Saturday, December 20, 2025
Home Blog Page 51

Ai+ 5G Mobile Launched : 4999 रुपयांत लाँच झाला 5G Mobile; मिळतात हे खास फीचर्स

Ai+ 5G Mobile Launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ai+ 5G Mobile Launched । तुम्ही जर कमी किमतीत आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हि बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतात अवघ्या ४९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत २ नवे मोबाईल लाँच झाले आहेत. हे मोबाईल Ai+ ब्रँडने बाजारात आणले आहेत. AI+ Pulse आणि Nova 5G असं या दोन्ही स्मार्टफोनची नावे आहेत. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

Ai+ ब्रँड च्या या दोन्ही मोबाईल मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील AI+ Pulse स्मार्टफोन मध्ये T615 चिपसेट बसवण्यात आली आहे तर Nova 5G मध्ये T8200 चिप वापरण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन Android 15 वर आधारित NxtQ OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतात. यामध्ये NxtPrivacy Dashboard आहे, जे वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कोणत्या ॲप्सद्वारे ट्रॅक केला जात आहे आणि कसा, याची माहिती देतं. याशिवाय, NxtQuantum PlayStore, NxtQuantum Theme Design Tool, Community App, Community Wallpaper आणि NxtMove App यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. (Ai+ 5G Mobile Launched)

कॅमेरा – Ai+ 5G Mobile Launched

AI+ पल्स आणि Nova 5G च्या कॅमेराबद्दल सांगायचं झाल्यास, या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा मिळतो, तर समोर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि हि बॅटरी जास्त वेळ टिकेल. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, बोलायचं झाल्यास स्मार्टफोन मध्ये Wi-Fi, GPS, Bluetooth, 3.5mm ऑडिओ जॅक आणि USB Type-C पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.

किंमत किती?

Ai + Pluse च्या ४GB रॅम आणि ६४GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४,९९९ रुपये आहे तर ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे. दुसरीकडे, Ai + Nova 5G च्या ६GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे तर ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

आजीबाई काळजी करू नकोस; बच्चू कडू तुला घर बांधून देईन…

Bachhu Kadu With Aajjibai

अमरावती प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा सुरू असून यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडून सर्वसामान्य शेतकरी, महिला यांच्या व्यथा जाणून घेत आहे. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लोही बाजार गावातून जात असताना एक आजीबाई बच्चू कडू यांना पडक्या घरात बसलेली दिसून आली. तेव्हा बच्चू कडू यांनी त्या आजीबाईंशी चर्चा करीत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तेव्हा आजींना राहायला पक्के घर नसून पडक्या घरात त्या राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता बच्चू कडू यांनी त्या आजीबाईला पूर्ण घर व्यवस्थित करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पाहिजे तेवढे पैसे आम्ही देतो उद्यापासून घरच्या बांधकामास सुरुवात करा, अशा सूचना कडू यांनी दिल्या. आजीबाई काळजी करू नका, जोपर्यत बच्चू भाऊ जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही, असे भावनिक आश्वासन देखील कडू यांनी आजींना दिले.

“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून आक्रमक सुरुवात केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.

दरम्यान, ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा लोही बाजार या ठिकाणी दाखल झाली. तेव्हा शेतकरी, गावातील ग्रामस्थांनी यात्रेचे स्वागत करत यात्रेत मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. गावातून यात्रा जात असताना बच्चू कडू यांनी शेतकरी, कष्टकरी लोकांच्या व्यथा, समस्या जाणून घेतल्या.

Pune Nashik Expressway : पुणे- नाशिक प्रवास अवघ्या 3 तासांवर; सरकारचा 28000 कोटींचा प्रकल्प

Pune Nashik Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Nashik Expressway । पुणे आणि नाशिककरांसाठी महत्वाची बातमी आहे. एकीकडे पुणे ते नाशिक रेल्वेमार्ग कधी सुरू होईल हे अजून स्पष्ट नसलं तरी पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या नव्या द्रुतगती महामार्गाला मात्र आता गती मिळाली आहे. सरकारने तब्बल २८ हजार ४२९ कोटींचा खर्च करत, या दोन्ही शहरांना जोडणारा १३३ किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग उभारण्याचा मोठा निर्णय घेतलाय. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी द्रुतगती महामार्गांची निर्मिती केली जात आहे. या महामार्गामुळे पुण्याहून नाशिकला किंवा नाशिकहुन पुण्याला प्रवास करणे अतिशय सोप्प आणि कमी वेळेत होणार आहे.

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती (Pune Nashik Expressway) महामार्गाच्या अंतिम आखणीला सरकारने फेब्रुवारी 2024 मध्येच मान्यता दिली होती. हा महामार्ग सुरत – चेन्नई महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचा इतर राज्यांतील वाहनचालकांना फायदा होणार आहे. महामार्गाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) आणि व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्य सरकारकडे सादर केला जाईल. या महामार्गाची लांबी १३३ किलोमीटर असून ३ वर्षांत तो पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी १५४५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

कोणकोणत्या तालुक्यातून जाणार? Pune Nashik Expressway

पुणे आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाईल… पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतून आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा नवा महामार्ग तयार केला जाईल. अहिल्यानगर आणि नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून, औद्योगिक इंडस्ट्रीला आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळेल.

कसा असेल नवा महामार्ग ?

पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गावर (Pune Nashik Expressway) १२ मोठे उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. नद्या, नाल्यांवर हे पूल उभारले जातील. पुणे जिल्ह्यातील चिंबळी, चाकण, पाबळ तसेच अहिल्यानगर, नाशिकमधील राजुरी, खंडारमाळ, साकूर, माची, कासारे या ९ ठिकाणी इंटरचेंज असेल. महामार्गावर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना या इंटरचेंजचा वापर करण्यात येईल. तसेच महामार्गाला शिर्डीचा मार्गही जोडला जाणार आहे, असं म्हंटल जात आहे.

शेतकऱ्याला शेती परवडत नाही आता गांजा, अफूचे पीक घेऊन द्यावे; ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेतून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा

bachhu kadu padyatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रात सरकार, राज्यात सरकार आणि जिल्हा परिषद त्यांची आहे. महानगर पालिकेपासून घरावर सुद्धा भाजप वाल्यांचे झेंडे असून आता शेतात झेंडे लावायचे राहिले होते ते सुद्धा लागले. नाही तरी शेतात पेरून काही फायदा नाही. आज अशी अवस्था आहे कि पेरलेला खर्च सुद्धा निघत नाही. ३४०० रुपयेमध्ये सोयाबीन गेले, ४ क्विंटल पिकले एका एकरमध्ये १५ हजार रुपयांचेसोयाबीन आले आणि खर्च आला ८० हजार रुपये. मग पीक घेण्यापेक्षा झेंडे लावलेले बरे आम्ही तुमच्या पक्षात आमच्या शेत सकट येतो आणि कमळ लागले कि घेऊन जातो. हिंदू मुसलमान करून शेतकऱ्याला भिकेला लावलं. आता शेतात पीक घेण्यापेक्षा भाजपचे झेंडे पेरतो. म्हणजे वावरासकट आम्ही तुमच्या पार्टीत येतो. म्हणजे कमळ लागले कि त्याला तरी बाजारभाव द्याल, अशा शब्दात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी भाजपवर निशाणा साधला.

बच्चू कडू यांची ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रा (Sat Bara kora Kora Yatra) चा आज दुसरा दिवस असून सुकळी येथील शेतकऱ्यांनी शेतात त्यांना भाजपचे झेंडे लावलेले दिसून आले. शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला असतानाच शेतात लावलेले फलक देखील लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार हे बैलगाडीवर बसल्याचे छायाचित्र या फलकावर आहे. आता पेरणी करणे बंद, गोरगरीब लोकांच्या जीवावर उठलेले म्होरके, आता एकतर गांजा, अफूचे पीक, नाहीतर पक्षाचे झेंडे, असा उल्लेख या फलकावर आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन सरकारनेच दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी कोणती समिती गठीत केली काय? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी समिती कशाला तयार करत आहेत, थेट घोषणाच केली पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकऱ्यांनी ‘7/12 कोरा कोरा कोरा’ यात्रेला देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजेच पापळ येथून आक्रमक सुरुवात केली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या यात्रेचा आजचा दुसरा दिवस असून ही पदयात्रा उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे पार करत 14 जुलै रोजी चिलगव्हाण येथे स्व. साहेबराव करपे यांच्या स्मृतिस्थळी जाहीर सभेने समाप्त होणार आहे.

शास्त्रज्ञांना सापडली दुसरी पृथ्वी!! मनुष्याला मिळणार नवं घर?

TOI-1846 b Planet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या पृथ्वीसारखंच जीवन दुसऱ्या कोणत्या ग्रहावर आहे का? किंवा पृथ्वीसारखाच मनुष्याला पोषक असा कोणता ग्रह आहे का? याची संशोधन मागच्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. आता मात्र यामध्ये शास्त्रज्ञांना यश मिळताना दिसतंय. कारण पृथ्वीसारखीच आणखी एक नवीन पृथ्वी शास्त्रज्ञांना सापडली आहे. मोरक्कोच्या ऑकाइमेडेन लॅबच्या अब्दुरहमान साबकिउ यांच्या नेतृत्त्वाखाली या नव्या ग्रहाचा शोध लागला आहे. शास्त्रज्ञांनीत या ग्रहाला TOI-1846 b असं नाव दिलं आहे.

या ग्रहाचं वय साधारण 7.2 अब्ज वर्षे इतकं असून, तो आपल्या पृथ्वीपेक्षा सुमारे 154 प्रकाशवर्षे दूर आहे. पृथ्वीसारखंच असणाऱ्या या नव्या ग्रहाची लांबी पृथ्वीपेक्षा दुप्पट आहे. म्हणजेच काय तर पृथ्वीपेक्षा दुप्पट लोकसंख्या या ग्रहावर वसू शकते. या बाह्यग्रहाची त्रिज्या सुमारे 1.792 पृथ्वी त्रिज्या आहे आणि ती आपल्या पृथ्वीपेक्षा सुमारे 4.4 पट जास्त आहे. सूर्याशी तुलना केल्यास, हा ग्रह आकाराने 40 टक्के आहे, तर त्याचे वस्तुमान सौर वस्तुमानाच्या अंदाजे 0.42 आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते तशीच ही नव्याने सापडलेली सुपर-अर्थ देखील एका उपग्रहांभोवती फिरते. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे 3.93 दिवसांमध्ये आपल्या उपग्रहाभोवतीची परिक्रमा पूर्ण करते. म्हणजेच पृथ्वीवरील १ वर्ष म्हणजे या नव्या सुपर अर्थ वरील अवघे ३ ते ४ दिवस ….

मनुष्याला पोषक आहे का?

अभ्यासानुसार, या ग्रहाचे समतोल तापमान सुमारे 568.1 K (किंवा सुमारे 294.95) आहे. हे पृथ्वीच्या समतोल तापमान 255 K च्या जवळजवळ दुप्पट आहे, याचा अर्थ असा की तापमान जीवनासाठी अनुकूल नसू शकते. तथापि, संशोधनानुसार, हा ग्रह पाण्याने समृद्ध असण्याची शक्यता आहे, जो जीवनासाठी योग्य असण्याचा एक सकारात्मक मुद्दा आहे. शास्त्रज्ञांनी TOI-1846 b ची पुष्टी केवळ TESS मधील डेटा वापरूनच केली नाही तर जमिनीवर आधारित रंगीत छायाचित्रण, उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग आणि स्पेक्ट्रोस्कोपिक निरीक्षणांमधून देखील केली. परंतु खरोखरच या नव्या ग्रहावर मनुष्याला राहण्यासाठी पोषक असं वातावरण आहे का? हे पाहण्यासाठी शास्त्रज्ञांना TOI-1846 b चे अचूक निरीक्षण करावं लागेल.

Cheapest Petrol In The World : काय सांगता!! पेट्रोल 2.50 रुपये लिटर? प्रवाशांची होतेय चांदी

Cheapest Petrol In The World

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cheapest Petrol In The World। आजकाल पेट्रोल आणि डिझलच्या किमती १०० रुपयांच्या वर गेल्यात. साहजिकच प्रवास करणं म्हणजे आता काय खायचं काम राहिलेलं नाही. खास करून चारचाकी वाहनात इंधन टाकणं हे काय सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोप्पी गोष्ट राहिलेली नाही. परंतु तुम्हाला माहितेय का? जगात असा एक देश आहे जिथे फक्त 2.50 प्रति लीटरने पेट्रोल मिळतंय. त्यामुळे कुठून कोणत्याही ठिकाणी प्रवास करणे येथील नागरिकांना चांगलंच परवडतंय. आम्ही तुम्हाला ज्या देशाबद्दल सांगतोय, त्या देशाचे नाव आहे इराण…

खरं तर इस्राईल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे तुम्ही इराण बद्दल बरंच काही ऐकलं असेल, यातीलच एक गोष्ट म्हणजे इराण मधील कच्च्या तेलाचे उत्पादन… जगातील बहुतेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत, परंतु इराणमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत फक्त $0.029 आहे (Cheapest Petrol In The World) म्हणजेच अंदाजे 2.50 रुपये आहे. त्यामुळे इथल्या प्रवाशांना लाँग ड्राईव्ह साठी जाणे केव्हाही परवडतंय.

इराण मध्ये पेट्रोल इतकं स्वस्त का? Cheapest Petrol In The World

इराण मध्ये पेट्रोल खूपच स्वस्त (Cheapest Petrol In The World) आहे यामागील पहिले कारण म्हणजे इराणकडे प्रचंड तेलाचे साठे आहेत आणि त्याची स्वतःची रिफायनरी क्षमता आहे, जी आयातीवर अवलंबून नाही आणि उत्पादन खर्चात लक्षणीय घट करते. आणि दुसरं कारण म्हणजे पेट्रोलवर असलेले सरकारी अनुदान… इराण सरकार कच्च्या तेलाचा मोठा भाग घरगुती वापरासाठी राखीव ठेवते आणि त्यावर प्रक्रिया करते आणि ते जनतेला अतिशय कमी किमतीत उपलब्ध करून देते. या २ कारणांमुळे इराणच्या जनतेला अवघ्या अडीच रुपयांत एक लिटर पेट्रोल मिळते.

इराणनंतर, लिबिया $0.031 प्रति लिटर, व्हेनेझुएला $0.035 प्रति लिटर, अंगोला $0.328 प्रति लिटर, इजिप्त $0.339 प्रति लिटर आणि अल्जेरिया $0.340 प्रति लिटर पेट्रोल विकते, त्यामुळे या देशातही वाहन चालकांना मोठा दिलासा मिळताना दिसतोय. आपल्या भारतात मात्र पेट्रोल आयात करावं लागते.. त्यावर असलेल्या वेगवेगळ्या टॅक्स मुळे भारतात पेट्रोलच्या किमती प्रचंड आहेत. येत्या काळातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. भारतात कधीही अडीच रुपये पेट्रोल दर होणार नाहीत हे सुद्धा सत्य आहे.

Mumbai Metro Line 1 : मुंबईकरांच्या गर्दीची कटकट मिटणार; ‘या’ मेट्रो लाईनवर आता 4 ऐवजी 6 डब्बे असणार

Mumbai Metro Line 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro Line 1 । मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबईवरील लोकलचा ताण कमी व्हावा यासाठी मुंबईत मेट्रो सुरु केली होती. मुंबईतील पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर धावली… या मेट्रोला ४ डब्बे जोडण्यात आलेले आहेत. मात्र तरीही या मेट्रो लाईन वर प्रवाशांची नेहमीच गर्दी बघायला मिळते. मेट्रोच्या सततच्या फेऱ्या असूनही हि गर्दी काय कमी होण्याचं नाव घेत नाही. अखेर यावर उपाय म्हणून आता वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो ४ ऐवजी ६ डब्ब्यांची करण्यात येणार आहे. मेट्रो 1 मार्गिकेचे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रा. लि. या कंपनीने मेट्रो गाडीकरिता अतिरिक्त इबे खरेदी करण्यासाठी इंडिया डेब्ट रिझोल्यूशन कंपनीमार्फत नॅशनल अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडे (एनएआरसीएल) प्रस्ताव सादर केला आहे.

रोज किती प्रवासी प्रवास करतात ? Mumbai Metro Line 1

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवर सध्या 5 लाखांहून अधिक प्रवाशांकडून प्रवास केला जात आहे. गर्दीच्या वेळी या मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागतात. हि गर्दी सोडवण्यासाठी मेट्रोचे डब्बे ४ वरून ६ करण्याचा निर्णय झाला आहे. सध्या मेट्रो १ गर्दीच्या वेळेत ३ मिनिटे २० सेकंदांच्या वारंवारतेसह ३६ फेऱ्या चालवते. सध्याच्या प्रणालीमध्ये गर्दीच्या वेळेत प्रति ट्रिप सुमारे १८०० आणि गर्दी नसलेल्या वेळेत १५०० प्रवासी प्रवास करतात. परंतु , ११ वर्षांपूर्वी कॉरिडॉर सुरू झाल्यापासून सहा कोच गाड्यांच्या प्रवाशांच्या मागण्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. आता हि मागणी मंजूर होण्याची शक्यता आहे. Mumbai Metro Line 1

रेल्वे विस्ताराव्यतिरिक्त, MMOPL घाटकोपर आणि अंधेरी स्थानकांदरम्यान गर्दीच्या वेळेत लहान लूप फेऱ्या चालवणाऱ्या मिक्स लूप सेवा पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे. एकूण प्रवाशांपैकी ८८ टक्के प्रवाशांना सेवा देणाऱ्या या सेवा जूनमध्ये बंद करण्यात आल्या होत्या कारण वर्सोवा डीएन नगर आणि आझाद नगर स्थानकांवर गर्दी कमी झाली होती, जे एकत्रितपणे मेट्रो १ च्या प्रवाशांच्या १२ टक्के आहेत. मिश्र लूप सेवा थांबवण्यात आल्या असल्या तरी, एमएमओपीएलने वारंवारता राखण्यासाठी दररोज ४५२ अतिरिक्त फेऱ्या चालवणे सुरू ठेवले आहे.

दरम्यान, वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेची (Mumbai Metro Line 1 )खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर उभारणी करण्यात आली होती. वर्सोवा हे पश्चिम टर्मिनस आणि घाटकोपर हे पूर्व टर्मिनस आहे. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो लाईन वर वर्सोवा, डी. एन. नगर, अझाद नगर, अंधेरी, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, चकाला (जेबी नगर), एअरपोर्ट रोड, मरोळ नाका, साकी नाका, सुब्रह्मण्यम रोड, जागृती नगर, आणि घाटकोपर अशी १२ स्टेशन आहेत. या प्रकल्पासाठी 2 हजार 356 कोटी रुपयांचा खर्च आला होता. त्यात रिलायन्स इन्फ्राची 74 टक्के, तर एमएमआरडीएची 26 टक्के भागीदारी आहे. मेट्रो 1 मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे 1,711 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Honor X9c 5G : Honor ने लाँच केला 108MP कॅमेरावाला मोबाईल; किंमत किती पहा

Honor X9c 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Honor ने भारतीय मार्केट मध्ये 108MP कॅमेरावाला नवीन मोबाईल लाँच केला आहे. जर तुम्ही स्टायलिश, हलकाफुलका मोबाईल खरेदी करणार असाल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. Honor X9c 5G असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. १२ जुलैपासून तुम्ही प्रसिद्ध इ कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून हा नवा स्मार्टफोन खरेदी करू शकता. तत्पूर्वी या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आपण जाणून घेऊयात….

डिस्प्ले-

Honor X9c 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट सह ६.७८-इंचाचा कर्व्हड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेला 3840Hz PWM डिमिंग आणि लो ब्लू लाईट + फ्लिकर फ्री सर्टिफिकेशन देखील आहे, ज्यामुळे मोबाईल वापरताना तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही. कंपनीने मोबाईल मध्ये स्नॅपड्रॅगन ६ जनरल १ चिपसेट वापरली असून Honor चा हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५-आधारित MagicOS ९.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. खास बाब म्हणजे या स्मार्टफोन मध्ये AI आधारित फीचर्स सुद्धा देण्यात आली आहेत. AI मोशन सेन्सिंग, AI इरेज, AI डीपफेक डिटेक्शन, AI मॅजिक पोर्टल २.० आणि AI मॅजिक कॅप्सूल सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन IP65M रेटिंग सह येतो ज्यामुळे धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कोणताही धोका राहत नाही.

कॅमेरा – Honor X9c 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायच झाल्यास, Honor X9c 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह १०८-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर सेन्सर आणि ५-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल लेन्स कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला १६-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6,600mAh दमदार बॅटरी आहे. हि बॅटरी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुल्ल चार्ज झाल्यानंतर हा स्मार्टफोन 25.8 तासांचा व्हिडिओ किंवा 48.4 तासांचा ऑनलाइन म्युझिक प्लेबॅक देऊ शकत.

किंमत किती?

आता येउयात महत्वाच्या मुद्द्यावर, ती म्हणजे मोबाईलची किंमत. तर भारतात, Honor X9c 5G फक्त एकाच स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला आहे, तो म्हणजे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज… त्यानुसार या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हॉनरचा हा मोबाईल जेड सायन आणि टायटॅनियम ब्लॅक शेड्समध्ये लाँच करण्यात आला असून येत्या 12 जुलैपासून Amazon वर उपलब्ध असेल.

Maharashtra Mega Bharti : राज्यात लवकरच मेगा भरती होणार!! तरुणांना नोकरीची मोठी संधी

Maharashtra Mega Bharti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Mega Bharti । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच मेगा भरती होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा सभागृहात सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना राज्यातील नोकर भरतीसंदर्भात सविस्तर, तपशीलवार माहिती दिली. सभागृहात अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या भरतीबाबत सदस्य भीमराव कराम यांनी लक्षवेधी उपस्थित कली होती. या चर्चेदरम्यान सदस्य नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी भरतीबाबत माहिती दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? Maharashtra Mega Bharti

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारकडून 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर ‘मेगा भरती’ प्रक्रिया राबवली जाईल. राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्ट कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंधातील सुधारणा, नियुक्ती नियमांचे अद्ययावतीकरण आणि अनुकंपा तत्त्वावरील 100% भरती पूर्ण करणे यांसारखी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ही उद्दिष्टे पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांची अचूक माहिती समोर येईल आणि त्यानंतरच राज्यात व्यापक ‘मेगा भरती’ प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं फडणवीस म्हणाले.

यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 75 हजार पदांच्या भरती कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्षात 1 लाखांहून अधिक पदे भरण्यात आली आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात सध्या जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या, परंतु 20 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असलेल्या 6860 कर्मचाऱ्यांची पदे शासनाने अधिसंख्य मान्य केली आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही, मात्र त्यांना सेवेतून कमीदेखील केले जाणार नाही आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ती पदे रिक्त म्हणून घोषित करण्यात येतील. Maharashtra Mega Bharti

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित 1343 पदांवर आधीच भरती करण्यात आली असून उर्वरित पदांसाठी कार्यवाही सुरू आहे. जात प्रमाणपत्र तपासणीसाठी ब्लॉकचेन पद्धतीने अभिलेख विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रमाणपत्र वैधतेसाठी आवश्यक कागदपत्रांची तपासणी सुलभ होईल. यासाठी सचिवांचा एक विशेष गट तयार करण्यात येणार असून तो गट अभ्यास करून अधिक पारदर्शक आणि गतिशील प्रणाली विकसित करेल. सर्वोच्च न्यायालयाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काने पदभरतीवरील स्थगिती उठवल्याने, आता लाड–पागे समितीच्या शिफारसीनुसार ही पदे भरली जातील. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पदांवरही लवकरच भरती (Maharashtra Mega Bharti) केली जाणार

Navi Mumbai Airport : मोठी बातमी!! नवी मुंबई विमानतळ ‘या’ तारखेला सुरु होणार

Navi Mumbai Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Navi Mumbai Airport। बहुप्रतीक्षित नवी मुंबई विमानतळाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण होत आलं असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हे विमानतळ कार्यान्वित होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आहे. खरं तर मुंबईवरचा प्रवासी ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत विमानतळ बांधण्याचं काम सुरु आहे. हे विमानतळ कधी सुरु होणार याबाबत प्रवाशांना उत्सुकता होती. अखेर उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळ हे देशातील दुसरे सर्वात मोठं विमानतळ असणार आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सरकारला नवी मुंबई विमानतळाबाबत (Navi Mumbai Airport) प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं कि, सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल. यापूर्वी विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष राहुल कुल यांनीदेखील या विमानतळाबाबत प्रतिक्रिया दिली होती. 25 जून रोजी राहुल कुल, मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही आमदारांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली होती. त्यावेळी बोलताना राहुल कुल म्हणाले होते की सप्टेंबरमध्ये विमानतळाचे काम पूर्ण होईल. नवी मुंबई विमानतळाच्या नावा संदर्भातील अंतिम निर्णय मात्र शासन स्तरावर होईल असेही त्यांनी म्हंटल होते.

कसं असेल नवी मुंबई विमानतळ ? Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळ (Navi Mumbai Airport) हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ असेल. या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांबीचा असून एकाचवेळी 350 विमाने उभे राहू शकतील इतकी या विमानतळाची क्षमता आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने जोडले जाणार आहे.हे विमानतळ पूर्णपणे कार्यन्वित झाल्यानंतर वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करु शकतात. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर 2029 पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा 2032 पर्यंत आणि चौथा टप्पा 2036 पर्यंत पूर्ण होईल, असं बोललं जातंय. महत्वाची बाब म्हणजे नवी मुंबई विमानतळामुळं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी होणार आहे.