हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे . 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आझाद मैदान अन मंत्रालयासमोर हे उपोषण सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी आज (30 एप्रिल) माध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील म्हणाले, “सरकारकडे समजून घेण्याचं कारण आता उरलेलं नाही. त्यामुळे आता मुंबई सोडायचा प्रश्नच नाही. 29 ऑगस्टपासून मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. तसेच ते जनतेला म्हंटले आहे कि ,फक्त मला 28 तारखेला मुंबईत सोडायला या, इतकंच मला हवं आहे.”
मुख्यमंत्री अन भुजबळ यांच्यावरही जोरदार टीका –
“मागच्या उपोषणावेळी सरकारने चार मागण्या तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण आज तीन महिने झाले तरी एकाही मागणीवर अंमलबजावणी झाली नाही. “आम्ही किती वाट पाहायची , संयम किती दिवस ठेवायचा?” असेही जरांगे-पाटील यांनी बेधडक बोलून टाकले. तसेच जरांगे यांनी सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अन छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांच्यावरही जोरदार टीका केली. “हक्काचं जे आहे, तेच मागतोय. ते रोखू नका. सरकारने आमची 100 टक्के फसवणूक केली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
जरांगेनी मुख्यमंत्र्याना इशारा देत म्हंटले आहे कि –
जरांगेनी मुख्यमंत्र्याना इशारा देत म्हंटले आहे कि , “फडणवीस साहेब, गर्वात राहू नका. सत्ता कोणाचीच कायम राहत नाही. काँग्रेसचं 40-50 वर्षांचं राज्य गेलं, तुमचंही जाईल. खुनशीपणाने अन आकसाने वागू नका.” तसेच त्यांनी मागणी केली की, “गॅझेटीयर, केसेस अन मराठा-कुणबी एक असल्याचे अध्यादेश तातडीने काढा. अन सर्व नोंदी सापडलेले प्रमाणपत्र तातडीने द्यायला सुरुवात करा, नाहीतर याचे परिमाण लवकरच दिसून येतील.
आंदोलनाची दिशा आजपासून सुरु –
जरांगे यांनी सांगितले कि , हि आंदोलनाची दिशा आजपासून सुरु झाली आहे. तसेच 1 ऑगस्ट रोजी आंदोलनाची पुढील दिशा जाहीर केली जाईल. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्टच्या आधी सगळी कामे आवरून घ्यावीत , अन या हक्काच्या लढ्यात सर्वानी सहभागी व्हावे.