या देशात अहंकाराला माफी नाही – प्रियांका गांधी

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. या देशाने कधीही अहंकार आणि गर्व करणाऱ्यांना कधीच माफ केले नाही, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केलीय. हरयाणातील अंबाला येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी प्रियंका यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. या देशाने कधीही अहंकार आणि गर्व करणाऱ्यांना कधीच माफ केले नाही. इतिहास, महाभारत याची साक्ष देतो. महाभारताचेच उदाहरण देत प्रियंका यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. दुर्योधनासही असाच अहंकार झाला होता, श्रीकृष्ण जेव्हा दुर्योधनाला सत्य समजाविण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना बंदी बनविण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला. त्यावरच, राष्ट्रकवी रामधारीसिंह दीनकर यांच्या कवितेतील ओळी प्रयंका यांनी म्हणून दाखवल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here