Thursday, January 1, 2026
Home Blog Page 338

काय आहे विमा सखी योजना? महिलांना मिळणार 2 लाखांहून अधिक मानधन

Vima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधानांनी विमा सखी योजना लाँच केली आहे. विमा सखी असणाऱ्या महिला आपल्या भागात राहणाऱ्या इतर महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याचसोबत त्यांना मदत करणे, अशी कामे सोपवण्यात आली आहेत. याआधी त्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. तसेच त्यांना दोन लाखांहून अधिक मानधन दिले जाणार आहे. तर चला आता सुरु झालेल्या या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विमा सखी योजना

विमा सखी योजना हि LIC द्वारा राबविण्यात येणारी योजना आहे. यामध्ये इच्छुक महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांना विम्याचे महत्त्व समजावून सांगण्याची आणि वित्तीय समज वाढवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे . या प्रशिक्षणात सहभागी महिलांना पगार मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या महिलांना एलआयसी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. तसेच बीए डिग्रीधारक महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधीही उपलब्ध होईल.

फक्त महिलाच अर्ज करू शकतात

या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करणाऱ्या महिला दहावी पास असणे आवश्यक आहे . या योजनेसाठी 18 ते 70 वयोगटातील महिलांना अर्ज करता येणार आहे. या महिलांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना एलआयसी एजंट म्हणून नियुक्त केले जाईल. पण एलआयसीच्या नियमित कर्मचाऱ्यांसारखे लाभ त्यांना मिळणार नाहीत. तसेच विमा सखी महिलांना त्यांचे कार्य प्रदर्शन प्रत्येक वर्षी दाखवावे लागेल.

प्रशिक्षण तसेच पगार

या योजनेतील महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत दोन लाखांहून अधिक मानधन मिळेल. यामध्ये पहिल्या वर्षी सात हजार, दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये मानधन मिळेल. तसेच यामध्ये बोनस किंवा कमिशन समाविष्ट नाही. महिलांना विकलेल्या पॉलिसीच्या 65% पॉलिसी पुढील वर्षी पर्यंत चालू असाव्या लागतील , हि अट ठेवण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा

विमा सखी योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. अर्ज करण्यासाठी, प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा https://licindia.in/test2 या लिंकवर क्लिक करा. यानंतर Click here for Bima Sakhi या पर्यायावर क्लिक करा. नंतर आपले नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पत्ता यांसारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच एलआयसी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधित माहिती देखील देणे आवश्यक आहे. कॅप्चा कोड भरल्यानंतर, अर्ज सबमिट करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जातो.

SBI ची अमृतवृष्टी योजना ; 444 दिवसांच्या FD वर मिळतात अधिक फायदे

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्राचा बँक भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना कमी वेळात चांगला परतावा मिळविण्याची संधी दिली आहे. SBI ने नुकतीच अमृत वृष्टि योजना सुरू केली असून , ही ठराविक कालावधीसाठीची फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे. जी 16 जुलै पासून सुरू झाली असून, या योजनेमध्ये ग्राहक 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे ग्राहकांना चांगला व्याजदर प्राप्त होणार आहे. म्हणजेच स्टेट बँकेने ग्राहकांना कमी वेळेत चांगला नफा मिळवून देण्याची संधी दिली आहे.

अमृत वृष्टि योजना

अमृत वृष्टि योजना हि एक टर्म डिपॉझिट योजना आहे, ज्याचा कालावधी 444 दिवस असतो . या योजनेमध्ये सामान्य ग्राहकांना 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75% वार्षिक व्याज दर मिळते . या योजनेचा लाभ देशी आणि विदेशी (NRI) ग्राहक दोन्ही घेऊ शकतात. त्यामुळे हि योजना ग्राहकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे.

कोणत्या टर्म डिपॉझिटसाठी लागू

SBI अमृत वृष्टि योजना ही 3 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या गृहस्थ रिटेल टर्म डिपॉझिटसाठी लागू आहे, ज्यात NRI रुपयांचे टर्म डिपॉझिटसुद्धा समाविष्ट आहेत. ही योजना नव्या डिपॉझिट्स तसेच पूर्वीच्या डिपॉझिट्सच्या नूतनीकरणावरही लागू होईल. टर्म डिपॉझिट आणि स्पेशल टर्म डिपॉझिटसाठी पे योजनाही लागू केली जाऊ शकते. तसेच रेकॉर्डिंग डिपॉझिट, टेक्स सेव्हिंग डिपॉझिट, एन्यूटी डिपॉझिट आणि मल्टी-ऑप्शन डिपॉझिटवर ही योजना लागू होणार नाही.

किती गुंतवणूक करावी लागेल ?

या योजनेमध्ये ग्राहक कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. तसेच जास्तीत जास्त गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही. ग्राहकांना यामध्ये महिन्याला , तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला व्याज दिले जाते. तसेच मिळालेल्या व्याजावर TDS कापला जातो. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केल्यास त्या रकमेवर कर्ज मिळू शकते. तुम्ही यामध्ये SBI शाखेच्या माध्यमातून , YONO SBI आणि YONO Lite मोबाईल अँपच्या माध्यमातून किंवा SBI इंटरनेट बँकिंगच्या साहाय्याने गुंतवणूक करू शकतात. तुम्ही 444 दिवसांचा कालावधी निवडल्यानंतर बँक आपोआप ही योजना लागू करेल.

वेळेआधी पैसे काढल्यास दंड

अमृत वृष्टि योजनेतून वेळेआधी पैसे काढल्यास दंड आकारला जातो. 25 लाखांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर 0.50% दंड वसूल केला जातो. 5 लाखांपेक्षा अधिक आणि 3 कोटींपेक्षा कमी असलेल्या डिपॉझिट्सवर 1% दंड लागतो. जर डिपॉझिट काढण्यासाठी सात दिवसांपेक्षा कमी कालावधी असेल, तर त्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. तसेच SBI स्टाफ आणि पेंशनधारकांना दंडामध्ये काही सवलत दिली जाते. त्यामुळे किमान ठराविक कालावधीसाठी पैसे ठेवणे फायदेशीर ठरते, नाहीतर वेगाने पैसे काढल्यास दंडाचा सामना करावा लागतो.

HDFC बँकेने ग्राहकांसाठी आणली आनंदाची बातमी; FD व्याजदरात केली मोठी वाढ

HDFC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. HDFC बँकेने फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवले आहेत. बँक 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी नवीन दर ऑफर करत आहे. पण ही वाढ काही विशिष्ट कालावधीच्या FD साठीच लागू केली आहे. बँकेने 3 कोटी रुपये पर्यंतच्या FD व्याजदरात बदल केलेला नाही. यावेळी बँकेने बल्क FD म्हणजेच 3 कोटी रुपये ते 5 कोटी रुपये पर्यंतच्या FD वर व्याजदर बदल केले आहेत. हे नवीन दर डिसेंबर 2024 पासून लागू झाले आहेत.

नवीन व्याजदर जाहीर

HDFC बँकेने 3 कोटी रुपये ते 5 कोटी रुपये पर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिट (FD) साठी नवीन व्याज दर जाहीर केले आहेत. या दरांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी वेगवेगळी दरसंख्या दिली आहे. 7 दिवस ते 14 दिवस कालावधीत सामान्य ग्राहकांना 4.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 5.25% व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 30 दिवस ते 45 दिवस पर्यंतच्या FD साठी सामान्य ग्राहकांना 5.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.00% व्याज मिळणार आहे. 1 वर्ष ते 15 महिने कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7.40% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.90% व्याज दर उपलब्ध होईल.

गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय

सामान्य ग्राहकांसाठी 6 महिने ते 9 महिने कालावधीच्या FD साठी 6.85% आणि 9 महिने ते 1 वर्ष कालावधीत 6.75% व्याज मिळेल. तसेच 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष पर्यंतच्या FD साठी सर्वसामान्य ग्राहकांना 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50% व्याज दिले जाईल. HDFC बँकेने या सुधारित व्याज दरांचा लाभ घेऊन मोठ्या रकमेच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त व्याज दरामुळे त्यांना अधिक लाभ होईल.

जास्त परतावा देणारी योजना

हे व्याज दर विविध कालावधीनुसार बदललेले आहेत आणि मोठ्या रकमेच्या FD वर आकर्षक परतावा मिळवणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलेले अतिरिक्त व्याज दर त्यांना निवृत्तीवयाच्या काळात अधिक सुरक्षित आणि जास्त परतावा देतात, ज्यामुळे या योजना आणखी आकर्षक ठरतात.

2024 मध्ये भारतात झाली या टॉप इनोव्हेशनमध्ये प्रगती

Top Innovation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने 2024 मध्ये विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. नवीन कल्पना आणि शोधामुळे ते नेहमी आघाडीवर असते. एआयच्या विस्तारामुळे अनेक क्षेत्रात प्रगती होताना दिसत आहे. हे आतापर्यंतचे टॉप इंनोव्हेशन असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने फक्त भारतातच नाही तर जगामध्ये प्रगती करून दाखवलेली आहे. तर चला जाणून घेऊयात टॉप इंनोव्हेशनची माहिती.

एआयचा विस्तार

एआयचा विस्तार एवढा वाढला आहे कि, याचा वापर आरोग्य क्षेत्रातही केला जात आहे. त्यामध्ये व्यक्तीच्या निदानापासून वैयक्तिक उपचारांपर्यंत याचा वापर वाढला आहे. एआय चलित प्लॅटफॉर्मवर रोगांचे भविष्यवाणी, निदान आणि उपचारांची माहिती मिळते. यामध्ये उदाहरण घायचे झाले तर , निरामाई सारखी एआय साधने मशिन लर्निंगचा वापर करून स्तन कर्करोगाचे पहिल्या टप्प्यावर निदान करतात, तर सिगट्युपल एआयच्या मदतीने वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण करता येते.

इलेक्ट्रिक वाहन विस्तार

भारतात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. नवीन स्टार्टअप्सपासून ते स्थापन झालेल्या कंपन्यांपर्यंत EV वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने जलद चार्जिंग स्टेशन आणि सुधारित बॅटरी तंत्रज्ञान विकसित केली जात आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रा इलेक्ट्रिक विविध प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार करत आहेत, तर एथर एनर्जी आणि ओला इलेक्ट्रिक या नवनवीन कल्पना घेऊन येत आहे.

रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन

रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन (RPA) व्यवसाय प्रक्रियांमध्ये, मानव संसाधन (HR) पासून वित्त आणि ग्राहक सेवा क्षेत्रापर्यंत लोकप्रिय होत आहे. यामुळे कार्यक्षमता वाढून त्यामधील चुका कमी होत आहेत. तसेच बचत होण्यासही मदत मिळत आहे. उदाहरण टीसीएस आणि विप्रो यांसारख्या कंपन्या बँकिंग आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील ग्राहकांसाठी RPA देत आहे.

कृषी तंत्रज्ञानातील प्रगती

कृषी क्षेत्रातील आव्हानांना उत्तर देण्यासाठी स्टार्टअप्स एआय, ड्रोन आणि डेटा ऍनालिस्ट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची उत्पादकता, कीड व्यवस्थापन आणि सिंचन प्रणाली सुधारत आहेत. यामध्ये ऍग्रोस्टार आणि देहात एआयचा वापर करून शेतकऱ्यांना डेटा आधारित निर्णय घेण्यात मदत करत आहेत, तर स्कायमेट ड्रोन आणि हवामान डेटा वापरून पिकांच्या आरोग्याची भविष्यवाणी करता येत आहे. त्यामुळे 2024 च्या टॉप इंनोव्हेशनमध्ये याला गणले जात आहे.

2024 मध्ये अधिक नफा मिळवून देणारे स्टार्टअप्स व्यवसाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्याच्या काळात स्टार्टअप व्यवसायांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. या स्टार्टअप व्यवसायासाठी सरकारकडून विविध योजना, निधी आणि मार्गदर्शन उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देत आहे. प्रत्येकजण या व्यवसायाच्या माध्यमातून अधिक नफा कमावण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर धरत असते. त्यामुळे आज आपण 2024 या वर्षात जास्त फायदा मिळवून देणाऱ्या स्टार्टअप व्यवसायाची माहिती पाहणार आहोत . तर चला त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

विवाह नियोजन व्यवसाय

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचे प्लॅनिंग करायला आवडत असेल , तर तुम्ही विवाह नियोजन व्यवसाय सुरु करू शकतात. या व्यवसायातून जास्त फायदा मिळू शकतो . भारतीय लग्न सोहळे खूप भव्य आणि तितकेच गुंतागुंतीचे असतात. त्यामुळे तुम्ही योग्य नियोजन आखून व्यवसाय सुरु केल्यास या क्षेत्रात उंचीवर पोहचाल .

ऑनलाइन किराणा व्यवसाय

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे किराणा वस्तू घरपोच करण्याचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. केवळ 30000 ते 40000 रुपयाच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. 2029 पर्यंत हा बाजार 73.89 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

लोणच्यांचा व्यवसाय

भारतीय घरांमध्ये लोणच्यांना विशेष स्थान आहे. 25000 ते 30000 रुपयाच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सहज घरातून सुरू करता येतो. हा व्यवसाय दीर्घकालीन यशाचे आश्वासन देतो. त्यामुळे या व्यवसायाला 2024 मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

ड्रॉपशिपिंग व्यवसाय

ड्रॉपशिपिंग हे ई-कॉमर्समधील आकर्षक मॉडेल आहे. 20000 ते 50000 गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. योग्य वस्तूंची निवड आणि प्रभावी मार्केटिंग केल्यास महिना 20000 ते 100000 कमावता येतात.

हस्तनिर्मित कपडे तसेच अ‍ॅक्सेसरीज

तुमच्याकडे जर डिझायनिंगचे कौशल्य असेल , तर तुम्ही 50000 पेक्षा कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता . पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी ग्राहकांचा वाढता कल याला फायदा देतो.

पाळीव प्राण्यांची काळजी सेवा

आता प्राणी पाळणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांचे मालक त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी चांगल्या सेवा मिळविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. अशा प्राण्यांसाठी तुम्ही पेट शॉप ओपन करू शकता. 30000 ते 50000 च्या गुंतवणुकीत पाळीव प्राण्यांच्या काळजी सेवेमध्ये चांगला नफा मिळवता येतो. 2024 या व्यवसायात चांगला फायदा झालेला दिसून येत आहे.

डिजिटल मार्केटिंग सेवा

प्रत्येक व्यवसायाला प्रभावी डिजिटल उपस्थितीची गरज असते. 20000 ते 40000 च्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो. चांगल्या ग्राहकांसह महिना 50000 ते 150000 पर्यंत कमाई करता येऊ शकते.

ऑनलाइन ट्युशन

2024 मध्ये ऑनलाइन ट्युशन व्यवसायाला भरमसाठ प्रतिसाद मिळालेला आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन तुम्ही घरून देखील हा व्यवसाय सुरु करू शकता. यासाठी 50000 पेक्षा कमी गुंतवणुकीत ऑनलाइन शिक्षण व्यवसाय सुरू करता येतो. वरील व्यवसायानी 2024 मध्ये कमी गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून दिला आहे. योग्य नियोजन, कौशल्य आणि सातत्याने मेहनत घेतल्यास यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल.

Top stars of the 2024 | 2024 मध्ये हे कलाकार ठरले वरचढ; अभिनयाने तोडले सगळे रेकॉर्डस्

Top stars of the 2024

Top stars of the 2024 | 2024 मध्ये बॉलीवूडमध्ये अनेक सिनेमा आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर देखील खूप चांगली कामगिरी केली. या चित्रपटांसोबत चित्रपटातील कलाकार देखील तितकेच लोकप्रिय झाले. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. 2024 मध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांच्या करिअरला एक वेगळेच वळण मिळाले. त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करून सगळ्यांची वाहवा मिळवली. आता आपण जाणून घेणार आहोत की, 2024 मध्ये असे कोणते कलाकार आहेत, जे चर्चेत राहिले आहेत.

विक्रांत मेस्सी | Top stars of the 2024

विक्रांत मेस्सीचा 12 th फेल हा चित्रपट 2023 चा अखेरीस रिलीज झाला. परंतु 2024 मध्ये या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. चित्रपटगृहामध्ये देखील हा चित्रपट खूप गाजला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील या चित्रपटाने चांगलीच वाहवा मिळवली. या चित्रपटातील विक्रांत मेस्सीचे पात्र सगळ्यांना खूप आवडले. हा चित्रपट IAS मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. विक्रांत मेस्सी याने मनोज कुमार शर्मा यांचे पात्र निभावले होते. चित्रपटात त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास मांडला. त्यामुळे विक्रांत मेस्सी 2024 मध्ये खूप जास्त लोकप्रिय झाला.

तृप्ती डीमरी

2023 मध्ये तृप्ती डिमरी हिच्या ॲनिमल चित्रपटातील तिच्या भूमिकेने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेनंतर तिला नॅशनल क्रश असे संबोधले जाऊ लागले. या चित्रपटांनंतर तिच्यासमोर अनेक प्रोजेक्टच्या रांगा लागलेल्या आहेत. 2024 मध्ये तिने बॅड न्यूज या चित्रपटात विकी कौशल सोबत काम केले. या चित्रपटातील तिचा अभिनय देखील चांगलाच गाजला. त्यानंतर बॉलीवूडमधील सर्वात जास्त बहुप्रतिक्षित असणाऱ्या भुलभुलैय्या 3 या चित्रपटात देखील तिने काम केले. या चित्रपटांनंतर आता तृप्ती डिमरी ही बॉलीवूडमधील एक मोस्ट डिमांडेड अभिनेत्री झालेली आहे.

अल्लू अर्जुन

दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन यांचे खूप जास्त चाहते आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच त्याच्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावलेले आहे. परंतु पुष्पा 2 हा 2024 मधील त्याचा सगळ्यात मोठा प्रतिक्षित चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मजल मारली. चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून अगदी सगळ्यांच्याच बत्या गुल झालेल्या आहेत. चित्रपटात त्याचे डायलॉग, त्याची ॲक्शन त्याचप्रमाणे त्याचा अभिनय सगळ्यांना खूप आवडलेला आहे. त्यामुळे आलू अर्जुन 2024 मधील सगळ्यात मोठा अभिनेता मानला जातो.

क्रीती सेनन

राष्ट्रीय पुरस्कार विजेलो क्रीती सेनन हिने अनेक प्रकारचे चित्रपट केलेले आहे. परंतु 2024 मध्ये आलेला तेरी बातो मे ऐसा उल्झा जिया या चित्रपटातील तिचे पात्र कौतुकास्पद होते. या चित्रपटातील एका रोबोटची भूमिका निभवलेली होती. चित्रपटातील तिचे डायलॉग त्याचप्रमाणे तिचा अभिनय चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा अभिनय खूप आवडला. आणि त्यामुळेच क्रिती सेनन 2024 मध्ये चांगलीच चर्चेत राहिली.

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण ने 2024 मध्ये कल्की 2898 AD या चित्रपटात एक पौराणिक भूमिका निभावली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. हा चित्रपट पौराणिक काळातील असल्याने तिचे डायलॉग हे खूपच जास्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे तिचा अभिनय सगळ्यांना आवडला. या चित्रपटानंतर तिने सिंघम अगेनमध्ये देखील लेडी सिंघमचे काम केलेले आहे. त्या दोन्ही चित्रपटातील तिच्या भूमिका अत्यंत वेगळ्या होत्या, तरी देखील तिने या दोन्ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत.

Top 5 block bluster movies in 2024 | 2024 मध्ये या चित्रपटांनी जिंकली प्रेक्षकांची मने; बॉक्स ऑफिसवर केला कल्ला

Top 5 block bluster movies in 2024

Top 5 block bluster movies in 2024 । 2024 वर्षात चित्रपट सृष्टीत अनेक विविध प्रकारचे आणि आकर्षक चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या वर्षात सामाजिक, रोमांचक, ऐतिहासिक, आणि प्रेरणादायक चित्रपटांनी सिनेमा प्रेमींना दिलासा दिला आहे . त्यामुळे असंख्य चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला आहे. 2024 हे साल सिनेमा सृष्टीत एक नवे वळण घेऊन आले आहे , ज्याने विविध वयोमानानुसार लोकांना भारावून टाकले आहे. तर आज आम्ही तुम्हाला असे टॉप चित्रपट सांगणार आहोत जे सामाजिक , शैक्षणिक आणि कंटेन्टच्या दृष्टितिकोनातून महत्वाचे ठरणार आहेत. तर चला पाहुयात ते कोणते चित्रपट आहेत.

लापता लेडीज | Top 5 block bluster movies in 2024

लापता लेडीज या चित्रपटाला किरण राव यांनी दिग्दर्शित केले असून , हा मूवी सामाजिक, विनोदी ड्रामावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा ग्रामीण भारतातील दोन नवविवाहित वधूंच्या आयुष्याभोवती फिरताना दिसते . तसेच यामध्ये घुंगट ( पडदा ) हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे यात रूढीवादी प्रथांचे प्रतीक ठळकपणे उमटलेले दिसते . घुंगटामुळे चित्रपटातील नवविवाहित महिलांची ओळख लपवली जाते. ज्यामुळे यांची ओळख समोर येऊ शकत नाही. यामुळे दोन्ही वधूंची अदलाबदल होऊन वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये जातात. नंतर या संघर्षांच्या दरम्यान या दोन महिलांना स्वतःची ओळख सापडते आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची हिंमत मिळते. असं बरच काही या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. यामुळे 2024 च्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये याला क्रिटिक्स चॉइस पुरस्कार (सर्वोत्कृष्ट चित्रपट) मिळाला , तसेच 2025 च्या ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाला पाठवण्यात आले असून, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

महाराजा

महाराजा हा चित्रपट 2024 मधील खूप गाजलेला असून , यामध्ये विजय सेठुपती यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. या मूवीमध्ये खूपच रोमांचक आणि थरारक कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात विजय सेठुपती एक न्हावी म्हणून दाखवलेला असून, तो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. तसेच अनुराग कश्यप यांनी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटातील रहस्यमय, थरारक घटकांमुळे प्रेक्षकांना खूप आकर्षित केले आहे.

मैदान

मैदान हा चित्रपट अजय देवगणचा प्रमुख भूमिकेतील एक प्रेरणादायक स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट आहे, जो भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळावर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे, आणि तो 1950 आणि 60 च्या दशकातील भारताच्या फुटबॉल संघाचा संघर्ष आणि यश दाखवलेले आहे. अजय देवगण या चित्रपटात श्रीनिवास रहीम साहब, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून भूमिका साकारत आहेत. यामध्ये खेळाडूंचे मुद्दे, राजकारणातील हस्तक्षेप, तसेच व्यक्तिगत संघर्ष यांचा समावेश आहे.

पुष्पा 2

पुष्पानंतर पुष्पा 2 द रूल या चित्रपटात अल्लू अर्जुन यांनी महत्वाची भूमिका साकारलेली आहे. यामध्ये पुष्पा राज याच्या संघर्षाची आणि त्याच्या सामर्थ्याच्या वाढीची कथा दर्शविली आहे. तसेच रश्मिका मंदाना श्रीवल्ली म्हणून मुख्य भूमिका साकारत आहे, आणि फहद फासिल पुन्हा या भागात खलनायक म्हणून दिसत आहे. या चित्रपटाच्या गाण्यांनीही प्रेक्षकांच्या मनात आपली छाप पाडलेली आहे. साम्राज्याची कहाणी तसेच ऍक्शन सीनसाठी हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाची अनेक तिकिटे विकली गेले असून, यामुळे एक मोठे रेकॉर्ड बनवले आहे.

द गोट लाइफ

द गोट लाइफ हा एक खऱ्या घटनेवर आधारित चित्रपट आहे. मल्याळी इमिग्रेंट नजीब मुहम्मद यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट 1991 मध्ये सऊदी अरेबियाला गेलेल्या नजीबच्या संघर्षाची कथा सांगतो. वाळवंटात पाण्याची कमतरता आणि माणुसकीवर विश्वास उडवणाऱ्या परिस्थितींमध्ये त्याने मेंढ्या, शेळ्या आणि उंटांचा कळप सांभाळला. या चित्रपटाने माणसाच्या संघर्ष आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायक चित्रण केले आहे.

हिवाळ्यात तुरटीचा होईल जबरदस्त फायदा; पिंपल्स, डागांपासून होईल मुक्तता

Alum

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळा सुरू झालेला आहे. आणि या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेच्या संबंधित अनेक समस्या निर्माण होतात त्वचा कोरडे पडते. तसेच पिंपल्स येण्याचे प्रकार देखील हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत असतात. यासाठी अनेक लोक केमिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु जर तुम्ही घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केले, तर यामुळे तुमच्या त्वचेला देखील कोणती हानी देखील पोहोचणार नाही. आज आपण तुरटीचा वापर करून चेहऱ्यावरील डाग पिंपल्स कसे घालवायचे? हे जाणून घेणार आहोत. तुरटी ही आपल्या चेहऱ्यावर जर योग्य पद्धतीने लावली, तर आपले सौंदर्य आणखी खुलते. तुरटीमुळे पिगमेंटेशन, पिंपल्स डार्क स्पॉट सारख्या गोष्टी कमी होण्यासाठी मदत होतात. असे सौंदर्यतज्ञांचे देखील मत आहे.

तुरटीचा वापर कसा करावा?

त्वचेवरील पिंपल्स पिगमेंटेशन डार्क स्पॉट्स कमी करण्यासाठी तुरटीचा वापर चांगल्या प्रकारे करता येतो. यासाठी तुम्ही एक टीस्पून एवढी तुरटी घ्या, आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट हळद टाका. त्यानंतर या मिश्रणात गुलाब पाणी घालून टाकून ते एकत्र मिक्स करा. आणि तो तुमच्या चेहऱ्यावर लावा. आणि पाच ते सात मिनिटांनी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा. तुमच्या चेहऱ्याला फेसवॉश किंवा साबण लावू नका. तुम्ही आठवड्याततून एकदा किंवा दोनदा हे केले, तर तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगला फायदा दिसून येईल.

त्वचा टाईप करण्यासाठी तुरटी उपयुक्त असते. यासाठी तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. त्यामध्ये तुरटी पावडर टाका. ती तुरटी पूर्ण विरघळेपर्यंत हलवा. त्यानंतर पाणी जेव्हा थंड होईल तेव्हा एक दोन चमचे गुलाब पाणी आणि आठ ते दहा थेंब ग्लिसरीन टाकू ते व्यवस्थित हलवून टेबल एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर मारा तुम्ही जर आठवड्यातून असे दोन ते तीन वेळा केले, तर तुमची लूज झालेली त्वचा टाईट होण्यासाठी तसेच सुरकुत्या कमी होण्यासाठी याचा उपयोग होईल. अशाप्रकारे तुम्ही तुरटीचा वापर करून तुमचा चेहरा आणखी सुंदर बनवू शकता.

BSNL ने लॉन्च केले सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; कमी किमतीत मिळणार दुप्पट फायदा

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या महागाई सोबत मोबाईलच्या रिचार्ज दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मागील काही महिन्यांमध्ये भारतातील अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे सरकारी कंपनी बीएसएनएलकडे वळालेले आहेत. बीएसएनएल देखील त्यांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. आता जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल किंवा बीएसएनएलकडे जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास आहे. कारण बीएसएनएलने त्यांचे काही नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहे.या प्लॅनची सुरुवात केवळ 58 रुपयांपासून होत आहे. आता आपण हे प्लॅन नक्की काय असणार आहे जाणून घेणार आहोत.

सध्या बीएसएनएलने 100 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या अनेक रिचार्ज प्लॅन लॉन्च केलेले आहेत. त्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे. वाढत्या महागाईमध्ये बीएसएनएलच्या युजरला हा एक मोठा दिलासा मिळणार आहे .आता आपण बीएसएनएलच्या याच 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत

58 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

तुम्हाला जर कमी काळासाठी कमी किमतीत रिचार्ज प्लॅन पाहिजे असेल, तर 58 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी खूप खास आहे. 58 रुपयांचा हाय स्पीड डेटा असलेला रिचार्ज प्लॅन आहे. परंतु यामध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएस पॅक देत नाही. तुम्हाला या डेटामध्ये रोज 2 जीबी डेटा वापरायला मिळणार आहे.

98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा 98 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा 18 दिवसांसाठी आहे. या मध्ये तुम्हाला 36 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच तुम्हाला दररोज दोन जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तुमचा डेटा संपत असेल तरी देखील तुम्हाला 40 केबीपीएस च्या स्पीडने 18 दिवस डेटा वापरण्यास मिळणार आहे.

97 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएल 97 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटा दोन्ही गोष्टी वापरायला मिळतात. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा वापरायला मिळतो. तसेच तुमचा हा प्लॅन संपला तरी तुम्हाला 40 केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येते.

94 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

94 दिवसांच्या या रिचार्ज प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला 90 जीबी डेटा वापरायला मिळतो. दिवसाला तुम्ही 3 जीबी डेटा वापरू शकता. त्याचप्रमाणे नॅशनल तसेच लोकल कॉलसाठी तुम्ही 200 मिनिटे बोलू शकता.

87 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

87 दिवसांचा रिचार्ज त्यांची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे. यामध्ये तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकता. जर तुम्हाला इंटरनेटची गरज लागत नसेल, तर 87 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचा प्लॅन आहे.

केंद्र सरकारद्वारे महिलांना मिळणार 7 हजार रुपये; काय आहे नवी योजना?

Bima Sakhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे महिलांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. अशातच सरकारने महिलांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना पहिल्या वर्षी महिन्याला 7 हजार रुपये दुसऱ्या वर्षी 6 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5000 रुपये मिळणार असल्याचे सांगितलेले आहे. महिला या आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. देशपातळीवर ही योजना राबवली जाणार आहे. मोदी सरकारने सध्या हरियाणामध्ये ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव बिमा सखी योजना असे आहे. परंतु हरियाणा नंतर संपूर्ण देशभरात ही योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

योजनेच्या अटी

योजनेअंतर्गत वर्षात महिन्याला 7000 रुपये घेणार विद्या वेतन मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी 6000 रुपये देण्यात येणार आहेम तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये विद्या वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे. अशाप्रकारे महिलांना तीन वर्षात 2 लाख 26 हजार रुपये विद्यावेतन मिळणार येणार आहे. असे सरकारने सांगितलेले आहेत. परंतु या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी देखील दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय हे 18 ते 70 वर्ष दरम्यान असते गरजेचे आहे. तसेच ती महिला किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ज्या महिलेच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती एलआयसी एजंट आहे. त्या कुटुंबातील महिलांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही.

योजनेसाठी कागदपत्र

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांचा पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा बँकेचे तपशील यासारखे कागदपत्रे जोडावे लागणार आहेत. देशभरात 3 वर्षात दोन लाख किंवा सचिन नियुक्ती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेत सहभाग झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी एजंट म्हणून काम करता येईल.

हे तीन वर्षाच्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला इतर एजंट परवाने कमिशनवर काम करतील. परंतु या महिलांना एलआयसी कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेता येणार नाही. तसेच एलआयसी कर्मचाऱ्यांना मिळणारे इतर फायदे देखील त्यांना मिळणार नाही