पाण्याच्या वेळा स्मार्ट डिजिटल बोर्डवर जाहीर करण्याची मागणी 

0
35
Water supply
Water supply
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मनपाने शहरात 50 डिजिटल बोर्ड लावलेले आहेत. या स्मार्ट डिजिटल बोर्डवर पाण्याच्या वेळा जाहीर करा अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीपुरवठा बाबत होणारी गैरसोय कमी होईल.

पैठण येथील जायकवाडी धरणातुन हा पाणीपुरवठा शहराला होत असतो. या धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पाण्याच्या वेळाही निश्चित नसल्यामुळे नागरिक आणि महिलांची गैरसोय होत असल्याने शहरातील डिजीटल बोर्डवर महापालिकेने पाण्याची वेळ जाहीर करावी अशी मागणी शहरवासीयांना कडून होत आहे.

शहर परिवर्तन आघाडीच्या वतीने राहुल इंगळे, सत्यप्रकाश राठोड, विजय सुरसे यांच्यातर्फे
मनपा प्रशासनाकडे याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here