Deharji Dam : महाराष्ट्रातील या जिल्ह्यात तयार होतंय आणखी एक धरण; 80 टक्के काम पूर्ण

Deharji Dam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Deharji Dam । समृद्ध आणि सुजलाम सुफलाम असलेल्या महाराष्ट्रात आणखी एक धरण तयार होत आहे. देहरजी धरण असं या नव्या धरणाचे नाव असुन ते पालघर जिल्ह्यात देहरजी नदीवर वसलेलं आहे. या धरणाचे 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. तांत्रिक सल्लागाराद्वारे सर्वेक्षण आणि इतर क्षेत्रीय कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून (केआयडीसी) या देहरजी धरण प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. तर केआयडीसी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या प्रकल्पास आर्थिक मदत केली जातेय.

देहरजी धरणाची लांबी: २,४५० मीटर असून उंची: ७१.६० मीटर आहे. या धरणाची एकूण साठवण क्षमता ९५.६० दशलक्ष घनमीटर आहे आणि वापरण्यायोग्य साठवणूक क्षमता ९३.२२ दशलक्ष घनमीटर आहे. त्यानुसार, साधारण प्रतिदिन 255 दशलक्ष लिटर इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. २०२७ च्या अखेरीस देहरजी धरण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आलं आहे. केआयडीसीने 27 जुलै, 2006 रोजी मे. पीव्हीआर प्रोजेक्ट्स लि. यांच्याशी प्रकल्प अंमलबजावणीचा करार केला आणि MMRDA या धरणातून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर प्रकल्प अहवालावर काम करत आहे.

हे पण वाचा : छत्र्या काढा रे!! राज्यात 5 दिवस पावसाचा धुमाकूळ; तुमच्या भागात कसं असेल वातावरण

काय आहेत देहरजी धरणाचे फायदे? Deharji Dam

देहरजी धरण ९३.५५ दशलक्ष घनमीटर (२५५ एमएलडी) पाणी साठवून ठेवेल, ज्यापैकी १९० एमएलडी वसई-विरार महानगरपालिका (व्हीव्हीएमसी) द्वारे राखीव आहे, १५ एमएलडी मार्गावरील ग्रामीण भागांसाठी आणि ५० एमएलडी सिडको पालघर प्रदेशासाठी राखीव आहे. हा प्रकल्प प्रादेशिक विकासासाठी पाणी साठवणुकीत लक्षणीय सुधारणा करण्यासाठी आणि शाश्वत जलसंपत्ती व्यवस्थापनाद्वारे कोकण प्रदेशातील सामाजिक-आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी उभारण्यात आला आहे.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल कि, देहरजी मध्यम प्रकल्प (Deharji Dam) हा महाराष्ट्र सरकारच्या मुख्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या आणि राज्यासाठी दीर्घकालीन जलसुरक्षा सुनिश्चित करण्याच्या अजेंड्यात एक महत्त्वाचा टप्पा आहे. शाश्वत, उच्च क्षमतेचे धरण बांधून, या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर मिटेलच आणि पालघर आणि आसपासच्या भागातील नागरिकांचे जीवनमान सुद्धा सुधारण्यास मदत होईल. हा महत्वाचा प्रकल्प वेळेवर राबवल्याबद्दल मी एमएमआरडीए आणि केआयडीसीच्या समन्वित प्रयत्नांचे मी कौतुक करतो असेही फडणवीसांनी म्हंटल.