मध्यरात्री आलेल्या “त्या” फोनमुळे पृथ्वीराज चव्हाणांचे आयुष्यच बदलून टाकले | वाढदिवस विशेष

हॅलो विधानसभा | पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव एक आदर्श व कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नेहमीच घेतलं जातं. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री अशी चव्हाण यांची ख्याती आहे. मुख्यमंत्री पदावर असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीच आपल्या जवळच्या लोकांच्या फाईली माणुस आपल्या गटातला आहे म्हणुन सह्या करुन पुढे पाठवण्याचं काम केलं नाही. पदाचा गैरवापर स्वत; केला नाही आणि सहकार्यांनाही करु दिला नाही. यामुळे त्यांची जनसामान्यात आजही एक वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्याच पक्षातील, मित्र पक्षांतील लोकांनी त्यांच्यावर कुरखोड्या करण्याचा प्रयत्न केला, त्यांना अकार्यक्षम ठरवलं पण तरी चव्हाण यांनी आपल्या निर्णयांतून आपल्या कामाची छाप पाडली. ते कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. आजच्या घडीला ताटातली भाजी बदलावी त्याप्रमाणे पक्ष बदलण्याचं सत्र सुरु असणार्‍या काळात पृथ्वीराज चव्हाणांसारखा सच्चा माणुस कसा काय बरं राजकारणात पडला असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचं झालं असं… Prithviraj Chavan Education

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म १७ मार्च १९४७ चा. वडील आनंदराव चव्हाण पंडीत नेहरुंचे सहकारी आणि ११ वर्ष केंद्रात मंत्री. पुढे आई देखील खासदार. मात्र तरुण पृथ्वीराजचं मन काही राजकारणात नव्हतं. त्या काळात चव्हाण यांनी बी.ई. (आॅनर्स) चे शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या केलिफोर्निया विद्यापिठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. आणि अभियंता म्हणुन एका मोठ्या संस्थेत नोकरी सुरु केली. भाषांच्या संगणकीकरणाविषयी चव्हाण यांनी संशोधन केलं. हे सगळं सुरु असताना १९९१ साली एकदिवस मध्यरात्रीच्या २ वाजता त्यांचा फोन खणानला. त्याकाळी काँग्रेस हायकमांडच्या एका फोनने देशाची राजकीय गणितं बदलायची. पृथ्वीराज चव्हाण यांना आलेला फोन दिल्लीवरुनच होता. राजीव गांधी बोलत होते. “पृथ्वीराज आपको कराडसे लोकसभा चुनाव लढना है। अभी जल्द जा कर चुनाव का अर्ज दर्ज करो. आपका प्रचार करणे मै खूद आऊंगा।” असं राजीव गांधींनी तिकडून सांगितलं. राजीव गांधींकडे तेव्हा एक तरुन, तडफदार नेतृत्व म्हणुन पाहिलं जात होतं. त्यांना पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, अभ्यासू, आणि जनतेशी आस्था असणार्‍या नेत्यांची फळी बांधायची होती. त्याचसाठी त्यांनी चव्हाण यांची निवड केलेली. Prithviraj Chavan Education

हायकमांडचा फोन आल्यानं पृथ्वीराज चव्हाण पहाटेच पुण्याहून कराडला निघाले. उमेदवारी अर्ज भरण्याचा तो शेवटचा दिवस होता. कसातरी गडबडीत त्यांनी अर्ज भरला. थोडा धोडका प्रचार केला. आणि ते खासदार म्हणुन निवडून आले. पुढे केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांनी जबाबदारीची कामं पाहीली. नंतर २०१० रोजी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मंध्यरात्री आलेल्या त्या एका फोनमूळे चव्हाण यांचे आयुष्यच बदलून टाकले. एक तरुण उच्चशिक्षित इंजिनिअर खासदार झाला. Prithviraj Chavan Education

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

उदयनराजे २ लाख मतांनी पडणार; पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी

उदयनराजे म्हणतात ‘स्टाईल इज स्टाईल’, कमिटमेंट कायम राहणार

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

Coronavirus : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, या’ गाड्या ३१ मार्चपर्यंत राहणार बंद

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण

 

पुढील सात दिवस सरकारी कार्यालये राहणार बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील सात दिवस सर्व सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कार्यालये एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आपत्कालिन सेवा वगळता राज्यातील … Read more

मदतीचं बक्षीस मिळालं का ? रंजन गोगोईंच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसींची टीका

मदतीचं बक्षीस मिळालं का ? असं म्हणत माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे

महाविकास आघाडीच्या स्थगितीचा राजापूर तालुक्याला फटका

रत्नागिरी प्रतिनिधी | जनसुविधा, नागरी सुविधा व यात्रास्थळ योजनेंतर्गंत मंजूर झालेल्या अनेक कामांना महाविकास आघाडीने स्थगिती दिली आहे. राजापूर तालुक्यातील वर्क ऑर्डर नसलेल्या पंचवीस कामांना याचा फटका बसला आहे. आघाडी सरकारच्या या निर्णयाबाबत जनतेत नाराजी वाढत आहे. २०१९-२० या वर्षामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा आणि यात्रास्थळ योजनेतून राजापूर तालुक्यातील ४६ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यासाठी शासनाकडून … Read more

शिवसेना नेत्याची हत्या झाल्यावर तरी सरकारला जाग येणार आहे का ? – सत्यजित तांबे

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे पाटील असे मृताचे नाव आहे. यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी … Read more

बाळासाहेब ठाकरेंनी असा अपमान कधीही सहन केला नसता : रामदास आठवले

नागपूर :- काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

भारतातील १४ राज्यात कोरोनाचे ११६ रुग्ण ; अशी आहे प्रत्येक राज्यातील रुग्णांची आकडेवारी

कोरोना व्हायरसची भीती भारतातही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सोमवारपर्यंत  दि. १६ पर्यंत देशभरात जवळपास 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.

भाऊचा धक्का ते मांडवा फेरी सेवा सुरु

महाराष्ट्र सरकारने जलवाहतुकीसंदर्भातील नवीन पाऊल सध्या उचललं असून विशेष प्रस्तावानुसार भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे.

शांततेचं श्रेय जम्मू काश्मीरमधील लोकांना – अल्ताफ बुखारी

जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतरही शांतता नांदण्यासाठी कुणी जास्त सहकार्य केलं असेल तर ते जम्मू काश्मीरचे लोक आहेत असं म्हणत जम्मू काश्मीरमधील नेते अल्ताफ बुखारी यांनी इथल्या लोकांचं कौतुक केलं आहे.