Thursday, December 11, 2025
Home Blog Page 30

BSNL Freedom Offer : फक्त 1 रुपयांत मोबाईल रिचार्ज!! महिनाभर घ्या मज्जा

BSNL Freedom Offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Freedom Offer । मोबाईल रिचार्ज हि आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. परंतु यासाठी महिन्याला कमीत कमी २०० रुपयांचा खर्च असल्याने सर्वसामान्य चांगलेच हैराण झाले आहेत. jio, airtel, vodafone idea सारख्या कंपन्या रिचार्जच्या माध्यमातून जबरदस्त कमाई करत आहेत, तर दुसरीकडे ग्राहकाच्या खिशाला मात्र चांगलाच चाप बसत आहे. परंतु आता गुड न्यूज आहे. आता फक्त १ रुपयांत तुम्हाला महिनाभरासाठी रिचार्ज करता येणार आहे. होय, देशी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी यासाठी खास योजना लाँच केली आहे.

काय काय फायदे मिळणार? BSNL Freedom Offer

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक धमाकेदार ऑफर सादर केली आहे. BSNL Freedom Offer ऑफर असं या योजनेचे नाव असून या ऑफरच्या माध्यमातून फक्त 1 रुपयात नवीन सिम घेऊन ग्राहकांना 30 दिवसांसाठी अमर्याद कॉलिंग, दररोज 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 मोफत एसएमएसचा आनंद घेता येणार आहे. ही ‘स्वातंत्र्य ऑफर’ 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत देशभरातील सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम बीएसएनएलच्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचे प्रतीक आहे आणि नागरिकांना भारताच्या स्वतःच्या स्वदेशी विकसित ४जी तंत्रज्ञानाचा मोफत अनुभव घेण्याची संधी देतो,” असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए रॉबर्ट जे रवी यांनी या खास योजनेबद्दल माहिती देताना म्हंटल कि, आम्ही या BSNL Freedom Offer अंतर्गत ग्राहकांना मोफत बीएसएनएल सिमकार्ड आणि त्यासोबत ३० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हाईस कॉल, दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ देतोय. बीएसएनएलच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेअंतर्गत डिझाइन केलेल्या, विकसित केलेल्या ४जी प्लॅनमुळे आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारताला अशा निवडक राष्ट्रांमध्ये स्थान देत आहोत ज्यांनी स्वतःचा टेलिकॉम स्टॅक तयार केला आहे. आमची BSNL Freedom Offer योजना’ प्रत्येक भारतीयाला ३० दिवसांसाठी या स्वदेशी नेटवर्कची चाचणी घेण्याची आणि अनुभव घेण्याची संधी देते आणि आम्हाला विश्वास आहे की ग्राहकांना बीएसएनएलमधील फरक नक्की दिसेल.

PM Kisan Yojana 20th Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा; तुम्हाला पैसे मिळाले का इथे चेक करा

PM Kisan Yojana 20th Installment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana 20th Installment । पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यावेळी डीबीटी द्वारे २००० रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तब्बल ९.७० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. खरं तर मागील महिण्यापासूनच हे पैसे कधी एकदा मिळतायत याकडे देशभरातील बळीराजा डोळे लावून बसला होता. अखेर आज २००० रुपये शेतकऱ्याला मिळाले आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत सरकारने ट्विट करत म्हंटल कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, सक्षम शेतकऱ्यांच्या, समृद्ध राष्ट्राच्या दिशेने आणखी एक पाऊल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एका क्लिकवर, देशातील ९.७० कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे २०,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमान आणि समृद्धीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे असं सरकारने म्हंटल आहे. PM Kisan Yojana 20th Installment

तुम्हाला पैसे मिळाले का इथे चेक करा– PM Kisan Yojana 20th Installment

तुमच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचे २००० रुपये जमा झाले का हे तुम्ही विविध पद्धतीने चेक करू शकता. तुम्हाला सर्वात आधी याबाबत तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. परंतु मोबाईल मेसेज आला नाही तर तुम्ही स्वतः स्टेटस तपासू शकता. त्यासाठी

१) सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
२) यंत्र Status of Self Registered Farmer वर क्लिक करा
३) आता तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका
४) तुमच्या अर्जाची नवीनतम माहिती तुमच्यासमोर उघडेल.

कोणासाठी आहे हि योजना –

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. २००० रुपयांच्या ३ हप्त्यातून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हाच या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.

Airtel Recharge Plan : Airtel ने ग्राहकांसाठी आणला नवा रिचार्ज प्लॅन; 399 रुपयांत मिळणार ‘हे’ फायदे

Airtel Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Airtel Recharge Plan । देशातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या Airtel ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खरं तर
जुलै २०२४ मध्ये टॅरिफ वाढ होण्यापूर्वी एअरटेल ३९९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी आणला होता. परंतु त्याच्यातील सुविधांमध्ये आता जमीन-अस्मानचा फरक झाला आहे. आता ग्राहकांना जास्तीचा फायदा देण्यासाठी कंपनीने पुन्हा एकदा हा रिचार्ज प्लॅन आणला आहे. आज आपण या रिचार्ज प्लानचे खास फायदे जाणून घेणार आहोत.

३९९ मध्ये ग्राहकांना काय काय मिळणार ? Airtel Recharge Plan

आपल्या ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा आणि लाभ देण्यासाठी एअरटेल नेहमीच प्रयत्नशील असते. त्याचाच भाग म्हणून पुन्हा एकदा नव्याने ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Airtel Recharge Plan) ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २.५ GB इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हाईस कॉल, दिवसाला १०० SMS चा आनंद घेता येईल. या रिचार्ज प्लॅनचा कालावधी २८ दिवसांसाठी आहे. महत्वाची बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला फक्त ४G च नव्हे तर ५G इंटरनेटचा लाभ मिळतोय. तसेच संपूर्ण २८ दिवसांसाठी मोफत Jio Hotstar चे सबस्क्रिप्शन सुद्धा मिळतेय. २८ दिवसांसाठी ३९९ रुपये म्हणजे दिवसाला १४.२५ रुपयांच्या खर्चात तुम्हाला हे सगळं मिळणार आहे.

एअरटेलचा, हा प्लॅन (Airtel Recharge Plan) परत आणण्याचा विचार ग्राहकांना अधिक पर्याय देण्यासाठी आहे. त्याच वेळी कंपनीचा प्रति वापरकर्ता सरासरी महसूल वाढवू शकतो. ३९९ रुपयांचा प्लॅन आता संपूर्ण भारतातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. परंतु प्रत्येकालाच या रिचार्ज प्लानचा फायदा आहे असं नाही… ज्या लोकांना जास्तीच्या इंटरनेटची गरज असते त्यांच्यासाठी हा रिचार्ज बेस्ट पर्याय आहे, कारण मध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतोय. परंतु ज्यांना जास्त इंटरनेटची गरज नसते आणि कॉलिंग साठीच मोबाईल लागतो अशा वापरकर्त्यांना मात्र हा ३९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन म्हणावा तसा कामाचा नाही.

MSRTC : आता ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

MSRTC Petrol Pump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC । वाढत्या आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC ) लवकरच किरकोळ इंधन व्यवसायात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, आता ST महामंडळ आपल्या स्वतःच्या पंपा वरून पेट्रोल- डिझेल विकणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा उपक्रम राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीद्वारे राबविला जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं.

प्रताप सरनाईक म्हणाले, नजीकच्या काळात , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक विश्वासार्ह आणि सुलभ इंधन स्टेशन ऑफर करेल. यामुळे महामंडळाला व्यावसायिक इंधन किरकोळ विक्रीद्वारे एक नवीन महसूलाचा स्रोत निर्माण होईल. सध्या एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. असे असतानाही MSRTC प्रवासी तिकिटांच्या उत्पन्नावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. “केवळ प्रवासी तिकिटांच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. अशावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे,” असे सरनाईक यांनी म्हंटल.

सध्या 251 ठिकाणी ST चे पेट्रोल पंप – MSRTC

ते पुढे म्हणाले, MSRTC ला इंधन व्यवस्थापनाचा दशकांचा अनुभव आहे. गेली 70 वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्या कडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. या कौशल्याचा वापर करून, महामंडळ आता इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या भागीदारीत किरकोळ इंधन केंद्रे चालवण्याची योजना आखत आहे. हा करार केंद्र आणि राज्य पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये होणार असल्याने, महसूल वाटप मॉडेल पारदर्शकता सुनिश्चित करेल अशा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

हे नवीन आउटलेट एमएसआरटीसीच्या मालकीच्या जमिनीवर, विशेषतः महामार्ग आणि वर्दळीच्या रस्त्यांवर उभारण्यात येतील. अशा भूखंडांच्या माहितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून साधारणपणे २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो.

Crop Insurance Scheme : शेतकऱ्यांना दिलासा!! पीकविमा अर्जासाठी मुदतवाढ; ही आहे शेवटची तारीख

Crop Insurance Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Crop Insurance Scheme । खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची तारीख १ ऑगस्ट रोजी निघालेल्या शासनाच्या आदेशानुसार वाढवण्यात आली आहे. आता शेतकरी १४ ऑगस्ट पर्यंत खरीप पिकविम्यासाठी अर्ज करू शकतात. सरकारच्या या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज भरलेला नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरं तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पीकविमा योजनेला शेतकऱ्याचा प्रतिसाद खूपच कमी बघायला मिळाला आहे. पोर्टल सेवा, आधार व सीएससी मधील व्यत्ययामुळे शेतकऱ्यांना वेळेत सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आता अर्जाची मुदत सरकार कडून वाढवण्यात आली आहे.

खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत (Crop Insurance Scheme) सहभागी होण्याची अंतिम मुदत यापूर्वी ३१ जुलै २०२५ होती. मात्र शेतकऱ्यांकडून सहभाग अपेक्षेप्रमाणे न झाल्यामुळे, तसेच अ‍ॅग्रीस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकाचा अभाव, पिक विमा योजना पोर्टलवरील अडथळे, आधार व सेवा केंद्रांच्या तांत्रिक अडचणी, तसेच राज्यातील भूमी अभिलेख प्रणालीतील व्यत्यय यामुळे अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने १ ऑगस्ट रोजी दिलेल्या सूचनेनुसार योजनेतील सहभागासाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आता १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत योजनेत सहभागी होता येणार आहे.

यंदा शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद कशामुळे? Crop Insurance Scheme

सरकारने २०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेत बदल करत सुधारित पीक विमा राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उत्पादनावर आधारित आणि ८०:११० या मॉडेलचा अवलंब करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून दिल्या होत्या. या योजनेची (Crop Insurance Scheme) अंतिम मुदत ही ३१ जुलै होती… मात्र शेतकऱ्यांचा यंदा थंडा प्रतीसाद बघायला मिळाला. महत्वाची बाब म्हणजे सुरुवातीला अवघ्या १ रुपयांत पीक विमा भरला जात होता.. परंतु आता शेतकऱ्याला जास्तीची रक्कम भरावी लागतेय, त्यामुळॆ शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. म्हणूनच आता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची वेळ सरकारवर आली.

कसा करायचा अर्ज?

पीक विम्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi हे App डाउनलोड करा.
यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर प्रोसेस पूर्ण करा.
अँप ओपन होताच तुम्हाला सरकारी योजना हा पर्याय दिसेल.
त्यातील पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) वर क्लिक करा.
आता तुम्ही आवश्यक कागदपत्रे सादर करून थेट अर्ज करू शकता.

अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्याचे कृषि अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट!! 1500 रुपये ‘या’ तारखेला मिळणार

Ladki Bahin Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सरकार कडून रक्षाबंधनाचे गिफ्ट मिळणार आहे. यंदाची रक्षाबंधन ९ ऑगस्टला आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांची रक्षाबंधन आणखी गोड होणार आहे. खरं तर जुलै महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार अशी चिंता महिलांना लागली होती. मात्र अखेर सरकार कडून लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

काय म्हणाल्या आदिती तटकरे? Ladki Bahin Yojana

अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीच्या जुलै महिन्यातील हप्त्याबाबत माहिती देताना म्हंटल कि, लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) रक्षाबंधनाची भेट !! माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल. म्हणजेच काय तर ८ ऑगस्टला किंवा त्याच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) महायुती सरकारनं जुलै 2024 पासून सुरु केली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हाच या योजनेमागचा मुख्य हेतू होता. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. तर, पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीयोजने तील लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 500 रुपये दिले जातात. राज्य सरकार अगदी तारेवरची कसरत करत लाडक्या बहिणींना पैसे देत असते. या योजनेला नुकतंच १ वर्ष पूर्ण झालं असून महिलावर्गात मोठ्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. . जुलै महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 2984 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयात देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील.

BDD Chawl Worli : BDD चाळीत मालकी हक्काची घरं नाहीच; ठाकरेंच्या निर्णयाला फडणवीसांची फुली

BDD Chawl Worli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BDD Chawl Worli। मुंबईत मराठी माणसाचा टक्का वाढविण्यासाठी आणि मराठी माणसाला मुंबईत हक्काचे घर मिळावे म्हणून तत्कालीन मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी BDD चाळ पुनर्विकासाच्या निर्णयाला गती दिली होती. त्याचबरोबर वरळी येथील बीडीडी चाळ परिसरातील असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या ‘सावली’ इमारतीमध्ये राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानांच्या मोबदल्यात मालकी हक्काचे घरं देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र हाच निर्णय रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचं बोललं जात आहे.

सध्या वरळीत बीडीडी चाळींचा (BDD Chawl Worli) पुनर्विकास सुरू असून या चाळींतील रहिवाशांना ५०० चौरस फुटांची मोफत आणि आलिशान घरं दिली जाणार आहेत. याच पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान तत्कालीन ठाकरे सरकारने बीडीडी चाळींच्या परिसरात असलेल्या आणि बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाचा भाग नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये ‘सावली’ इमारतीतील सेवानिवासस्थानांमधील रहिवाशांना (शासकीय कर्मचाऱ्यांनाही) मोफत घरं देण्याचा निर्णय जानेवारी 2022 मध्ये घेतला गेला होता. ज्यानंतर आपल्यालाही मालकी हक्काने घरं मिळावीत, या मागणीसह मुंबई आणि इतर ठिकाण्या शासकीय सेवानिवासस्थानात राहणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून हाच सूर आळवण्यात आला होता.

ठाकरे सरकारचा निर्णय रद्द का करण्यात आला? BDD Chawl Worli

सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर घरे देण्याचं बंधन कायद्यानं तसं शासनावर नाही. अधिकारी हि घरांसाठी शासनावरती हक्क सांगू शकत नाही. जर या मागण्यांची पूर्तता करण्याचे ठरवले तर पुनर्विकास प्रकल्पातून अपेक्षित आर्थिक निकषांची पूर्तता होणार नसून, नव्यानं सेवेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरे मिळणार नाहीत अशी भूमिका स्पष्ट करत मालकी तत्त्वावरील घरांचा निर्णय रद्द करण्यात आला.

शिक्षकाची बदली मागे घेण्यासाठी चिमुकल्याचे थेट शरद पवारांना पत्र

student letter to sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षकाचे आणि विद्यार्थी यांचं नातं तस जिव्हाळ्याचे… अगदी बालवाडीपासून शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा मित्रही असतो आणि मार्गदर्शकही असतो… त्यामुळे विद्यार्थ्यांना अगदी लहान वयापासूनच शिक्षकांचा लळा लागतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. आपल्या आवडत्या एका महिला शिक्षकाची बदली मागे घ्यावी म्हणून एका चिमुकल्याने थेट शरद पवारांना पत्र पाठवलं आहे. ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा अशा आशयाचं पत्र शरद पवारांना पाठवण्यात आलं आहे. ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे.

कोणत्या शाळेतील प्रकार –

सदर घटना हि पुण्यातील हडपसरमधील शाळेत घडली आहे. या शाळेतील महिला शिक्षिका शारदा दवडे यांची बदली झाली हे कळताच त्यांच्या वर्गातील मुलांनी त्या शिक्षिकेला गराडा घातला आणि ढसाढसा रडू लागले. तर हमीद सुयोग बेंद्रे या विद्यार्थ्यांने तर बाईंची बदली रद्द करा अशी मागणी करणारे पत्र थेट शरद पवारांनाच लिहिले.

काय आहे पत्रातील मजकूर ?

“माझे नाव-हमीद सुयोग बेद्रे. माझ्या शाळेचे नाव-साधना प्राथमिक विद्यामंदिर, पुणे हडपसर-28 मी इयत्ता – तिसरी मध्ये शिकत आहे. माझ्या वर्गशिक्षिकाः सौ. शारदा दवडे ताई आहेत. मला आज असे कळले आहे की त्या मला उदया पासून शिकवायला येणार नाहीत. त्यांची बदली अचानक केली आहे. हे ऐकून मला खूप रडू आले. मग मी मम्माला पप्पांना विचारले की, बाईना परत आणायला करायला पाहिजे? त्यांनी सांगितलं की, तुम्ही आमच्या ताईना परत आणू शकता. कारण ताई आम्हाला खूप छान शिकवतात. कधीही ओरडत नाही. म्हणून मला ताई याच शाळेत पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे. की ताईंची बदली करू नका. त्यांना आमच्यातच ठेवा. असं पत्र तिसरीत शिकणाऱ्या चिमुकल्या हमीदने शरद पवारांना पाठवलं आहे. लहान वयातही मुलांना किती मोठी समज येतेय याच हे जिवंत उदाहरण म्हणता येईल.

Jio PC : 400 रुपयांत TV ला बनवा कम्प्युटर; अंबानींचा मास्टरस्ट्रोक

Jio PC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर कोणी म्हटलं कि तुमच्या घरातील TV कम्प्युटर मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो तर तुम्ही वेड्यात काढाल…. हे कस शक्य आहे असं म्हणाल.. परंतु तंत्रज्ञानाच्या या युगात हे पण शक्य झालं आहे. मुकेश अंबानी यांच्या Jio ने ही किमया करून दाखवली आहे. रिलायन्स जिओने पूर्णपणे नवीन Jio PC लाँच केला आहे. JioPC ही एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप सेवा आहे जी आपल्या जिओ सेट टॉप बॉक्स डिव्हाइसद्वारे चालते. ज्याचा खर्च अवघा ४०० रुपये आहे. त्यामुळे तुम्हीही जर नवीन कम्प्युटर खरेदी करणार तर थांबा …. त्याआधी जिओ ची हि सुविधा जाणून घ्या…

काय आहे Jio PC?

Jio PC हा क्लाउड आधारित व्हर्च्युअल डेस्कटॉप प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या मदतीने तुम्ही घरातील किंवा ऑफिसमधील कोणत्याही टीव्ही स्क्रीनला काही मिनिटांत हाय एंड पर्सनल कॉम्प्युटरमध्ये रूपांतरित करू शकता. ज्या वापरकर्त्यांकडे JioFiber किंवा Jio AirFiber कनेक्शन आहे त्यांना Jio-PC वापरण्यासाठी फक्त एक अतिरिक्त मासिक प्लॅन घ्यावा लागेल. तर नवीन वापरकर्ते ही सेवा एका महिन्यासाठी मोफत वापरू शकतात. JioPC विविध क्षमता आणि प्लॅनमध्ये उपलब्ध सब्सक्रिप्शन सेवा म्हणून ऑफर केली जाते.

खास बाब म्हणजे Jio PC भारताचे असे पहिले कम्युटर आहे, ज्यात ‘पे-एज-यू-गो’ मॉडल आहे. म्हणजे जितका तुमचा वापर, तितकाच खर्च हा त्यासाठीचा मंत्र आहे. कंपनीने या सेवेसाठी कोणताही लॉक-इन कालावधी निश्चित केलेला नाही. या एकाच प्लॅनमुळे, वापरकर्त्यांना कोणताही देखभाल खर्च सहन करावा लागणार नाही किंवा त्यांना कोणतेही महागडे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त प्लग इन करून आणि साइन अप करून ही संगणकीय सेवा वापरण्यास सुरुवात करू शकता. जिओचे म्हणणे आहे की ज्यांना वेब ब्राउझ करायचे आहे, प्रोग्रामिंग करायचे आहे, ऑनलाइन लर्निंग करायचे आहे, डिझाइनिंग करायचे आहे.

खर्च किती?

जिओ ही सुविधा फक्त ४०० रुपयांच्या मासिक प्लॅनवर देत आहे. म्हणजेच दर महिन्याला फक्त ४०० रुपये खर्च करून तुम्ही तुमचा टीव्ही कॉम्प्युटर मध्ये बदलू शकता. यासह तुम्हाला सर्व एआय टूल्स, अॅप्लिकेशन्स आणि ५१२ जीबी पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे. जर तुम्हाला वार्षिक प्लॅन घ्यायचा असेल तर तुमचे पैसे आणखी वाचतील. कारण हा प्लॅन 4,599 रुपयांत उपलब्ध असून यामध्ये कंपनी 3 महिन्यांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देत आहे. म्हणजेच काय तर 12 महिने आणि त्यासोबत 3 महिने अतिरिक्त म्हणजे 15 महिने तुम्ही या सेवेचा आनंद घेऊ शकता.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! PM किसान योजनेचे पैसे या तारखेला मिळणार

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे ज्यामुळे देशभरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे. खरं तर आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून १९ हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता २० वा हप्ता कधी येणार याकडे देशातील बळीराजा डोळे लावून बसला असतानाच केंद्र सरकारने याबाबत घोषणा करत शेतकऱ्यांना खुशखबर दिली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २ ऑगस्ट रोजी हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे २ ऑगस्टला शेतकऱ्यांना २००० रुपयांची भेट मिळणार आहे.

कृषी विभागाने याबाबत ट्विट करत म्हंटल कि, आता वाट पाहण्याची गरज नाही! पीएम-किसानचा २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून थेट तुमच्या खात्यात पोहोचेल. जर मेसेजची रिंग वाजली तर समजून घ्या की किसान सन्मानाची (PM Kisan Yojana) रक्कम तुमच्या खात्यात पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर असतील आणि या काळात ते उत्तर प्रदेशला १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देतील. याच कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan Yojana) वितरित करणार आहेत.

काय आहे पीएम किसान योजना – PM Kisan Yojana

पंतप्रधान किसान सन्मान योजना हि २०१९ मध्ये केंद्र सरकारने सुरु केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून हि योजना (PM Kisan Yojana) चालवली जाते. शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी यो योजनेच्या माध्यमातून दरवर्षी ६००० रुपये बळीराजाच्या बँक खात्यात सरकार कडून जमा केले जातात. २००० रुपयांच्या ३ हप्त्याच्या रूपात हे पैसे थेट शेतकऱ्याला दिले जातात. आत्तापर्यन्त १९ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. यापूर्वी फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले होते. त्यानंतर ४ महिने उलटूनही पीएम किसान योजनेचं पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र आता सरकारने २ ऑगस्टला हे पैसे शेतकऱ्यांना देणार असल्याचं जाहीर केल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.