Tuesday, September 23, 2025
Home Blog Page 201

Women’s day 2025: पुण्यातील महिलांसाठी मेट्रोची खास ऑफर ; केवळ 20 रूपयांत मिळणार पास

pune metro

Women’s day 2025: पुणे मेट्रोने महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक खास सवलत जाहीर केली आहे. १ मार्च ते ८ मार्च दरम्यान, महिला प्रवाशांना केवळ २० रुपयांमध्ये मेट्रोचा वन डे पास मिळणार आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे महिलांना एक मोठा दिलासा मिळणार आहे.

महिला दिनाच्या सवलतीचा कालावधी (Women’s day 2025)

या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी महिला प्रवाशांना १ मार्च ते ८ मार्च या कालावधीत पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर २० रुपयांत वन डे पास उपलब्ध होईल. या पाससाठी महिला प्रवाशांना त्यांची ओळख प्रमाणित करणारे कागदपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत ठेवणे आवश्यक आहे.

विशेष ऑफर (Women’s day 2025)

सामान्यतः, पुणे मेट्रोचा वन डे पास ११८ रुपयांमध्ये मिळतो, परंतु महिला दिनाच्या विशेष सवलतीत हा पास केवळ २० रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे. यामुळे महिला प्रवाशांना सवलतीचा मोठा फायदा होणार आहे.

सुरक्षित आणि आरामदायी प्रवास (Women’s day 2025)

पुणे मेट्रो प्रशासन महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. या विशेष सवलतीमुळे महिलांना मेट्रोचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास अनुभवता येईल. मेट्रोमध्ये महिलांसाठी विशेष सुरक्षा उपाय आणि आरामदायक सुविधाही उपलब्ध आहेत, ज्यामुळे महिलांचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

पुणे मेट्रोचा वाढता वापर (Women’s day 2025)

पुणे मेट्रो हे शहरातील एक महत्त्वाचे सार्वजनिक वाहतूक साधन बनत आहे. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या या विशेष सवलतीमुळे, अधिक महिला मेट्रोचा वापर करु शकतील, ज्यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

कसा घ्यावा वन डे पास? (Women’s day 2025)

पुणे मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावर जाऊन तिकीट खिडकीतून वन डे पास मिळवा.
२० रुपये भरून पास त्वरित प्राप्त करा.
ओळख प्रमाणित करणारे कागदपत्र सोबत ठेवा.
हा पास १ दिवसासाठी वैध असेल.

महिला दिनाच्या विशेष ऑफरचा लाभ घ्या आणि पुणे मेट्रोसोबत सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घ्या.

पुणेकरांचा प्रवास होणार आरामात ! PMP च्या ताफ्यात होणार 600 CNG बसेसची एंट्री

pmp

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे! पीएमपी ताफ्यात आगामी तीन महिन्यांत 600 सीएनजी बस सामील होणार आहेत, ज्यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार आहे. यामध्ये 400 बस पीपीपी (सरकारी-खासगी भागीदारी) तत्त्वावर एप्रिल महिन्यात ताफ्यात दाखल होणार आहेत, तर उर्वरित 200 स्वमालकीच्या बस जून महिन्याच्या अखेरपर्यंत पीएमपीच्या सेवेत येतील, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

प्रवास होणार आरामात

हे नवीन सीएनजी बस प्रवाशांना जास्त आराम, वातानुकूलित वातावरण आणि नवनवीन सुविधांसह प्रवास करण्याची संधी देणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरएडी क्षेत्रातील पीएमपी सेवा, ठेकेदारांमार्फत चालविल्या जाणाऱ्या बसांच्या आयुर्मानाची समाप्ती झाली आहे, आणि त्यामुळे 250 हून अधिक जुनी बस ताफ्यातून काढून टाकली गेली. या घसरणीमुळे, पीएमपीच्या ताफ्यातील बसांची संख्या घटली आहे आणि आता अनेक जुनी स्वमालकीच्या बस आजही वापरली जात आहेत.

विशेष म्हणजे, अनेक बसांचे आयुर्मान 12 वर्षांपेक्षा जास्त झाले असून, त्यामुळे प्रवाशांना जुन्या आणि मोडकळीस आलेल्या बस मध्ये प्रवास करावा लागतो. पण, पीएमपीने या समस्येवर तोडगा काढला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 200 स्वमालकीच्या आणि 400 पीपीपी तत्त्वावरील सीएनजी बस घेण्यास मान्यता दिली होती. या निर्णयानुसार, 400 पीपीपी सीएनजी बसांची खरेदी प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे, तर स्वमालकीच्या 200 बसांच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील बसची सध्याची स्थिती

  • स्वमालकीच्या बस: 1004 (नवीन 200 बस येणार)
  • कंत्राटी बस: 950
  • पीपीपी तत्त्वावरील बस: 400 (नवीन)
  • आयुर्मान संपलेल्या बस: 327

नवीन सीएनजी बसांच्या आगमनामुळे पीएमपीच्या ताफ्यात एक नवा परिवर्तन होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद, आरामदायक, आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित बससेवा मिळणार आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखद आणि सुलभ होईल.

धक्कादायक! संतोष देशमुख यांच्या अमानुष अत्याचाराचे फोटो पाहून तरुणाची आत्महत्या

Santosh Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. सोमवारी रात्री या अमानुष अत्याचाराचे काही फोटो समोर आले. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महत्वाचे म्हणजे, हे फोटो पाहून बीडमधीलच (Beed) एका तरुणाने धक्कादायक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता गावात त्या नावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील धकादायक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. हेच फोटो बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 23 वर्षीय तरुण अशोक शिंदे (Ashok Shinde) याने देखील पाहिले. परंतु हे फोटो पाहिल्यामुळे अशोक शिंदे यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. शेवटी त्याने मानसिकता तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याला त्याच्या कुटुंबाला आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या क्रूर अत्याचाराचे फोटो पाहून अशोक शिंदे अत्यंत अस्वस्थ आणि भावनिक झाला होता. त्याने आपल्या गावातील मित्रांसोबत या घटनेवर चर्चा केली. मात्र, घरी जाऊन येतो असे सांगून तो निघून गेला आणि त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. परिणामी आता या दोन्ही घटकांमुळे गावातील वातावरण अधिक तापले आहे. यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल (4 मार्च) जानेगाव संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये अशोक शिंदे सक्रीय होता, मात्र त्याच्या अचानक आत्महत्येने गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी भावनिक आवाहन केले आहे की, “लढाई ही संयमाने लढायची असते. एक एक मावळा अशा प्रकारे कमी होत गेला, तर ही लढाई आपण कशी लढणार?”

वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषारोपपत्रात आणखी काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांना तपासा दरम्यान वाल्मिक कराडने आपल्या 3 आयफोनमधील डाटा डिलीट केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र एसआयटीने तो डेटा रिकव्हर केला आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी हा डेटा महत्त्वाचा ठरणार आहे.

CISF Recruitment 2025: CISF अंतर्गत 1161 रिक्त जागांची भरती सुरू; 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी!

CISF Recruitment 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । CISF Recruitment 2025 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी आनदांची बातमी आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Central Industrial Security Force म्हणजेच केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल द्वारे मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी एकूण 1161 रिक्त जागा भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2025 ही दिलेली आहे.

पदाचे नाव (CISF Recruitment 2025) –

जाहिरातीनुसार ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या –

या पदासाठी एकूण 1161 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी या पदासाठी 18 ते 23 वर्ष वयोमार्यादा दिलेली आहे. ((मूळ जाहिरात वाचावी)

वेतन –

उमेदवारांना ‘कॉन्स्टेबल’ या पदासाठी रु. 21,700/- ते रु. 69,100/- दर महिना वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती – ऑनलाईन (CISF Recruitment 2025)

अर्ज सुरू होण्याची तारीख – 05 मार्च 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2025

असा करा अर्ज –

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
भरतीसाठी अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचे प्रमाणपत्रे (क्रेडेन्शियल्स) टाकून लॉग इन करा आणि अर्ज सबमिट करा.
अर्जाची माहिती भरून, अर्ज शुल्क भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रत डाउनलोड करा.

लिंक्स (CISF Recruitment 2025)

अधिक माहितीसाठी PDF पहा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी APPLY करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.

केदारनाथ धाम रोपवेला केंद्राची मंजुरी, 9 तासांचा प्रवास केवळ 36 मिनिटांत होणार

kedarnath

आपण जाणतोच की भारत एक आध्यात्मिक आणि निसर्गसंपन्न देश आहे. त्यातही उत्तराखंड म्हणजे अद्भुत सौंदर्य आणि अध्यात्माचं माहेरघर म्हटलं जातं. अशातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उत्तराखंडला एक मोठी भेट मिळाली आहे. मोदी सरकारकडून उत्तराखंड मधील केदारनाथ धाम साठी रोपवे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे

सोनप्रयाग ते केदारनाथ असा 12.9 किलोमीटरचा हा रोपवे असणार असून त्यासाठी 481 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट कडून हे बांधकाम केले जाणार असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,’ याचा सर्वात मोठा फायदा असा होईल की सध्या आठ ते नऊ तासांचा प्रवास हा 36 मिनिटांवर येईल. यात 36 लोक बसू शकणार आहेत.

केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी चारधाम यात्रेचे नियोजन मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि या लोकांसाठी ही योजना खूप मोठं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. त्यामुळे चारधाम यात्रेला यामुळे चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर यामुळे तेथील स्थानिक व्यवसायांना सुद्धा फायदा होणार आहे. क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. एवढेच नाही तर या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत.

केदारनाथ रोपे प्रकल्प उत्तराखंड रोपवे कायदा 2014 अंतर्गत कार्य करेल जो परवाना ऑपरेशनचे निरीक्षण सुरक्षा आणि भाडे निश्चित करण्यासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. दुसरा प्रकल्प हेमकुंड साहेब मध्ये रोपवे प्रकल्प बांधण्याचा आहे. यासाठी 2730 कोटी रुपये खर्च केले जातील या प्रकल्पाद्वारे हेमकुंड साहेब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातात येणार आहे.

हसन मुश्रीफ यांच्याकडून वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा; हे कारण आले समोर

Hasan Mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी वाशिमच्या (Washim) पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता वाशिमसाठी नवीन पालकमंत्री कोण होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी ही हसन मुश्रीफ वाशिमचे पालकमंत्री पद सोडतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा का?

हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार असून त्यांचे राजकीय कार्यक्षेत्रही तिथेच आहे. मात्र तरी देखील त्यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. जो कोल्हापुरापासून जवळपास 600 किमी दूर आहे. या अंतरामुळे त्यांचा मोठा वेळ प्रवासात जात होता, यामुळे त्यांना कोल्हापुरातील त्यांच्या मतदारसंघात अधिक लक्ष देता येत नव्हते. त्यामुळेच त्यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजतं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. महायुतीतील इतर पक्षांमध्येही पालकमंत्री पदांच्या वाटपावरून चर्चा सुरूच आहे. यामध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण होणार, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याकडे कोणते पद दिले जाईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नवा पालकमंत्री कोण?

सध्या महायुतीमध्ये वाशिमच्या पालकमंत्री पदासाठी कोणाची निवड केली जाईल, याबाबत सस्पेन्स कायम आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्री दत्ता मामा भरणे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याची जबाबदारी नाही. त्यामुळे वाशिमची धुरा त्यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार असले तरी पालकमंत्री पदांच्या वाटपावरून अजूनही तणाव दिसून येत आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून युतीतील पक्षांमध्ये मतभेद आहेत. अशा परिस्थितीत हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याने हा पेच आणखी वाढला आहे. आता वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BSNL Recharge Plans: BSNL ची होळी ऑफर!! 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉलिंगसह OTT ऍक्सेस

BSNL Recharge Plans

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BSNL Recharge Plans – BSNL ने एक आकर्षक ऑफर जाहीर केली असून, हि होळीच्या सणानिमित्य देण्यात आली आहे. या ऑफेरमध्ये BSNLच्या युजर्सना जास्त कालावधीसाठी इंटरनेट, कॉलिंग सेवा आणि इतर फायदे मिळणार आहेत. यासाठी तुम्हाला 1499 रुपये आणि 2399 रुपये मूल्याच्या प्रीपेड प्लॅनचा रिचार्ज करावा लागणार आहे. तसेच या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 1 मार्च 2025 ते 31 मार्च 2025 कालावधी देण्यात आला आहे. तर चला या ऑफरबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

BSNL चा 1499 रुपयांचा प्लॅन (BSNL Recharge Plans) –

व्हॅलिडिटी – 365 दिवस
अनलिमिटेड कॉलिंग – भारतातील कोणत्याही नेटवर्कवर
मोफत नॅशनल रोमिंग
डेटा – 24GB (दरमहा 2GB) आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर 40kbps इंटरनेट स्पीड
SMS – दररोज 100 SMS

BSNL च्या 2399 प्लॅनवर ऑफर –

व्हॅलिडिटी – 425 दिवस
डेटा – दररोज 2GB (एकूण 850GB) आणि डेटा मर्यादा संपल्यानंतर स्पीड कमी होईल.
SMS – दररोज 100 SMS
अनलिमिटेड कॉलिंग – भारतातील कोणत्याही नेटवर्कवर
OTT फायदे – BiTV चे मोफत सबस्क्रिप्शन, ज्यामुळे विविध OTT अँप्सचे ऍक्सेस मिळेल.

वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही –

जर तुम्ही जास्त कालावधीचा प्लॅन शोधत असाल, तर 1499 किंवा 2399 रुपयांचे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात . यामध्ये एक वर्षभर कॉलिंग, डेटा, SMS आणि OTT सेवा मिळत आहेत. त्यामुळे वारंवार रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. वाढलेली व्हॅलिडिटी अन OTT फायदे यामुळे ही डील अधिक आकर्षक बनली आहे.

सरकारच्या नव्या नियमांमुळे जिल्हा परिषद आणि गावातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर!!

Zilla Parishad school

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गेल्या काही वर्षांपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. याचा थेट परिणाम शाळांच्या अस्तित्वावर होत आहे. आता राज्य सरकारने १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या सुधारित संचमान्यता धोरणामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. नव्या नियमानुसार, शाळांना मंजुरी मिळण्यासाठी आता केवळ प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांवर अवलंबून न राहता आधार पडताळणीच्या संख्येनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

शाळा बंद होण्याची भीती

नव्या संचमान्यतेच्या निकषांमुळे जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना शिक्षक मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ६१ विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या शिक्षकाची मंजुरी मिळत होती. मात्र आता ती संख्या ७६ वर नेण्यात आली आहे. त्यामुळे लहान शाळांमध्ये शिक्षक संख्येवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे काही ठिकाणी शाळा बंद करण्याची वेळ देखील येऊ शकते.

शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता

शासनाच्या नव्या नियमांमुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. २१० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी शिक्षक मंजुरीसाठी प्रति शिक्षक ३० विद्यार्थ्यांची मर्यादा होती. जी आता ४० करण्यात आली आहे. परिणामी, मोठ्या शाळांमध्येही शिक्षकांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहणार आहे. ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण वाढणार आहे. तसेच आता, सहावी ते आठवीच्या वर्गांमध्ये २० हून कमी विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्यास शिक्षक मंजूर केला जाणार नाही. या निर्णयामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात

शिक्षक संघटनांचा वाढता विरोध

दुसऱ्या बाजूला शिक्षक संघटनांनी या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नव्या संचमान्यतेनुसार, चार शिक्षकांसाठी १०६, पाच शिक्षकांसाठी १३६ आणि सहा शिक्षकांसाठी १६६ विद्यार्थी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने शिक्षक नोकरी गमावण्याच्या भीतीत आहेत. त्यामुळे संघटनांनी सरकारकडे जुन्या प्रणालीप्रमाणेच संचमान्यता देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आता संचमान्यता ही आधार पडताळणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदीवर आधारित असणार आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांची नावे आधार पडताळणीमध्ये नोंदली गेली नसल्याने शाळांमधील अधिकृत पटसंख्येत मोठा फरक पडला आहे. यामुळे शिक्षक मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या संख्येवर याचा थेट परिणाम झाला आहे.

निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हा ! उन्हाळी सुट्टीत करा महाराष्ट्रातील ‘या’ खास ठिकांणांची सैर

travel maharashtra

उन्हाळ्याचा कालावधी म्हणजेच उन्हाचा तडाखा, उकाडा आणि दमटपणा! अशा वेळी सुट्टी घेणे आणि गड-किल्ले, निसर्गाच्या सान्निध्यात आरामदायक ठिकाणी जाऊन शरीर आणि मनास ताजेतवाने करणे ही एक उत्तम कल्पना असू शकते. महाराष्ट्र, एक विविधतेने भरलेला राज्य, आपल्या निसर्गसंपत्ती आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. उन्हाळी सुट्टीत आनंद घेण्यासाठी येथे अनेक ठिकाणे आहेत. चला, जाणून घेऊया काही प्रमुख ठिकाणे:

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. उंच डोंगरावर स्थित असलेल्या महाबळेश्वरच्या ठिकाणी तुम्हाला शांतता आणि थंड वारा अनुभवता येईल. येथे द्राक्षांचे बागांचे दृश्य, प्रेक्षणीय डोंगर रांगा आणि जलप्रपात पाहायला मिळतात. वेण्णा लेकवर बोटिंग करणे, कित्तुरी आणि महोबळेश्वर मंदिरातील दर्शन करणे हे महाबळेश्वरच्या भेटीचे काही खास अनुभव आहेत.

लोणावळा

लोणावळा हे पुणे शहरापासून जवळ असलेले एक सुंदर ठिकाण आहे. उन्हाळ्यात लोणावळ्याचे टुरिस्ट आकर्षण असलेल्या भुशी डॅम आणि पावना डॅम येथे सुंदर ठिकाणे आहेत. येथे ट्रेकिंग, हायकिंग, आणि धरणातील बोटिंग करता येते. तसेच, आपल्या आवडीनुसार विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये आरामदायक निवासाची सोय आहे.

रायगड किल्ला

रायगड किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेशी संबंधित आहे. येथे इतिहासाची गोडी आणि निसर्गाची शोभा मिळते. किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा परिसर व प्राचीन किल्ल्याची संरचना यामुळे रायगड एक उत्तम पर्यटक स्थळ बनतो.

आगाशी आणि अलीबाग

आगाशी आणि अलीबाग हे समुद्र किनारे असलेले ठिकाण आहेत. समुद्रकिनार्यावर फेरफटका मारणे, वॉटर स्पोर्ट्सची मजा घेणे आणि शांततेत वेळ घालवणे यासाठी अलीबाग एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर येथील प्राचीन किल्ले आणि मंदिर देखील भेट द्यायला योग्य आहेत.

सिंहगड

सिंहगड किल्ला पुणे शहराजवळ आहे. हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून, त्याच्याजवळ असलेले ठिकाण अत्यंत आकर्षक आहेत. सिंहगड किल्ल्यावर चढून पिऊन एक गार वारा आणि निसर्गाची गोष्ट ऐकणे, हे एक अप्रतिम अनुभव असतो.

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेत स्थित एक पर्वतीय रस्ता आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी थोडं गारवा असतो आणि निसर्गाची भव्यता अनुभवायला मिळते. घाटात पाणी पडणारे धबधबे आणि हिरवीगार जंगल असलेले ठिकाण ट्रेकिंगसाठी खूप आदर्श आहे.

संगलीतील जिंकडळ

संगली जिल्ह्यातील जिंकडळ एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. येथील बॅकवॉटर आणि धरण परिसराचा नजारा सुंदर आहे. येथे पर्यटकांच्या निवासासाठी चांगली रिसॉर्ट्स देखील उपलब्ध आहेत.

पवना लेक

पवना लेक हे पुणे शहराजवळ असलेले एक सुंदर स्थान आहे. येथील शांतता आणि सौंदर्य प्रवाशांना एकदम ताजेतवाने करणारी असते. पवना लेकच्या परिसरात असलेली हॉटेल्स आणि कॅम्पिंगच्या पर्यायांनी पर्यटकांना आकर्षित केलं आहे.

नाणेघाट

नाणेघाट हा एक आकर्षक ट्रेक आहे जो माथ्यावरून वसलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. नाणेघाट आपल्याला ट्रेकिंगची आवड असलेल्या पर्यटकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

भीमाशंकर

भीमाशंकर, ज्याला पुण्याजवळ असलेले एक प्रसिद्ध श्री महादेव मंदिर आहे, हे निसर्ग प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. या ठिकाणी हायकिंग आणि ट्रेकिंगची मजा घेता येते आणि थंड वातावरणामुळे उन्हाळ्यात इथे फिरणं खूप आरामदायक ठरते.

उन्हाळ्याच्या सुटीत महाराष्ट्रात फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. किल्ले, डोंगर, जलप्रपात, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळे अशा विविध ठिकाणी तुम्हाला आराम, साहस आणि निसर्गाची सुंदरता अनुभवता येईल. तुमच्या आवडीनुसार योग्य ठिकाण निवडून, आपल्या सुट्टीचा आनंद घ्या!

IND Vs AUS मॅचदरम्यान व्हायरल झालेल्या ‘सुंदरीची’ ओळख पटली; पहा कोण आहे ती?

Payal gaming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकताच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना 4 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. यानंतर भारताच्या शानदार कामगिरीबरोबर चर्चा सुरू झाली ती स्टेडियमवर कॅमेरामॅनने टिपलेल्या एका सुंदर मुलीची. ही मुलगी स्टेडियमवर टीम इंडिया जर्सी परिधान करून फोनमध्ये फोटो क्लिक करताना स्क्रीनिंग बोर्डवर दिसली. त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण होती? याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अखेर नेटकऱ्यांनी तिची ओळख पटवली आहे.

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनल मध्ये चर्चेत राहिलेल्या मुलीचे नाव आहे पायल धारे. पायल धारे ही एक भारतातील सुप्रसिद्ध गेमिंग स्ट्रीमर आणि कंटेंट क्रिएटर असून ती “Payal Gaming” या नावाने ओळखली जाते. ती सध्या S8UL Esports संघाशी जोडलेली आहे. खास म्हणजे, तीचे यूट्यूबवर तब्बल 4 मिलियनपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स आहेत. ज्यामुळे ती भारतातील आघाडीच्या महिला गेमर्सपैकी एक मानली जाते.

पायल धारे चर्चेत कशी आली?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात पायल धारे भारतीय संघाचे समर्थन करण्यासाठी उपस्थित राहिली होती. त्यावेळी सामन्याचे व्हिडिओ काढत असताना ती कॅमेऱ्यात कैद झाली आणि तीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यामुळे ही मुलगी नेमकी कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली. त्यानंतर गेमिंग क्षेत्रातील तिच्या चाहत्यांनी ही “Payal Gaming” असल्याचे सांगितले. या घडलेल्या प्रकारामुळे पायल धारे चर्चेत आली आणि तिचे फॉलोवर्स देखील अधिक वाढले.

कोण आहे पायल धारे?

मध्य प्रदेशमधील पायल धारे हिने गेल्या काही वर्षांमध्ये गेमिंग विश्वात मोठे नाव कमावले आहे. ऑनलाइन गेमिंगमध्ये महिलांची उपस्थिती तुलनेने कमी असताना पायल धारे या क्षेत्रात पाय रोवून उभी आहे. महत्वाचे म्हणजे, तिने 2023 मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी तिने त्यांच्याशी संवाद साधला होता. या भेटींचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर उपलब्ध आहेत. आता हे फोटोज देखील सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा भाग बनले आहेत.