अशा 96 रुग्णांना सुट्टी देण्यात आली. उपचार सुरू असताना, म्हस्की, वैजापूर येथील 50 वर्षीय पुरुष, गारखेड्यातील 67 वर्षीय महिला, किनगाव, फुलंब्री येथील 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

शहरातील मनपा हद्दीतील घाटी 1, पडेगाव 1, टाऊन हॉल, सिडको 1, हर्सूल 1, घाटी 1, गारखेडा 2, शहानूरवाडी 1, इटखेडा 1, अन्य 3 त्याचबरोबर ग्रामीण भागात औरंगाबाद तालुक्यात 1, फुलंब्री 1, गंगापूर 1, कन्नड 2, खुलताबाद 1, वैजापूर 3, पैठण 5 रुग्ण आढळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here