Konkan Railway Merger : कोकण रेल्वेबाबत मोठा निर्णय, भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होणार; सरकारची मान्यता

Konkan Railway Merger
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Konkan Railway Merger: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात हा निर्णय कळवला आहे. या पत्रामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होण्याचा मार्ग सुकर झाला असून, यामुळे कोकणातील प्रवाशांची गैरसोय होण्यास मदत होणार आहे. खरं तर या विलीनीकरणाचा उद्देश कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणी दूर करणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे आहे.

सरकारने 2 अटीही घातल्या- Konkan Railway Merger

कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वे मधील विलीनीकरणाला कर्नाटक, गोवा आणि केरळ या इतर प्रमुख भागधारकांची यापूर्वीच संमती दिली होती. आता महसुली उत्पन्नात वाढ आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने सुद्धा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने विलीनीकरणाला पाठिंबा देताना २ अटीही घातल्या आहेत. यातील पहिली अट म्हणजे जे विलीनीकरणानंतरही (Konkan Railway Merger) भारतीय रेल्वे कोकण रेल्वे हे नाव कायम ठेवेल आणि दुसरी अट म्हणजे १९९० मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) स्थापनेदरम्यान महाराष्ट्र सरकारने दिलेल्या ३९४ कोटींपेक्षा जास्त रकमेची परतफेड करेल. केआरसीएल हा रेल्वे मंत्रालय (५१% हिस्सा) आणि चार राज्यांच्या मालकीचा संयुक्त उपक्रम आहे: महाराष्ट्र (२२%), कर्नाटक (१५%), गोवा आणि केरळ (प्रत्येकी ६%).

दरम्यान, कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमधील विलीनीकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटल कि, “कोकण रेल्वेची स्वतंत्र कंपनी म्हणून क्षमता मर्यादित असल्याने आणि तिच्या पायाभूत सुविधांच्या गरजा खूप जास्त असल्याने, भारतीय रेल्वेच्या प्रचंड गुंतवणूक पोर्टफोलिओमधून तिला वाटा मिळणे महत्त्वाचे होते. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. कोकण रेल्वेच्या विस्तारात अधिक रेल्वे मार्ग जोडणे, नेटवर्क वाढवणे आणि या मार्गावर अतिरिक्त सेवा सुरू करण्यास मदत होईल.

कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडणारी 741 किलोमीटर लांबीची निसर्गरम्य रेल्वे मार्गिका आहे. ती नद्या, दऱ्या आणि ढगांमध्ये भरकटणारे पर्वत यातून जाते. कोकण रेल्वेवरील पहिली प्रवासी रेल्वे 20 मार्च 1993 रोजी उडुपी आणि मंगलोर दरम्यान धावली. भारतीय रेल्वे अनेक प्रवासी गाड्या चालवण्यासाठी देखील या मार्गाचा वापर करते.