Saturday, December 13, 2025
Home Blog Page 202

आता WhatsApp वर तयार करा तुम्हाला हवी तशी AI इमेज ; फॉलो करा स्टेप्स

whats app

AI-जनरेटेड इमेज तयार करणे आता कल्पनांना व्यक्त करण्याचा एक रोमांचक आणि क्रिएटिव्ह मार्ग बनला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही WhatsApp वर थेट AI इमेज तयार करू शकता? होय, बरोबर ऐकलंत! Meta ने WhatsApp मध्ये एक खास फीचर आणले आहे, ज्यामुळे तुम्हाला अॅप सोडण्याची गरज नाही. जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर हा लेख तुमच्यासाठी एक ट्रीट आहे.

चला पाहूया WhatsApp वर AI इमेज कशी तयार करायची आणि एडिट करायची

  • Meta AI चॅट उघडा.
  • ‘imagine’ टाइप करा आणि नंतर तुम्हाला हवी असलेली इमेज वर्णन करा. (तुमच्या प्रॉम्प्टचा प्रीव्यू लगेच दिसेल.)
  • एका इमेजची निवड करा आणि ‘Send’ वर टॅप करा.
  • AI-जनरेटेड इमेज थेट चॅटमध्ये दिसेल.
  • डाउनलोड करण्यासाठी इमेजवर टॅप करा आणि होल्ड करा, मग ‘Save’ वर क्लिक करा.

WhatsApp वर AI इमेज कशी एडिट करावी?

जर तुम्हाला तयार केलेली AI इमेज अपडेट किंवा एडिट करायची असेल, तर WhatsApp त्यासाठीही सोयीस्कर पर्याय देते.

  • त्या चॅटमध्ये जा जिथे तुम्ही AI इमेज तयार केली आहे.
  • इमेजवर टॅप करा आणि होल्ड करा.
  • ‘Reply’ पर्यायावर टॅप करा.
  • नवीन टेक्स्ट प्रॉम्प्ट टाइप करा.
  • ‘Send’ वर टॅप करा आणि अपडेटेड इमेज लगेच चॅटमध्ये दिसेल.

AI इमेज WhatsApp वर का वापरावी?

क्रिएटिव्हिटीला चालना: तुमच्या कल्पनांना प्रत्यक्ष इमेजमध्ये बदलण्याचा सोपा मार्ग.
वेळेची बचत: वेगळे अॅप उघडण्याची गरज नाही – थेट WhatsApp वर इमेज तयार करा.
सुलभ शेअरिंग: मित्र-परिवारासोबत सहज शेअर करता येते.

Meta AI ने WhatsApp मध्ये आणलेल्या या नव्या सुविधेमुळे डिजिटल कम्युनिकेशन आणखी इंटरेक्टिव्ह आणि मजेदार होणार आहे. तुम्ही अजून हे फीचर वापरले नाही? मग वाट कसली पाहताय? तुमच्या WhatsApp वर लगेच ट्राय करा.

Indian Railway: तुम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेकडून ‘या’ 5 सुविधा मिळतात मोफत

indian railway

Indian Railway: भारतात रेल्वे म्हणजे सर्वाधिक परवडणारे आणि आरामदायी प्रवास देणारे असे सार्वजनिक वाहन. म्हणूनच बहुसंख्य लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. एवढेच नाही तर भारतीय रेल्वे (Indian Railway) जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

भारतीय रेल्वे प्रवाशांना विविध सोयी देखील पुरवत असते. प्रवाशांचा प्रवास हा अधिक जलद गतीने आणि आरामदायी होण्यासाठी भारतीय रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. एवढेच नाही तर भारतीय रेल्वेकडून वेगवेगळे उपक्रम देखील राबवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का रेल्वेच्या काही सुविधा प्रवाशांसाठी मोफत आहेत. पण या सुविधांबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे आज आपण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या पाच मोफत सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.

बेडरोल सेवा (Indian Railway)

भारतीय रेल्वेमध्ये एसी कोच मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत बेडरोल सेवा दिली जाते. एसी फर्स्ट, एसी सेकंड आणि एसी थर्ड मधील प्रवाशांना ब्लॅंकेट, उशी, चादर आणि टॉवेल मोफत दिला जातो. गरीब रथ एक्सप्रेस मध्ये ही सुविधा 25 रुपये फी देऊन उपलब्ध करून दिली जाते आहे. काही ट्रेनमध्ये स्लीपर क्लासच्या प्रवाशांना देखील सुविधा मोफत दिली जाते.
वैद्यकीय सेवा

भारतीय रेल्वे कडून प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. ट्रेनमध्ये अचानक आजारी पडल्यास प्रवासांना मोफत वैद्यकीय सेवा मिळू शकते. यासाठी प्रवासी रेल्वे अधीक्षक, तिकीट कलेक्टर किंवा कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता.

मोफत जेवण (Indian Railway)

जर तुम्ही राजधानी शताब्दी किंवा दुरांतू सारख्या प्रीमियम ट्रेनमधून (Indian Railway) प्रवास करत असाल तर दोन तास उशिरा ट्रेन येत असेल तर रेल्वे प्रवाशांना मोफत जेवण देते.

लॉकर रूमची सुविधा

भारतीय रेल्वेच्या काही स्थानकांवर प्रवाशांना क्लॉक रूम आणि लॉकर रूमची सुविधा देखील मिळते. प्रवासी त्यामध्ये त्यांचा सामान ठेवू शकतात या सुविधेसाठी तुम्हाला नाममात्र शुल्क भरावा लागतो.

वेटिंग हॉल (Indian Railway)

जर एखाद्या प्रवाशाला प्रवासाच्या दरम्यान ट्रेन बदलायची असेल किंवा काही काळ स्टेशनवर वाट बघायचे असेल तर तो प्रवासी रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या एसी किंवा नॉन एसी वेटिंग हॉलचा वापर करू शकतो ही सुविधा त्यांना अगदी मोफत मिळते

केंद्र सरकारसह नागरिकांच्या चिंतेत वाढ!! आता गव्हाच्या किमती पुन्हा एकदा महागणार

Wheat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या भारतीय बाजारपेठेत मोठी उलथापालथ सुरू आहे. ज्यामुळे केंद्र सरकारने (Central Government) खुल्या बाजारात गहू विक्री थांबवली आहे. ओपन मार्केट सेल्स स्कीम (OMSS) अंतर्गत सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 3 दशलक्ष टन गहूपैकी जवळपास 2.97 दशलक्ष टन गहू विकला गेला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतरही बाजारातील गव्हाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक राहिले आहेत, यामुळे आगामी हंगामात सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गव्हाच्या किमतींचे बदलते चित्र

गहू लिलावात प्रति क्विंटल दर 2,540 ते 3,275 रुपयांच्या दरम्यान राहिला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गव्हाची सर्वाधिक बोली 3,275 रुपये प्रति क्विंटल लावली गेली, तर हरियाणामध्ये मोठी दरघसरण पाहिला मिळाली. पंजाब आणि बिहारमध्ये मात्र किंमतींमध्ये मोठा फरक नव्हता. लिलावाच्या पहिल्या टप्प्यात सरासरी विक्री दर 2,885 रुपये प्रति क्विंटल होता, जो शेवटच्या टप्प्यात 2,712 रुपयांपर्यंत खाली आला.

सरकारसमोरील प्रमुख अडचणी

केंद्र सरकारने यावर्षी 31 दशलक्ष टन गहू खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे, जे गेल्या वर्षीच्या 26.61 दशलक्ष टनांपेक्षा अधिक आहे. मात्र, खाजगी व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने सरकारच्या खरेदी प्रक्रियेला मोठा फटका बसू शकतो. आता व्यापारी बाजारातील वाढत्या मागणीनुसार थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करत आहेत, त्यामुळे सरकारी साठ्यात घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये खरेदी वाढवण्यासाठी बोनस देण्याचा निर्णय घेतला आह. सरकारच्या मते, या प्रोत्साहनामुळे अधिक शेतकरी सरकारी खरेदी केंद्रांकडे वळतील. मात्र दुसऱ्या बाजूला, गव्हाच्या दरात पुढील काही आठवड्यांत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतरही किंमती MSP पेक्षा जास्त असल्याने बाजारात अस्थिरता कायम आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सध्या राज्यावर महागाईचे सावट असताना त्यात गव्हाच्या किमती वाढल्या तर याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारला गव्हाच्या किमती योग्यरीत्या ठरवण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावी लागणार आहेत.

स्पोर्ट्स क्षेत्रात काम करायचे आहे? येथे करा अर्ज; तब्बल दीड लाखांपर्यंत मिळेल पगार

Sports Authority of India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जर तुम्हाला खेळाची आवड असेल आणि त्याच क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण की, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या अंतर्गत हेड कोच (बॉक्सिंग), हेड कोच (जुडो) आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट-लिड या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा

या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना sportsauthorityofindia.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपले अर्ज वेळेत सादर करावे.

पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित खेळातील डिप्लोमा आणि किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निर्धारित करण्यात आली आहे.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,००,००० ते १,५०,००० इतका आकर्षक पगार मिळणार आहे. ही संधी खेळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहे.

अर्ज प्रक्रिया आणि पत्ता

अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून तो डाउनलोड करून भरावा लागणार आहे. त्यानंतर भरलेला अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा.

पत्ता – निदेशक, खेळ आणि युवा व्यवहार संचालनालय, जिमी जॉर्ज इंडोर स्टेडियम, तिरुवनंतपुरम, केरळ.

दरम्यान, खेळासोबतच बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे, खेळात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाची तर बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाची संधी फायदेशीर ठरू शकते.

TVS Jupiter 110: TVS Jupiter 110 नव्या अवतारात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

TVS Jupiter 110

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TVS Jupiter 110 – तुम्ही जर दमदार फीचर्स अन मॉडेल असलेली स्कूटर घेण्याचा विचार करत असला तर, तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. टीव्हीएस मोटर्सने (TVS) 2025 मध्ये आपली सगळ्या लोकप्रिय स्कूटर Jupiter 110 चे नवीन अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. तसेच हि गाडी Honda Activa नंतर सर्वात जास्त विक्री होणारी 110cc स्कूटर म्हणून ओळखली जात आहे. हि नवीन लाँच झालेली गाडी फीचर्सनी परिपूर्ण असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ आहे. तर चला या दमदार स्कूटर बदल अधिक माहिती जाणून घेऊ.

Jupiter 110 चे नवीन फीचर्स (TVS Jupiter 110)

नवीन Jupiter 110 मध्ये OBD-2B मानकांसोबत एक इंजिन उपलब्ध आहे, जे पर्यावरणीय तत्त्वांचे पालन करत इंजिन कार्यक्षमता सुधारते. तसेच 113.3cc सिंगल सिलेंडर इंजिन असून, 6500 rpm वर 7.9 bhp आणि 5000 rpm वर 9.2 Nm टॉर्क तयार करते . याला CVT ऑटोमेटिक गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे, ज्यामुळे वाहनाचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक बनतो. यासोबतच टॉप व्हेरिअंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह रंगीत एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर उपलब्ध आहे. या क्लस्टरमध्ये मॅपमायइंडिया द्वारा टर्न बाय टर्न नेव्हिगेशनची सुविधा देखील आहे. टीव्हीएसने 2025 च्या मार्च अखेरपर्यंत आपल्या संपूर्ण पोर्टफोलिओला OBD-2B मानकांमध्ये रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेन्सरद्वारे थ्रॉटल रिस्पॉन्स, एअर-ईंधन रेशो, इंजिन तापमान, इंधन पातळी आणि इंजिन वेग यावर रिअल-टाइम डेटा गोळा केला जाईल. यामुळे स्कूटरची कार्यक्षमता आणि इंधन बचत अधिक सुधारेल.

किंमत आणि आकर्षक रंग –

नवीन व्हर्जनची (TVS Jupiter 110) सुरुवातीची किंमत 76,691 रुपये ठेवण्यात आली असून, ही स्कूटर चार व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. तसेच नवीन Jupiter 110 सात आकर्षक रंगांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे , त्यामुळे ग्राहकांना रंग निवडण्याचे स्वातंत्र असणार आहे. ग्राहक डॉन ब्लू मॅट, गॅलेक्टिक कॉपर मॅट, स्टारलाइट ब्लू ग्लॉस, टाइटेनियम ग्रे मॅट, द्वाइलाइट पर्पल ग्लॉस, मेटियोर रेड ग्लॉस आणि लूनर व्हाइट ग्लॉस या रंगात गाडी खरेदी करून शकतील .

मशिदींवरील भोंग्यांबाबत फडणवीसांची मोठी घोषणा; नेमकं काय म्हणाले ?

मध्यंतरी मशिदींच्या भोंग्यांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर राज्यातील मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता कमी करण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात कुठल्याही प्रार्थनास्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचा उल्लंघन झालं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकानेही याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

मशिदींवरील भोंगे आणि त्यातून परिसरातील लोकांना होणारा त्रास यावरून विधानसभेमध्ये भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

किती असायला हवा आवाज ?

याबाबत माहिती देताना विधानसभेत फडणवीस म्हणाले की, कुठल्याही प्रार्थनास्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे. हे भोंगे रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत बंद असले पाहिजेत. सकाळी सहा ते रात्री दहा या काळात सकाळी 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त नको असे काही निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्याबाबत कायद्यानुसार जर अधिक डेसिबल ने एखादा भोंगा वाजत असेल तर त्यावर कारवाईचे अधिकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रांना दिले आहेत. पोलिसांनी पुढाकार घेऊन एमपीसीबी ला कळवायचं आहे. त्यानंतर त्या बोर्डाने पुढची कार्यवाही जे काही आरोप पत्र कोर्टात खटला भरायचा अशी सध्या कायद्याची परिस्थिती आहे. ज्या प्रकारे या गोष्टींचा अवलंब व्हायला हवा तसा होत नाही. असे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं.

कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी नाहीच

याबरोबरच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की यापुढे कोणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही.
जी परवानगी मिळेल ती निश्चित कालावधीसाठीच देण्यात येईल.
या कालावधीनंतर पुन्हा भोंगा लावायचा असेल तर त्याची परवानगी पोलिसांकडून घेतली पाहिजे.
ज्या ठिकाणी 55 डेसिबल 45 डेसिबल आवाजाच्या मर्यादा उल्लंघन होईल तिथे परवानगी देण्यात येणार नाही.
जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल याबाबत तंतोतंतपालन होते की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल.

पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी

प्रत्येक पोलीस निरीक्षकांना त्याच्या विभागातील प्रार्थना स्थळात जाऊन भोंग्यांची परवानगी घेतली आहे की नाही हे तपासलं पाहिजे. आपण सगळ्यांना मीटर दिलं आहे त्यात आवाजाचा डेसिबल मोजता येतं. हे मशीन प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे प्रार्थना स्थळावरील डेसिबल मोजून जर आवाज जास्त असेल तर पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कळवण त्याच्यामार्फत कारवाई करण आणि दुसरे जे उल्लंघन करतील त्यांना पुन्हा परवानगी नाही. अशी कारवाई केली जाईल. अतिशय कठोरपणे या गोष्टीचा मॉनिटरिंग केलं जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

याबाबतची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सगळी कारवाई केंद्राने ठरवल्यानुसार एमपीसीबीला करायची आहे. त्यामुळे सध्याचे नियम आहेत त्यात बदल करणे गरजेचे आहे. जर हे नियम बदलले तर अधिक प्रभावीपणे यावर कारवाई करता येईल. यावर केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल. आम्ही जे बदल यात सुचवत आहोत केंद्रांने करून द्यावे जेणेकरून त्या बदलांच्या अनुरूप भोंग्यांबाबत अत्यंत कडक कारवाई करता येईल. यापुढे भोंग्यांबाबत समस्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकाची असेल तर त्यांनी काही केले नाही तर कारवाई केली जाईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं

शेतकऱ्यांना शेती अवजारांच्या खरेदीसाठी मिळणार अनुदान; फक्त या योजनेसाठी करा अर्ज

farmers scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी सतत विविध योजना राबवत असते. आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेती अत्यावश्यक साधनसामग्री खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या उपकर निधीमधून आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. शेती साहित्य योजनेअंतर्गत (Agricultural Material S) जिल्ह्यातील 1,140 शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी तर 80 शेतकऱ्यांना सोयाबीन चाळणीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या उपकर निधीचा उपयोग हा शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या स्वरूपात केला जातो. कृषी विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंप व सोयाबीन चाळणी यंत्रासाठी 75% अनुदान देण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि पात्र शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

त्यानुसार, ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. मात्र, अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 10 मार्चपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.

अनुदानाचा तपशील

सोयाबीन चाळणी यंत्रासाठी – 9,377
बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी – जीएसटी बिल सादर केल्यानंतर 2,800

तालुकानिहाय लाभार्थ्यांची संख्या

योजनेंतर्गत विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असला तरी, वाशिम व कारंजा तालुक्यातील एकाही शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही. मंगरूळपीर तालुक्यात सर्वाधिक 32 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. खरेदी बिल (जीएसटी क्रमांकासह)
  2. बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
  3. अनुदान अर्ज व प्रतिज्ञापत्र
  4. कृषी विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल
  5. साहित्य खरेदीनंतर अधिकाऱ्यांसोबतचा जिओ-टॅग केलेला फोटो

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक साधनांच्या खरेदीस चालना मिळणार आहे. त्यामुळे, अनुदानाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज सादर करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Holika Dahan 2025: नेमकी 13 की 14 तारखेला होळी साजरी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी, महत्त्व

holika dahan 2025

Holika Dahan 2025| हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. हा सण भारतात वेगवेगळ्या परंपरांनुसार साजरा केला जातो. त्यामुळे होलिका दहनच्या तिथी देखील काही ठिकाणी वेगवेगळ्या असतात. हिंदू पंचांगानुसार होलिका दहन कधी करावे, शुभ मुहूर्त कोणता आहे जाणून घ्या.

यंदा होलिका दहन कधी होणार?

फाल्गुन पौर्णिमा १३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०:३५ वाजता सुरू होईल आणि १४ मार्च २०२४ रोजी दुपारी १२:२३ वाजता समाप्त होईल. चंद्राच्या स्थितीनुसार पौर्णिमेचा मुख्य कालावधी १३ मार्चलाच असल्याने यंदा होलिका दहन १३ मार्च रोजीच केले जाईल.(holika dahan 2025) त्यानंतर १४ मार्चला धूलिवंदन साजरा होईल.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त (Holika Dahan 2025)

होलिका दहन करताना योग्य मुहूर्त निवडणे महत्त्वाचे असते. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी १०:३६ पासून रात्री ११:२९ वाजेपर्यंत भद्रा काळ असेल. भद्रा काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे यंदाचा शुभ मुहूर्त १३ मार्चच्या रात्री ११:३० वाजल्यापासून १:०४ वाजेपर्यंत असेल.

होळीचा सण आणि त्याचे महत्त्व

होळी हा सण(Holika Dahan 2025) भारतात अनेक शतकांपासून साजरा केला जात आहे. यामागे हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद यांची पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. हिरण्यकश्यपाने आपल्या भक्त पुत्र प्रल्हादाला मारण्यासाठी होलिकेला मदतीला बोलावले, परंतु होलिका स्वतःच अग्नीमध्ये भस्मसात झाली आणि प्रल्हाद वाचला. म्हणूनच हा सण सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. याशिवाय होळी समाजात एकोपा वाढवणारा सण मानला जातो. काही ठिकाणी याला ‘फगवा’, ‘शिमगा’, ‘धुलवड’, ‘डोल पौर्णिमा’ असेही म्हणतात.

होलिका दहन करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • शुद्ध आणि पवित्र जागेची निवड: होलिका दहन करण्यासाठी जमिनीवर नैसर्गिकरित्या तयार केलेला चौरस किंवा विटांचे गोल स्थळ निवडावे. सिमेंट किंवा काँक्रीटच्या ठिकाणी होलिका दहन करू नये.
  • शेणाच्या गोवऱ्यांचा वापर: धार्मिक मान्यतेनुसार होळीमध्ये शेणाच्या गोवऱ्या जाळल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव मिळतो.
  • धान्य आणि गव्हाची आहुती: होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा आणि नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे. यामुळे समृद्धी लाभते, असे मानले जाते.
  • सुरक्षितता राखा: होळीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर जळणाऱ्या वस्तूंचा वापर केला जातो. त्यामुळे आगीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरेशी काळजी घ्यावी.

मुंबईकरांचा प्रवास सुखद ! घाटकोपर-अंधेरी थेट मेट्रो सेवेचा मार्ग मोकळा; मार्च अखेर प्रवास सुरू

mumbai metro

मुंबईच्या प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मार्च अखेरपासून घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ने गर्दी नियंत्रणासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या या सेवेच्या चाचण्या सुरू असून त्या यशस्वी झाल्यानंतर थेट मेट्रो मार्गिका प्रत्यक्षात धावणार आहे.

प्रवाशांसाठी मोठा दिलासा

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिका २०१४ पासून कार्यान्वित आहे. सध्या या मार्गिकेवर दररोज ४.८ लाख प्रवासी प्रवास करतात, त्यातील तब्बल ८८% प्रवासी घाटकोपर ते अंधेरीदरम्यानच प्रवास करतात. सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घाटकोपर ते अंधेरी हा प्रवास अधिक कोंदट होतो, तर अंधेरी ते वर्सोवा मार्ग तुलनेने मोकळा राहतो. त्यामुळे घाटकोपर-अंधेरी थेट मेट्रो सेवा सुरू केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवास होणार वेगवान आणि सुकर

या नव्या सेवेमुळे मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून प्रवाशांसाठी प्रतीक्षा कालावधी कमी होईल. दोन मेट्रो गाड्यांमधील अंतरही कमी होऊन गर्दी नियंत्रणात राहणार आहे. नव्या सेवेनुसार, आता घाटकोपर ते अंधेरी आणि घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा अशा दोन प्रकारच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

अंतिम टप्प्यात चाचण्या

सध्या MMOPL कडून मेट्रो गाड्यांच्या यशस्वी चाचण्या सुरू आहेत. मार्च अखेरपर्यंत या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो सेवा अधिकृतपणे सुरू होईल. या निर्णयामुळे लाखो मुंबईकर प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि आरामदायी होणार आहे.

Samsung कडून स्मार्ट TV वर धमाकेदार ऑफर; 20% कॅशबॅकसह झिरो डाउन पेमेंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मनी होळी 2025 च्या निमित्ताने फेस्टिव सेल्सचे आयोजन केले आहे. तसेच मोठ्या टेक कंपनी सॅमसंगने (Samsung) देखील होळीच्या पार्श्वभूमीवर फेस्टिव सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये दक्षिण कोरियाची कंपनी आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक डिस्काउंट्स आणि डील्स ऑफर करत आहे. विशेषतः, काही निवडक स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर सॅमसंग ग्राहकांना आकर्षक फ्रीबीज देखील देत आहे. हा धमाकेदार सेल 5 मार्चपासून सुरू झाला असून, तो 31 मार्चपर्यंत चालू असणार आहे.

होळी 2025 च्या निमित्ताने फेस्टिव सेल्स –

सॅमसंग (Samsung) निओ क्यूएलईडी 8K स्मार्ट टीव्ही, सॅमसंग निओ क्यूएलईडी 4K स्मार्ट टीव्ही आणि सॅमसंग क्रिस्टल 4K UHD स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

सॅमसंग इंडियाची अधिकृत वेबसाइट दर्शविते की कंपनी 55 इंच आणि त्यापेक्षा मोठ्या स्क्रीन असलेल्या टीव्हीवर विशेष डिस्काउंट देत आहे. तसेच, प्रीमियम सिरीज जसे की “The Frame” आणि Smart TV वर होळी सेलमध्ये सूट दिली जात आहे.

सॅमसंगच्या माहितीनुसार, या सेलमध्ये निवडक स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 2,04,990 रुपये किंमतीचा टीव्ही किंवा 90,990 रुपये किंमतीचा साउंडबार मोफत दिला जात आहे.

या डीलला आणखी आकर्षक बनवण्यासाठी सॅमसंग 20% कॅशबॅक, झिरो डाउन पेमेंट आणि सोपे ईएमआय ऑप्शन्स ऑफर करत आहे. इच्छुक ग्राहक 2,990 रुपये प्रति महिना ईएमआय ऑप्शनवर टीव्ही खरेदी करू शकतात.

तसेच, सॅमसंग फेस्टिव सेलमध्ये स्मार्ट टीव्ही आणि साउंडबार एकत्र खरेदी केल्यावर डिस्काउंट ऑफर केला जात आहे.

सॅमसंगने सांगितले आहे की, ग्राहक 31 मार्चपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये कोणताही टीव्ही खरेदी करतांना सॅमसंग साउंडबारवर 45% पर्यंत सूट मिळवू शकतात.

डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा लाभ –

ग्राहक सॅमसंगच्या (Samsung) वेबसाइट, ऑनलाइन रिटेलर्स आणि निवडक सॅमसंग स्टोअर्सवर या डिस्काउंट्स आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

सॅमसंगने घोषणा केली आहे की प्रीमियम एआय-पावर्ड स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर 20% पर्यंत कॅशबॅक ऑफर केले जात आहे.

डिस्काउंट्स व्यतिरिक्त, सॅमसंग इच्छुक ग्राहकांना 30 महिन्यांपर्यंत ईएमआय ऑप्शनसह झिरो डाउन पेमेंटची सुविधा देखील देत आहे.