महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आलेल्यांनी महाराष्ट्रद्रोह सिद्ध केला ; शुभम शेळकेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही सिद्ध केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना सुरुवातीपासून या लढ्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस आणि भाजप यांना या प्रश्नाचे सोयर सुतक आहे. असं वाटत नाही. ज्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते त्यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी साडेचार वर्षे वाट पाहावी लागली. त्यामुळे आम्हाला फडणवीस यांच्याकडून अपेक्षा नाहीत, असंही शुभम शेळके यावेळी म्हणाले.

आमचे अंतिम ध्येय महाराष्ट्रात सामील होणे हेच आहे. इथे मराठी माणसाची गळचेपी होते, शिवरायांचा अपमान, शिवरायांची साक्ष देणाऱ्या भगव्या झेंड्याची विटंबना, याची चीड व्यक्त करण्याचे माध्यम ही निवडणूक आहे. इथे लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढायला मराठी माणूस ही निवडणूक संधी म्हणून पाहात आहे” असंही शेळके म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment