विमान सुरु करण्याची नुसती घोषणा? अनेक विमाने रद्द केल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल २ महिने ठप्प पडलेली देशांतर्गत विमानसेवा काल सुरु झाली खरी. मात्र अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्याने, मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर विमानसेवा सुरु करून विमान अचानक रद्द करायची होती तर ती सुरूच का केली असा प्रश्न आता विमानप्रवास विचारत आहेत.

लॉकडाऊन आणि कोरोनाचा धोका असताना पुन्हा माघारी परतावे लागणार आहेत. त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च कोण देणार, असा सवालही प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.दरम्यान, १ हजार १५० उड्डाणांपैकी दिल्लीतल्या ८२ फेऱ्यांसह देशभरातील एकूण ६३० विमानसेवा रद्द करण्यात आल्या. या विमानसेवेसाठी २२ मेपासूनच बुकिंग सुरु करण्यात आले होते. मात्र कोरोना वाढण्याच्या भीतीने महाराष्ट्रासह, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांनी विमानसेवेवर मर्यादा घातल्याने, या सेवा रद्द कराव्या लागल्या.

नव्या सूचनांनुसार विमान झेपावण्याच्या किमान २ तास आधी प्रवासी विमानतळावर आले. मात्र तिथे पोहोचल्यावर उड्डाण रद्द झाल्याचे कळल्याने या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. रद्द केलेल्या विमानांमध्ये दिल्लीहून जास्त करून पूर्व आणि ईशान्य भारताकडची विमानसेवा रद्द केली गेली. अम्फान वादळाने निर्माण झालेल्या खराब हवामानामुळे इथली उड्डाणं रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment