ठाकरे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार ; सदाभाऊंचा हल्लाबोल

0
41
sadabhau khot uddhav thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं आघाडीचं सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकी सरकार आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सदाभाऊ खोत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार आहे. सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचं काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येते, अशी टीका खोत यांनी केली.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता केंद्राला साकडे घालण्याचा उद्योग या सरकारकडून करण्यात येत आहे. मग दीड वर्ष तुम्ही झोपा काढत होता का? असा सवाल करतानाच या सरकारने केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडे घातले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here