Rice Farming | भातशेती करताना ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी; उत्पनात होईल भरभराट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rice Farming | तांदूळ हे भारतातील प्रमुख पीक आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तांदळाची लागवड केली जाते. शेतकरी दरवर्षी शेतात कष्ट करून हा तांदूळ लावतात. त्यामुळे जगभरातील लोकांना रोज तांदूळ खायला मिळतो. भात शेती असो किंवा इतर कोणत्याही धान्य असो. परंतु प्रत्येक पिकाचे शेतकऱ्याला संरक्षण करावे लागते. त्याची काळजी घ्यावी लागते. तसेच ते पीक खराब होऊ नये. या गोष्टीची देखील काळजी घ्यावी लागते. आता पावसाळा चालू झालेला आहे. आणि भात लागवड करायला देखील अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज आपण भात शेतीची (Rice Farming) काळजी कशाप्रकारे घ्यावी याबद्दल माहिती सांगणार आहोत.

या गोष्टींची काळजी घ्या | Rice Farming

भात शेती ही खरीप हंगामातील एक महत्त्वाची शेती आहे. अनेक राज्यांमध्ये भात पिकाची शेती केली जाते. तांदूळ हे पीक पोष्टिकतेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. संपूर्ण तांदळाचा वापर केला जातो. भारतामध्ये खरीप हंगामात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि झारखंड या ठिकाणी भाताची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

बियाणे शुद्ध करणे आवश्यक आहे

शेतकरी बांधवांनी सिंचनाची साधने चांगली ठेवावीत. कारण भातशेतीसाठी भरपूर पाणी लागते. याशिवाय भाताची मशागत आणि पेरणी ही प्रत्यारोपणाच्या माध्यमातून केली जाते, अशा परिस्थितीत भातपिक जितक्या लवकर लावली जाईल तितक्या लवकर पीक तयार होऊन पिकेल आणि तुम्हाला नफाही लवकर मिळू शकेल. भात लागवडीपूर्वी बियाणे शुद्ध करणे देखील खूप महत्वाचे आहे, बियाणे शुद्धीकरणाने भातशेतीतील नफा वाढू शकतो. त्यामुळे किडीचा धोका टाळण्यासाठी क्लोरो सायपर किंवा इमिडाक्लोप्रिडची फवारणी करणेही अत्यंत आवश्यक आहे. भातशेतीमध्ये बेड तयार केल्यास पिकात वाढ दिसून येते. शेतकऱ्याने आपल्या क्षेत्रानुसार भात पीक व बियाणे निवडावे, जेणेकरून नुकसान होण्याची शक्यता कमी असते.