हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाची आन बान आणि शान हिटमॅन रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती (Rohit Sharma Retired) जाहीर केली. रोहित यापूर्वी T २० फॉरमॅट मधून आधीच निवृत्त झालाय. आता कसोटीमधून निवृत्ती घेत त्याने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. रोहितच्या या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेतलं असता समोर धक्कादायक माहिती आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपल्याला कर्णधार म्हणून विचारात घेऊ नये असं रोहितने निवड समितीला अगोदरच सांगितलं होत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, खरं तर रोहितला इंग्लंड विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिले २ सामने खेळायचे होते. त्यामध्ये त्याचा खेळ कसा कसा होतोय ते पाहून तो कसोटी कारकिर्दीबाबत निर्णय घेणार होता. रोहितने स्वतः कसोटी कर्णधारपद सोडण्याची ऑफर दिली होती. गेल्या आठवड्यात त्याने निवडकर्त्यांना कळवले होते की त्यांनी कर्णधार पदासाठी इतर पर्याय शोधावेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो स्वतःचीच टेस्टिंग घेणार होता. परंतु रोहितची हि आयडिया बीसीसीआयला पटली नाही. निवडकर्त्यांनी रोहितची भेट घेतली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला माहिती देण्यात आली. त्यांना सांगण्यात आलं कि असं केल्यास भारतीय संघावर नेतृत्वावर चुकीचा परिणाम होईल. निवडकर्त्यांना अशा खेळाडूची कर्णधार म्हणून नियुक्ती करायची होती जो दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकेल. निवडकर्त्यांच्या या विचारानंतर रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. (Rohit Sharma Retired)
पुढचा कर्णधार कोण?
रोहित शर्माने कसोटी मधून निवृत्ती घेतल्यानंतर पुढचा कर्णधार कोण होणार? यावर सुद्धा चर्चा झाली.. सुरुवातीला विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची नावे आघाडीवर होते, दोघांच्याही नावांवर बरीच चर्चा झाली पण वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिपच्या दृष्टीने बीसीसीआयला तरुण कर्णधार पाहिजे… त्यादृष्टीने शुभमन गिल आणि विकेटकिपर फलंदाज रिषभ पंतच्या नावावर चर्चा सुरु आहे. यातही शुभमन गिलचे नाव आघाडीवर आहे. कारण रिषभ पंतचा सध्याचा फॉर्म खराब आहे, तर गिल सुपर फॉर्मात आहे.
रोहितची कसोटी कारकीर्द कशी राहिली- Rohit Sharma Retired
रोहित शर्माने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4 हजार 302 धावा केल्या आहेत. त्याने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं होतं. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.