Monday, December 22, 2025
Home Blog Page 561

Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्रातही मुंबईचा दबदबा ! एका महिन्यात 12 हजार मालमत्तांची विक्री

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करता. इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देताना दिसत आहेत. कारण या क्षेत्रातील गुंतवणूक ही चांगला परतावा देणारी गुंतवणूक समजली जाते.

महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचे झाल्यास मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांमध्ये गुंतवणूक मागच्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये केवळ एका जुलै महिन्यात १२ हजार १२९ मालमत्तांची विक्री झाल्याची आकडेवारी आता समोर आली आहे. एवढेच नव्हे तर यातून सरकारला १०४७ कोटींचा महसूल मिळाला आहे. नाईट फ्रॅंक याच्या सर्वेक्षण अहवालातून ही माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया या (Real Estate) अहवालाबाबत …

काय सांगतो अहवाल ? (Real Estate)

नाईट फ्रॅंक ने दिलेला अहवाल हा जानेवारी ते जुलै दरम्यानचा आहे. यामध्ये या काळात मुंबईमध्ये तब्बल 84,653 मालमत्तांची विक्री झाली आहे. याद्वारे राज्य सरकारला 6,929 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर गेल्या वर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या (Real Estate) तुलनेत ही वाढ 16% इतकी झाल्याचे या अहवालामध्ये म्हंटले आहे

मुंबईतल्या ‘या’ भागाला पसंती (Real Estate)

आता आपण पाहूयात की क्षेत्रफळानुसार विक्रीचे प्रमाण किती आहे? तर जुलै महिन्यात 500 चौरस स्क्वेअर फुट ते एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतले प्रमाण हे 49 टक्के इतके आहे. तर 500 चौरस फुटांपर्यंतच्या फ्लॅटचे एकूण विक्रीतील प्रमाण हे 38% इतके आहे. घर खरेदीसाठी ग्राहकांची पसंती ही प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व उपनगराला मिळाल्याचे दिसून येत आहे. (Real Estate) तेथील विक्रीचे प्रमाण हे 73% इतके मोठे आहे. मध्य मुंबईतील घरांच्या विक्रीतही वाढ होताना दिसत असून या विक्रीचा गेल्या जुलै महिन्यातील विक्रीच्या तुलनेत 41 टक्के इतकं प्रमाण अधिक आहे

मागच्या वर्षीची आणि यावर्षीच्या विक्रीची तुलना केली असता गेल्यावर्षी जुलैमध्ये मुंबईत एकूण दहा हजार 221 मालमत्तांची विक्री झाली होती. त्याच्या तुलनेत यावर्षी विक्रीमध्ये 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून जून 2024 मध्ये मुंबईमध्ये 11,673 मालमत्तांची (Real Estate) विक्री झाली आहे.

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास!! ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Swapnil Kusale Bronze Medal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने नवा इतिहास रचला आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. मराठमोळ्या खेळाडूनें आपल्या देदीप्यमान कामगिरीच्या जोरावर सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकावला आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक मिळवून देणारा स्वप्नील महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला पदक मिळवून दिले होते. त्यानंतर आता तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या खेळाडूने देशाला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे.

50 मीटर रायफल थ्री पोजीशन स्पर्धेत स्वप्नीलने (Swapnil Kusale) एकुण 451.4 गुण प्राप्त केले. या खेळात चीनच्या लिऊ युकुनने 463.6 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकलं तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं. स्वप्नीलपूर्वी मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांनी भारताला पदक मिळवून दिले होते. स्वप्नील कुसळेने मंगळवारी झालेल्या क्वालिफायर फेरीत 50 मीटर रायफल 3 पोझिशन नेमबाजीत एकूण 590 गुण मिळवून फायनलमध्ये धडक मारली होती. त्याने गुडघे 198, प्रोनमध्ये 197 आणि उभे राहून 195 गुण मिळवले. आता त्याने कांस्यपदक मिळवत भारताचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

कोण आहे स्वप्निल कुसाळे? Swapnil Kusale

स्वप्निल कुसाळे हा कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील खेळाडू आहे. 6 ऑगस्ट 1995 रोजी त्याचा जन्म झाला . 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथूनच त्याचा क्रीडा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. सुरुवातीच्या काळात त्याने नेमबाजीतील आपले कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले. तुम्हाला माहिती नसेल तर स्वप्नील हा 2015 पासून मध्य रेल्वेत काम करतो. ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी हा तिकीट कलेक्टर होता, त्याचप्रमाणे स्वप्नील सुद्धा रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. दोघांमध्ये हा खास योगायोग आहे.

Gold Price Today : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव वाढला!! आजच्या किमती इथे चेक करा

Gold Price Today 1 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदीदारांसाठी मोठी निराशाजनक बातमी आहे. आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 69602 रुपयावर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोनं 519 रुपयांनी महागले आहे तर चांदीच्या दरात सुद्धा ५१९ रुपयांनी वाढ झाली असून सध्या एक किलो चांदी 84170 रुपयांवर व्यवहार करत आहे. मागील २-३ दिवसात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांना मोठा झटका मानला जातोय. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६९५५३ रुपयांपासून (Gold Price Today) सुरु झाला. मात्र थोड्याच वेळात सोन्याचा भाव घसरून ६८४७५ रुपये झाला. त्यानंतर मात्र सोन्याच्या किमती या वाढतच गेल्या. ११ वाजून १० मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याने ६९६०९ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या सोन्याचा भाव 69602 रुपयांवर व्यवहार करत आहे. गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर ६४५०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ७०३६० रुपये तोळा आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 64,500 रुपये
मुंबई – 64,500 रुपये
नागपूर – 64,500 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 70,360 रूपये
मुंबई – 70,360 रूपये
नागपूर – 70,360 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Mumbai Mhada : PM आवास योजनेतील घरांच्या किंमतीत वाढ ; मात्र ‘या’ सोसायट्यांना म्हाडा कडून बगल ?

Mumbai Mhada : मुंबईत सध्याच्या घडीला घर घेणे म्हणजे खूप जोखमीचे झाले आहे. कारण मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत मुंबईत घर घेणाऱ्यांकरिता आशेचा किरण म्हणजे म्हाडाची सोडत. म्हाडामधून कमी किमतीत घरं उपलब्ध करून दिली जातात. यावर्षीची मुंबई येथील सोडत अवघ्या काही दिवसांत निघण्याची शक्यता आहे. ही सोडत दोन हजार घरांसाठी असेल असे सांगण्यात येत आहे. मात्र कमी किमतीतल्या घरांच्या ऐवजी म्हाडाची घरे महागली आहेत का ? शिवाय कमी उत्पन्न असलेल्या घरांच्या किंमतीत वाढ आणि पॉश घरांच्या किंमती मात्र जैसे थे असल्याचा (Mumbai Mhada) असा सवाल ‘सामना’ मधून उपस्थित करण्यात आलाय…

यंदाच्या म्हाडाच्या लॉटरी मध्ये मागील लॉटरी मधील शिल्लक घरांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील शिल्लक घरांच्या किमती यंदा सव्वा चार लाख रुपयांनी मागणार आहेत. तर कन्नमवार नगर मधील अत्यल्प गटाच्या घरांसाठी देखील लाखभर रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जुहू आणि ताडदेव मधील पॉश घरांच्या किमती गतवर्षी एवढीच (Mumbai Mhada) असल्याची माहिती सूत्राने दिली असल्याचा वृत्तपत्रातून मध्ये म्हंटले आहे.

यावर्षी ‘या’ भागातील घरांचा समावेश (Mumbai Mhada)

मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाला मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश होता यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हाडा तर्फे गोरेगाव, विक्रोळी, पवई, ताडदेव, जुहू येथील दोन हजार घरांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. गतवर्षीच्या लॉटरीतील शिल्लक घरांचा म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरांचाही या लॉटरीमध्ये समावेश (Mumbai Mhada) असणार आहे.

घरांच्या किंमतीत वाढ का? (Mumbai Mhada)

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हाडाच्या किमतीबद्दल वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी गुंतवलेल्या भाग भांडवला वरील व्याजांमुळे गतवर्षीच्या लॉटरीच्या तुलनेत यंदाच्या लॉटरी शिल्लक करांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील जवळपास 88 घर शिल्लक आहेत. मागील वर्षी या घरांची किंमत 30 लाख 44 हजार रुपये होती तर आता या घरांची किंमत अंदाज 34 लाख 70 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर उत्पन्नाची मर्यादा देखील आता तीन लाखांवरून सहा लाख रुपये केले आहे.
विक्रोळी आणि कन्नमवार नगर मधील 34 लाख 74 हजार रुपयांच्या घरांसाठी यंदा अंदाजे 35 लाख 82 हजार रुपये आकारले जाणार (Mumbai Mhada) असल्याचे बोलले जात आहे.

पॉश घरांच्या किमती मात्र जैसे थे ? (Mumbai Mhada)

मात्र दुसऱ्या बाजूला ताडदेवच्या क्रिसेंट टॉवर आणि जुहूच्या विक्रांत सोसायटीतील आलिशान घराच्या किमती म्हाडा ने तशाच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी क्रिसेंट टॉवर मधील घरांसाठी सात कोटी 57 लाख आणि विक्रांत सोसायटीमधील घरासाठी चार कोटी 87 लाख रुपये किमती असणार आहेत. मग एकीकडे आवास योजनेतील घरांसाठी किमती वाढवण्यात येतात आणि दुसरीकडे पॉश आणि श्रीमंतांच्या घरांच्या किमतीमध्ये वाढ नाही. असा फरक का ? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

पुणे शहरात ‘या’ 6 विधानसभा मतदारसंघाचा निकाल असा लागतोय

Pune Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ (Pune Vidhan Sabha) … इथे जाळ अन् धूर संगटच निघताना दिसतो… याच पुण्यात कसब्याचा बालेकिल्ला फोडण्याची किमया रवींद्र धंगेकरांनी केली…. चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून येऊन इथं बस्तान बांधलं… तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली… लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार होत भाजपला पुन्हा एकदा शहरात पॉलिटिकल स्कोप मिळवून दिला… जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून मोहोळांना पर्यायाने भाजपला लीड आहे… पण लोकसभेचं कट टू कट गणित विधानसभेलाही पाहायला मिळेल का? पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट बोर्ड ते कसब्यासारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघात यंदा आमदारकीला कोण गुलाल उधळतय? पुणे शहरातील ६ विधानसभा मतदारसंघातील चालू राजकारणाचा आणि संभाव्य आमदारांचा हा इंडेप्थ आढावा…

पुणे शहराचा आढावा घेताना सर्वात पहिला विचार करावा लागतो तो कोथरूड विधानसभेचा… 2014 ला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली… भाजपच्या बाजूने वारं होतच… तेव्हा मेधा कुलकर्णी त्यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत कोथरूड मध्ये फक्त भाजपच! हे जणू ठासून सांगितलं… नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्याने स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्याने कुलकर्णी नाराज झाल्या होत्या… 2019 ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी झुंज दिली… निवडणूक झाली… निकाल लागला… चंद्रकांत पाटील जिंकले देखील… पण लीड होतं अवघं 25 हजारांचं…पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके आहे… मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यानं पारंपारिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आला… म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं 74 हजार मतांची मोठी आघाडी दिली… हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत… बाकी चंद्रकांत मोकाटे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत … मात्र चंद्रकांत पाटलांसोबत यंदा खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही ताकद लागल्यानं भाजपच इथे सध्या तरी प्लस मध्ये दिसतेय…

दुसरा विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगरचा…युतीचा हा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.. 2019 ला भाजपने इथे पहिल्यांदाच सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली… पण अवघ्या 5000 च्या तूटपुंज्या लीडनं त्यांचा विजय झाला… नंतर भाजप आणि शिरोळ यांनी मतदारसंघावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी पाच वर्षात बरीच कामे केली आहेत… स्वतः आमदार साहेब शिरोळे यांनी मोहोळांच्या पाठीशी निर्णायक लीड देईल, असं बोलून दाखवलं होतं… पण त्यांना मिळालं अवघं 4 हजारांचं मताधिक्य… थोडक्यात सिद्धार्थ शिरोळे यांची शिवाजीनगरची आमदारकी धोक्यात आहे… काँग्रेसकडून शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट हे येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहेत.. दलित – मुस्लिम आणि काँग्रेसचा पारंपारिक वोटर हा यंदा काँग्रेसच्या पाठीशी असल्याने आणि त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मारक ठरणार नसल्याने मतदार संघातून काँग्रेसला विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

तिसरा मतदारसंघ येतो तो पर्वतीचा…2009 ला या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच भाजपने इथं आपला दबदबा कायम ठेवला… भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वतीच्या मतदारांनी डोळेझाक विश्वास ठेवला… म्हणूनच सलग तीन टर्म निवडून येण्याचा… आमदारकीची हॅट्रिक करण्याचा… बहुमान त्यांना मिळाला… सलग तीन टर्म निवडून आल्यामुळे त्यांचा मतदारसंघावर चांगला होल्ड आहे, मार्केट यार्ड शांतीनगर , बिबवेवाडी सिटी प्राईड स्वारगेट हा मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय मतदार हा नेहमी भाजपच्या बाजूने राहिलाय… एकट्या पर्वती विधानसभेतून 27 पैकी तब्बल 23 नगरसेवक एकदा भाजपचे आहेत… पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नसतो, अशी ओरड नेहमीच मतदार संघातून होत असते…. त्यातही झोपडपट्टी पुनर्वसन, सिंहगड रस्त्यावरील कोंडी, पर्वती – तळजाई, जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत प्रश्न जसेच्या तसे आहेत.. मात्र असं असूनही लोकसभेला मोहोळांना मिळालेलं तीस हजारांचे लीड पाहता भाजपचा उमेदवार सेफ झोनमध्ये आहे… फक्त श्रीनाथ भिमाले यांनी भाजपामध्येच उमेदवारीसाठी थोपटलेले दंड पाहता इथे बंडखोरीची दाट शक्यता आहे… महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी लढत देत आलीये… पण काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहेत… त्यामुळे पर्वतीत यंदा इंटरेस्टिंग निकाल पाहायला मिळू शकतो…

चौथा मतदारसंघ येतो तो कसब्याचा…भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावून विजय मिळवल्याने रवींद्र धंगेकर आणि कसबा विधानसभा ही दोन्ही नाव उभ्या महाराष्ट्राला माहीत झाली… त्यानंतर धंगेकरांनी लोकसभा निवडणुकीतही अपयशी का होईना, पण कडवी झुंज दिल्याने आणि नंतरच्या पोर्शे कार पासून ससून पर्यंत आवाज उठवल्याने… आणि मतदार संघात अनेक कामं मार्गी लावल्याने मविआकडून तेच उमेदवार असतील… दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र भाजपमध्येच तिघांनी उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.. टिळक यांचे चिरंजीव कुणाल हे स्पर्धेत उतरले आहेत. त्यातच गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यादेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. हेमंत रासने यांनीही पुन्हा उमेदवारी मिळेल, या आशेने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामुळे कसबा पेठ जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याआधी भाजपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे, एवढं नक्की… पण सध्या तरी धंगेकर येथे प्लस मध्ये दिसतायत…

पाचवा मतदारसंघ येतो तो पुणे कॅन्टोन्मेंट…सध्या भाजपचे सुनील कांबळे हे इथले विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि एका महिलेशी फोनवर अर्वाच्य भाषेत बोलल्याची त्यांची क्लिपमुळे ते अडचणीत सापडले होते. पण नगरसेवक पदाच्या काळात केलेल्या कामांमुळे शहरातील समस्यांची जाण असलेला नेता म्हणून कांबळे यांची ओळख आहे. शिवाय महायुती सरकारच्या काळात मिळालेल्या निधीमुळे मतदारसंघात त्यांनी बरीचशी कामंही केलेली आहेत. बाकी त्यांच्या विरोधात रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजत आहे. शिवसेनेतर्फे अमोल देवळेकर या मतदारसंघातून निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यंदाच्या लोकसभेला काँग्रेस उमेदवाराला इथून १३ हजार २५० मतं जास्त मिळाली होती. काँग्रेस उमेदवाराला मिळालेली ही वाढीव मतं भाजपसाठी धोक्याची ठरू शकतात. मविआघाडीतील मित्रपक्षांची योग्य ती मदत मिळाली तर याठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव करणं तुलनेनं सोपं आहे. अन्यथा भाजप उमेदवार इथून विजयाची हॅट्ट्रिक करू शकतो…

आता पाहूयात शेवटचा सहावा मतदारसंघ तो वडगाव शेरीचा…पोरशे कार प्रकरणात फ्रंट आलेले सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार… राष्ट्रवादीच्या फुटीत ते अजित दादांसोबत गेल्याने सध्या त्यांच्या विरोधात अनेक इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे…त्यात भाजपकडूनच माजी आमदार जगदीश मुळीक, बापू पठारे, माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे हे उमेदवारीसाठी अडून बसलेत.. यांपैकी एखाद्या नाराज उमेदवाराला हाताशी धरून शरद पवार इथून राष्ट्रवादीची तुतारी जिंकण्यासाठी फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे… पण सध्या तरी या मतदारसंघात दोन्ही बाजूला निवडणूक जिंकण्यासाठी फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत…तर अशी आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळणारा संभाव्य सहा आमदारांचा सविस्तर आढावा… बाकी या हा सहा मतदार संघात कोण आणि कुठल्या पक्षाकडून आमदारकीचा गुलाल उधळेल? आणि कुठल्या विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसेल? याबाबत तुमचे प्रेडिक्शन काय? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…

Loan Waiver For Farmers : शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? सरकारकडून हालचाली सुरु

Loan Waiver For Farmers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला दर महिन्याला १५०० रुपयांची भेट देऊन शिंदे सरकारने महिलावर्गाला आकर्षित केलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचं कर्ज माफ (Loan Waiver For Farmers) करून राज्यातील बळीराजाला खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरु असून जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमध्ये शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न- Loan Waiver For Farmers

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला दणका बसला होता. शेतकऱ्यांचे प्रश्न, कांद्याचे प्रश्न आदी कारणांमुळे सरकारला बळीराजाच्या रोषाला सामोरे जावं लागलं होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा फटका बसू नये यासाठी शेतकऱ्यांना खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून जवळपास 938 आदिवासी सोसाट्यांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं बोलले जातंय. सरकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून यासंदर्भात हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. जर कर्जमाफीची घोषणा झाली तर शेतकऱ्यांसाठी हि मोठी आनंदाची बाब असेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल (Loan Waiver For Farmers) एक वक्तव्य केले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही सरकारकडे विनंती केली आहे. केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार काही वाटा उचलून 3 लाख रुपयांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शकतं का, याची माहिती सरकार गोळा करत आहे. सरकार याबद्दल सहानुभूतीपूर्वक आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे आता खरंच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी मागच्या महीनाभरातच मोफत वीज योजना, कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. आता थेट शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यास शिंदे सरकारचा हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक ठरेल असं म्हंटल जातंय.

BCCI आणि संघ मालकांच्या बैठकीत शाहरुख खान -नेस वाडियामध्ये खडाजंगी; पहा काय होता मुद्दा?

Shahrukh Khan Ness Wadia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 च्या पार्श्वभूमीवर मुंबईत BCCI आणि IPL संघ मालकांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मेगा लिलाव आणि प्लेअर रिटेंशनचं प्रमाण याबाबत चर्चा झाली. मात्र याचवेळी कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया (Ness Wadia) यांच्या वादावादी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव करू नये असं शाहरुखच मत होते तर नेस वाडिया हे मात्र मेगा लिलावासाठी तयार होते. याचवरुन दोघांमध्ये वाद पाहायला मिळाला.

याबाबत क्रिकबझने एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की शाहरुख खान हा मेगा लिलाव आयोजित करण्याच्या बाजूने अजिबात नाही. 2025 च्या आयपीएल हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नको असं शाहरुखचं म्हणणं होतं. म्हणजेच काय तर प्लेअर रिटेंशनचं प्रमाण अधिक ठेवून लिलावावर कमी भर दिला पाहिजे असं असं शाहरुख खानचे मत होते तर दुसरीकडे नेस वाडिया यांचं मात्र म्हणणं वेगळंच होते. जास्तीत जास्त खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देऊ नये. मर्यादित संख्येमध्येच खेळाडू रिटेन झाले पाहिजेत आणि मेगा लिलावात जास्तीत जास्त खेळाडू उतरले पाहिजेत असं नेस वाडिया यांचं म्हणणं होतं. याच मुद्द्यावरून शाहरुख खान आणि नेस वाडिया यांच्या बाचाबाची झाल्याचेही समजते.

आता BCCI च्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. खेळाडूंचा मेगा लिलाव करायचा की नाही यावर एकमत होऊन किती खेळाडूंना कायम ठेवायचे हे ठरवले जाईल. बीसीसीआयने जर मेगा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला तर मग रिटेंशनची गरज भासणार नाही. या बैठकीनंतर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांनी सांगितले की ते मेगा लिलावाच्या समर्थनात आहेत. तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिने मात्र शाहरुख खानच्या सुरात सूर मिसळत मेगा लिलावाला विरोध केला आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित ?

BCCI सोबतच्या या या बैठकीत दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, चेन्नई सुपर किंग्जचे रूपा गुरुनाथ, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रथमेश मिश्रा आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले हे देखील उपस्थित होते. या व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी हे ऑनलाईन माध्यमातून या बैठकीला उपस्थित होते.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचल प्रदेशात ढगफुटी!! 19 लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले

Himachal Pradesh Cloudburst

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. २ दिवसांपूर्वी केरळमधील वायनाड येथे भुस्कलन होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. ती घटना अजूनही ताजी असताना आता हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी (Himachal Pradesh Cloudburst) झाल्याची घटना समोर येत आहे. या पावसामुळे अचानक पूर आला आणि सुमारे 19 लोक या पाण्यात वाहून गेल्यास सांगितलं जातंय. त्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह सापडला- Himachal Pradesh Cloudburst

कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील 19 लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. तर 20 पेक्षा जास्त घरे जमीनदोस्त होऊन गाडली गेली आहेत. अनेक वाहने सुद्धा या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह सापडला आहे, तर नऊ जण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने हवाई दलाला बचावासाठी सतर्क केले आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतले आहेत. थलतुखोडमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. याबाबत रामपूरचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच तातडीने एसडीआरएफची टीम रवाना करण्यात आली आहे. तसेच पोलीस, रेस्क्यू टीम देखील पोहोचली आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ढगफुटीमध्ये १९ लोक बेपत्ता झाले आहेत.

ढगफुटीमुळे (Himachal Pradesh Cloudburst) हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू जिल्ह्यातील रामपूरला लागून असलेल्या १५-२० भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराभोवती ढगफुटीमुळे कुरपण, समेळ आणि गणवी नाल्यांना महापूर आला आहे. शिमला जिल्ह्यातील गणवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये नाले ओसंडून वाहत असल्याने उध्वस्त झाली आहे. याठिकाणी मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. तसेच रस्ते देखील उखडले गेले आहेत. एकूणच काय तर हिमाचल प्रदेशात सध्या पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार? महाराष्ट्राची सूत्रे कोणाकडे?

Devendra Fadnavis BJP National President

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र भाजपचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे आता आपल्याला दिल्लीच्या राजकारणात पाहायला मिळू शकतात. फडणवीस यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येईल अशा चर्चा सुरु आहेत. पक्षाच्या हायकमांडने भाजपच्या राष्ट्रीय (BJP National President) अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची बातमी दिली आहे. फडणवीस दिल्लीला गेल्यावर विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा देण्यात येईल असेही बोललं जातंय.

संघाचाही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा- Devendra Fadnavis

काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत नीती आयोगाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पक्षाच्या मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर मोदींनी फडणवीस यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली, यानंतरच फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा चर्चाना उधाण आलं आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांचा पक्षाध्यक्षपदाचा कार्यकाळ काही आठवड्यांपूर्वीच संपुष्टात आला असून त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरु आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रेसर आहे. फडणवीस यांचा कामाचा आवाक, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री म्हणून उत्तमपणे सांभाळलेली जबाबदारी, यामुळे फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठिंबा आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झालं आहे. फडणवीस येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नवी दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र येत्या ३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत त्यामुळे विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत फडणवीस महाराष्ट्रातच राहावे आणि नंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घ्यावी असाही एक मतप्रवाह भाजपमध्ये आहे. परंत्तू, सध्याची दिल्लीतील गरज पाहता फडणवीस हे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच दिल्लीला जाऊ शकतात. फडणवीस दिल्लीच्या राजकारणात गेल्यास महाराष्ट्र भाजपची धुरा विनोद तावडे यांच्या खांद्यावर जाण्याची शक्यता आहे मात्र याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

LPG Price Hike : LPG गॅस सिलेंडर महागला!! सर्वसामान्यांच्या खिशाला झळ

LPG Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गॅस सिलेंडरच्या किमती महाग (LPG Price Hike) झाल्या आहेत. तेल विपणन पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र हि दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने आयात हॉटेल मधील जेवण महाग होण्याची शक्यता आहे. केंद्राचा अर्थसंकल्प पार पडल्यानंतरनंतर १० दिवसातच सर्वसामान्य जनेतला बसलेला हा पहिला झटका आहे.

कसे आहेत नवे दर – LPG Price Hike

IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1646 रुपयांवरून 1652.50 रुपये झाली आहे. म्हणजेच दिल्लीत प्रति सिलिंडरच्या किमती 6.50 रुपयांनी वाढल्या (LPG Price Hike) आहे. तर दुसरीकडे मुंबईतही सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून 1598 रुपयांचा सिलेंडर आता 1605 रुपयांना खरेदी करावा लागणार आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत 8.50 रुपयांनी वाढली असून त्याठिकाणी 1756 रुपयांना मिळणार सिलेंडर आता 1764.5 रुपयांना खरेदी करावा लागेल. तर चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८०९.५० रुपयांवरून १८१७ रुपयांपर्यंत वाढली आहे.

खरं तर जुलैमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली होती. 1 जुलै रोजी दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी झाली होती, ज्यामुळे त्याची किंमत 1676 रुपयांवरून 1646 रुपयांवर आली होती. मात्र आता पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आल्याने हॉटेल चालकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिकाला थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे. तर मुंबईत 802.50 रुपये,कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे.