कोयना धरणातील विसर्गामुळं कृष्णेच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नदी काठावरील लोकांचे स्थलांतर

0
39
संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । कोयना धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी कृष्णा नदीची पाणी पातळी ३२ फुटांवर जाऊन पोहोचली. त्यामुळे शहरातील सुर्यवंशी प्लॉटमधील घरांमध्ये पाणी शिरले आहे. यानंतर प्रशासनाकडून येथील १० कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असल्याचं वृत्त झी २४ तास वृत्तवाहिनीने दिलं आहे.

कृष्णा नदीसह वारणा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे नदीकाठावरील १०४ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सांगली शहरात रात्रीपासून चारशेहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पूरबाधितांसाठी शहरातील शाळा आणि रिकाम्या इमारतींमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे. सध्या वारणा धरणातून तब्बल १५ हजार क्युसेक्स तर कोयना धरणातून ५५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here