Friday, December 19, 2025
Home Blog Page 48

Pune Tourism App : पुण्यातील सर्व पर्यटनस्थळांची माहिती ‘या’ App वर मिळणार

Pune Tourism App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Tourism App । महाराष्ट्रातील पर्यटकप्रेमी नेहमीच पुण्याला आपली पसंती देत असतात. शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीचे बेस्ट शहर असल्याने पुण्याची लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे पुण्याच्या आसपास असणारी अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची कायमच गर्दी बघायला मिळते. परंतु कधी कधी लांबून पुण्यात पर्यटनाला आलेल्या प्रवाशांना पुण्यात नेमकी कोणकोणती पर्यटनस्थळे आहेत? कुठे कस जायचं याबाबत बहुतेकदा माहितीच नसते… राहायचं कुठे? अन्न सेवा आणि इतर आवश्यक सुविधांबद्दल माहिती मिळविण्यासाठी अनेकदा लांबच्या पर्यटकांना संघर्ष करावा लागतो. त्यामुळे पर्यटन फसते. परंतु आता यावर उपाय म्हणून पुणे जिल्हा प्रशासनाने पर्यटनाशी संबंधित सर्व माहिती एकाच मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये भरण्याची तयारी केली आहे. लवकरच हे अँप पर्यटकांच्या सेवेत येणार आहे. या अँप मध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असतील आणि पर्यटकांना त्याचा कसा फायदा होईल तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.

तर पुण्यातील कोणालाही माहिती नसलेल्या आणि निसर्गाच्या कुशीत लपलेल्या अनेक पर्यटन स्थळांपासून ते त्याठिकाणी कसं जायचं? कोणत्या मार्गे जायचं? प्रवेश शुल्क किती आहे? त्याठिकाणी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत. याची संपूर्ण माहिती या अँप मध्ये (Pune Tourism App) मिळेल. मागील कैच महिन्यात पर्यटनाच्या बाबतीत अनेक दुर्घटना घडल्यात.. मग तो कुंडमाळा पूल कोसळणे असो वा कोणी वाहून गेल्याची घटना असो… अशा प्रकारच्या घटनांमुळे निश्चितच पुण्याच्या पर्यटकनावर परिणाम होऊ शकतो. अशा घटनांमुळे लोकप्रिय पर्यटन स्थळांवर चांगल्या पायाभूत सुविधा, गर्दी नियंत्रण आणि नियोजनाची आवश्यकता असल्याची गरज स्पष्ट झाली. या सर्व अडचणी दूर करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन नवीन पर्यटन अँप बनवणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासोबतच सुरक्षित पर्यटन कस होईल यासाठी हा प्रयत्न आहे.

काय काय सुविधा मिळणार ? Pune Tourism App

पुणे जिल्ह्यातील सर्व १३८ अधिकृतपणे मान्यताप्राप्त पर्यटन स्थळांची माहिती या अँप मध्ये (Pune Tourism App) मिळेल. यामध्ये प्राचीन गुहा, भव्य किल्ले, हिरवेगार गेटवे, पायवाट, हिल्स स्टेशन यांसारख्या पर्यटन स्थळांचा समावेश आहे. या सर्व पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती या अँप मध्ये मिळेल. कोणत्या पर्यटन स्थळावर कस जायचं? वाहनांची सोय कशी आहे? सदर पर्यटन स्थळांवर तिकीट शुल्क आहे का? असेल तर किती रुपये आहे? तसेच सदर पर्यटन स्थळी साहसी आणि क्रीडा ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या आहेत याबाबतची माहिती पर्यटकांना या अँप मध्ये मिळेल.

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले बल्ले!! पगार 34 टक्क्यांनी वाढणार

8th Pay Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन 8th Pay Commission । केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर मागील काही दिवसापासून हे कर्मचारी ८ व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. सरकार कडून अजून तरी ८ व्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी जर ८ वा वेतन आयोग लागू झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढले याबाबतची माहिती समोर आली आहे. अँबिटच्या अहवालानुसार, ८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर ३०-३४% पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. . ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. परंतु, हे तेव्हाच होईल जेव्हा अहवाल तयार होईल, सरकारला पाठवला जाईल आणि सरकार त्याला मान्यता देईल.

1.12 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा – 8th Pay Commission

अँबिटने त्यांच्या अहवालात सांगितले आहे की, आठव्या वेतन आयोगाचा (8th Pay Commission) अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होईल. भारताचा वाढता आणि मजबूत जीडीपी असूनही, त्याचा परिणाम अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असू शकतो. याचा फायदा सुमारे 1.12 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन किती वाढेल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल.

एम्बिटच्या रिपोर्टनुसार, ७ व्या वेतन आयोगात सरकारने १४ टक्के पगारवाढ केली होती. १९७० नंतरची ही सर्वात कमी वाढ होती. परंतु ८ व्या वेतन आयोगात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० ते ३४ टक्के वाढ होऊ शकते. जी एकूण खर्चाच्या १५.५ टक्के असू शकते. अम्बिटने त्यांच्या विश्लेषण अहवालात मूळ वेतन 50,000 रुपये आणि महागाई भत्ता 60 टक्के गृहीत धरून गणना केली आहे. यानुसार, पगार १४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकार पगारात एकूण ५४ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. जर सरकारने 1.82 x फिटमेंट फॅक्टर लागू केला तर 50 हजार मूळ वेतन 91,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. जर ते 2.15 x असेल तर ते 107,500 रुपये होईल. आणि जर ते 2.46 x केले तर ते 1 लाख 23 हजार 200 रुपये होईल. एचआरए, डीए आणि इतर भत्ते सुद्धा याच प्रमाणात वाढतील. 8th Pay Commission

पगार आणि पेन्शनमध्ये वाढ झाल्यानंतर सरकारवरील भार वाढेल. यासाठी सरकारला 1.8 ट्रिलियन रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागेल. हा खर्च भरून काढण्यासाठी सरकार जीएसटी दर वाढवू शकते असं या अहवालात म्हंटल आहे.

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज!! कोकणातून जाणाऱ्या या विशेष ट्रेनला मुदतवाढ

Railway News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Railway News । महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडणारी आणि कोकणच्या निसर्गरम्य वातावरणातून धावणाऱ्या उधना ते मंगळूर ट्रेनला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. खरं तर उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हि द्वीस्वाप्ताहिक रेल्वे सुरु करण्यात आली होती. आता या ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणी माणसाला तसेच उधना वरून मंगळूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कधीपर्यंत मुदतवाढ ? Railway News 

उधना ते मंगळूरु (09057/09058) या विशेष द्वीस्वाप्ताहिक रेल्वेला २८ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत गाडी क्रमांक 09057 म्हणजे उधना-मंगळूरू आठवड्यातील दर बुधवार आणि रविवारी रात्री 8 वाजता उधना जंक्शनहून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठ वाजता ही गाडी मंगळूरू जंक्शनला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 09058 म्हणजे मंगळूरू-उधना आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०:१० वाजता मंगळुरु जंक्शनहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी ही ट्रेन सुरत येथील उधना जंक्शनला पोहोचणार आहे. (Railway News) 

उधना ते मंगळूर ट्रेनला (Udhna to Mangaluru Train) मुदतवाढ देण्यात आल्याने गणेशोत्सवला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे .. तसेच उधना, सुरत आणि त्या आसपासच्या परिसरातून कोकणासह मंगळुरू आणि कर्नाटकच्या इतर भागांत जाणाऱ्या तसेच मंगळुरू येथून उत्तर दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावरील पर्यटक, व्यावसायिक, विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे.

कोणकोणत्या स्टेशनवर थांबा ?

हि विशेष ट्रेन (Railway News)उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा , माणगाव , खेड़, चिपळूण, सावर्डा, संगमेशवर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कर्माली, मडगाव जंक्शन, कानकोना, करवार, अंकाळा, गोकर्णा रोड, कुम्टा, मुर्देश्व,र भटकल मूकांबिक रोड (ब्यंदूर) कुंडापुर, उदुपी, मुलकी, सुरथ्कल, मगंलूरू जंक्शन या स्थानकांवर थांबू शकते.

Chikhaldara Paramotoring Service : चिखलदऱ्यात पॅरामोटरिंग सेवा सुरु; 3000 फुटावरून अनुभवा निसर्गाचे सौंदर्य

Chikhaldara Paramotoring Service

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Chikhaldara Paramotoring Service। विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या मेळघाटमधील चिखलदरा येथे पावसाळ्यात अनेक पर्यटक मोठी गर्दीय करतात. हिरवेगार जंगल, खोल दऱ्या, उंच उंच पहाड आणि त्यातच बरसणारा पाऊस… अशा या चिखलदऱ्याचे नयनरम्य विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येत असतात. आता या पर्यटकांना पॅरामोटरिंग चा अनुभव घेता येणार आहे. या माध्यमातून तब्बल ३००० फूट उंचीवरून निसर्गाचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.

तस बघितलं तर साहसी खेळांची आवड असलेले बरेच पर्यटक चिखलदरा येथे येतात. पॅरामोटरिंगमुळे (Chikhaldara Paramotoring Service) या पर्यटकांना पर्यटक भीमकुंड, गाविलगड किल्ला, स्कायवॉक पॉइंट, चिखलदरा शहर आणि आकाशातून येथील जंगलातील खोल दरीचा आनंद घेता येणार आहे. वन विभागाच्या सहकार्यानं चिखलदरा येथे पर्यटकांना भुरळ पडणाऱ्या पॅरामोटरिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सेवा प्रशिक्षित पायलट्सच्या देखरेखीखाली चालवली जाते, जे सुरक्षितता सुनिश्चित करतात. उपकरणे आणि प्रशिक्षण उच्च दर्जाचे असून, नवशिक्यांसाठीही ही सेवा सुरक्षित आहे. साधारणपणे एक पॅरामोटरिंग फ्लाइट 15 ते 30 मिनिटांची असते, ज्यामध्ये पर्यटकांना मेळघाटच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येतो. पॅरामोटरिंगचा खर्च साधारणपणे प्रति व्यक्ती 2,000 ते 3,500 रुपये असू शकतो, परंतु नेमके दर जाणून घेण्यासाठी स्थानिक वनविभागाशी किंवा सेवा प्रदात्याशी संपर्क साधावा लागेल.

दरम्यान, पॅरामोटरिंगचे पायलट आशिष तोमर यांनी पॅरामोटरिंग पायलट म्हणून दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. उल्लेखनीय म्हणजे, त्यांना पाँडिचेरी, जैसलमेर, हरिद्वार, अलिबाग आणि गोवा येथे पॅरामोटरिंग पायलट म्हणून चार वर्षांचा अनुभव आहे. आशिष तोमर हे मूळचे परतावाडा येथील रहिवासी असून त्यांनी मुंबईत चित्रपटसृष्टीत स्टील फोटोग्राफर म्हणून सुद्धा काम केलंय. नो एन्ट्री, प्रेमाची गोष्ट अशा काही चित्रपटांसाठी स्टील फोटोग्राफी त्यांनी केलीय. Chikhaldara Paramotoring Service

चिखलदराला कस पोहचाल ? Chikhaldara Paramotoring Service

चिखलदरा हे अमरावतीपासून 100 किमी अंतरावर आहे. नागपूर ते चिखलदरा 231 किमी अंतर आहे. तर मुंबईवरून ६०० किलोमीटर अंतरावर आहे. विमानाने जायचं असल्यास तुम्हाला अमरावती विमानतळ गाठावे लागेल. हे विमानतळ चिखलदऱ्यापासून 107 किमी अंतरावर आहे. तर रेल्वेने जायचं असल्यास अमरावती किंवा बडनेरा रेल्वे स्टेशनला उतरावं लागेल. तेथून तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने चिखलदऱ्याला जाऊ शकता.

Mumbai Nanded Vande Bharat Express : मुंबई- नांदेड वंदे भारत ट्रेन या तारखेपासून सुरु होणार

Mumbai Nanded Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Nanded Vande Bharat Express मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे. खरं तर मागील काही महिन्यापासून या ट्रेनची चर्चा सुरु आहे. मुंबई ते जालना वंदे भारत एक्स्प्रेस चाच हा विस्तार आहे. मुंबईहून थेट नांदेडला जोडणारी हि ट्रेन कधीपासून सुरु होणार याकडे मराठवाड्यातील आणि खास करून नांदेडचे प्रवाशी लक्ष्य ठेऊन आहेत. अखेर आता हि वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार याबाबतची तारीख जाहीर झाली आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी या ट्रेनचे उदघाटन होणार आहे. तसेच 27 ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि दिनांक 28 ऑगस्ट पासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी रेल्वे सुरु होईल

कस असेल वेळापत्रक- Mumbai Nanded Vande Bharat Express

मुंबई- नांदेड वंदे भारत ट्रेन 27 ऑगस्ट 2025 पासून (Mumbai Nanded Vande Bharat Express) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी 13.10 वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री 22.50 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन 28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 14.25 वाजता पोहोचेल.

हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Nanded Vande Bharat Express) हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. या ट्रेन मध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त प्रवाशांना प्रवास करता येईल, ते सुद्धा अगदी आरामात…

तिकीट किती असेल?

मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचे तिकीट सुमारे 1750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3300 रुपयांपर्यंत राहील असा दावा करण्यात येत आहे. मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेनचा विस्तार थेट नांदेड पर्यंत करण्यात आल्याने नांदेडवासियांसाठी प्रवास अगदी आरामदायी होणार आहे. या ट्रेनचा ७ जिल्ह्याना आणि १० रेल्वे स्थानकांना फायदा होणार आहे.

Airtel 189 Rupees Recharge Plan : Airtel ने लाँच केला 189 रुपयांचा नवा रिचार्ज प्लॅन; मिळतात हे फायदे

Airtel 189 Rupees Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Airtel 189 Rupees Recharge Plan । भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर भारती एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी १८९ रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्या ग्राहकांना आपलं सिम कार्ड ऍक्टिव्ह ठेवायचं आहे, परंतु जास्तीचे इंटरनेट वापरण्याची गरज लागत नाही अशा यूजर्स साठी एअरटेलचा हा रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल. हा प्लॅन आता संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅन मध्ये काय काय फायदे मिळतात ते आपण सविस्तर जाणून घेऊयात …

21 दिवसांची वैधता – Airtel 189 Rupees Recharge Plan

एअरटेलचाय या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅन मध्ये (Airtel 189 Rupees Recharge Plan) ग्राहकांना २१ दिवसांची व्हॅलिडिटी मिळतेय. या कालावधीत यूजर्सना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि १ GB इंटरनेटचा लाभ घेता येतोय.. हे इंटरनेट दररोज १ GB नव्हे तर संपूर्ण २१ दिवसांसाठी १ GB इंटरनेट असेल. हा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आला आहे ज्यांना मोठ्या प्रमाणात डेटाची आवश्यकता लागत नाही, परंतु तरीही अमर्यादित व्हॉइस कॉलचा लाभ ते घेऊ शकतात. ज्येष्ठ नागरिक, सामान्य फोन वापरकर्ते किंवा कमीत कमी इंटरनेटची गरज असलेल्या ग्राहकांसाठी हा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन बेस्ट पर्याय ठरेल.

२०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे एअरटेलचे २ च रिचार्ज प्लॅन आहेत. एक म्हणजे हा १८९ चा रिचार्ज प्लॅन (Airtel 189 Rupees Recharge Plan) आणि दुसरा आहे तो म्हणजे १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन… या दोन्ही प्लॅन ची तुलना करायची झाल्यास, १९९ च्या रिचार्ज मध्येही हेच सर्व बेनेफिट्स मिळतात हे १८९ मध्ये आहेत, परंतु १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा २८ दिवसाच्या वैधतेसह येतो.. त्यामुळे ग्राहकांना जास्त कालावधीसाठी हा रिचार्ज वापरता येतो. त्यामुळे तुम्ही १० रुपये जास्त खर्च करून १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन सुद्धा मारू शकता .

दरम्यान, एअरटेलने OTT सेवांसह कंटेंट-रिच प्लॅनसह आपला प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओ वाढवण्यावर भर दिला आहे. अलीकडेच, कंपनीने २७९ रुपयांपासून सुरू होणारे नवीन प्लॅन सादर केले होते. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना नेटफ्लिक्स, झी५ आणि जिओहॉटस्टार सारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सहज ऍक्सेस मिळतो. हा प्लॅन डेटा आणि व्हॉइस बेनिफिट्ससह मनोरंजन हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी खास लाँच करण्यात आला आहे.

बच्चू कडूंच्या मागण्यांची दखल घ्या, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू; बाळा नांदगावकरांचा सरकारला इशारा

Bachhu Kadu Bala Nandgaonakr

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र येत शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार करीत बच्चूभाऊ कडू (Bachhu Kadu) यांनी ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारने दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करू, अशा थेट इशाराच मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिला. तर आमच्या शेतीमाला भाव द्या, आम्हाला कुठल्याही योजनांचे पैसे नकोत. जर आमच्या शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला तर आम्हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना दर महिन्याला 5000 देऊ…, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

देशाचे माजी कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेली ‘७/१२ कोरा कोरा कोरा’ यात्रा दारव्हा तालुक्यातील लालखिंड येथे आज पोहचली. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या यात्रेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाठिंबा दर्शविला. यावेळी नांदगावकर म्हणाले की, बच्चूभाऊ कडू यांनी सरकारकडे ज्या सतरा मागण्या केल्या आहेत त्या मागण्या अतिशय योग्य आहेत. कष्टकरी शेतकरीराजाला मदत झालीच पाहिजे. त्याला पीकविमाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं कर्जमाफी झाली पाहिजे. आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी घालवणारे बच्चू कडू यांचा पाठीचा कणा एकदम ताठ आहे. ताठ कण्याचे आबू लढाऊ बाण्याचे माझे मित्र बच्चू कडू आहेत. ज्यावेळेला हा माणूस उन्ह, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पायी यात्रा काढतो अशा माणसाला पाठिंबा हा द्यायलाच पाहिजे, असे बाळा नांदगावकर यांनी यावेळी म्हंटले.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, बाळा नांदगावकरांना पाहताच सिमेंटच्या जंगलातला माणूस शेतीच्या जंगलात आलाय. मनसेचे बाळा नांदगावकर हे माझे मित्र असून आम्ही दोघेजण विधानसभेत एकत्रित होतो. पक्ष, जात आणि धर्म कोणताही असू दे मात्र राबणारी जात मात्र, शेतकरी, मजुराची आहे हे एकदा दाखवायला पाहिजे. या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आम्ही उभारलेला हा लढा शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांच्या एकजुटीसाठी आहे. त्यामुळे या लढ्यात सर्वांनी सहभागी झाले पाहिजे. जात, पात बाजूला ठेवत शेतकऱ्यांसाठी एकत्रित येत असून मत कोणाला पण द्या पण शेतकऱ्यांसाठी एकत्रित व्हा, असे आवाहन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना केले.

YouTube New Policy 2025 : YouTube वरून पैसे कमवणे झालं अवघड!! 15 जुलैपासून नियम बदलले

YouTube New Policy 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईनYouTube New Policy 2025 । सध्या सर्वत्र Youtube चे फॅड सुरु आहे. जो तो उठतोय आणि स्वतःच नवीन युट्युब चॅनेल काढतोय.. उद्देश एकच ते म्हणजे युट्युब वरून पैसे कमवणे… अनेकांनी युट्युबच्या माध्यमातून लाखो रुपये कमावले आहेत. युट्युबचे वारं सध्या जोरदार बघायला मिळत आहे. मात्र आता येत्या १५ जुलै पासून युट्युब ने काही नियमात बदल केले आहेत, ज्यामुळे पैसे कमवणे आधी पेक्षा कठीण होणार आहे. बदललेल्या नियमांनुसार, आता युट्यूब फक्त मूळ आणि नवीन कंटेंट तयार करणाऱ्यांनाच व्हिडिओंमधून कमाई करण्याची संधी देईल. युट्यूबला प्रत्येक चॅनेलप्रमाणे नवीन आणि मूळ कंटेंट मिळावा अशी इच्छा आहे त्यासाठीच कंपनीने नवीन नियम लागू केले आहेत.

गुगलच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, आता YouTube पार्टनर प्रोग्राम अंतर्गत मास प्रोड्यूस्ड आणि रिपेटिव्ह कंटेट ओळखण्याची आणि मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आणखी कडक (YouTube New Policy 2025) करण्यात येणार आहे. एखाद्या क्रिएटरच्या व्हिडिओला किती व्हीव्हज येतात यापेक्षा प्रेक्षकांना माहिती देणारा कन्टेन्ट कोणता आहे किंवा प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा व्हिडिओ कोणता आहे? यावर युट्युब लक्ष्य केंद्रित करणार आहे. आत्तापर्यंत युट्युबचे धोरण बघितलं तर YouTube ने नेहमीच ओरिजनल कंटेटला प्रोत्साहन दिले आहे. हे धोरण त्या दिशेने आणखी एक पाऊल असणार आहे.

काय आहेत नवीन नियम- YouTube New Policy 2025

युट्यूबच्या नवीन धोरणानुसार, आता जर एखाद्या क्रिएटरला युट्युबच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर त्याचा विडिओ हा मूळ विडिओ असावा.. दुसऱ्या कोणाचा तरी वापरलेला विडिओ आपल्या युट्युब चॅनेल वर टाकला तर पैसे मिळणार नाहीत..

वारंवार तोच तोच कंटेट रिपीट करणाऱ्या चॅनेलवाल्यांना सुद्धा धक्का बसणार आहे. अशा चॅनेलला पैसे मिळणार नाहीत. YouTube New Policy 2025

मोठ्या बदलांशिवाय इतर कोणाचाही कंटेट वापरला जाऊ शकत नाही. जर दुसऱ्या कोणाचा कन्टेन्ट घेतला तरी त्यात जास्तीत जास्त बदल करावा जेणेकरून तो नवीन कंटेन्ट आहे असच वाटावं… यासाठी तुमच्या स्वतःच्या डोक्यातील स्क्रिप्ट सदर कन्टेन्ट मध्ये टाकावी

अलीकडच्या काळात यूट्यूब आणि इतर व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर एआय व्हिडिओंचा वापर करण्यात येत असल्याचं सातत्याने दिसत आहे. अशा विडिओ वर सुद्धा युट्युब कडून कारवाई करण्यात येईल. AI चा वापर करुन तयार केलेल्या व्हिडिओला आता पैसे मिळणार नाहीत.

धरतीवरचा देव, माझा गुरु शेतकरीच आहे! शेतकऱ्यांचा सत्कार करत बच्चू भाऊंकडून गुरुपौर्णिमा साजरी

Bachhu Kadu Gurupournima

अमरावती प्रतिनिधी । आज सर्वत्र गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे.गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस गुरुंना समर्पित केला जातो. या जगात धरणीवरचा देव म्हणून शेतकऱ्याला मानले जाते. कारण तो अन्नधान्य पिकवतो आणि हा शेतकरीच माझा गुरु आहे असे सांगत शेतकऱ्यांसाठी ७/१२ कोरा कोरा यात्रेच्या माध्यमातून आवाज उठवणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आज चौथ्या दिवशी शेतकरी माता भगिनींचा शाल, हार, श्रीफळ देऊन सत्कार केला. इतकेच नाही तर माता भगिनींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतला. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असून त्याकडे कोणी लक्ष देत नसताना शेतकऱ्यांच्या ७/१२ सह कर्जमाफी प्रश्नी आवाज उठवणाऱ्या व त्याला गुरुचे स्थान देऊन त्याचा सत्कार करणाऱ्या बच्चू भाऊंना पाहताना अनेकांचे डोळे पाणावले.

‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,’ या निर्धाराने हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन माजी मंत्री बच्चू कडू यांनी ‘७/१२ कोरा करा’ यात्रेच्या आजच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांनी दारव्हा तालुक्यातील वळसा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्त तेथील शेतकरी, महिला शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ, हार घालून आशीर्वाद घेतला. वळसा येथून शेतकऱ्यांचा सत्कार केल्यानंतर आपल्या सातबारा कोरा यात्रेचा निर्धारपुर्वक पुढचा टप्पा बच्चू भाऊंनी सुरु केला.

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरांसह विविध मागणीसाठी उन्ह, वारा, पाऊस आणि दिवस रात्र याचा विचार न करता पायी चालत निघालेल्या बच्चू भाऊंच्या सातबारा कोरा कोरा यात्रेला गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पायी चालत असल्याने बच्चू भाऊंच्या पायांना जखमा झाल्या आहेत तरी देखील त्या जखमा सोसत बच्चू भाऊंनी आपली हि यात्रा सुरूच ठेवली आहे. सर्व जाती धर्मातील, पक्षातीळ शेतकरी बांधव बच्चू भाऊंच्या या यात्रेत पक्ष, जातपात सहभागी होताना दिसून येत आहेत.

Ganeshotsav : गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित!! अधिवेशनात मोठी घोषणा

Ganeshotsav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav । गणेशोत्सव अगदी तोंडावर आला असताना आता महाराष्ट्रातील गणेशभक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गणेशोत्सव या सणाला महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विधानभवनात याबाबत घोषणा केली आहे. भाजपाचे कसबा पेठचे आमदार नारायण रासने यांनी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना आशिष शेलार यांनी हि मोठी घोषणा केली आहे.

गणेशोत्सवासाठी कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही- Ganeshotsav

आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राचा गणेशोत्सव 1893 रोजी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या सुरु केला. घऱोघरी तो सुरु होताच. त्याची एक पार्श्वभूमी सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित होतं आणि त्याच पद्धतीन चालू आहे. त्यामुळेच महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव महाराष्ट्र राज्याचा महोत्सव उत्सव म्हणून घोषित करेल हे मी आजच स्पष्ट करतो. तसेच पीओपी (POP) मूर्तींवरील निर्बंध हटवण्यात आले असून, विसर्जन परंपरागत पद्धतीनेच व्हावे, असे धोरण सरकार न्यायालयासमोर मांडत आहे. राज्य सरकारचे धोरण गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोणत्याही प्रकारे आडकाठीचे असणार नाही,” असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील गणेश मंडळांमध्ये आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा –

गणेशोत्सवाला (Ganeshotsav) महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित करत असताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. काही लोकांनी वेगवेगळ्या कारणाने गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या न्यायालयात केला. पण महायुतीच्या सरकारने या सर्व निर्बंधांना बाजूला केलं. 100 वर्षाच्या परंपरेला खंडित कोणी केला असेल तर तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केले. लालबागचा राजा देखील एक वर्ष बसला नाही. ही भूमिका तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली, असा टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आता ठाकरे गटाकडून यावर काय प्रत्युत्तर येत ते बघायला हवं.