‘मनसे’ने भोपळा फोडला!! कल्याण मधून राजू पाटील विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपलं खातं उघडलं आहे. मनसेचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांना ८६,२२३ मते मिळाली. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे रमेश म्हात्रे निवडणूक रिंगणात होते. म्हात्रे यांनी राजू पाटील यांना कडवी झूंज दिली. रमेश म्हात्रे यांना ८०,६६५ मते मिळाली आहेत.

नालासोपाऱ्यात शिवसेनेचा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ उमेदवार पराभूत

नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे प्रदीप शर्मा विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांच्यावर सर्वांचं लक्ष लागलं होतं. निवडणूक निकालात बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. तर ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून पोलीस दलात ख्याती असलेले शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडीवर चालत होते.

मुंबई-ठाण्यात शिवसेनेची ‘मुसंडी’ तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘वर्चस्व’

महाराष्ट्र निर्मिती नंतरच्या तेराव्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज हाती येत आहे. मतदानोत्तर एक्झीट पोलमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल असा दावा करण्यात येत होता. तर शिवसेना शंभरी पार करेल असा अंदाज होता. भाजपचे स्वबळाचे स्प्न पुर्ण होण्याची चिन्हे विरली आहेत मात्र, सेना शंभरीच्या आसपास पोहचली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची गळती, पक्षातील दिग्गज नेत्यांचे सत्ताधारी पक्षात पलायन यामुळे राष्ट्रवादीची ताकद क्षीण झाल्याचे बोलले जात होते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत झूंज दिली. संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. जिथले – जिथले नेते सोडून गेलेत तेथे झंझावती सभा घेतल्या. तसंच संपुर्ण राज्यात साता-याची निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. तेथे राष्ट्रवादीनं आपला गड राखला.

शिक्षण मंत्री आशिष शेलार बहुमताने ‘पास’!

महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शेलार २५ हजार ९०० पेक्षा जास्त मताधिक्यान विजयी झालेत. वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र २०१४ मध्ये भाजपन खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत.

मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंना काँग्रेस पाठिंबा देणार?

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघामधील प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या कलांनुसार भाजपा-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युतीचा होणार याबद्दल दुमत नाही. पण प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतील सभेत भाजपाचा मुख्यमंत्री होणार असे म्हटले होते.

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद फिक्स..!! संजय राऊत यांच्याकडून फिफ्टी-फिफ्टीचा नारा

२०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल भल्या भल्यांची झोप उडवणारा ठरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वरळीतील निकालानंतर संजय राऊत यांनी युती आता फिफ्टी फिफ्टी तत्वावर चालणार असल्याचं सांगत सेनेकडे किमान अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राहील अशी सूचना केली आहे.

२०१९ विधानसभा निवडणूकीचा खराखुरा निकाल पहा फक्त इथेच..!!

आज विधानसभा निवाडणुकांचा निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.