इथेनॉल 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉलच्या वापरासंबंधी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना इथेनॉलचा वापर हा एकविसाव्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केला होता. ‘उत्तम पर्यावरणासाठी जैवइंधनाला प्रोत्साहन’ अशी या कार्यक्रमाची मुख्य कल्पना होती.

इथेनॉलच्या वापराबद्दल बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले इथेनॉल वर लक्ष केंद्रित केल्याने त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉल मिश्रित करायचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे. तसेच गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही दोनशे पन्नास कोटींहून अधिक झाल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या सहा वर्षांच्या काळात भारताच्या सौरऊर्जेची क्षमता ही जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढली असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी बोलताना म्हणाले.

One sun, one world, one grid

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जागतिक हवामान बदलाच्या संकटा बद्दल भारत जागृत असून या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेने काम करत आहे. One sun, one world, one grid हे स्वप्न साकार करण्यासाठी इंटरनेशनल सोलर असायन्स भक्कम व्हायला पाहिजे अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment