Sunday, December 21, 2025
Home Blog Page 513

महाविकास आघाडीकडून राज्यभर निषेध आंदोलन; शरद पवारांनीही बांधली काळी फीत

Protest movement by Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता, मात्र मुंबई हायकोर्टाने या बंदला परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीकडून आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहे. आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा निषेध आंदोलन केलं आहे. पुणे स्टेशन परिसरात शरद पवार गटाचे आंदोलन सुरु आहे. सकाळी १० ते ११ या वेळेत हे निषेध आंदोलन चालणार आहे.

शरद पवार यांनी या आंदोलनादरम्यान हाताला काळी फीत आणि तोंडाला काळा मास्क लावला असल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अनेक कार्यकर्ते याठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे. स्टेशन रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन सुरु आहे. अगदी शांततेत ते निषेध आंदोलन सुरु आहे.

शरद पवार यांच्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा निषेध आंदोलनात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे हे ११ वाजता दादर येथील शिवसेना भवनासमोर आंदोलन करतील. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात काळ्या रंगाचा स्टेज बांधण्यात आला आहे. तसेच मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले हे ठाण्यात निषेध आंदोलन करतील. महाविकास आघाडीचे नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे संयुक्त आंदोलन करत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

PM Modi Hug Diplomacy : मोदी सर्व परदेशी नेत्यांना मिठी का मारतात? समोर आलं ‘हे’ कारण

modi hug diplomacy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे जेव्हा जेव्हा परदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा तेथील पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांना आवर्जून मिठी मारतात. आत्तापर्यंत आपण असे अनेक फोटो बघितले असतील ज्यामध्ये मोदींनी पुतीन पासून ते ऋषी सुनक आणि जो बायडन पर्यंत सर्व बड्या नेत्यांना मोदींनी मिठी मारली आहे. सध्या मोदी युक्रेन या देशाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. या भेटीवेळी मोदींनी झेलेन्स्की याना मिठी मारली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. मोदी नेहमी सर्व परदेशी नेत्यांना मिठी का मारतात असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला, ज्याचे उत्तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिले आहे. मिठी मारणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे असं एस जयशंकर यांनी सांगितलं.

वोलोदिमिर झेलेन्स्की आणि नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी भेट झाली. या भेटीसाठी मोदी पोहोचले तेव्हा भेटल्यानंतर त्यांनी आधी हस्तांदोलन केलं. त्यानंतर मोदींनी वोलोदिमिर झेलेन्स्की यांना मिठी मारली. ६ महिन्यापूर्वी मोदींनी युक्रेनचा कट्टर विरोधक असलेल्या व्लादिमीर पुतिन यांनाही मिठी मारली होती. त्यावरून एका पाश्चात्य पत्रकाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले की, जेव्हा आमच्या भागात लोक भेटतात तेव्हा एकमेकांना मिठी मारतात, हा कदाचित तुमच्या संस्कृतीचा भाग नसेल, मात्र आमच्या संस्कृतीचा भाग आहे. आज मी बघितलं कि मोदींनी झेलेन्स्की याना मिठी मारली.

एस जयशंकर पुढे म्हणाले, मी मोदींना जगातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांना मिठी मारताना पाहिलं आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की या शिष्टाचारांच्या अर्थांसंदर्भात तुमच्याकडे आणि आमच्याकडे थोडा संस्कृतिक फरक आहे,” असं सांगितलं. दरम्यान, मोदींनी आत्तापर्यंत जो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन, रऋषी सुनाक, यांच्यासह इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या सर्वोच्च नेत्यांनाही मोदींनी अशाप्रकारे मिठी मारल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मोदींची मिठी ही नेहमीच चर्चेत ठरते.

Raw Garlic Eating Benefits | कच्चा लसूण खाल्याने आरोग्याला होतात हे फायदे; यावेळी करा सेवन

Raw Garlic Eating Benefits

Raw Garlic Eating Benefits | आपले भारतीय जेवन हे अत्यंत निरोगी असे जेवण असते. त्यामुळे अनेक लोक नेहमीच भारतीय जेवण खाण्याला प्राधान्य देतात. कारण भारतीय जेवन हे वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवले जाते. आणि हे मसाले आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी असतात. ज्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. आपल्या भारतीय मसाल्यांमध्ये वापरलेले सगळेच पदार्थ हे नैसर्गिक रित्या औषधाने परिपूर्ण असतात. त्यामुळे अगदी भारताबाहेर देखील आपल्या मसाल्यांची निर्यात केली जाते. आपण जर सगळ्या पदार्थांचा अन्नात समावेश करून जर जेवण केले, तर आपल्याला आपण आरोग्याच्या दृष्टीने खूप निरोगी राहू. या मसाल्यामुळे आपल्या जेवनाला चव देखील येते आणि आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक फायदा होतो.

त्यातीलच आपण स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना लसूण हा नेहमीच वापरतो. कारण लसणाच्या फोडणीने अन्नाला खूप चांगली चव येते. त्याचप्रमाणे लसणाचा (Raw Garlic Eating Benefits) आपल्या आरोग्याला देखील खूप फायदे होतात. जर तुम्ही कच्चा लसूण रोज सकाळी खाल्ला, तर तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. तुम्ही निरोगी राहण्यासाठी घरगुती काही नैसर्गिक पर्याय शोधत असाल, तर कच्चा लसूण खाणे हे अत्यंत फायदेशीर आहे. आता आपण जाणून घेऊया की लसुन खाण्याचे काय फायदे होतात.

जेवणापूर्वी लसुन खाण्याचे फायदे | Raw Garlic Eating Benefits

लसणामध्ये एलीसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि कोणताही रोग होण्यापासून लांब राहतो. हे एलीसिन जळजळ कमी होण्यास मदत देखील करते. लसूण खाण्याचा आपल्या त्वचेला देखील खूप जास्त फायदा होतो. आपल्या चेहऱ्यावर जे पिंपल्स येतात, त्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याची क्षमता लसणामध्ये असत त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही. आणि तुमची त्वचा एकदम साफ राहत म्हणजेच लसूण हे नैसर्गिकरित्या एक चांगले अँटीऑक्सिडंट आहे.

लसणाला (Raw Garlic Eating Benefits) एक अँटिव्हायरल , अँटी बॅक्टेरियल, अँटिफ्गल, एंटीपरजीवी आणि अँटी मोल्ड असे देखील म्हटले जाते. लसूण हा बॅक्टेरिया आणि विषाणू यांसारख्या यांना मारून टाकतो. त्यामुळे आपल्याला विषाणूजन्य रोग देखील टाळता येतात. लसणामुळे सर्दी फ्लू यांसारखे आजार लांब राहतात. आणि आपले रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते त्यामुळे तुम्ही जर जेवणाआधी रोज कच्च्या लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खाल्ल्या. त्या तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या त्वचेला ही खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे. कारण लसणामध्ये अनेक नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढेलच त्यासोबतच तुमची पचनक्रिया देखील चांगली होईल.

Shikhar Dhawan Announces Retirement : शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!!

Shikhar Dhawan Announces Retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा स्टार खेळाडू आणि सलामीवीर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती (Shikhar Dhawan Announces Retirement) घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत धवनने निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र आयपीएल निवृत्ती बाबत त्याने कोणतेच भाष्य केलेलं नाही, त्यामुळे तो आयपीएल खेळू शकतो असं बोललं जातंय. मागील काही वर्षांपासून शिखर धवन दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर होता, अखेर आज त्याने निवृत्ती जाहीर करून आपल्या चाहत्याना धक्का दिला.

काय म्हणाला गब्बर – Shikhar Dhawan Announces Retirement

एक पोस्ट करत शेखरने आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यात तो म्हणाला मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय संपवत आहे, मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जात आहे. आज मी अशा वळणावर उभा आहे. जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला फक्त आठवणी दिसतात, आणि जेव्हा तुम्ही पुढे पाहता तेव्हा तुम्हाला संपूर्ण जग पाहता येते… माझे नेहमी एकच ध्येय होते, भारतासाठी खेळणे.ते ध्येय पूर्ण झालं, यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्व प्रथम माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी…मदन शर्मा जी, ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो. ९Shikhar Dhawan Announces Retirement)

शिखर धवन पुढे म्हणाला, टीम इंडिया कडून खेळल्यानंतर मला चाहत्यांचे प्रेम मिळाले. मला आनंद आहे कि मी भारताकडून मनसोक्त क्रिकेट खेळलो. ज्यांनी मला संधी दिली त्या बीसीसीआय (भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ) आणि डीडीसीए (दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन) यांचा मी खूप आभारी आहे. मी स्वतःला तेच सांगतो की तू इथून पुढे देशासाठी खेळणार नाहीस याचं दु:ख मानू ऊ नकोस, पण तू देशासाठी खेळलास तो आनंद कायम ठेव आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्ही मला जे प्रेम आणि समर्थन दिले त्याबद्दल धन्यवाद! जय हिंद…असं म्हणत शिखर धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जायचा. रोहित शर्मासोबत त्याची सलामी चांगलीच जमायची…. एका बाजूला शिखर पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला करायचा, त्यामुळे दुसऱ्या बाजूला उभा असलेल्या रोहितला अतिरिक्त वेळ घ्यायला मिळत होता. शिखर धवन आणि रोहित शर्मा या जोडगोळीने २०१३ ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. शिखरने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय तसेच 68 सामने खेळलेले आहेत.

कर्जाचा बदलता ट्रेंड; भारतीयांमध्ये वाढले गोल्ड लोन घेण्याचे प्रमाण

Gold Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक हे विविध कारणांसाठी व्यवसायांसाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी लोन घेत असतात. लोन घेण्याचे प्रकार वेगवेगळे असतात .परंतु आजकाल गोल्ड लोन (Gold Loan) घेण्याचा प्रकार भारतामध्ये जास्त वाढत चाललेला आहे.. कर्ज घेण्याचा घेणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे. त्यात लोक खास करून गोल्ड लोन घेत आहेत. म्हणजेच घरात जे सोने असते, ते सोने ते बँकेत ठेवून त्याच्या बदल्यात बँकांकडून पैसे घेतात. सध्या अशा प्रकारे लोन घेण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

आणि जाणकार व्यक्तींनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे की, येत्या पाच वर्षात गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दुप्पट होणार आहे. यावरून असे दिसत आहे की, भारतीय लोक हे जास्तीत जास्त कर्जाच्या विळख्यात अडकलेले आहेत. भारतीयांनी जरी कर्ज घेतले, तरी याचा फायदा मात्र कर्ज देणाऱ्या कंपन्यांना होत आहे. परंतु हे कर्ज घेण्याचे प्रमाण भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले नाही, असे देखील अनेक लोकांचे म्हणणे आहे. सध्या जर आपण भारतात पाहिले, तर वाढती बेरोजगारी तसेच आर्थिक स्थैर्य नसणे यामुळे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे.

गेल्या काही दिवसांची आपण जर आकडेवारी पाहिली तर भारतीयांनी 200 टन सोने तारण ठेवून मार्केटमधून जवळपास 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. भारताने जे एकूण कर्ज घेतलेले आहे, त्यातील 20% कर्ज हे गोल्ड लोन द्वारे घेतले गेलेले आहे. सध्या भारतीयांकडे 18000 टन एवढे सोने आहे. ज्याची किंमत 50.40 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षामध्ये कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या 20 टक्क्यांनी वाढलेली आहे आणि आता कर्ज घेणाऱ्या लोकांचे प्रमाण हे 50 टक्के झालेले आहे. जास्तीत जास्त लोक हे सोनेतारण ठेवूनच कर्ज घेतात.

आजपर्यंत सोन्याचा वापर केवळ दागिने बनवण्यासाठी केला जात होता. परंतु भारतीय लोक सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून देखील पाहतात. जेणेकरून वेळेला हेच सोने आपल्याला पैसे मिळवून देईल, या दृष्टीने अनेक लोक सोने करतात. रिझर्व बँकेने 20000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे कर्ज रोखीने देण्यावर बंदी घातलेली आहे.त्यामुळे ग्राहकांनाही रक्कम केवळ चलनाद्वारे मिळू शकते. परंतु यावर क्रिसल रेटिंग यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, गोल्ड लोन देण्याची तर डिजिटल पद्धत आली, तर त्याचा परिणाम नवीन कर्जावर होणार आहे.

तुम्हालाही सिलेंडर महाग मिळते का ? मग इथे नोंदवा तक्रार

सध्याच्या काळात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने महिलांची धुरापासून मुक्तता करण्यासाठी उज्वला योजना आणली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. एवढेच नाही तर हे सिलेंडर रिफील केल्यावर सुद्धा देखील अनुदान देण्यात येते. मात्र काही ठिकाणी सिलेंडर महाग मिळते. मग अशावेळी काय करायचे ? याचीच माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

जरा तुम्ही उज्वला योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला अधिक किंमतीने सिलेंडर मिळत असेल तर तुम्ही याबाबतची तक्रार नोंदवू शकता. उजवला योजनेच्या लाभार्थ्यांना १४. २ किलो सिलेंडर करिता ८०३ रुपये अनुदान मिळते. एवढेच नाही तर सिलेंडर रिफील केल्यानंतर देखील अनुदान मिळते. हे अनुदान ग्राहकांच्या खात्यात जमा होते. तुम्हाला देखील महागड्या किमतीने सिलेंडर मिळत असेल तर उज्वला योजनेच्या हेल्पलाइन नंबर वर संपर्क करू शकता.

कुठे कराल तक्रार ?

हेल्पलाइन नंबर 1800-266-6696 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही त्या एजन्सी आणि डीलरबद्दल तक्रार करू शकता. यासोबतच तुम्ही एलपीजी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1906 वर सुद्धा तक्रार करू शकता. जर तुम्ही इंडेनचा सिलिंडर वापरत असाल, तर तुम्ही इंडेन गॅस एजन्सीच्या १८००-२३३-३५५५ या हेल्पलाइन क्रमांकावरही तुमची तक्रार नोंदवू शकता.

यासोबतच तुम्ही भारत सरकारच्या https://www.mopnge-seva.in या अधिकृत पोर्टलला भेट देऊनही तुमची तक्रार करू शकणार आहात. तक्रार दाखल केल्यानंतर तुमच्या तक्रारीची पडताळणी केली जाईल, पडताळणी नंतर मग तुमच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होईल. जर यामध्ये कोणी दोषी आढळल तर त्यावर कारवाई होईल.

7 th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! DA मध्ये होणार इतके टक्के वाढ

7 th Pay Commission

7 th Pay Commission | जे लोक सरकारी नोकरी करतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते. ती गोष्ट आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. कारण पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्यात वाढ होण्याची घोषणा होऊ शकते. तसेच त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी देखील मिळू शकते.

डीएमध्ये किती वाढ होणार | 7 th Pay Commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबद्दल अजून कोणत्याही प्रकारची घोषणा केली नाही. परंतु दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकार वर्षातून दोन वेळा जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ताची सुधारित माहिती देत असते
त्यामुळे हा महागाई भत्ता येत्या एक महिन्यात कधीही जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी या महागाई भत्ताच्या वाढीची वाट पाहत होते. परंतु त्यांना हा महागाई भत्ता लवकरच मिळणार आहे. यावेळी केंद्र सरकार महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढ करू शकत असल्याची देखील चर्चा होत आहे. यावर्षी जर महागाई भात्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तीन टक्क्यांनी वाढ केली, तर हा महागाई भत्ता 53 टक्क्यांवर पोहोचेल. या गोष्टीला सध्या उशीर होत आहे
परंतु लवकरच सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

पगार वाढ किती होणार ? | 7 th Pay Commission

सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये जर केंद्रीय 3 टक्क्यांनी वाढ केली, तर त्यांचा डीए 53 टक्क्यांवर पोहोचेल समजा जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे मुख्य वेतन हे 30 हजार रुपये असेल. तर सध्या 50% डीएनुसार त्याला 15000 रुपये महागाई भत्ता मिळतो. परंतु जर हा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढला, तर त्याच्या पगारातील डीए हा 16900 रुपयांनी वाढेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दर महिन्याला एकूण 900 रुपयांची वाढ होईल आणि कर्मचाऱ्यांचे इतर भत्ते देखील वाढणार आहे. आणि त्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सध्या अनेक केंद्रीय कर्मचारी आहे. त्यांच्या महागाई भत्ता वाढण्याची वाट पाहत आहेत.

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकऱ्यांची कमतरता; रोजगार वाढीच्या दरात मोठी घसरण

Job Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करावी आणि चांगले आयुष्य जगावे. अशी अनेक लोकांची इच्छा असते आणि त्यासाठी प्रयत्न देखील करत असतात. परंतु आता देशातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवरच वाईट वेळ आलेली आहे. कारण रोजगार निर्मितीचा वेग सध्या मोठ्या प्रमाणात मंदावलेला दिसत आहे. त्यामुळे आता बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda कॉर्पोरेट क्षेत्रातील रोजगारवाढ बाबतची आकडेवारी देखील जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात कार्परीक्षेत्रातील रोजगार निर्मितीचा वाढीचा दर हा 4.2% ने कमी झालेला आहे. त्यामुळे जे लोक काम करतात त्यांचीच नोकरी धोक्यात आलेली आहे. त्यामुळे इतर लोकांना काम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

बँक ऑफ बडोदाने कॉर्पोरेट रोजगार निर्मितीबाबत आकडेवारी जाहीर केलेली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2021- 22 या आर्थिक वर्षानुसार 1196 कंपन्यांमध्ये तब्बल 58 लाख 27 हजार 272 कर्मचारी होते. परंतु 2022- 23 मध्ये ही संख्या 61 लाख 60 हजार 968 पर्यंत वाढली. म्हणजे या एका वर्षाच्या दरम्यान 33 हजार 696 लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यात परंतु 2023 आणि 24 आर्थिक वर्षात 1196 कंपन्यांनी फक्त 1.5. टक्के वाढीसह दुकानात रोजगार दिलेला आहे. त्यांनी केवळ 9840 नवीन लोकांना रोजगार दिलेला आहे. म्हणजेच 2023- 24 आर्थिक वर्षात एक लाखापेक्षा कमी लोकांना रोजगार दिलेला आहे.

375 कर्मचाऱ्यांमध्ये कर्मचार्‍यांची संख्या घट

बँक ऑफ बडोदाने सादर केलेल्या या आकडेवारीनुसार 1196 कंपन्यांमध्ये 700 अशा कंपन्या होत्या. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली होती. परंतु उरलेल्या 121 कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संकेत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. त्याचप्रमाणे 375 अशा कंपन्या आहे. ज्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत देखील घट केलेली आहे.

बँक ऑफ बडोदाने दिलेल्या अहवालात असे म्हटलेले आहे की, 2023-24 आर्थिक वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहे. यावर्षीचा जीडीपी वाढीचा दर हा 8.2% असा आहे 2021 आणि 22 या आर्थिक वर्षांमध्ये जीडीपीची वाढ ही 9.7 टक्के एवढी होती. तर 2022 आणि 23 आर्थिक वर्षात जीडीपी वाढली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जीडीपीमध्ये वाढ झालेला असला, तरी रोजगारात मात्र वाढ झालेली नाही. कारण आजकाल अनेक कंपन्यांची विक्री संख्या कमी झालेली आहे. तसेच जगभरात आर्थिक मंदी पसरण्याची भीती आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यात असलेल्या रोजगारांची संख्या कमी केलेली आहे. तर काही कंपन्यांनी भरती प्रक्रिया कमी केलेली आहे.

कोणत्या क्षेत्रात किती रोजगार

आयटी क्षेत्रामध्ये सध्या 25% एवढा रोजगार आहे. तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये 22 टक्के रोजगार उपलब्ध आहेत. किरकोळ बाजारात 19.4% रोजगार आहे. तर व्यापारामध्ये 16.2% एवढा रोजगार संधी आहे. तसेच 15.8% एवढी रोजगाराची संधी आहे.

खुशखबर ! कोल्हापूरला मिळणार 100 इलेक्ट्रिक बसेस

राज्यातल्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा होत असून आता रस्त्यावर इलेक्ट्रिक बसेस धावताना पाहायला मिळत आहेत. आरामदायी आणि जलद प्रवासामुळे या बसेसना प्रवाशांची चांगली पसंती देखील मिळत आहे. कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर असून, आता कोल्हापुरात देखील शंभर इलेक्ट्रिक बसेस धावण्याच्या तयारीत आहेत चला याबद्दल जाणून घेऊया …

9 कोटी रुपयांची मंजुरी

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजी नगर मध्ये ई बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या 100 बसेस मिळणार आहेत. याची पूर्वतयारी म्हणून चार्जिंग स्टेशन्स उभारले जात आहेत. राज्य सरकारने त्यासाठी 9 कोटी 86 लाख 96 हजार 637 रुपये मंजूर केल्याची माहिती आहे.

कुठे होणार चार्जिंग स्टेशन?

कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील एसटी कॉलनी आवारात ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र डेपो आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली आहे. चार्जिंग पॉइंट साठी 11,22 व 33 केव्ही क्षमतेचे उच्च दाबाची वीज जोडणी आवश्यक असते. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस तीनशे किलोमीटरचा टप्पा गाठते.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील 10 एसटी स्थानकांमध्ये 50 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांची या इलेक्ट्रिक बसेसला पसंती देखील मिळत आहे. याबाबत माहिती देताना विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितलं की, ई बसेस मिळाव्यात ही आपली खूप दिवसांपासून मागणी आहे 100 बसेस कोल्हापूरला मिळणार आहेत. या बसेसच्या चार्जिंग साठी ताराबाई पार्क इथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये शंभर बसेसच्या चार्जिंगचा नियोजन करण्यात येणार आहे.

Kokan Railway Bharti 2024 | कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Kokan Railway Bharti 2024

Kokan Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्यामुळे आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि त्यांना चांगली नोकरी देखील मिळालेली आहे. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची भन्नाट संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता तीच इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता भारतीय रेल्वे विभागातून विविध रिक्त पदांच्या जागा निघालेल्या आहेत. खास करून भारतीय रेल्वेच्या कोकण रेल्वे विभागकडून (Kokan Railway Bharti 2024) ही भरती निघालेली आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची खास संधी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा. आता ही भरती या भरतीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Kokan Railway Bharti 2024

या भारतीय अंतर्गत सीनियर सेक्शन, इंजीनियरिंग, स्टेशन मास्टर, कमर्शियल, सुपरवायझर, गुड्स ट्रेन मॅनेजर आणि टेक्निशियन मेकॅनिकल, टेक्निशियन III, इलेक्ट्रिकल असिस्टंट, लोको पायलट पॉईंट्स, ट्रॅक मॅनेजमेंट या पदांच्या रिक्त जागा आहेत.

रिक्त पदांची संख्या

भारतीय रेल्वे भरती अंतर्गत तब्बल 190 रिक्त जागा आहेत
आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कमीत कमी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर बारावी फिजिक्स आणि गणित या विषयात उत्तीर्ण असण्यासोबत इंजीनियरिंगमधील विविध विषयात पदवी असणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 39 दरम्यान असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एससी, एसटी उमेदवारांना वयात 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीचे अर्ज प्रक्रिया 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 6 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदर अर्ज करायचा आहे.

दरमहा वेतन | Kokan Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत उमेदवाराशी निवड झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिन्याला 18000 ते 44 हजार दरम्यान पगार मिळणार आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा