विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर आल्यास होणार पाचशे रुपयांचा दंड : जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सातारा | यापुढे केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात वाड्या- वस्त्यांवर विनाकारण व मास्क न वापरता घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीकडून 500 रूपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिला आहे. यासाठी दंड वसुलीही कोणाकोणाला करता येणार हेही सांगितले आहे.
आदेशात असे म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक बाबी, अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी घरातून बाहेर पडताना व परत घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकार राहील, असे कळविले असताना देखील बरेचसे नागरिक मास्कचा वापर न करता विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरी, ग्रामीण भागामध्ये नागरिक विनाकारण घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास अशा व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्यात यावा.
या आदेशानुसार दंडाची आकारणी पोलीस विभाग, ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी व शहरी भागात पोलीस विभाग, संबंधित नगर पालिका, नगरपंचायत, नगर परिषद विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.

Leave a Comment