छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीला मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निर्बंधात शिथिलता देण्याची मागणी

0
73
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वर्षापासून राज्यात कोविडमुळे विविध धार्मिक, राजकीय कार्यक्रम, उत्सव यावर कडक निर्बंध लागू होते. कोविडचा संसर्ग रोखण्यास शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाची चांगल्या पध्दतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यामध्ये यश आले आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (ता. 19) होणार आहे. हा जयंती उत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लेखी पत्राव्दारे केली आहे.

पत्रातील माहिती अशी, दोन वर्षापासून राज्यात कोविडच्या अनुषंगाने विविध धार्मिक, राजकीय व विविध धर्माचे उत्सव साजरे करणे यावर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्या निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी राज्यातील जनतेने यशस्वीपणे केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यात राज्य शासनासह सर्वजण यशस्वी झालो आहोत. सध्या संक्रमणाचा दर कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून शासनाने काही निर्बंध हे आज देखील लागू केले आहेत.

राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी मोठया उत्साहात साजरी करण्याची भावना शिवप्रेमींमध्ये आहे. मात्र, कोविडच्या अनुषंगाने लागू असलेल्या निर्बंधामुळे शिवप्रेमी व पोलीस विभागामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्याबाबत तसेच शिवज्योत परवानगी देण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत काही निर्बंध व अटी शिथील केल्यास शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावण निर्माण होऊन शिवजयंती उत्साहात साजरी होईल. यंदाची शिवजयंती साजरी करताना शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामध्ये शासनाचे नियम पाळून थोडया फार प्रमाणात शिथीलता देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here