मैदानावर झोपला, हात आपटून रडला!! रोहित वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरले. अतिशय रोमांचक असा या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यासह सर्वच खेळाडूंच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली होती. खूप वर्षांनी विश्वचषक जिंकल्याचे समाधान खेळाडूंच्या चेहऱ्यावर दिसत होते. यादरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma Emotional) केलेली कृती सर्वांच्याच चांगली लक्षात राहील.

रोहित शर्माने विजयानंतर काय केलं?

हार्दिक पंड्याने सामन्यातील शेवटचा चेंडू टाकताच भारताचा विजय झाला. यानंतर रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात मैदानावर हात आपटून रडू लागला. यानंतर ज्या खेळपट्टीवर हा सामना पार पडला, त्या खेळपट्टीची माती रोहितने तोंडात घातली आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीपुढे नतमस्तक झाला. रोहितशिवाय इतर सर्व खेळाडूंना सुद्धा आनंदाश्रू अनावर झाले होते. भारतीय संघासाठी आपल्या देशासाठी हा क्षण अत्यंत भावुक असा होता. आयसीसीने याबाबतचा विडिओ शेअर केला आहे. हा विडिओ पाहताच प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यात पाणी येईल एव्हडं मात्र नक्की.

रोहित T-20 मधून निवृत्त –

दरम्यान, भारताला विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 क्रिकेट मधून निवृत्त्ती जाहीर केली. हा माझा शेवटचा सामना होता. निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. मला ती (ट्रॉफी) हवी होती. हे शब्दात मांडणे खूप कठीण आहे. मला हेच हवे होते आणि हेच घडले. मी माझ्या आयुष्यात यासाठी खूप हताश होतो. यावेळी आम्ही सर्व सीमा पार करून वर्ल्डकप जिंकलो याचा आनंद झाला. असं म्हणत रोहित शर्माने T20 मधून निवृत्ती (Rohit Sharma Retirement) जाहीर केली.

कस आहे रोहितचे T20 करिअर ?

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहोतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. 2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो एक भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.