मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. “मुंबईची लाइफलाइन” म्हणून ओळखली जाणारी मध्य रेल्वे काही दिवसांसाठी अडथळ्यांमधून जाणार आहे. 23 ते 26 मार्च दरम्यान मध्य रेल्वे विशेष ब्लॉक घेणार आहे, ज्यामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द होणार आहेत. याचा परिणाम हजारो प्रवाशांवरहोणार असून पर्यायी प्रवासाची व्यवस्था करणे आवश्यक ठरणार आहे.
मुंबई लोकल – लाखोंची जीवनवाहिनी का आहे महत्त्वाची?
मुंबई लोकल म्हणजे केवळ रेल्वे नाही, तर ही दैनंदिन प्रवाशांची नाळ आहे. दररोज 80 लाखांहून अधिक प्रवासी लोकलने प्रवास करतात. कार्यालयीन वेळेत ही रेल्वे दर दोन ते तीन मिनिटांनी धावत असते, त्यामुळेच ती मुंबईच्या गतिशील जीवनशैलीला आधार देते. या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांना त्यांच्या वेळेच्या नियोजनात बदल करावा लागू शकतो.
ब्लॉक का घेतला जातोय?
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील म्हसावद स्थानकावर अप लूप लाईन विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे गाड्यांची गती वाढेल आणि वाहतुकीला वेग येईल. या कामाचा एक भाग म्हणून यार्ड पुनर्रचना आणि नॉन-इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात आले आहे.
या सुधारणा रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत , त्यामुळेच काही दिवस गाड्यांची फेरफार करण्यात आली आहे.
या’ गाड्यांचे फेरफार – प्रवाशांनी घ्यावी नोंद
ब्लॉकमुळे खालील गाड्या रद्द राहणार आहेत
11113 – देवळाली ते भुसावळ मेमू
11114 – भुसावळ ते देवळाली मेमू
01212 – नाशिक ते बडनेरा मेमू
01211 – बडनेरा ते नाशिक मेमू
प्रवाशांसाठी सूचना – काय करावे?
प्रवासापूर्वी नवीन वेळापत्रक तपासा.
शक्य असल्यास पर्यायी प्रवास व्यवस्था निवडा.
रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा.
ब्लॉक संपल्यानंतर सुधारित सेवांचा लाभ घ्या.
मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अपील केले आहे की, हे ब्लॉक्स भविष्यातील अधिक वेगवान आणि सुरक्षित रेल्वेसेवेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे काही दिवसांची गैरसोय सहन करावी लागणार असली तरी, याचा दीर्घकालीन फायदा होणार आहे.