Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 38

Bullet Train : बुलेट ट्रेन कधी धावणार?? रेल्वेमंत्र्यांनी तारीखच सांगून टाकली

Bullet Train Updates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bullet Train। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. भारतातील हि पहिलीच बुलेट ट्रेन असल्याने ती कधीपासून सुरु होणार? याची उत्सुकता लागली आहे. आता खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच बुलेट ट्रेन पटरीवर कधी धावणार याबाबत अपडेट दिली आहे. संसदेत बोलताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, २०२९ पर्यंत मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे संपूर्ण काम पूर्ण होईल.

बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) कामाबाबत अपडेट्स देताना अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल, वापी ते साबरमती दरम्यान बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होईल. महाराष्ट्र ते साबरमती विभागाचा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल. बुलेट ट्रेन प्रकल्प खूप गुंतागुंतीचा आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्याच्या पूर्णतेचा अचूक कालावधी तेव्हाच निश्चित करता येईल जेव्हा त्याच्याशी संबंधित सर्व बांधकाम कामे जसे की नागरी संरचना, ट्रॅक, इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, ट्रेनसेट्सचा पुरवठा पूर्ण होईल.

अश्विनी वैष्णव पुढे म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा (Bullet Train) एकूण खर्च १,०८,००० कोटी रुपये आहे, त्यापैकी ८१ टक्के म्हणजे ८८,००० कोटी रुपये जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी (जिका) कडून निधी दिला जात आहे, तर राहिलेल्या २०००० कोटीमधील १०००० कोटी महाराष्ट्र सरकार आणि १०००० कोटी रुपये गुजरात सरकार देत आहे. ३० जून २०२५ पर्यंत या प्रकल्पावर एकूण ७८,८३९ कोटी रुपये खर्च झाले आहेत अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली.

कुठून कशी धावणार बुलेट ट्रेन ? Bullet Train

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, महाराष्ट्र, दीव दमन आणि गुजरात मधून धावेल. या बुलेट ट्रेनला मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती असे १२ थांबे असतील. अश्विनी वैष्णव यांनी म्हंटल कि, ३९२ किमी घाट बांधकाम, ३२९ किमी गर्डर कास्टिंग आणि ३०८ किमी गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण झाले आहे. तर समुद्राखालील बोगद्याचे (सुमारे २१ किमी) काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात भूसंपादनास विलंब झाल्यामुळे २०२१ पर्यंत प्रकल्प प्रभावित झाला होता. मात्र सध्या MAHSR प्रकल्पासाठी संपूर्ण जमीन (१३८९.५ हेक्टर) संपादित करण्यात आली आहे. अंतिम स्थान सर्वेक्षण आणि भू-तांत्रिक तपासणी देखील पूर्ण झाली आहे आणि संरेखन देखील अंतिम करण्यात आले आहे.

Indian Railways Rules : सर्वसामान्यांना मोठा दिलासा!! रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Indian Railways Rules । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे विभागाने आपत्कालीन कोटा (EQ) अंतर्गत तिकिटे बुक करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या नव्या नियमामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा लवकर त्यांच्या रिक्वेष्ट पाठवणे बंधनकारक केले आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांनी आता ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान एक दिवस आधी त्यांची विनंती दाखल करावी. रेल्वे मंत्रालयाने अलीकडील निर्णयानुसार हा बदल केला आहे की ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारण्यासाठी रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी आरक्षण चार्ट तयार केले जातील.

रेल्वेने नेमकं काय म्हटले ? Indian Railways Rules

आपत्कालीन कोट्याच्या नियमांमध्ये बदल करण्यासंबंधीचे एक परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, “०००० ते १४०० तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १२०० तासांपर्यंत इमर्जन्सी कोटा EQ सेलवर पोहोचली पाहिजे. तसेच १४०१ ते २३५९ तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या उर्वरित सर्व गाड्यांसाठी आपत्कालीन कोट्याची विनंती प्रवासाच्या आदल्या दिवशी १६०० तासांपर्यंत EQ सेलवर पोहोचली पाहिजे.

खरं तर इमर्जन्सी कोटा (Indian Railways Rules) जागा व्हीआयपी, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती असलेल्या प्रवाशांसाठी राखीव आहेत. परंतु, या सुविधेचा गैरवापर आणि शेवटच्या क्षणी केलेल्या विनंत्यांमुळे चार्ट तयार करण्यास उशीर होत आहे. परिणामी वेटिंग लिस्ट मधील तिकीट कन्फर्म करण्यात अडचणी येतात आणि प्रवाशांची गैरसोय होतेय.

यापूर्वी, रेल्वे बोर्डाने ट्रेनचा आरक्षण चार्ट ४ तासांऐवजी ८ तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. दुपारी २ च्या आधी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशी रात्री २१:०० वाजता तयार करण्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, रेल्वेकडून प्रवासी आरक्षण प्रणालीत बदल करण्याची चर्चा देखील झाली होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व अधिकाऱ्यांना या वेळापत्रकांचे पालन करण्याचे (Indian Railways Rules) आवाहन केले आहे जेणेकरून तिकीट वाटप वेळेत होईल आणि चार्ट तयार होण्यास उशीर होणार नाही. यामुळे गाडी सुटण्यासही उशीर होणार नाही आणि प्रवाशांना अडचणीचा सामनाही करावा लागणार नाही .

फक्त 100 रुपयांत घर!! कसा अर्ज करायचा?

house in 100 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकल नवीन घर खरेदी करणं म्हणजे काय सोप्पी गोष्ट नाही… आयुष्यभराची कमाई त्यासाठी खर्च करावी लागतेय. त्यातच घराच्या किमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत कि सर्वसामान्य माणसाला तर नवीन घर खरेदी करणं म्हणजे एक स्वप्नच राहील आहे. परंतु तुम्हला कोणी म्हंटल कि फक्त १०० रुपयांत घर मिळतंय तर?? खोटं वाटतंय ना? पण हे खरं आहे…. हिरव्यागार निसर्गाने समृद्ध असलेल्या फ्रान्समध्ये तुम्हाला हे घर खरेदी करण्याची संधी आहे. मात्र यासाठी काही अटी आणि नियम तुम्हाला पाळावे लागतील. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

100 रुपयांत कसं शक्य आहे ?

फ्रान्सच्या मध्यवर्ती भागात, पुय-दे-डोम येथे असलेले अम्बर्ट मध्ये हि घरे तुम्ही घेऊ शकता. इतक्या स्वस्तात तयार घरे देण्यामागेही काही कारणे आहेत. अम्बर्टची लोकसंख्या एकेकाळी जास्त होती, परंतु हळूहळू येथील घरे रिकामी होत आहेत. अनेक परिसरात ६०% पेक्षा जास्त घरे रिकामी आहेत. यामुळेच स्थानिक प्रशासनाने या ऐतिहासिक शहराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे, जेणेकरून नवीन लोक येथे येतील, स्थायिक होतील आणि एक नवीन समुदाय तयार होईल. म्हणूनच सुरवातीला फक्त १०० रुपयांत याठिकाणी राहण्यासाठी घर दिले जात आहे. मात्र इथेही काही अटी आहेत.

काय आहेत अटी?

तुम्हाला जरी १०० रुपयांत घर मिळत असलं तरी तुम्हाला त्या घराचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी तुम्हाला €20,000 ते €50,000 (सुमारे 18 ते 45 लाख रुपये) खर्च करावे लागू शकतात. परंतु चांगली गोष्ट म्हणजे स्थानिक प्रशासन तुम्हाला कमी व्याजदराचे कर्ज आणि नूतनीकरण अनुदान यासारखी आर्थिक मदत देखील करेल.

आणखी एक बाब म्हणजे कोणीही याठिकाणी घरे खरेदी करू शकतो, मग तो फ्रेंच नागरिक असो किंवा परदेशी… परंतु तुम्हाला तिथे किमान 3 वर्षे राहावे लागेल. कारण इथल्या प्रशासनाचा हेतूच हा आहे कि, लोकांनी याठिकाणी स्थायिक व्हावं. त्यामुळे तुम्ही फक्त गुंतवणूक म्हणून याकडे बघू शकत नाही, तर तुम्हाला इथे राहावं लागेल. जर तुम्ही घर खरेदी करून ते भाड्याने देण्याच्या मनस्थितीत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही. जर तुम्ही ही अट पूर्ण केली नाही तर सरकारी अनुदान तुमच्याकडून काढून घेतले जाऊ शकते. तुम्हाला दंड देखील भरावा लागू शकतो.

BSNL Recharge Plan : BSNL चा ग्राहकांना दणका!! 197 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोठे बदल

BSNL Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BSNL Recharge Plan । देशी टेलिकॉम कंपनी BSNL नेहमीच त्याच्या स्वस्त रिचार्जसाठी ओळखली जाते. एअरटेल, जिओ, VI पेक्षा बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन कमी किमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल सुद्धा बीएसएनएल कडे वाढला आहे. मात्र आता याच BSNL ने आपल्या ग्राहकांना दणका दिला आहे. कंपनीने १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत, ज्याचा फटका यूजर्सना बसू शकतो. हा बदल नेमका काय आहे? आणि ग्राहकांना यामुळे कशाप्रकारे तोटा होऊ शकतो हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

काय बदल झाला ? BSNL Recharge Plan

बीएसएनएलच्या १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना आता ४ जीबी डेटा, ३०० मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये, यूजर्सना आता ५४ दिवसांची वैधता मिळते. खरं तर इतर कंपन्यांची तुलना केल्यास जरी तो परवडत असला तरी यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवसांची होती. त्यामुळे ग्राहकांना थोडा का होईना फटका आता सहन करावा लागणार आहे.

यापूर्वी कसा होता रिचार्ज ?

बीएसएनएलच्या १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये, (BSNL Recharge Plan) यूजर्सना यापूर्वीपहिल्या १५ दिवसांसाठी २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळत होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे सिमकार्ड ७० दिवसांसाठी ऍक्टिव्ह राहत होते. आता मात्र या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना फक्त ५४ दिवसांची वैधता मिळते.

याबाबत टेलिकॉम टॉकने त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की बीएसएनएल त्यांच्या प्लॅनची वैधता कमी करून प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू) वाढवत आहे. यासोबतच, कंपनी त्यांच्या ४जी नेटवर्कच्या विस्तारावर सुद्धा मोठा भर देत आहे तसेच नवनवीन यूजर्स जोडत आहे. बीएसएनएलचे म्हणणे आहे की त्यांनी आतापर्यंत देशभरात ९२ हजारांहून अधिक ४जी टॉवर बसवले आहेत. अजूनही पुढचं काम चालूच आहे.

Bachhu Kadu Chakkajam Andolan : 24 जुलैला चक्काजाम आंदोलन!! शेतकऱ्यांच्या विद्रोह पाहायला मिळणार

Bachhu Kadu Chakkajam Andolan

अमरावती प्रतिनिधी Bachhu Kadu Chakkajam Andolan । शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मागणीला हमीभाव या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकार कडून म्हणावी अशी ठोस भूमिका बघायला न मिळाल्याने प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या २४ जुलैला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्टरातील शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छिमार असा सर्वच समुदाय या चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विद्रोह यावेळी आपल्याला बघायला मिळेल.

खरं तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करु अशा घोषणा महायुतीने दिल्या होत्या. मात्र आता सरकार येऊन १० महिने होत आले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही या सरकारने केलेली नाही. बच्चू कडू यांनी या कर्जमाफीसाठी ८ दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. सातबारा कोरा कोरा पायी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा आवाज सरकार पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारकडून समिती स्थापन करतोय असं मिळमिळीत उत्तर मिळाले. खरं तर मागच्या ३ महिन्यात महाराष्ट्रातील ७६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे. हि नक्कीच राज्याची मान शरमेने खाली घालवणारी बाब आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी एकवटणार आहे.Bachhu Kadu Chakkajam Andolan

२४ जुलै २०२५ , वार – गुरुवार या दिवशी सकाळी ८ ते १० अशा २ तासांसाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्यासोबतचे हे एक सर्वसामावेशन आंदोलन असेल. सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्ये शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी होतील. यावेळी आपले गाव, तालुका, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी चक्काजाम करावे. आंदोलनावेळी रुग्णवाहिकेस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा – Bachhu Kadu Chakkajam Andolan

अनेक पक्षांनी आणि संघटनेने या चक्काजाम आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील, काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, खासदार बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे, निलेश लंके, आमदार बाबाजी काळे, आमदार हेमंत ओगले, आमदार प्रकाश सोळंके, खासदार भास्कर भगरे, यांच्यासह, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र स्वराज्य पक्ष भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस, यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या चक्कजाम आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. Bachhu Kadu Chakkajam Andolan

एवढच नव्हे तर ग्रामपंचायतीपासून या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा ग्रामपंचायतीने चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देणारा एक ठराव मंजूर करून घेतला आणि मोठ्या प्रमाणावर यात सहभाग घेणार असल्याचं जाहीर केलं.

Bhatghar Dam : काय सांगता!! हिरव्या पाण्याचे धरण?? पुण्यातील घटनेने खळबळ

Green Colour Dam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bhatghar Dam । पुणे तिथे काय उणे असं उपहासात्मकपणे बोललं जाते. मात्र आता याच असा एक प्रकार घडला आहे जो बघून तुम्हीही बोटे तोंडात घालाल. पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग चढला आहे. धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्याचे पाणी हिरवं दिसत आहे. अचानक धरणाचे पाणी हिरवं झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे. परंतु धरणाचं पाणी हिरवं कसं झालं याबद्दलचं गूढ अजूनही कायम आहे.

भाटघर धरणाच्या (Bhatghar Dam) उत्तरेकडील धरणाच्या भिंतीपासून काही अंतरावर संगमनेर, माळवाडी आणि नन्हे गावांच्या लगतच्या जलसाठ्यात हे हिरवेगार पाणी दिसत आहे. या हिरव्यागार पाण्यामुळे संपूर्ण परिसर दूषित झाला असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दूषित पाण्यामुळे भाटघर धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या काही गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खरं तर, गेल्या दोन महिन्यांपासून भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने पाणी गढूळ होऊन दूषित झाले होते. परंतु चार दिवसांपासून पाण्याचा रंग हिरवा झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका – Bhatghar Dam

या हिरव्या पाण्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. लाखो लोक ज्या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत त्या धरणाचं पाणी हिरवं कसं पडलं याबद्दल प्रशासनाने तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

नंदुरबारमध्येही हिरवं पाणी –

दरम्यान, नंदुरबारमध्येही असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला. नंदुरबार मधील प्रकाशातील गोमाई नदीपात्रात केमिकल युक्त हिरवगार पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. गेल्या तीन चार दिवसापासून केमिकल युक्त पाणी येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीच्या वातावरण निर्माण झाला असून, शेतीसाठीही हे पाणी वापरण्याची रिस्क शेतकरी घेत नाहीत.

रोहित पवारांकडून कोकाटेंचा नवा Video व्हायरल; म्हणाले, नाईलाजाने मला सत्य…..

Manikrao Kokate Video r

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा सभागृहात ऑनलाईन रमीचा खेळतानाचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) चांगलेच गोत्यात आले आहेत. कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. मात्र गिरे तो भी टांग उपर असं म्हणत कोकाटे यांनी मी राजीनामा का देऊ? असा प्रश्न पत्रकारांना केला. तसेच मला रमी खेळता येत नाही… मी जाहिरात स्किप करतो होतो. त्यामुळे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोकाटे यांचा आणखी एक नवा विडिओ पोस्ट करत बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे .

काय आहे रोहित पवारांची पोस्ट –

रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे आणखी २ विडिओ आज सोशल मीडियावर शेअर केले. त्यामध्ये कोकाटे हे पत्त्यांची पाने स्वतःच्या बोटाने इकडे तिकडे सरकवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या पोस्टमध्ये रोहित पवारांनी म्हंटल, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.

विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? #राजीनामा द्यावाच लागेल…

माणिकराव कोकाटे यांनी काय म्हंटल होते-

मला रमी खेळता येत नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला होता.

Railway Tickets on EMI : EMI भरा अन देशभर रेल्वेने फिरा; IRCTC ची नवी सुविधा

Railway Tickets on EMI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway Tickets on EMI । तुम्ही आत्तापर्यंत नवीन कार किंवा नवीन घराचा EMI भरला असेल… कधी कधी तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप EMI च्या हप्त्यावर खरेदी केला असेल. परंतु आता EMI च्या माध्यमातून संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करता येणार आहे. होय, तुम्ही जे वाचताय ते १०० % खरं आहे. IRCTC ने एक खास असं टूर पॅकेज लाँच केलं आहे. ज्या माध्यमातून तुम्ही EMI वर रेल्वेचे तिकीट खरेदी करू शकता. म्हणजेच काय तर रेल्वे ट्रेन तिकिटाचे भाडे EMI मध्ये म्हणजेच हप्त्यांमध्ये भरू शकता.

प्रवास होणार सोप्पा – Railway Tickets on EMI

लोकांचा प्रवास सोपा करण्यासाठी रेल्वेने गेल्या काही दिवसांत अनेक बदल केले आहेत. वेटिंग तिकिटांचे बुकिंग, आरक्षण शुल्क, रेल्वे तिकिट आरक्षणासाठी तत्काळ तिकिटांमध्ये बदल केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वेने EMI च्या माध्यमातुन प्रवास करण्याची संधी आपल्या प्रवाशांना दिली आहे. खरं तर असे अनेक प्रवासी असतात ज्यांना रेल्वेने विशेष देवदर्शनाला किंवा कोणत्या तरी ठिकाणी पर्यटनाला जायचं असते, परंतु खिशात पैसे नसल्याने या प्रवाशांची इच्छा अपुरीच राहते. आता अशा प्रवाशांना हप्त्यावर तिकीट भरून प्रवास (Railway Tickets on EMI) करता येणार आहे.

मात्र ही ऑफर देशातील सर्वच ट्रेन साठी नाही, तर IRCTC च्या भारत गौरव ट्रेनसाठीच आहे. रेल्वेकडून देशातील प्रसिद्ध तिर्थस्थळांना भेट देण्यासाठी हि भारत गौरव ट्रेन सूर करण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांमध्ये तिकिटे बुक करताना तुम्ही EMI चा पर्याय निवडू शकता. समजा तुम्ही १३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान धावणाऱ्या भारत गौरव ट्रेनमध्ये तिकीट बुक केले आहे. या ट्रेनचे इकॉनॉमी क्लासचे भाडे प्रति व्यक्ती १८४६० रुपये आहे. यामध्ये तुमचे स्लीपर क्लास ट्रेनचे तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याचा समावेश आहे. थर्ड एसी कोचचे भाडे प्रति व्यक्ती ३०४८० रुपये आहे. त्याचप्रमाणे, कम्फर्ट कॅटेगरीचे भाडे ४०३०० रुपये आहे. अर्थात, हे मोठे भाडे भरण्यात अडचण येऊ शकते, म्हणून रेल्वेने EMI ची सुविधा उपलब्ध केली आहे. (Railway Tickets on EMI) तुम्ही ट्रेनचे टूर पॅकेज सहज बुक करू शकता आणि प्रवास झाल्यानंतर हप्त्याने तिकीटाचे पैसे हळू हळू भरू शकता.

त्यासाठी IRCTC ने अनेक सरकारी आणि खासगी बँकांशी करार केला आहे. तुम्ही IRCTC वेबसाइटद्वारे ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता. तिकीट भरताना, तुम्हाला EMI पर्याय निवडावा लागेल. हे बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर देण्यात येईल.

Krushi Samruddhi Yojana : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवी योजना; मिळणार हे फायदे

Krushi Samruddhi Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Krushi Samruddhi Yojana। विधानभवनात रमी खेळल्याच्या आरोपाखाली चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी नवीन योजना लाँच केली आहे. कृषी समृद्धी योजना असं या योजनेचे नाव असून बळीराजाची उत्पादकता वाढवणे, हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे यांसारखे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हि योजना सुरु करण्यात आली आहे. खरं तर या योजनेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, मात्र अधिकृत जीआर आज जारी करण्यात आला.

पत्रकार परिषदेत बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना (Krushi Samruddhi Yojana) आपण लॉन्च करत आहोत या योजनेमुळे कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे तसेच शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होईल असं कोकाटे म्हणाले.

कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश – Krushi Samruddhi Yojana

१) कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे
२) उत्पादन खर्च कमी करणे
३) उत्पादकता वाढवणे
४) पीक विविधीकरण करणे
५) मूल्य साखळी बळकट करणे
६) हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे
७) शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे (Krushi Samruddhi Yojana)

कोणकोणत्या घटकांचा समावेश –

पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन
मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास
हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर
मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा
उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम
संस्थात्मक बळकटीकरण
ज्ञान, संशोधन आणि प्रात्यक्षिक
कोल्ड स्टोरेज

मला रमी खेळताच येत नाही –

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा विडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही जोर धरू लागली. परंतु मला रमी खेळता येत नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही.  मी मोबाईल उघडताच तो गेम आला. तो स्किप करता आला नाही. त्यामुळे हे सर्व आरोप खोटे आहेत, बिनबुडाचे आरोप आहेत. माझी राज्यभरात बदनामी झाली आहे. ज्या ज्या राजकीय नेत्यांनी माझी बदनामी केली त्यांना मी कोर्टात खेचणार आहे असा उलट इशारा माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना दिला.

India’s Longest Wildlife Overpass : NHAI ने उभारला भारतातील सर्वात लांब वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर

India's Longest Wildlife Overpass

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन India’s Longest Wildlife Overpass । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे वर देशातील सर्वात लांब वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर उभारला आहे. वन्यजीव संवर्धन आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे मिश्रण करणारा हा १२ किलोमीटरचा मार्ग रणथंबोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून जातो. या प्रकल्पात पाच ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपास समाविष्ट आहेत, जे सर्व नैसर्गिक अधिवासांना त्रास न देता प्राण्यांची सुरक्षित हालचाल सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

हा प्रकल्प भारतातील पहिलाच प्रकल्प आहे जिथे वन्यजीव संवर्धनाला केंद्रस्थानी ठेवून राष्ट्रीय द्रुतगती महामार्गाची रचना करण्यात आली आहे.. या वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉरमुळे फक्त माणसाचा प्रवासच सुखकर होत नाही तर वन्यजीवांना सुद्धा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करतो.हा मार्ग रणथंबोर आणि चंबळ खोऱ्याच्या दरम्यान असून याठिकाणी वाघ, अस्वल, काळवीट आणि इतर प्रजातींचा वावर असतो. या झोनमध्ये पाच समर्पित वन्यजीव ओव्हरपास आहेत, प्रत्येकी ५०० मीटर लांबीचे आणि १.२ किमीचा अंडरपास आहे, ज्यामुळे तो भारतातील आतापर्यंतचा सर्वात लांब कॉरिडॉर बनला आहे. India’s Longest Wildlife Overpass

प्राणी चुकून महामार्गावर येऊ नयेत म्हणून मार्गाच्या दोन्ही बाजूला ४ मीटर उंच सीमा भिंत बांधण्यात (India’s Longest Wildlife Overpass) आली आहे , तर २ मीटरवरील ध्वनी अडथळे वन्यजीवांना त्रास देऊ शकणारा वाहतूक आवाज कमी करण्यास मदत करतात. या वन्यजीव कॉरिडॉरच्या बाजूने ५०० मीटर अंतराने सुमारे ३५,००० झाडे लावण्यात आली. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था बसवण्यात आली आणि पाण्याचा वापर निम्म्याने कमी करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्यात आला. याव्यतिरिक्त, पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी मॉड्यूलर फॉर्मवर्क आणि कमी कचरा असलेल्या बांधकाम पद्धती वापरण्यात आल्या.

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉरच्या मुख्य वैशिष्ट्ये: India’s Longest Wildlife Overpass

उद्देश: वन्यजीवांची सुरक्षित हालचाल, वाहन टक्कर प्रतिबंध, पर्यावरण संरक्षण आणि पायाभूत सुविधांचा समतोल.

लांबी: भारतातील सर्वात लांब, १२ किमी (रणथंभौर टायगर रिझर्व्हच्या बफर झोनमध्ये).

रचना: ५ वन्यजीव ओव्हरपास (प्रत्येकी ५०० मीटर) आणि १.२ किमी अंडरपास.

सुरुंग: मुकुंदरा राष्ट्रीय उद्यान आणि माथेरान इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये दोन ८-लेन सुरुंग.