ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे
परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.
परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.
‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.
निवडणूक प्रचारात पाण्याचा मुद्दा दुर्लक्षिला जात असल्याने पनवेल महापालिका हद्दीतील रोडपली येथील द स्प्रिंग नामक सोसायटीच्या सर्वच 325 कुटुंबांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सोमवारी विदर्भात प्रचाराला येत आहेत. सोमवारी, सकाळी ७.३० वाजता ते खासगी विमानाने नागपूर विमानतळावर येतील. विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांकडून स्वागताचा स्वीकार करून ते वणी येथे रवाना होतील.
पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने एसटी वेळेत येत नाही. तसेच घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतं.
मतदारांच्या दारोदारी जाऊन त्यांना आवाहन करणं तसेच गावागावात सभा घेणं हे प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र वाशीममध्ये बसपाकडून होत असलेल्या जादूच्या प्रयोगाचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच लक्ष वेधून घेत आहे.
उदयनराजे भोसले लोकसभा पोटनिवडणुकीत २ लाख मतांनी पराभूत होणार आहेत असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
देशात कोणत्याही एका पक्षाचं मोठं होणं हे लोकशाहीला घातक असल्यामुळे निवडणुकांच्या बाबतीत पारदर्शकता राहण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
‘अतुल भोसले ना एकदा आमदार करा मी त्यांना महाराष्ट्राचा नेता करेन’ असे ठोस आश्वासन केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कराड येथे दिले. सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. यावेळी दोन्ही मतदारसंघांचे उमेदवार उदयनराजे आणि अतुल भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याची अमित शहा यांनी उपस्थित लोकांना विनंती केली.
अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय. मात्र, मुर्तिजापुरात आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पिंगळे यांनी केलेलं ताज भाषण जिल्हा भाजपातील गटबाजी कोणत्या थराला गेली आहे याचेच संकेत देणारे आहे.