Corona Cases In Maharashtra : कोरोना रुग्णांचा आकडा वाढला; कोणत्या जिल्ह्यांत किती संख्या?

Corona Cases In Maharashtra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Corona Cases In Maharashtra। महाराष्ट्रात एकीकडे पावसाने धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे कोरोना विषाणूंनेही डोकं वर काढलं आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खास करून मुंबई- ठाण्याच्या शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. मागील २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील सर्वाधिक ३७ रुग्ण मुंबईत असून, त्याखालोखाल ठाण्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. ताज्या आकडेवारी नुसार, राज्यात मे महिन्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ३६९ वर पोहोचली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण – Corona Cases In Maharashtra

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत कोरोनाचे ३७ रुग्ण आहेत, ठाणे महापालिका परिसरात १९ रुग्ण, नवी मुंबई महापालिका ७ रुग्ण, पुणे महापालिका २ रुग्णआणि पिंपरी-चिंचवड महापालिका, लातूर महापालिका, रायगड, कोल्हापूर याठिकाणी प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात १ जानेवारी ते २६ मेपर्यंत करोनाच्या ७ हजार ८३० संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३६९ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक २८५ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्याची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या २७८ असून, ८७ रुग्ण बरे झाले आहेत.Corona Cases In Maharashtra

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सर्वाधिक (Corona Cases In Maharashtra) असल्याने टेन्शन वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून विविध रुग्णालयांत राखीव खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज पडल्यास आरोग्य सेवेत वाढ करण्यात येणार असल्याचे सुद्धा महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सध्याचे रुग्ण प्रामुख्याने ओमिक्रॉन JN.1 आणि कोरोनाच्या उप-व्हेरिएंट्समुळे (उदा., LF.7, NB.1.8) आहेत, जे अत्यंत संसर्गजन्य मानले जातात, परंतु कमी घातक आहेत. यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घश्यात खवखव होणे आणि शारीरिक दुखणे अशी लक्षणे दिसतात.

कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये –

खरं तर कोरोनाची उत्पत्ती चीनमध्ये 2019 मध्ये झाली आणि 2020 मध्ये संपूर्ण जगभर हा विषाणू पसरला. भारतात तर करोडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांनी यातून स्वतःचा बचाव केला तर काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉक डाउन करण्यात आलं, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली होती. 2022 पासून जग हळूहळू पूर्वपदावर आले. परंतु आता हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे ही पुन्हा लाट येणार का अशी भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या या नव्या विषाणूचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.