कार इन्शुरन्स घेताना ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कार किंवा बाईक किंवा इतर कोणतेही वाहन असो रस्त्यावर उतरण्यापूर्वी त्याचा इन्शुरन्स असणे कायद्याने गरजेचे आहे. हे इन्शुरन्स आपल्याला अनेक प्रकारचे कव्हर देतात. अपघातामुळे किंवा तुमच्या वाहनाचे कोणतेही नुकसान किंवा चोरी झाल्यास इन्शुरन्स काही प्रमाणात नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करते.

म्हणून, तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सवर लक्ष ठेवा, जर ते एक्सपायर होणार असेल तर तत्काळ त्याचे रिन्यूअल करा. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नवीन किंवा वापरलेली कोणतीही कार घेताना त्याच्या इन्शुरन्सबाबतची संपूर्ण माहिती गोळा करा.

आज इन्शुरन्स मार्केटमध्ये अनेक प्रकारचे इन्शुरन्स उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या प्रीमियमवर विविध प्रकारचे कव्हर देतात. त्यामुळे गाडीचा इन्शुरन्स काढताना नेहमी इतर इन्शुरन्स कंपन्यांशी तुलना करा. यावरून तुम्‍हाला तुम्‍ही आणि तुमच्‍या कारचे इन्शुरन्सच्‍या अंतर्गत कव्हर कसे केले आहे याची कल्पना येईल.

इन्शुरन्स कंपन्यांच्या उत्पादनांची तुलना करा
जसे आपण आधीच सांगितले आहे की, अनेक कंपन्या इन्शुरन्स मार्केटमध्ये विविध इन्शुरन्स पॉलिसी ऑफर करत आहेत. त्यामुळे कोणती इन्शुरन्स कंपनी कोणत्या प्रीमियममध्ये कोणती सुविधा देत आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसींचे प्रीमियम आणि सुरक्षा कव्हर यांची तुलना करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला याबाबत जास्त माहिती नसेल तर तुम्ही तज्ज्ञाचीही मदत घेऊ शकता. मग तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या कारचा इन्शुरन्स घेऊ शकता.

इन्शुरन्स कव्हरची तुलना करा
कार इन्शुरन्समधील प्रीमियमसोबतच सुरक्षा कव्हरबाबतही सखोल अभ्यास केला पाहिजे. कारण कोणत्याही वाहनाच्या इन्शुरन्समध्ये काही गोष्टी पूर्णपणे कव्हर केल्या जातात आणि काही कमी तर काही गोष्टींचा इन्शुरन्स क्लेम मिळत नाही. कारण जेव्हा तुम्ही क्लेम करायला जाता तेव्हा तुम्हाला नियमानुसार कमी कव्हरेज मिळते. यामुळे वाद निर्माण होतात.

Leave a Comment