मुंबई । इरफान खान यांचं पार्थिव स्मशानात पोहोचलं असून मुंबई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांचं पार्थिव सुपुर्द-ए-खाक करण्यात येईल. यावेळी चाहते किंवा सिनेसृष्टीतील कोणालाही स्मशानभूमी जवळ गर्दी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दुर्दैवानं लॉकडाऊन आडवा आल्यानं इरफानच्या चाहत्यांना त्याला शेवटचा निरोप देता येणार नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी कडक बंदोबस्त करण्यात आले असून अंत्यदर्शनासाठी चाहते किंवा कोणत्याही सेलिब्रिटीला तिथपर्यंत जाण्याची परवानगी नाही. त्यांच्या अंत्ययात्रेत फक्त २० जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या देखरेखीखाली इरफान यांच्या पार्थिवाला सुपुर्द-ए-खाक करण्यात येईल. इरफान खान यांचं पार्थिव स्मशानभूमीत पोहोचलं असून अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत दफन करण्याची तयारी पूर्ण झाली. फार कमी लोकांना इरफानच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांवेळी चाहते. मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही.
बुधवारी २९ एप्रिलला बॉलिवूड स्टारचं निधन झालं. कोकिलाबेन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खानचं शव इस्पितळातून स्मशानात नेण्यात आलं आहे. न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरशी बॉलिवूड स्टारचा लढा अखेर अपयशी ठरला. एका हरहून्नरी कलाकाराला काळाने घाला टाकत सर्वांपासून कायमचं दूर नेलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”