Mansoon Tourism | साताऱ्यातील कास पुष्प पठार पर्यटनासाठी खुले; या वेळेतच घेता येईल निसर्गाचे दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mansoon Tourism | पावसाळा सुरू झाला की, आपोआपच सगळ्यांना निसर्गाची ओढ लागते. आणि लोक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जातात. पावसाळ्यामध्ये (Mansoon Tourism) हिरवेगार डोंगर, धबधबे, सर्वत्र फ्रेश असे वातावरण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. अशातच आता जागतिक वारसा स्थळ कास पठारावरकास पठार हे कार्यकारी समिती वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. येथे नैसर्गिक मंडपघळ, भदार तळे, मचान कुमुदिनी तलाव, इत्यादी पॉईंट्स असतात. ज्याकडे पर्यटक आकर्षित होत असतात.

याप्रमाणेच निसर्गरम्य (Mansoon Tourism) परिसर दाट झाडी, पाऊस, धुके आणि धबधबे हे कास पठाराला मिळालेले एक मोठे वरदानच आहे. राज्यभरातून कितीतरी पर्यटक या ठिकाणी निसर्गाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात. परंतु आता या ठिकाणी फुलांच्या राखीव क्षेत्रात जाऊ नये. यासाठी कर्मचारी दिवसभर काम करत आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शुल्क देखील आकारले जात आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी अनेक वेली, झाडे, झुडपे, लाल, निळ्या, जांभळ्या रंगाची फुले, दुर्मिळ वनस्पती पाहायला मिळतात. त्यामुळे अगदी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतात. परंतु सध्या फुलांसाठी पोषक वातावरण नाही. परंतु ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फुलं पाहायला मिळतील. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत पावसाळी पर्यटनात प्रतिव्यक्ती पन्नास रुपये एवढे शुल्क आकारण्यात येईल. यानंतर तुम्हाला कुमुदिनी तलाव, कास धरण, दर्शन नैसर्गिक मंडप याचे दर्शन घेता येईल. येथे सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटन सुरू असणार आहे.

या ठिकाणी पर्यटकांसाठी स्वच्छतागृहांची चांगली व्यवस्था आहे. शुद्ध पिण्याचे पाणी आहे. संपर्कासाठी कर्मचाऱ्यांकडे वॉकी टॉकी देखील आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनात तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

फुलांच्या क्षेत्रात जाण्यास बंदी | Mansoon Tourism

या पठारावरील वेगवेगळे पॉईंट्स पाहण्यासाठी खुले गेलेले आहे. परंतु फुलांच्या राखीव क्षेत्रात जाण्यास बंदी आहे. या ठिकाणी कुणी प्रवेश केला, तर त्याला दंडात्मक कारवाई केली जाईल. फुलांचा हंगाम सुरू होईपर्यंत या ठिकाणी कोणालाही एन्ट्री नसणार आहे.