Friday, January 2, 2026
Home Blog Page 316

Vande Bharat : वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एकावेळी तब्बल 823 प्रवाशांना प्रवास करता येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा उत्तम पर्याय मानला जातो. प्रवाशांच्या वाढत्या सोयीसाठी तसेच प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनची चाचणी सुरू असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे. तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी –

वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) हिरवा कंदील मिळताच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल. समोर आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 160 ते 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसेच एका रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली सेवा दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2025 अखेर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रेनमध्ये एकूण 16 डबे –

वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper Trains) एकूण 16 डबे असतील. यामध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच, आणि 1 फर्स्ट क्लास कोच समाविष्ट आहे. तसेच, ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवचिकतेसाठी 2 एसएलआर (स्लिपर) कोच असतील, जे लगेज आणि गार्डसाठी वापरले जातात. यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे , तसेच विविध विभागात प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करतो. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अत्याधुनिक सुविधा आणि सोयींच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

823 प्रवासी प्रवास करू शकतील –

ट्रेनमध्ये (Train) एकावेळी 823 प्रवासी प्रवास करू शकतील. यात 3 टायर एसी कोचमध्ये 611 बर्थ, 2 टायर एसी कोचमध्ये 188 बर्थ, आणि फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 24 बर्थ उपलब्ध असतील. यामुळे विविध प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधांचा पुरवठा होईल. ट्रेनचे डिझाइन आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली गेली आहे. ही ट्रेन ऑस्ट्रेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवली आहे, जे अधिक मजबूती पुरवते. तसेच, क्रॅश बफर आणि कप्लर्स यांसारख्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबींवर लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे तयार करण्यात आली आहे. भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (BEML) नेही या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींनी 14 दिवसांची पोलीस कोठडी

Santosh Deshmukh murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलीसांनी पुण्यात अटक केली आहे. याच्यासह या दोघांना मदत करण्यात दोघांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे, आज या घटनेप्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना डीवायएसपी अनिल गुजर यांनी सांगितले की, आरोपींनी हत्येपूर्वी अवादा कंपनीच्या प्रकल्पस्थळी जाऊन संतोष देशमुखला धमकावले. त्याला दमदाटी केली. यावेळी दोघी गटात हाणामारी झाली. यानंतर एकेदिवशी संतोष देशमुख यांना अडवून आरोपींनी पुन्हा मारहाण केली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणातील तपासाच्या अनुषंगाने सीआयडीच्या एसआयटी टीमने आरोपींना 15 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. मात्र आरोपींच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे. आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Ather 450X 2025 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; स्मार्ट फीचर्ससह उपलब्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एथर एनर्जी (Ather Energy) ने ग्राहकांसाठी एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. एथर एनर्जीने त्यांच्या सर्वात जुन्या आणि सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर 450X चे 2025 मॉडेल सादर केले आहे. या स्कूटरमध्ये कंपनीने नवीन फीचर्स आणि ड्राइविंग रेंज देऊन त्याला आकर्षक बनवले आहे. तसेच लाँच होताच कंपनीने 2025 Ather 450X च्या बुकिंगची प्रक्रिया सुरू केली आहे. तर चला या इलेक्ट्रिक स्कूटर बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Ather 450X मधील प्रगत फीचर्स –

नव्या Ather 450X मध्ये काही प्रगत फीचर्स देखील देण्यात आले आहेत. त्यामध्ये तीन ट्रॅक्शन कंट्रोल मोड्स दिले आहेत . त्यात रेन, रोड आणि सॅंडी (रेती) यांचा समावेश आहे. या मोड्समुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर स्कूटरला योग्य प्रकारे नियंत्रित करता येते. ग्राहकांना या ट्रॅक्शन कंट्रोलला पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच, Ather Magic Twist Regenerative Braking System हे महत्त्वाचे फीचर देखील या स्कूटरमध्ये देण्यात आले आहे, ज्यामुळे बऱ्याच वेळा सामान्य ब्रेक्सची गरज भासत नाही.

नवीन टायर्स डिझाइन –

Ather 450X स्कूटरमध्ये ( Electric scooters ) हार्डवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे ड्रायव्हिंग रेंजमध्ये मोठी वाढ झाली आहे. MRF च्या सहकार्याने Zapper Ne-Tred नावाचे नवीन टायर्स डिझाइन करण्यात आले आहेत, जे स्कूटरच्या रेंजला 25% पर्यंत वाढवतात. 2.9kWh वेरिएंटची रेंज 85 किमीवरून 105 किमीपर्यंत वाढली आहे, तर 3.7kWh वेरिएंटची रेंज 130 किमीपर्यंत झाली आहे. यामुळे ग्राहकांना अधिक लांब अंतराचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना दूरच्या ठिकाणी आरामात प्रवास करता येणार आहे.

स्मार्ट फिचर्सचा समावेश –

नव्या Ather 450X मध्ये स्मार्ट फीचर्स आणि सॉफ्टवेअरची देखील भर पडली आहे. प्रो पॅक घेणाऱ्या ग्राहकांना Ather Stack 6 सॉफ्टवेअर मिळेल, ज्यामध्ये Google Maps, Alexa कनेक्टिव्हिटी, WhatsApp नोटिफिकेशन्स, Ping My Scooter आणि लाइव्ह लोकेशन शेअरिंग यांसारख्या अनेक स्मार्ट फिचर्सचा समावेश आहे. हे फीचर्स ग्राहकांसाठी सोयीस्कर आणि स्मार्ट बनतील , तसेच अधिक सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची उत्तम ठरतील .

स्कूटर तीन तासांत 80% चार्ज –

स्कूटरची चार्जिंग सुविधाही चांगली करण्यात आली आहे. 2.9kWh वेरिएंटसोबत Ather Duo 700W होम चार्जर मोफत दिले जात आहे, ज्यामुळे स्कूटर केवळ तीन तासांत 80% चार्ज होऊ शकते. या वेगवान चार्जिंग सुविधेमुळे ग्राहकांना त्यांची स्कूटर कमी वेळात अधिक वेळ चालवता येईल, यामुळे त्यांना प्रवासासाठी जास्त तयारी करण्याची आवश्यकता भासणार नाही . एथर एनर्जीचे नवीन 450X स्कूटर प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट फीचर्ससाठी उत्तम पर्याय ठरणार आहे.

Ather 450X स्कूटरच्या किंमती –

2025 मध्ये लाँच झालेल्या Ather 450X स्कूटरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. 2.9kWh वेरिएंटची नवीन किंमत 1.47 लाख (एक्स-शोरूम) आणि 3.7kWh वेरिएंटची किंमत 1.57 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने या दोन्ही वेरिएंट्सच्या किमतीत अनुक्रमे 6,400 आणि 2,000 ची वाढ केली आहे. तसेच यात ग्राहकांसाठी प्रो पॅकचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 2.9kWh वेरिएंटसाठी प्रो पॅकची किंमत 17,000 आणि 3.7kWh वेरिएंटसाठी प्रो पॅकची किंमत 20,000 आहे.

जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! फडणवीसांच्या त्या एका कृतीने जिंकले शिवप्रेमींचे मन

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातच नव्हे तर जगभरात मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळख असणाऱ्या शिवरायांप्रती प्रेम आणि आदर सर्वांच्याच मनात आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेल्या एका कृतीने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड येथील आळंदीमध्ये जाऊन संत कृतज्ञता कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यावेळी संत, महात्म्यांकडून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि जिरेटोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, बाबा महाराज, भास्करगिरी महाराज असे अनेकजण उपस्थित होते.

या सर्वांनी देवेंद्र फडणवीस यांना जिरेटोप घालण्याचा आग्रह केला. परंतु फडणवीस आम्ही नम्रपणे यास नकार दिला. पुढे , त्यांनी या घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला. तसेच, “जिरेटोपाचा मान शिवछत्रपतींचाच! रयतेच्या राज्याच्या निर्मितीसाठी या मावळ्याला महाराजांचा आशीर्वादच पुरेसा आहे,” असे म्हणले.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1875237150360530972?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1875237150360530972%7Ctwgr%5Ef2cfd3da37020a9c46e3746cd745f81be87af1a0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या कृतीमुळे त्यांचे महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे. तसेच, सोशल मीडियावर देखील शिवप्रेमींकडून त्यांच्या या कृतीबाबत प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर, फडणवीस यांनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला वायरल झाला आहे.

मोठी बातमी!! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 2 आरोपींना पोलिसांकडून अटक

Santosh Deshmukh murder case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी फरार असलेल्या तीन पैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे असे या आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी पुण्यात अटक केले आहे. परंतु यातील तिसरा आरोपी म्हणजेच कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेला पोलिसांनी मुंबई अटक केली आहे. यासह आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायबसे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यामध्ये डॉ संभाजी वायबसे याचा मोठा हात होता. वायबसे याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हस्तेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आला. परंतु या प्रकरणातील इतर आरोपी फरार होते. यातील दोन मुख्य आरोपींना आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, इतर आरोपींना पोलीस शोधत आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या प्रकरणाकडे लागून राहिल्या आहेत.

EMV वरून मरकडवाडीतील ग्रामस्थांमध्येही २ मतप्रवाह; नेमकं म्हणणं काय?

EVM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या. या निवडणुकांमध्ये माळशिरस मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी विजय मिळवला. उत्तमराव जानकर यांनी तब्बल 13000 मतांनी भाजपच्या विद्यमान आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना मात दिली. मात्र विजयी होऊन देखील जानकारांनी ईव्हीएम मशिनवर आक्षेप नोंदवला आणि पुन्हा एकदा निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली.

उत्तमराव जानकारांनी केलेल्या या मागणीला उपविभागीय दांडाधिकाऱ्यांकडून फेटाळून लावण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन देखील केले. खरे तर ज्या ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर काँग्रेस व विरोधक अक्रमकाची भूमिका घेत आहेत. त्या ईव्हीएम मशिनसाठी काँग्रेसनेस पुढाकार घेतला होता. तेच काँग्रेस आज ईव्हीएमबाबत भाजपला धारेवर धरत आहे.

या सगळ्या प्रकरणांमध्ये वन इंडिया मराठीच्या टिमने ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी, “हे लोक लोकशाहीलाच आव्हान देत आहेत. हे विसरू नका, ईव्हीएम काँग्रेसने आणले होते.” असे स्वतः ग्रामस्थांनीच म्हणले. यासह महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत मशीनचा वापर करून विजय मिळवला त्यावेळी कोणी बोलले नाही, अशी देखील टीका केली.

यासह, “ईव्हीएमबाबत शंका होती, तर त्यांनी ते लोकसभा निवडणुकीत का मांडले नाहीत? आत्ता सुरु असलेला संधीसाधूपणा हा घटनाविरोधी आहे.” असे स्वतः ग्रामस्थांनी म्हणले. सातपुते यांच्या विषयी सांगताना, “देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब आणि अजितदादांच्या कारभाराने त्यांच्या भ्रष्टाचारमुक्त उपक्रम आणि महिलांच्या कल्याणकारी योजनांबद्दल कौतुक या निवडणुकीत झाले. मतदाराला त्यांची शक्ती माहित आहे आणि त्यांनी त्यांच्या योगदानाच्या आधारे सातपुते यांची निवड केली होती.” असे ग्रामस्थांनी रोखठोकपणे सांगितले. थोडक्यात ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांमध्ये मतप्रवाह निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सविता करंजकर जमाले यांच्या ‘युद्ध जवळ आलंय’ या अनुवादित कवितासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

DH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कवयित्री, अनुवादक सविता करंजकर जमाले यांनी अनुवादित केलेल्या ‘युद्ध जवळ आलंय’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध साहित्यिक व मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांच्या हस्ते व ज्येष्ठ लेखिका सुनंदा गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला.

हरेक प्राणिमात्राच्या व्यक्तिगत जीवनात अधिक्षेप वाढला असून त्याचा विरोध आता अटळ आहे. कुटुंबव्यवस्थेपासून ते समूहजीवनात देखील दंडेलशाही, पिळवणूक, अत्याचार वाढले असून ती अस्वस्थता युद्ध रूपाने बंड पुकारेल, असे मध्यवर्ती आशयसूत्र घेवून अनुवादित केलेला ‘युद्ध जवळ आलंय’ हा काव्यसंग्रह आहे.

पैठण येथील दखनी स्वराज्य या प्रकाशन संस्थेने हा संग्रह प्रकाशित केला असून, समकालीन महत्त्वाचे कवी संतोष पद्माकर पवार यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. ब्रतोल ब्रेख्त, महेमूद दरवेश, ओम नागर, इव्हान बुनीन, माया एंजलो आदी जगप्रसिद्ध कवींच्या अनुवादित कविता या संग्रहात समाविष्ट आहेत.

”अनुवाद करणे हे अत्यंत जोखमीचे काम आहे. वेगवेगळ्या भाषेतील आशय आणि शब्दकळा जशास तशी टिकवून ठेवत मराठी भाषेच्या वाचकांसाठी ते भावविश्व सांभाळणे कठीण असते, मात्र ते काम सविता करंजकर जमाले यांनी यथार्थपणे पेलले आहे,” असे कौतुकाउद्गार डॉ दादा गोरे यांनी या वेळी बोलताना काढले.

पुढे बोलताना डॉ. गोरे असे म्हणाले की, ”सविता करंजकर यांनी केलेली कवितांची निवड अतिशय उत्तम आहे. कवितेतील विषय मानवाच्या घुसमटींचे विषय आहेत, अन्यायाविरुद्ध बंड करण्याच्या मानसिकतेचे विषय आहेत, अन्याय अत्याचाराविरुद्ध उभे राहण्याचे हे विषय आहेत. एकूणच हा मानवमुक्तीचा लढा आहे आणि म्हणूनच ‘युद्ध जवळ आलंय’ हे या संग्रहाचे शीर्षक मला अतिशय यथार्थ आणि बोलके वाटते.”

यावेळी दखनी स्वराज्य प्रकाशनाचे संतोष तांबे, मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणचे अध्यक्ष अनिल देशमुख, प्राचार्य कैलास मुके, प्राचार्य संदीप काळे, मुख्याध्यापक बजरंग काळे, पत्रकार मदन आव्हाड, पत्रकार महेंद्र नरके, कवयित्री आशा डांगे, प्रा.सविता लोंढे, श्रेयस जमाले यांची उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन आव्हाड यांनी केले, तर बजरंग काळे यांनी आभारप्रदर्शन केले.

भारतातील हे ठिकाण म्हणजे जणू मिनी लंडन ; हनिमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लग्नाचा हंगाम सुरू असून, नवविवाहित जोडप्यांना हनिमूनसाठी खास डेस्टिनेशन (Best destination for honeymoon) निवडायचे आहे. पण अनेक जोडपी बजेटमुळे महागड्या ठिकाणांऐवजी कमी खर्चात सुंदर आणि शांत ठिकाण शोधत असतात. अशा परिस्थितीत झारखंडमधील मॅकक्लूस्कीगंज हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो . हे ठिकाण निसर्गसौंदर्याने नटलेले असून ते कमी खर्चात रोमँटिक आणि अविस्मरणीय अनुभव देऊ शकते. तर चला या ठिकाणांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

मिनी लंडन म्हणून ओळख –

झारखंडची राजधानी रांचीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेले मॅकक्लूस्कीगंज हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे. येथील ब्रिटिश काळातील वाडे, घनदाट जंगल, टेकड्या आणि शांत नद्या यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आहे. हे ठिकाण झारखंडचे मिनी लंडन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे अनेकांची पसंती असल्याचे दिसून येते.

बजेटमध्ये हनिमून ट्रिप –

जर तुम्हाला कमी बजेटमध्ये हनिमून प्लॅन (Honeymoon Plan) करायचा असेल तर मॅकक्लूस्कीगंजला भेट देणे फायदेशीर ठरेल. येथे हॉटेलच्या रूमचे भाडे अवघ्या 1000 पासून सुरू होते. ऑनलाईन बुकिंग केल्यास त्यामध्ये सवलत मिळू शकते. खाण्यापिण्याचेही अनेक स्वस्त पर्याय येथे उपलब्ध आहेत. योग्य नियोजन केल्यास फक्त 5000 च्या बजेटमध्ये दोन ते तीन दिवसांची हनिमून ट्रिप सहज करता येते.

फिरण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणे –

मॅकक्लूस्कीगंजमध्ये फिरण्यासाठी अनेक आकर्षक ठिकाणे आहेत. तुम्ही पार्टनरसोबत शांत वेळ घालवण्यासाठी पत्राटू व्हॅलीला भेट देऊ शकता. रांचीपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणाला झारखंडची मनाली असेही म्हटले जाते. तसेच येथे ट्रेकिंगसाठी देखील उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. टेकड्यांवरून दिसणारा सूर्यास्ताचा नजारा अविस्मरणीय अनुभव देतो.

मॅकक्लूस्कीगंजला पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध –

मॅकक्लूस्कीगंजला (Mccluskieganj) पोहोचण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी हावडा स्टेशनवरून मॅकक्लूस्कीगंजसाठी नियमित ट्रेन सेवा उपलब्ध आहेत. जर आपल्याला फ्लाईटने प्रवास करायचा असेल, तर सर्वात जवळचे विमानतळ रांची येथे आहे, जे मॅकक्लूस्कीगंजपासून 53 किमी अंतरावर स्थित आहे. रांचीला पोहोचल्यावर, आपल्याला बस सेवा किंवा भाड्याने कार घेऊन निसर्गरम्य रस्त्यांचा आनंद घेत मॅकक्लूस्कीगंजला पोहोचता येते.

प्रवाशांना खुशखबर ; नांदेड-पटना दरम्यान विशेष गाडीची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात , त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने (Indian Railways) नांदेड ते पटनादरम्यान एक विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सोय व्हावी म्हणून ही विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चला या विशेष गाडी बदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विशेष गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग –

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 07099 नांदेड-पटना विशेष गाडी 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता नांदेड येथून सुटेल आणि 15 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता पटना रेल्वे स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 07100 पटना-नांदेड ( Patna – Nanded ) विशेष गाडी 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता पटना येथून सुटेल आणि 17 फेब्रुवारीला पहाटे 4.30 वाजता नांदेड येथे पोहोचेल.

प्रमुख स्थानकावर थांबणार –

हि विशेष गाडी प्रमुख स्थानकावर थांबणार आहे. त्यामध्ये पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर या स्थानकांचा समावेश असणार आहे.

कुंभमेळ्यासाठी भाविकांना मोठा दिलासा –

उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. या पवित्र सोहळ्यासाठी मराठवाड्यातील नागरिकांचीही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या विशेष गाडीची घोषणा करून भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार असून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच विशेष गाडीमध्ये 22 डबे असतील, त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.