भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक ? गृहमंत्र्यांचे संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुजफ्फरपूर | भारतीय लष्कराने सीमेवर दोन – तीन दिवसांपूर्वी सर्जिकल स्ट्राइक सारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत केद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. ‘आपल्या जवानांनी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक सारखं असं काही केलं आहे ज्याची माहिती तुम्हाला लवकरच कळेल’, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याची माहिती दिली आहे.

त्याचबरोबर आपल्या सैन्यासोबतची क्रुरता सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मात्र यावेळी नेमकं काय झालं आहे हे आत्ताच सांगणार नाही असं म्हणुन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईकवर अधिक बोलण्याचे टाळले.

Leave a Comment