महाराष्ट्रातील ‘या’ 5 खासदारांना मंत्रीपदासाठी फोन; पहा कोणाकोणाची वर्णी लागली??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत NDA ला २९१ जागांसह बहुमत मिळाल असं नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची वर्णी लागली असून सकाळपासूनच पंतप्रधान कार्यालयातून खासदारांचे फोन खणखणत आहेत. यामध्ये भाजपसह शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश असून आरपीआयचे रामदास आठवले यांचीही मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

भाजपकडून नितीन गडकरी, पियुष गोयल आणि रक्षा खडसे याना पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेत. गडकरी आणि पियुष गोयल यांनी यापूर्वी सुद्धा मंत्रिपद भूषवलं आहे तर रक्षा खडसे यांची पहिलीच वेळ असेल. तर शिंदे गटाकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव याना PMO कार्यालयातून फोन आला. एव्हडच नव्हे तर रामदास आठवेल यांनाही मंत्रिपदासाठी फोन आला आहे. दुसरीकडे, प्रफुल्ल पटेल यांनाही मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरु आहे मात्र अद्याप त्यांना मंत्रिपदासाठी कोणताही कॉल आला नसल्याचे समोर आलं आहे.

आतापर्यंत कोणाकोणाला फोन आले?

राजनाथ सिंह (भाजप)
पियुष गोयल (भाजप)
एचडी कुमारस्वामी (जेडीएस)
जयंत चौधरी (RLD)
जीतन राम मांझी (HAM)
डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (टीडीपी)
अर्जुन राम मेघवाल (भाजप)
अमित शहा (भाजप)
नितीन गडकरी (भाजप)
किंजरापू राम मोहन नायडू (टीडीपी)
सर्बानंद सोनोवाल (भाजप)
ज्योतिरादित्य सिंधिया (भाजप)
चिराग पासवान (लोजप-आर)
अनुप्रिया पटेल (अपना दल)